समुद्रपूर :- तहसील येथे भुमी अभिलेख कार्यालयात शेतीचा रीनंबररिंग पर्ची काढण्याकरता दर्शन मुंजेवार गेले असता भुमिअभिलेख कार्यालयातून महा-ई-सेवा केंद्र प्रो. संदीप दरेकर यांच्याकडे चालान साठी पाठविले त्यांना चालान भरायचे आहे सांगितले त्यांनी माझ्याकडून चालान
भरण्याचे 200 रुपये मागितले मी फोन पे द्वारे पैसे दिले चालान रसीद वर 40 रुपये होते. 200 रुपये कसे घेतले ? आम्ही प्रत्येकाकडून इतकेच रुपये घेतो असे सांगितले. तुम्ही चाळीस रुपये चालान चे भरले मग दोनशे रुपये कसे घेतले यावरून वाद झाला तहसीलदार कडे सांगतो असे सांगितले असता ? जा सांग काही होत नाही असे उत्तर दिले ? तहसीलदार राजू गणवीर यांच्याकडे गेलो व त्यांना घडलेली हकीकत सांगितले त्यांनी नायब तहसीलदार सयाम साहेब यांना सोबत पाठवले . या ठिकाणी महा ई सेवा केंद्र या ठिकाणी जागेवर पंचनामा करताना
1)महा ई सेवा केंद्रा कडून कोणती सुविधा पुरवण्यात येते
,कोणत्या कामाचे किती रुपये घेण्यात येते याचा फलक नाही
या ठिकाणी महा इ सेवा केंद्र सेंटर दुसरी कडले व ठिकाण वेगळे, लायसन दुसऱ्याचे महा ई सेवा केंद्र चालवत आहे दुसरा . ग्राहकाकडून मनमर्जी नुसार पैसे घेतात , चार पट जास्त पैसे घेण्यात येत आहे . याप्रकरणात वरिष्ठांकडून महा ई सेवा केंद्र यांची चौकशी करुन कारवाई करायला पाहिजे . सध्या समुद्रपूर येथे महा-ई-सेवा केंद्र नाहीतर महालुट केंद्र सुरू आहे.
सुर्या मराठी न्यू साठी सचिन वाघे वर्धा