शेगाव येथे समता परिषदचे प्रबोधन शिबिर
शेगाव: केंद्रातील मोदी सरकारने ओबीसींचे आरक्षण संपवुन टाकण्याचा कट रचलेला आहे. राज्यातही भाजपचे सरकार होते तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी कोणत्याही प्रकारे प्रयत्न केलेले नाहीत.भाजपचा ओबीसी आरक्षणाला आतून विरोध आहे हे कागदत्रनिशी मी सिद्ध करू शकतो.त्यामुळे त्यांची प्रत्येक कृती ही ओबीसींचे विश्वासघात करणारी ठरत आहे. ही बाब अशीच सुरू राहिली तर ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षापासून दूर जाऊन त्याचा फटका त्यांना राजकारणात बसेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा.हरि नरके यांनी बोलतांना केले.
येथील वर्धमान जैन भवन मध्ये समता परिषदेचे एकदिवसीय प्रबोधन शिबिर 25 सप्टेंबर रोजी पार पडले.याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या सात वर्षात ओबीसी बाबत अनेक वेळा खोटी विधाने केली आहेर. ते हुकूमशाही वृत्ती चे पंतप्रधान असल्याने मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना ते पूर्ण स्वातंत्र्याने निर्णय घेऊ देत नाहीत ओबीसींच्या आरक्षणाचा हक्क हा ओबीसीसाठी आता आरपारची लढाई ठरलेली आहे. केंद्र सरकारने इम्पीरियल डाटा च्या नावाने नौटंकी चालवली आहे. व न्यायालयातही त्यांनी अनेक वेळा खोटे प्रतिज्ञापत्र देऊन समाजाची दिशाभूल केली आहे. ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा डाव हा भारतीय जनता पक्षाची कूटनीती असून यामुळे ओबीसींना फक्त मतदानासाठी त्यांचा उपयोग करून घेत बालवाडीचे राजकारण खेळत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला ओबीसी समाजात अनेक समाज आलेले आहेत त्यामुळे आरक्षणामुळे त्यांचा आर्थिक विकास होईल गेल्या सात वर्षात मोदी सरकारने मागासवर्गीयांचे दोन लक्ष कोटी रुपये इतर योजनांमध्ये वळविले तर ओबीसींच्या आर्थिक विकासासाठी सहकार्य करणारे दहा टक्के निधी हा आर्थिक मागास वर्गासाठी वरती केल्याने त्याचे परिणाम ओबीसीला भोगावे लागतात मोदी यांनी गेल्या सात वर्षात सरकार त्यांना अनेक चुका केलेले आहेत त्यात नोटबंदी जीएसटी यासारखे विषय असून ओबीसींना त्यांचे हक्क मिळवून दिल्याशिवाय आमचा लढा थांबणार नसल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादित केले सरकार सीबीआय या संस्थांचा दुरुपयोग करून पक्षातील व विरोधक असलेल्या नेत्यांना दाबू पाहत आहे हे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले
या शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब भुजबळ तर उदघाटक बुलढाणा जि प अध्यक्ष सौ मनीषाताई पवार, प्रमुख वक्ते जेष्ठ विचारवंत प्रा हरी नरके सर, उत्तम कांबळे,माजी आ लक्षमणराव तायडे, माजी आ. कृष्णराव इंगळे, तोताराम कायंदे,समता परिषदचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ खरात,रवीभाऊ सोनवणे प्रदेश सरचिटणीस, अॅड सुभाष राऊत विभागीय अध्यक्ष मराठवाडा, प्रा अरविंद गाभणे विभागीय अध्यक्ष पश्चिम विदर्भ,जळगाव जा.मतदारसंघाच्या च्याकाँग्रेस पक्षनेत्या डॉ स्वातीताई वाकेकर,माधुरी ताई राणे, जयश्री ताई शेळके,शेगाव चे माजी नगराध्यक्ष साहेबराव कलोरे,माधवराव हुडेकर, संतोष खांडेभराड जिल्हा अध्यक्ष, दत्ता खरात जिल्हा अध्यक्ष, मनोज भोपळे, अविनाश उमरकार , अजय तायडे, गजानन इंगळे,अरविंद शिगांडे, श्रीकांत कलोरे,वैभव घाटोळ, दिपक निमकरडे,प्रदीप सातव,अनंता लहासे आदींची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.शिबिरास राज्यभरातून ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.