नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल ):-
नेहरु युवा केंद्र युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयात भारत सरकार तालुका नांदुरा च्या वतीने नांदुरा शहरातील रेल्वे स्टेशन चौकातील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा जो घाणीच्या साम्राज्यात विळख्यात पडला होता तेथील सर्व गवत तसेच गुटख्याच्या पुड्या व घाण साफ करून पाण्याने स्वच्छ धुवून खरी 125 वी जयंती राष्ट्रीय चेतना दिवस म्हणून साजरा करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच नेहरू युवा केंद्र नांदुरा स्वयंसेवक अमर रमेश पाटील यांनी नेताजीच्या आयुष्यावर प्रकाश टाकत पुतळ्याची असलेली अवस्था पाहून हळहळ व्यक्त केली पुतळा यावेळी पत्रकर संतोष तायडे सामाजिक कार्यकर्ते कुलदीप डंबेलकर,भागवत पेठकर,अमोल पाटील,गणेश वाकोळे, व इतर एनसीसी जवान उपस्थित होते. त्यांनी राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाची सांगता केली




![SangrampurNews /संग्रामपूर शाळेत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन मेळावा संपन्न.[ २० वर्षानंतर भरली जुनी मित्रांची शाळा ]](https://i0.wp.com/www.suryamarathinews.com/wp-content/uploads/2026/02/20260204_090724.jpg?resize=218%2C150&ssl=1)


