Home Breaking News यावल तालुक्यात कोरोना संसर्गामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्युत्तर दोन हजार पॉझीटीव्ह...

यावल तालुक्यात कोरोना संसर्गामुळे एका वर्षात ८१ जणांचा मृत्युत्तर दोन हजार पॉझीटीव्ह रुग्ण व८६० प्रतिबंधीत क्षेत्र

0
335

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

संपुर्ण जगासह महाराष्ट्र राज्यात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणु संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , यात कोरोना बाधीत ८१ नागरीकांचा मृत्यु झाला असुन एक वर्षात सुमारे दोन हजार लोक हे कोरोना बाधीत आढळुन आले आहेत . दरम्यान मागील वर्षी यावल तालुक्यात कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केन्द्र आणी राज्य शासनाने २२ मार्च २०२०च्या मध्यरात्री पासुन संचारबंदी लागु करण्यात आली होती . या काळात सर्वप्रथम कोरोना पॉझीटीव्ह रुग्णहेकोरपावली तालुका यावल येथे तर यावल शहरातही जुन अखेर शहरातील सुर्दशन चित्र मंदीर परिसरात डॉ . सलीम शेख यांचे कुटुंबातील त्यांचा मुलगा हा कोरोना बाधीत आढळुन आला होता , यावेळी पॉझीटीव्ह रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबांच्या सुरक्षेसाठी ग्रामीण परिसरात एकुण ६१२ प्रतिबंधीत क्षेत्र तर शहरी भागात २४५ प्रतिबंधीत क्षेत्र अशी ८६० प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत करण्यात आली होती. या महामारीच्या कठीन व संकटमय समयी तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली यावलचे तत्कालीन तहसीलदार जितेन्द्र कुवर , तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसुल व पोतीस प्रशासना तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य प्रशासनाने लक्ष वेधणारे असे उल्लेखनिय कार्य केलीत, या कार्यात त्यांना यावल नगर परिषद आणी फैजपुर नगर परिषदचे अधिकारी व कर्मचारी यांचे बहुमुल्प सहकार्य मिळाले . यावेळी फैजपुर विभागाचे तत्कालीन प्रांत अधिकारी डॉ . अजीत थोरबोले यांनी घेतलेले धाडसी निर्णय आणी यावलचे तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांनी कोरोना काळात केलेल्या नागरिक शासन आदेशाची अमलबजावणी साठीचे घेतलेले कठोर निर्णय व त्यासाठीचे अथक प्रयत्न हे असमरणीय आहे . दरम्यान आज कोरोना संसर्गाच्या महामारीस एक वर्ष पुर्ण झाले असुन , मागील वर्षाच्या मिळालेल्या बाधीत रुग्णांच्या तुलनेत गेल्या दहा दिवसात मिळालेले ३७०पॉझीटीव्ह रुग्णसंख्या ही अत्यंत धोकादादक व आरोग्य यंत्रणेसह प्रशासनाची चिंता वाढवणारे आहे , याकरीता वारंवार प्रशासनाच्या वतीने सोशल डिस्टेंसिंग, मास्क वापरणे , सार्वजनिक ठीकाणी अनाश्यक गर्दी टाळणे या सर्व नियमांची काटेकोर अमलबजावणी होणे अत्यंत गरजे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here