गजानन सोनटक्के जळगाव जा
दि 22 सप्टेंबर पासून अतिक्रिमित टपऱ्या काढाव्या ही मागणी रेटून धरत सूनगाव येथील मोहनसिंह राजपूत व इतर चार यांचे ग्रामपंचायत समोर चालू असलेल्या उपोषणाला आज चौथा दिवस उजळला आहे टपरी धारकांना ग्रामपंचायत मासिक सभा 20 ऑगस्ट च्या ठरावानुसार नोटीस ग्रामपंचायत प्रशासनाने बजावली आहे व नंतर ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा कार्यकाळ संपल्यानंतर हे प्रकरण ग्रामपंचायत येथे प्रशासक रुजू झाल्यानंतर प्रशासक यांचेकडे आल्यानंतर त्यांनीसुद्धा संबंधित टपरी धारकांना दुसरी नोटीस बजावली आहे व नंतर ही प्रक्रिया ग्रामपंचायत प्रशासनाकडून थांबविली गेली आहे व ती प्रक्रिया पूर्ण करावी वरिष्ठ अधिकारी व प्रशासन यांनी या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी रेटून धरत उपोषण कर्त्यांनी आज सलग चौथ्या दिवशीही आपले उपोषण ग्रामपंचायत सूनगाव समोर चालूच ठेवले आहे



![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)



