घुग्घुस काँग्रेस तर्फे जन समस्यांचा आढावा
(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : शहरातील पारा सध्या 47 डिग्रीच्या जवळपास असून वाढत्या तापमानाने व भीषण उन्हामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झालेले आहेत.
असे असताना शहरात सर्वत्र भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने नागरिकांना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे.
शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजे मध्ये कूलरचा हा सर्वात महत्वपूर्ण घटक झालेला आहे.
या जीवघेण्या परिस्थितीत शहरात सर्वत्र पाणी टंचाई झाली असून नागरिकांना पिण्याचा पाणी ही मिळेनासा झाला आहे.
नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन आज दिनांक 07 मे रोजी
काँग्रेस अध्यक्ष राजूरेडडी कामगार नेते सैय्यद अनवर यांनी शास्त्री नगर भागाची पाहणी केली नागरिकांन तर्फे समस्या जाणून घेतल्या व समस्या निवारणासाठी वेकोलि अधिकाऱ्याला वॉर्डांत बोलावून संपूर्ण परिसरात फिरवून
समस्येशी अवगत करण्यात आले
व तातळीने समस्या निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आले.
व नागरिकांना तत्काळ वॉटर टँकर द्वारे नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्यात आले
याप्रसंगी सौ. पुष्पा कणकम, अविनाश गोगुर्ले, बालकिशन कुळसंगे, व मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित होते.