हिंगणघाट: -5 मे दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयात पटवारी कार्यालय हिंगणघाट येथे म्हाताऱ्या , अपंग निराधार लोकांची गर्दी झाली होती आणि पटवारी कार्यालय बंद करून वर्धा येथे गेले होते . आज कार्यालय बंद राहणार हे माहीत असूनही पटवारी यांनी त्यांना आज बोलावले होते . आणि ही अपंग निराधार लोकांची गर्दी आजच नाही तर गेल्या दीड , दोन महिन्यापासून सतत लोक पटवारी कार्यालय ला गर्दी करत आहे . आज मे महिन्यातील उन 47,48 डिग्री उन्हाचा तडाखा 4 महिन्या पासून निराधारांच्या मानधन अडवल्या गेले आणि सरकारने म्हातार्या निराधार अपंग विधवा लोकाना तहसील चे चकरा मारण्यास मजबूर केले आहे कारण दरवर्षी लागणाऱ्या हयतीच्या प्रमाणपत्र सोबत आता 21000 चे उत्पन्न प्रमाणपत्र ही त्यांना मागितल्या जाते आणि थंब घेण्यासाठी त्यांना बोलल्या जाते.
व पटवारी साहेब चौकशी करतो म्हणून टाळाटाळ करतात बिचारे निराधार रोज पटवारी कार्यालय ला उन्हा तानात पायदळ येतात . यावर आमदार समीर कुणावर व तहसीलदार यांना वारंवार सांगितले एवढेच नव्हे तर मंत्रालायात विशेष सहाय्य विभागाची भेटही घेतली पण सरकार आणि प्रशासना चे या कडे लक्ष देण्याचा काही हेतू दिसत नाही या म्हातार्या निराधारांना भर उन्हाच्या तडाख्यात काही झाले तर सरकार आणि प्रशासनच जबाबदार राहतील ?
निराधारांना आधीच 1000 रू तुटपुंजे मासीक अनुदान देवून त्यांची क्रूर थटा केली जाते .व 4, 5 महिने रेगुलर मानधन दिल्या जात नाही अडविल्या जाते . आमदार ,खासदार , नगरसेवक , सरपंचांनी आप आपल्या गावातील एरियात निराधारांना त्रास होऊ नये यासाठी ही लक्ष घातले पाहिजे कारण निराधारांच्या वाली कोणीच नाही . 21000 उत्पन्न दाखला नाही मिळाला तर त्यांचे येत असलेले निराधार मानधन बंद पडेल आणि निराधार वर्ग पुन्हा रस्त्यावर येईल अशी चिंता निराधार संघटनेचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मंगला ताई ठक यांनी दर्शविली आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा