जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी गावाबाहेर शेतात घटमांडणी करून जे काय भाकीत वर्तविण्याची ची प्रथा परंपरा आहे हे भाकीत केवळ एक थोतांड आहे. संभाव्यतेच्या नियमावर आधारित असं भाकित कोणीही शिकलेला किंवा न शिकलेला निरक्षर व्यक्ती देखील परिस्थितीजन्य तार्किक विचार करून एकंदरित पर्जन्यमानाचा, हवामानाचा,पर्यावरणाचा शासकीय कार्यालयात वर्तवलेल्या अंदाजांचा अभ्यास करुन असे भाकिते वर्तवले जाऊ शकतो.असे म्हटल्या जातं की चंद्रभान वाघ या व्यक्तीला निलवंती नावाची विद्या प्राप्त होती आणि आता जे पुंजाजी रामदास वाघ भाकित करतात ते त्यांचेच वंशज आहेत .खरंच या कुटुंबामध्ये जर अशी निलवंती किंवा कुठलीही अलौकिक शक्ती किंवा अतिंद्रिय शक्ती जर अस्तित्वात असेल तर यांनी ते सिद्ध करण्यासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे 25 लाखाचे आव्हान स्वीकारावे. देशातील अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था, संरक्षण व्यवस्था, पर्जन्यमान आणि पीक पाणी इत्यादी वेगवेगळ्या विषयावर हे भविष्य वर्तवतात. खरच हे भविष्य संपूर्णपणे खरे ठरतात का ? संभाव्यतेच्या नियमानुसार शंभर भाकिते जर कोणी सांगितली तर त्यातली 50% भाकिते खरी ठरण्याचा संभव हा निश्चितच असतो. त्याचप्रमाणे असं म्हटलं जातं की तीनशे ते साडेतीनशे वर्षाची भाकिते वर्तवण्याची परंपरा या घराला लाभलेली आहे . परंतु प्रत्यक्ष चौकशी केली असता यांच्याकडे 300 वर्षाचे कुठलेही पुरावे नाहीत.भाकिते वर्तवण्याचे पुरावे तर नाहीतच परंतु तीनशे वर्षांपासून आम्ही वर्तवलेलं भाकित हे खरे ठरतात हे देखील पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत. आता या घराण्यातील वारस पुंजाजी वाघ हे अत्यंत साधे भोळे व्यक्ती आहेत. परंतु त्यांच्या भावबंदकितील जे सारंगधर वाघ आहेत हेच तार्किक विचार करून भाकित वर्तवण्याचे लुडबूड करताना दिसून येतात. ही फक्त एक अंधश्रद्धा आहे असे शेतकऱ्यांनी आणि या शेतकऱ्याच्या भावी पिढीतील युवकांनी अशा थोतांडावर विश्वास न ठेवता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती करावी बळीराजानी अशा अंधश्रद्धेला बळी पडू नये ही विनंती करत आहोत. 25 लाखाचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अवाहन आहेच. यांनी सांगितलेले भाकिते खरच तपासून पाहिले तर अलीकडच्या 20-25 वर्षातील भाकिते पूर्णपणे खरे ठरल्याचे दिसून येत नाही. मागील वर्षीचे जर यांचे भाकीत तपासले तर यांनी असं म्हटलं होतं की कपाशीचे पीक उत्तम येईल पण कपाशी नाममात्र पीक आले.हरभरा पीक साधारण सांगितले होते पण सर्वत्र ते पीक उत्कृष्ट आले. उडीद मुगाचे पिके साधारण राहील परंतु उडीद मुगाचे पीक हे त्यांच्या तालुक्यामध्ये शून्य होते. घटमांडणी मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धान्य ठेवतात परंतु कपाशीनंतर सोयाबीनचा पेरा असतो तरी घटमांडणी मध्ये सोयाबीनला मात्र थारा नाही. कारण सोयाबीनचे पीक हे या भागांमध्ये आलीकडे म्हणजे जवळ जवळ 30 वर्षापासून जास्त प्रमाणात घेतल्या जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या घटामध्ये कुरडई, करंजी ,पुरी या सारख्या पदार्थांचा वापर करतात किंवा यासारखे पदार्थ तिथे त्या साहित्यामध्ये मांडतात वास्तविक हे पदार्थ तर महिलाच बनवतात परंतु या ही घटमांडणी जेव्हा चालते त्या परंपरेमध्ये त्या कुठेही महिला समाविष्ट झालेली दिसून येत नाही .वास्तविक त्यांना तिथे प्रवेश दिला जात नाही. आणि हे घटमांडणी गावाबाहेर शेतामध्ये केल्या जाते आणि आतापर्यंत तिथे कुठेच महिला उपस्थित दिसत नाही म्हणजे तिथे स्त्री-पुरुष असमानता देखील जोपासल्या जात नाही. अशा भाकितांवर विश्वास ठेवून जर बळीराजा आपले निर्णय घेत असेल तर जग चालले पूर्वेकडे आणि आम्ही चाललो पश्चिमेकडे अशी आपली दुर्दशा होण्यास वेळ लागणार नाही. जादूटोणा विरोधी कायद्या 2013 नुसार असे अंधश्रद्धा युक्त कार्यक्रम पसरवणे अंधश्रद्धेचे भाकिते करणे ,आमच्यामध्ये किंवा आमच्या वारसाकडे किंवा आमच्या कुटुंबाकडे काहीतरी अलौकिक ,अद्वितीय शक्ती आहे असे म्हणणे हे गुन्हा पात्र कृतीमध्ये मोडते. अशा गुन्हा पात्र कृती केल्यास या कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो.
—- प्रतिभा भुतेकर ,आखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती ,महिला अध्यक्ष जिल्हा बुलडाणा. जादुटोणा प्रतिबंध कायदा (PIMC govt.of maha.) अशासकिय सदस्य बुलडाणा