सचिन वाघे वर्धा
26.5.21
हिंगणघाट :-दिल्ली येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय किसान आंदोलनाला दिनांक 26 मे रोजी सहा महिने पूर्ण होत आहे स्वतंत्र भारतामध्ये इतके दीर्घकाळ चालणारे हे आंदोलन एकमेव आहे. संपूर्ण जगामध्ये भारताची कृषिप्रधान देश म्हणून ओळख असतांना शेतकऱ्यांना सहा महिने आपल्या मागणीसाठी आंदोलन करावे लागावे. ही बाब केंद्र सरकार साठी अत्यंत लाजिरवाणी आहे. भारतातील शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. केंद्र सरकार आंदोलनाला कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहे. हे लज्जास्पद आहे. केंद्र सरकारने हेकेखोरी करणे ही भारतातील लोकशाहीला मारक अशी आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रीय किसान आंदोलनाला समर्थन म्हणून व केंद्र सरकारचा निषेध म्हणून हिंगणघाट शहरात ठिकठिकाणी कोव्हिडं -19 च्या नियमाचे पालन करून काळे झेंडे व फिती लावून निषेध नोंदविला आहे. केंद्र सरकारने तीनही कृषी कायदे रद्द करावे शेतकऱ्यांच्या शेतमालाला एम एस पी चा कायदा लागू करावा याकरिता हे निषेध आंदोलन हिंगणघाट मधील वेगवेगळ्या चौकात करण्यात आले. नंदोरी चौक येथे महेश माकडे, गौरव खिराळे, भूषण वाटोरे, मयूर नगराळे हे होते. विठोबा चौक येथे अजय मुळे, रोशन डेकाटे, नानाभाऊ शिरसागर, मंगेश ताजणे यांच्या वतीने तर कारंजा चौक येथे दिनेश वाघ, जयंत धोटे, गोलू भोंगाडे, रोहित राऊत , हर्ष मून , संकेत नगराळे, श्रीकांत वागदे हे होते मा.अनिल जवादे राष्ट्रीय किसान आंदोलन यांनी प्रथम नंदोरी चौक येथे भेट देऊन केंद्र सरकार विरुद्ध नारेबाजी केली. त्यानंतर विठोबा चौक या ठिकाणी त्यांनी भेट दिली तिथे केंद्र सरकारनी तीनही काळे कृषी कायदे रद्द करावे अश्या घोषणा दिल्या आणि शेवटी कारंजा चौक या ठिकाणी भेट देऊन या निषेध आंदोलनाचा समारोप नंदोरी चौक येथे केला. यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत भारत पाटील, गोकुळ पाटील, हनुमान गुडदे , विलास भोमले आदि किसान कार्यकर्ते उपस्थित होते