सचिन वाघे वर्धा वर्धा .
२२ / ७ परिसरात खळबळ जुन्या वादातून एका व्यक्तीची राॅडणे हत्या करून मृतदेह वरुड रेल्वे लाईन वर फेकून दिला, ही घटना १८ रोजी रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असुन मंगळवारी याचा उलगडा झाला,यासंबंधात तिन आरोपींना दहेगाव पोलिसांच्या हमदापुरचे बीट अमलदार पो.हवा.इजास खान , पो.हवा.मनोज बाराहाते यांनी ३ तासात आरोपींना अटक करून सक्तिने विचारपुस करताच आरोपींनी गुन्हा कबुल केला. तिघांनी मिळून मृतकाला मारून वरूड (पवनार) येथे रेल्वेलाइन वर रात्री ११ .३० वाजता फेकून दिले व हत्येचेवेळी उपयोगात आणलेले हत्यार नदीत फेकले अशी माहिती आरोपींनी पोलिसांना दिली.
मृतकाचे नाव दिगांबर नामदेव कन्नाके (रेल्वे)(५०)आहे . प्राप्त माहितीनुसार मृतक दिगांबर आणि आरोपी संदीप राऊत यांच्यात जुना वाद होता, ३ दिवसापूर्वी दिगांबर हा शेतातील कामे आटोपून घरा कडे जात असताना आरोपी संदीप राउत , राजु राउत आणि किशोर राउत यांनी रस्त्यावर अडवुन लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली तसेच त्यांच्या डोक्यावर राॅडनेही मारहाण केली. दरम्यान आरोपीनी जख्मी दिगांबरचा मृत्यू झाल्याने वरुड रेल्वे परिसरात रेल्वेच्या पटरीवर फेकुन दिला. यांचा तपास दहेगाव पोलिसांनी केला असता हि सर्व बाब उघड झाल्याने आरोपींना हत्येचा गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली हि हत्या जुन्याच वादातुन झाली आहे की यात आणखी काही दुसरे कारण आहे याचा पुढील तपास पोलीस करीत आहे.सदर गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.







