वटपोर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी करायचे व्रत..(vatpurnima)

0
192

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

vatpurnima:वड हा अनेक वर्ष आयुष्य असणारा महा वृक्ष म्हणून ओळखला जातो त्यामुळेच आपण खूप वर्षांपूर्वीचे जुने वडांची झाडे आजही बघत आहोत 200 ते 300 वर्ष जुने वटवृक्ष आजही अस्तित्वात आहेत पूर्वीच्या काळी स्त्रिया तीन दिवसाचे व्रत करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करून वडांची पूजा करतात एक दिवसीय व्रत करतात वटपौर्णिमा म्हणजे सात जन्म तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी करायचे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळते.

आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती साथीदार मिळतो अशी धारणा आपल्या समाजात मागच्या बऱ्याच काळापासून रूढ आहे हिंद पंचागातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा या दिवशी वडाच्या वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे.

130 years / १३० वर्षीय आजीबाईचे निधन.नातेवाईकांनी फटाके आणि ढोलताशाच्या गजरात काढली अंत्ययात्रा…

वड हा वृक्ष अनेक वर्ष आयुष्य असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो म्हणूनच त्याला आधारवड म्हणतात वड पूजनामागे काही शास्त्रीय कारणेही सांगितली जातात वडाच्या झाडांमध्ये ऑक्सिजनचे प्रमाण जास्त असल्याने स्त्रियांनी या झाडाच्या सानिध्यात राहणे चांगले असते त्यामुळे हे व्रत करणे अतिशय उपयुक्त ठरते याबरोबरच एकमेकींना वाण दिल्याने आपल्याकडून दान केले जाते.

असेही म्हणतात म्हणून या दिवशी सुहासनी आंब्याचे वाण देतात वडाचे झाड ज्याप्रमाणे अनेक वर्षासाठी जगते त्याचप्रमाणे आपला पती ही दीर्घायुष्य व्हावा म्हणून त्याला सुताने बांधून ठेवतात सुहासिनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र येतात.

vatpurnima:आणि पुजन करतात वड पौर्णिमेच्या दिवशी येथील महिला सौ कमलबाई आत्माराम सातपुते यांच्या घराजवळील वडांची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here