सतीश मुलंगे सह जगन मोरे
लोणार येथील भगवान बाबा महाविद्यालय येथे दि. १२/१२/२०२१ वार रविवारला प्रा. पुरुषोत्तम चव्हाण लिखित ” हे बंध रेशमाचे ” या चारोळी संग्रहाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते कवी व साहित्यिकांच्या उपस्तितीत उत्साहात संपन्न झाला. या चारोळी संग्रहाचे प्रकाशन मा. श्री वामनराव सांगळे (से.नि.न्यायाधीश) यांच्या हस्ते जेष्ठ साहित्यिक उषाताई फड, श्री प्रा. गजानन खरात (नगरसेवक), डॉ.एस.जी.बडे (प्राचार्य, भ.बा. महाविद्यालय) श्री सा.ना.इंगळे (अध्यक्ष, अंकुर साहित्य संघ शाखा लोणार) यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. पहिल्या सत्राचे सुत्रसंचालन श्री. प्रविण इंगळे सर आभारप्रदर्शन दत्ता पवार यांनी केले.
कार्यक्रमाचे दुसरे संत्र म्हणजे कविसंमेलनाला अध्यक्ष म्हणून अॅड. विजयकुमार कस्तुरे, तर प्रमुख अतिथी म्हणून उषाताई फड, पा.मा. गायकवाड, प्राचार्य पंढरीनाथ शेळके, रामदास कोरडे, अभिमन्यू मगर उपस्थित होते.
कविता सादरीकरणामध्ये विद्याताई सरपाते, अशोक भालेराव सर, बांगर साहेब, एजाज खान, रामदास कोरडे,प्रदिप इक्कर, दत्ता खुळे, कातिब लोणारवी, अभिमन्यु मगर, प्रा.सोडनर, राजेश्वर चव्हाण, प्रा. अशोक सारडा, प्रशांत डोंगरदिवे, जगदिश नरवाडे, प्रा. पंढरीनाथ शेळके, सा.ना.इंगळे, रतन डोंगरे, शत्रुघ्न कुसंबे, विजय दळवी, कु. सपना दळवी, दत्ता पवार, विद्याधर चिपडे, रमेश थोरात, कैलास शिवणकर, वैशाली देशमुख मॅडम, तेजनकर सर, पा.मा. गायकवाड, शेख इरफान, ज्ञानेश पंचागे, रमेश थोरात (कविरेश), जगन अवचार, व सोनाली दळवी, आदी कविंनी आपला सहभाग नोंदवला. अॅड. कस्तुरे साहेब यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये साहित्यिक हा समाजाचा आरसा असल्यामुळे बदलत्या समाजाच्या बदलत्या समस्या समाजापुढे मांडण्याचे व त्यांना वाचा फोडण्याचे काम आपल्या लेखानातून व साहित्यातून करावे असा साहित्यिकांना मोलाचा संदेश दिला. या कार्यक्रमाचे आभार श्री रमेश थोरात सर यांनी केले. तर सुत्रसंचालन प्रा.पुरुषोत्तम चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानिक अंकुर साहित्य संघाचे सचिव श्री विद्याधर चिपडे व पदाधिकारी तसेच भगवान बाबा महाविद्यालयाचे कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. सदर कार्यक्रम हा जेष्ठ साहित्यिक पाचपावलीकार मा.ज.ह. खरात (भाऊसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.