Home Breaking News अवैध वृक्षतोड कधी थांबणार? वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले वरती हात.जंगल होणार भुईसपाट.

अवैध वृक्षतोड कधी थांबणार? वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केले वरती हात.जंगल होणार भुईसपाट.

 

जंगल हा प्राणी,पक्षी,कीटक आणि मानवाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.वनविभाच्या संरक्षण करण्यासाठी वनविभागाची निर्मिती करण्यात आली आहे.त्या वनविभागात बऱ्याच महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जबाबदारी सोपवली गेली आहे.आणि उत्तम, प्रामाणिक,कर्तृत्वाची ठिणगी निर्माण करून समाजासाठी आणि शासनासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे.
त्यामुळे त्यांच्याकडून वनविभागाच्या माहितीच्या संदर्भात अपेक्षा सुद्धा केल्या आहेत.परंतू बुलढाणा जिल्यातील मोताळा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणा-या अवैध वृक्ष तोडी च्या संबधाने आमच्या पत्रकाराने आपला जीव धोक्यात आणुन तेथील वनरक्षक दादगाव बिट बावने मैडम ह्याना दुरध्वनी वरुन अवैध वृक्षतोड संदर्भात माहिती दिली.
त्यावर उचित कारवाई करतो असे तात्पुरती आश्वासन महिला अधिकाऱ्यांकडुन त्या पत्रकाराला थातुरमातुर उत्तर मिळाले. पन चौथी दिवस परत काय कारवाई झाली?ह्या बाबत माहिती घेण्याचा प्रयत्न पत्रकाराने केली असता पत्रकारालाच अधिकारी महिला अधिकाऱ्यांच्या नाहक रोषाला बळी पडावे लागले .
आम्ही महीला आहोत, आमच्यावर कुणी दबाव टाकू शकत नाही?आम्हाला जसे काम करायचे तसे काम आम्ही आमच्या मनमर्जीने करणार, संपूर्ण वृक्षतोड झाली तरी तुम्हाला काय करायचे आहे?अशी मल्लीनाथी ह्या वनपरिक्षेञ व वनरक्षक या दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या तोंडी कर्तव्यदक्षपणा दिसून आला.रक्षक तर भक्षक होणार नाही ना?असे चित्र तर निर्माण होणार नाही ना?असा प्रश्न उपस्थित होत आहे. पत्रकाराला अवैध वुक्ष तोडून पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्यांच्या रोषाचा बळी ठरविण्यात आले.वनविभागात अशा महिला अधिकारी जर असतील तर कसे काय वनांचे संरक्षण होईल?याची चिंता पर्यावरण विभागाला भेडसावण्याचे दृश्य पहायला मिळत आहे.