130 years / १३० वर्षीय आजीबाईचे निधन.नातेवाईकांनी फटाके आणि ढोलताशाच्या गजरात काढली अंत्ययात्रा…

0
1007

 

संग्रामपूर ( अनिल सिंग चव्हाण )ः- प्रत्येक पुरुष महिलांच आयुष्य हे शतआयुषी व्हायाचे परंतु काळ बदलला. अन् शुद्ध पोष्टीक अन्न ,भाजीपाला मिळत नसल्याने सर्वांच आयुष्यमान नवीन पिढीत घटत ६० ते ६५ वर्षावर आले आले आहे.

परंतु संग्रामपूर शहरातील शिखल्लकार समाजातील एका आजीबाईचे वृद्धापकाळाने तब्बल १३० वर्षांनी गुजराथ मध्ये निधन झाले
“गुजराथ राज्यातील हिंमतनगर येथील शिख शिक्कलकर समाजाच्या १३० वय असलेल्या आजीबाई निवर्तल्या, त्यांच्या परलोकी जाण्याचे दुःख सर्व कुटुंबाला झाले.

Ravikanttupkar./तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही – रविकांत तुपकर आक्रमक..!

परंतु नातू ,पंतू, पंतूचे मुलं,मुली पाहिलेली आजी पाहिली असल्याने सर्व आनंद उपभोगून इहलोकी जात असलेल्या या आजीबाईंचा इहलोकीची प्रवास म्हणजे राहत्या घरातून निघालेली अंतयात्रा ढोलताशांच्या गजरात आणि फटाके फोडून काढण्यात आली.

विशेषम्हणजे महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असणा-या आदिवासी भागातील तसेच संग्रामपूर शहरात जन्मा पासून गेल्या ३५ वर्षापासून रहिवासी असलेले ” दयालसिंग चव्हाण व व अनिलसिंग चव्हाण चौथी पिढी असलेले यांची आजीबाई ह्यांचे गुजराथ मधील हिम्मतनगर येथील कोयल कौर दादी सरदारसिंग टाक यांचे दि. ८ / जुन /२०२५ रोजी दुपारी वयाच्या १३० व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

कोयल दादी यांचं मोठं एकत्रित कुटूंब आहे.काही नातवंडे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आहेत, तर कोयलदादी ह्या आपल्या वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत एक मनमोकळे निर्भीड असे जीवन जगल्या होत्या. तर मृत्यू नंतरही आपल्या कुटुंब परिवाराने आनंदाने जगावे अशी शिकावं त्यांनी दिली होती.

त्यात १३० वर्षे जगलेल्या कोयलदादी यांनी आपल्या मुलांचे लग्न आणि नातवांची,पंतूंची व पंतूच्या मुला- मुलींची देखील शुभ मंगल व इतर कार्ये पाहिली आहेत. त्यामुळे नातू,पंतूना अंगा खांद्यावर खेळविलेल्या कोयलदादी ह्या आनंदाने जीवन जगले असल्याने त्यांची अंत्ययात्रा त्या गेल्याचे दुःख व्यक्त करून न काढता दुःख बाजूला सारून काढण्याचे ठरविले होते. त्यामुळे
त्यांचे निधन झाल्यानंतर हिम्मतनगर येथे त्यांच्या गावी सर्व नातेवाईक आले.

130 वर्षीय कोयलदादी यांची दुसऱ्या दिवशी ९ / जुन रोजी त्यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि ढोल ताश्यांच्या गजरात निघाली.

130 years :एखाद्या मृत व्यक्तीची अंत्ययात्रा अशा पध्यतीने काढली गेल्याने त्याची चर्चा गुजराथ आणि महाराष्ट्र राज्यात शिख शिक्कलकर समाजात चर्चेला येत आहे”..
अश्या शतआयुषी आजीबाईस भावपूर्ण श्रद्धांजली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here