बच्चू कडुंच मोठं वक्तव्य नाही तर भाजपा मध्ये करू प्रवेश

 

अमरावती | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाचा देशभरातून विरोध केला जात आहे. अशातच राज्याचे शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

कृषी विधेयकात शेतकऱ्यांना 50 टक्के नफा धरून भाव देऊ आणि याच भावात शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करू, असं केल्यास आम्ही भाजपमध्ये प्रवेश करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात भाजपच्या महिला नेत्या गप्प आहेत. महिला अत्याचार प्रकरणात पक्ष न पाहता महिलांनी पुढे यावं, असं आवाहनही कडू यांनी केलं आहे.

Leave a Comment