राजूरेड्डीच्या नेतृत्वाखाली स्थानिकांचा एल्गार
(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला
घुग्घुस : चंद्रपूर जिल्ह्यातील औद्योगिक शहर हे वर्ष 2020 जानेवारी ते मार्च प्रदूषण मंडळाच्या अहवालात घुग्घुस हा प्रदूषित क्षेत्राच्या यादीत झळकले होते शहरातील प्रदूषणात लोयडस मेंटल्स कंपनीचे मोठे योगदान आहे.
शहरातील प्रदूषणात सिंहाचा वाटा घेणारी ही कंपनी गावाच्या विकासा करीत खारीचा वाटा ही उचलत नाही.
प्रदूषणा सह ही कंपनी सुरक्षिततेच्या बाबतीत अत्यंत धोकादायक असून येथे मोठ्या प्रमाणात झालेल्या अपघातात कामगारांना जीव गमवावा लागतो
काही दिवसांपूर्वी नुकतेच या कंपनीच्या साडे सातशे कोटीच्या कारखाना विस्तारीकरणासाठी जनसुनावणी घेण्यात आली.
नव्याने निर्माण होऊ घातलेल्या या कंपनीत स्थानिकांना डावलून बाहेरील युवकांना गुप – चूप रीत्या घेण्याचे कट कारस्थान रचल्या जात आहेत.
याचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिकांच्या हक्कासाठी 30 डिसेंम्बर रोजी गांधी चौक घुग्घुस ते लोयडस मेंटल्स पर्यंत काँग्रेस शहर अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात येत आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या
1) प्रदूषण नियंत्रणा करिता नवीन प्रदूषण नियंत्रक यंत्र, इलेक्ट्रोस्टेटीक प्रिपीसेटेटर (ESP) बसविण्यात यावी.
2) घुग्घुस येथील स्थानिकांना तातळीने रोजगार उपलब्ध करून घ्यावा.
3) शहरातील बस स्थानक परिसरातील तुमचा अपघातास कारणीभूत जडवाहतुकीचा मार्ग बंद करून मागच्या बाजूने जडवाहतुक शुरु करावी
4) कंपनीच्या चार ही बाजूने सरंक्षक भिंत उभारावी.
5) सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) मधून केमिकल वॉर्ड, अमराई व शहरातील अन्य भागांत हँडपंप, व्यायामशाळा,रस्ते,नाल्या, निर्माण करण्यात यावे.
6) प्रत्येक रविवारी शहरातील गरीब वस्तीत मोफत रोग निवारण शिबीर आयोजित करण्यात यावे.
7) शांतीनगर ही वस्ती कंपनी निर्माणा करिता स्थलांतरित केली व ही वस्ती उठवतांना त्यांना स्थायी स्वरूपाचे घरपट्टे देण्याचे व वस्तीचे पालकत्व घेतले होते.
मात्र गेली 25 वर्ष गरीब नागरिकांना वाऱ्यावर सोडून हात झटकले त्यांना तातळीने स्थायिक घरपट्टे द्यावे व शांती नगरचा विकास करावा.
8) धूळ नियंत्रणा करिता
शहराच्या प्रमुख रस्त्यावर दिवसातून तीन वेळा वॉटर टँकरने पाणी मारावे.
9) शहरात अनेक ठिकाणी पाणी टंचाई असून टंचाईग्रस्त भागात टँकर द्वारे पिण्याचे पाणी पुरविण्यात यावे.
10) शहरातील विधवा परित्यक्ता निराधार आई बहिणी करिता स्वयंरोजगार निर्मिती करीता आर्थिक साहाय्य करावे
उपरोक्त जनहिताच्या मागणीला घेऊन सदर आंदोलन करण्यात येत आहे.