शेतकऱ्याने मानले प्रहार शेतकरी संघटनेचे आभार

0
475

 

प्रतिनिधी – सचिन पगारे
नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील विलास लाठे यांच्या शेतातील डी.पी.गेल्या तिन महीन्यापासुन जळालेली होती.त्यांच्या शेतातील कांदे व बाजरी पीकाचे मोठे नुसकान झाले शेतकरी विलास लाठे यांनी संबंधीत वायरमन,सबस्टेशन येथील कर्मचाऱ्यांना कळवले देखील परंतु कोनीही दखल घेतली नाही.शेवटी शेतकऱ्याने शेवटचा पर्याय म्हणुन प्रहार शेतकरी संघटनेकडे धाव घेतली.प्रहार शेतकरी संघटनेने प्रत्यक्ष शेतात जाऊन पहानी करुन महावितन अधिकाऱ्यांशी व संबंधीत ठेकेदारांशी फोनवर चर्चा केली व सांगीतले की शेतकऱ्याचे फार मोठे नुसकान झाले आहे.तरी पुढील नुसकान होऊ नये म्हणुन शेतकऱ्यास त्वरीत डी.पी.देन्यात यावी.
परंतु महावितरणाच्या आधीकाऱ्यांनी व ठेकेदारांनी ऊडवा ऊडविचे ऊत्तरे दीली.
परंतु प्रहार शेतकरी संघटना ही वंदनीय राज्यमंत्री बच्चु भाऊ कडु यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन चालवलेली संघटना आहे.प्रहार संघटनेने सडेतोड भाषेत सांगीतले की दोन दीवसात शेतकऱ्याला न्याय नाही मिळाल्यास,शेतकऱ्याच्या शेतात डी.पी.नाही बसवल्यास प्रहार शेतकरी संघटना महावितरनाच्या कार्यलयापुढे अर्धनग्न आंदोलन करेल. तरी देखील डी.पी.दिली नाही.
शेवटी आज प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संदीप भाऊ सुर्यवंशी.चंद्रभान झोडगे,रविकांत भागवत,नवनाथ वरपे,शेतकरी विलास लाठे.हे आंदोलनासाठी गेले असता महावितरणाचे संबंधीत अधीकारी वाटपाडे साहेब यांनी सांगीतले की.आंदोलन करु नका तुम्हाला एक तासात डी.पी.देतो.आणि तासाभरात विलास लाठे यांची डी.पी.व ढेकु येथील गावठानची डी.पी.पोहच करन्यात आली.
त्यामुळे आता शेतकऱ्याचे होनारे नुसकान टळले.म्हणुन शेतकऱ्याने मोठ्या मनाने प्रहार शेतकरी संघटनेचे आभार मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here