निर्गुण नदीला खूप मोठा पूर नागरिकांना मध्ये भीतीचे वातावरण.

 

नासिर शहा
पातूर प्रतिनिधी

पातूर तालुक्यातील निर्गुण नदीला काल दी.१३ सप्टे.२०२० रोजी रात्री ९:३० ते १०:०० वाजता खूप मोठा पूर आला पुलावरून पाणी वाहत होते आणि आलेगाव येथील वाळकेश्र्वर मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा घातला होता व गोठान वरील घरांमध्ये पाणी शिरले तसेच गुरांच्या गोठ्यांमध्ये सुध्दा पाणी भरले गेले गावातील लोक जागे होते म्हणून सुदैवाने नुकसान टळले. नाहीतर खूप मोठी हानी झाली असती. चोंढी येथील धरण १००%भरलेले आहे त्यामुळे केंव्हाही नदीला पूर येऊ शकतो व मोठी हानी सुद्धा होऊ शकते म्हणून नागरिकांनी सतर्क राहणे खूप गरजेचे आहे प्रशासनाने सुद्धा जनजागृती करून उपाय योजना करणे गरजेचे आहे असे सुज्ञ नागरिकांमध्ये बोलले जात आहे

Leave a Comment