महावितरणाच्या भोंगळ कारभारा विरोधात काँग्रेसचा आक्रोश

0
226

 

विजेचा लपंडाव बंद न झाल्यास कार्यालयाला कुलूप मारू : राजूरेड्डी

(चंद्रपूर घुग्घुस) प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : राज्यात सर्वात जास्त प्रदूषित व उष्ण तापमान असलेल्या शहरात सध्या नागरिक विजेच्या लपंडावाने त्रस्त झालेले आहे.
नागरिकांना होत असलेला जीवघेणा त्रास लक्षात घेता काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांनी पदाधिकाऱ्यांन सह महावितरण कार्यालयावर धडक दिली व उपस्थित अधिकारी यांची चांगलीच कान उघाडणी केली येत्या आठ दिवसात शहरातील वीज समस्या निकाली काढण्यात आल्या नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकू असा सज्जड दम रेड्डी यांनी दिला.

काँग्रेस अध्यक्षाचा रौद्ररूप बघून महावितरण अधिकारी डी. वाय.अनिल पेंदोर यांनी शक्य तितक्या लवकर विज समस्या निकाली काढण्यात येईल.
व नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात येईल विजेचा लपंडाव शक्य तितक्या लवकर नियंत्रित करण्याचे आश्वासन दिल्याने काँग्रेस नेत्यांनी कार्यालयातून माघार घेतली.
सदर कार्यालयात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

शहरात सध्या उन्हाचा पारा 45 ते 47 डिग्री इतका वाढला असून या भीषण गर्मीत एसी कूलर शिवाय जगणे कठीण जाहे

दिवसभरात अनेक वेळा विज येत जात असल्याने व्यापाऱ्यांचे कामे रखडतात व रात्री तर हमखास अनेक वेळा विजेचा लंपडाव सुरू असल्याने नागरिकांची झोप होत नसल्याने नागरिकांना चीड – चीड डोकं दुःखी सारखे अनेक आजार होत आहे.

महावितरण विज बिला साठी नागरिकांना त्रास देत असते
मात्र विज पुरवठया कडे लक्ष दिल्या जात नाही.

यामुळे संतप्त काँग्रेस पदाधिकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक दिली

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर,अलीम शेख, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी,रोहित डाकुर, मोसिंम शेख,नुरूल सिद्दीकी,सुकुमार गुंडेटी,अनुप भंडारी, देव भंडारी,साहिल सैय्यद,रफिक शेख,कपिल गोगला, बालकिशन कुळसंगे,सुनील पाटील, अंकुश सपाटे, रंजीत राखुंडे ,आरिफ शेख, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here