शेगाव येथून जवळ असलेल्या श्रीक्षेत्र नागझरी गावात सरपंच ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या संगनमताने विकास कामासाठी आलेल्या निधीचा दुरुपयोग करण्यात येत असून त्यामुळे नागरीक समस्यांच्या विळख्यात सापडलेले दिसत आहे याबाबत मंगळवार दिनांक सात डिसेंबर रोजी शेगाव तहसील कार्यालयात तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या निधीतून गावांमध्ये आरो लावण्यात येणार होते मात्र सदर प्लांट लावण्यात आलेले नाही. साशनाकडून मिळालेला निधी गमन करण्यात आला. अशी शंका गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे त्याचप्रमाणे गावांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत त्वरित कारवाई करून शुद्ध पाणी पिण्याचे पाणी उपलब्ध करून स्वच्छता उपलब्ध करून देण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.