सुनगाव वासियांचे पाण्यासाठी हाल ग्रामपंचायत पाणीपुरवठा 8 ते 10 दिवसांपासून बंद

0
507

 

गावकरी पित आहेत बोअरचे धोकादायक पाणी

140गाव पाणीपुरवठा योजना कागदावरच

गजानन सोनटक्के
ता.प्र./जळगाव जा

/दि1फेब्रु
तालुक्यातील सुनगाव चे नागरिक सध्या पाण्यासाठी वणवण फिरत असुन आठवडाभर पासुन ग्रामपंचायत ग्रामवासियानां पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत आहे.
त्यामूळे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत व प्राधिकरण कार्यालय गाठुन पत्रकारासमवेत आपली समस्या मांडली .
सविस्तर वृत्त असे की,
सद्य स्थितीत कागदपत्रे तपासले असता 2017 च्या करारानुसार सुनगाव हे प्रादेशिक 140 गाव पाणीपुरवठा योजना मधे समाविष्ट असून येथे करारानुसार वारी हनुमान चे पाणी पोचायला पाहिजे परंतु प्रत्यक्ष जाणून घेतले असता आजही140गाव योजना वारी हनुमानचे पाणी सुनगाव करांच्या नशिबात नसून गावच्या विविध दिशेने वेगवेगळ्या बोर मधून चार-पाच ठिकाणचे आरोग्यास धोकादायक पाणी जमा करून ते वितरित केल्या जात आहे आणि हे पाणी वितरण करीत असतांना सुद्धा त्यामध्ये नियमितता नाही ,
चार पाच दिवसातून नळ येतात त्यातही महिन्यातून एक-दोन वेळा पाइपलाइन फुटून पाणीपुरवठा मध्ये खंड पडतो हीच परिस्थिती सतत दोन वर्षापासून आहे याविषयी सरपंच व प्रभारी ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधला असता त्यांच्या म्हटल्यानुसार एकशे चाळीस गाव योजनेच्या पाईपलाईन मधून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही व आम्ही आजपर्यंत कधीही पूर्ण टाकी भरून हे पाणी वितरित केले नाही ,ही योजना टाकी भरण्यास असमर्थ असुन त्यामूळे आम्ही जुने योजनेतून पाणीपुरवठा करतो असे संगितले,त्याचप्रमाणे जे पाणी आम्ही वापरलेच नही त्याचे 32 लाख रुपये बिल कसे काय दिले असा प्रश्न उपस्थित केला. नागरिकांनी पत्रकारांसह प्राधिकरण ऑफिस गाठले असता ,
शाखा अभियंता यांच्याशी संवाद केल्यावर त्यांच्या माहितीनुसार 2017 पासून नियमित सूनगावला पाणी पुरवठा सुरू असून ग्रामपंचायतचे कोणत्या कारणाने हे पाणी वापरत नसावी व पर्यायी पाणीपुरवठा करत असावी याविषयी आश्चर्य व्यक्त केले तसेच आमच्या योजनेत कुठलाही दोष नसून सुनगावला पाणी पुरवण्यास ही योजना समर्थ आहे ,
मात्र मागील तीन महिन्यापासून बिल न भरल्यामुळे आम्ही हे कनेक्शन बंद केले आहे .
ग्रामपंचायतीने बिल भरल्यास आम्ही पाणी नियमित करू असे सांगितले.
ग्रामपंचायत व प्राधिकरण यांनी ही परस्पर विरोधी मते व्यक्त केल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र तहानेने व्याकूळ होत कसेतरी मिळेल त्या धोकादायक पाण्याने आपली तहान भागवत आहे,तरी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी व जल योद्धा म्हणून प्रसिद्धी पावलेले माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यामध्ये लक्ष घालतील काय ? व सुनगाव वासियांना वारी हनुमान चे 140 गाव योजनेचे शुद्ध पाणी मिळवून देतील काय?
ही मागणी जोर धरत आहे!
विशेष म्हणजे गावातून पंचायत समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य स्थानिक असताना यांचे मौन का त्यांनीही मागील तीन वर्षात हा प्रश्न सोडवण्यासाठी मागील ग्रामपंचायत समिती सह कोणतेच प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही,
नवीन आलेले सरपंच व ग्रामसेवक यांच्यापुढे हे 32 लाख रुपये बिल कसे भरावे हे संकट उभे असून लवकरच ते काय तोडगा काढतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
====================
लक्षवेधक मुद्दे
*2017पासुन गावात 140गाव योजना लागू आहे तर आजपर्यंत नियमित पाणी का मिळाले नाही?
*पाणी मिळाले नाही तर ग्रामपंचायत ने ही योजना परत का केली नाही?
*प्राधिकरणात 87600रु अनामत रक्कम भरल्यावरही पाणी न मिळाल्याने वेळेवर प्राधिकरणास का कळवले नाही.
*पाणी च येत नाही तर 32लाख रुपये बिल कसे आले?
*गावकरी नागरिकांनी भरलेले पाणी कर चे पैसे कोणत्या कामात वापरले गेले?
*बोअर चे आरोग्यास धोकादायक पाणी पिउन गावात कीडणी पेशण्ट वाढल्यास जबाबदार कोण?
*सुनगाव कराना वारी हनुमानचे शुध्द पाणी केव्हा मिळनार?
====================
###################
मी पदावर आल्यापासून एक ही दिवस 140गाव योजनेच्या पाण्याने टाकी भरु शकली नाही,कमी प्रेशर असल्याने व वारंवार पाईपलाईन फुटल्यने आम्ही ही योजना वापरत नाही ,जर प्राधिकरण चमुने 8 दिवस सतत टाकी भरुन दाखवल्यास आम्ही ट्प्याने बिल भरुन या योजनेचा स्विकार करू
-रामेश्वर अंबड़कार सरपंच सुनगाव
##################
ग्रामपंचायत सुनगावला आम्ही 2017पासुन योजना कार्यान्वीत असून,आमची पाईपलाईन व्यवस्था व पुरवठा सज्ज असुन आम्ही गावापर्यंत पाणी पोचवुन ठेवलं आहे,तसेच त्याची ट्रायल देखील ड़ेमो देऊन केलेली आहे,आज रोजी व्याजासह सदर सुनगाव ग्रामपंचायत वर आमचे विभागाचे 31,96,891रु थकित आहेत. त्यामूळे 3 महिन्याने पाणि रोखण्यात आले आहे,जर आम्हाला ट्प्याने जरी बिल मिळाले तरी आम्ही पूर्ववत पाणी सूरु करू.
-मुकेश वैद्य
शाखा अभियंता
140 गाव प्रादेशीक पाणीपुरवठा योजना जळगाव जामोद
===================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here