डॉ.उमेश वावरे यांच्या नेतृत्वात मिल कामगार व कुटुंबाचा तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा !

0
337

 

सचिन वाघे वर्धा
5.7.21
हिंगणघाट :- मोहता कंपनी 135 वर्षं जुनी असुन हिंगणघाट व ग्रामीण भागातील संपूर्ण उदरनिर्वाह त्या कंपनीवर अवलंबून आहे. कंपनी संचालक मंडळाकडून अचानक मिल बंद केल्यामुळे कामगार व कुटुंबाच्यावर उपासमारी चि वेळ आली आहे. अनेक कामगाराचे वय हे 30 ते 40 च्या दरम्यान असुन रोजगाराच्या पेचप्रसंग निर्माण झाला आहे. मागील अनेक महिण्याचे वेतन कामगाराना मिळाले नाही.संचालक मंडळास गिरणी बंद करावयाची असेल तर संपूर्ण कामगाराना कंपनी अक्ट नुसार व्हीआरस देण्यात यावे.
व प्रोत्साहन 10 लाख देण्यात यावे.
त्यानचा हक्काचा पैसा देण्यात यावा अन्यथा कामगारा समोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही..जर एखादा कामगाराने आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? अशी घटना घडल्यास स्वतः मिलमालकास जबाबदार धरून संचालक मंडळावर 302 नुसार गुन्हा दाखल करावा का? मिल कामगाराची सोसायटी असून त्या सोसाटिचे रक्कम 36 लाख रूपये मिलमालकांकडे अजूननही जमा आहे तो पैसा सोसायटीकडे जमा करण्यात यावा ईएसआय चि रक्कम मिलमालकाने भरली नसल्यामुळे कामगाराना ईएसआय चे लाभ मिळणे बंद आहे , त्वरित मिलमालकाकडून ईएसआय च्या रक्कम भरण्यात यावी जर 8 दिवसात मागणी मान्य नाही झाली तर या पेक्षा तिव्र आदोलन करण्यात येईल असा ईशारा देण्यात आला, उपविभागीय अधिकारी यांना
निवेदन देताना. दिलीप कहूरके, मनिष कांबळे,राजेश खानकूरे, प्रदीप माणिकपुरे ,विलास ढोबळे ,देवराव साबळे ,अरूण काळे, गुलाबराव पिपळशेंडे , अनिल तादूळकर ,रत्नाकर कुंभारे ,मधुकर जागडे ,नितिन कानकाटे ,जिवन उरकुडे व अन्य मिल कामगार व महिला
उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here