अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या. आमदार संतोषराव बांगर साहेब यांचे कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांना निवेदन

 

अंकुश गिरी
ग्रामीण प्रतिनिधी सेनगाव

हिंगोली जिल्ह्यासह *कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये मागील काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे* व *अतिवृष्टीमुळे सोयाबीन उडीद मूग हळद ऊस व केळी पिकांचे मोठे नुकसान झाले* आहे त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आला असून शेतकरी बांधवांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी *नुकसान झालेल्या पिकांचे भरपाई देण्यात यावी अशी मागणी आमदार संतोषराव बांगर साहेब* यांनी *कृषिमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे केली आहे.*

Leave a Comment