गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातून १७ पवित्र स्थळांची माती व जल गौरव रथात समाविष्ट! (Ajitpawar )

0
86

 

Ajitpawar:बुलढाणा, दि. ३० एप्रिल २०२५ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील विविध पवित्र आणि ऐतिहासिक स्थळांमधून माती व जल संकलन करून गौरव रथात समाविष्ट करण्यात आले.

हा महोत्सव पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा.खा. प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि प्रांताध्यक्ष मा.खा. सुनीलजी तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनातून साकार झाला.

Waqf Research Bill/वक्फ संशोधन बील काळा कायद्या विरोधात मुसलीम समाज बांधवांचे आज रात्री बत्ती गुल आंदोलन

जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या गौरव रथ यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. संत गजानन महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शेगावची माती, बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्य पदस्पर्श असलेले परतूडाचे जल व माती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी गुणवंतीबाईंच्या जन्मस्थळ करवंड येथील माती, तसेच संत चोखामेळा, ताराबाई शिंदे, चक्रधर स्वामी यांच्यासह अनेक संतमहात्म्यांच्या स्थळांतील पवित्र माती व जलाचा समावेश या रथात करण्यात आला.

या पवित्र स्थळांमध्ये शेगाव, पातुडा जळगाव मैलगड, करवंड, अमडापूर, बुलढाणा, सैलानीबाबा दर्गा, जाळीचा देव, मढ, चिखली, मेहूणाराजा, देऊळगाव राजा, मेहकर, लोणार व सिंदखेडराजा येथील माती व जलाचा समावेश होता.

Ajitpawar:गौरव रथाचे विविध ठिकाणी जल्लोषात स्वागत झाले आणि या यात्रेने जिल्ह्याच्या संस्कृती, इतिहास व श्रद्धास्थानांचे महत्व अधोरेखित केले. “गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव-२०२५” हा उपक्रम आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल, असा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here