हिंगणघाट:- केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हे शेतकऱ्यांच्या विषयी संवेदनशील नाही . केंद्र सरकार उन्मत्त होऊन हुकूमशाही असल्यासारखे वागत आहे . केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने आपल्या कारच्या खाली शेतकरी आंदोलकांना चीरडल्यानंतर त्या ठिकाणी हिंसाचार निर्माण झाला. यावरून असे वाटते की केंद्र सरकार हिंसाचाराला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. त्यामुळेच लखिमपुर सारखी घटना घडलेली दिसते .उत्तर प्रदेश चे योगी आदित्यनाथ यांचे सरकार सुद्धा शेतकर्यांच्या बाजूने न्याय देण्यास असमर्थ ठरत आहे. आणि म्हणूनच केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचे सरकार या दोन्ही सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. उत्तर प्रदेशातील लखिमपुर खेरी येथील शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांनी जाहीर निषेध नोंदविला आहे. त्या घटनेच्या निषेधार्थ दिनांक 11 ऑक्टोबर रोजी देशातील सर्व संघटनांनी भारत बंदचे आव्हान दिलेले आहे. त्या बंदच्या समर्थनार्थ विदर्भ विकास आघाडीचे पूर्ण समर्थन आहे. या द्वारे आम्ही हिंगणघाट मधील संपूर्ण संघटना आणि पक्ष यांना असे जाहीर आव्हान करतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्या करिता आणि तीनही काळे कायदे रद्द व्हावे. याकरिता सर्व संघटनांनी 11 ऑक्टोबर च्या बंदमध्ये सामील व्हावे.असे निवेदन तहसीलदार साहेबांद्वारे माननीय राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले. निवेदन देताना विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांचेसोबत महेश माकडे, दिनेश वाघ, चंद्रकांत नगराळे, रोशन पाटील, अजय मुळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा