Farmernews /शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला पाहिजे

0
87

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

ओला दुष्काळ जाहीर करा -शेतकरी मित्र परिवाराची मागणी

सिंधी रेल्वे तहसील कार्यालयात जाऊन
अधिकाऱ्यांना दिले निवेदन
शेतकरी आज रस्त्यावर उतरला आहे. अतिदृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे सोयाबीन पिकावर येल्लो मोजक नावाचा रोग आलेला आहे या रोगामुळे सोयाबीनचे पीक नष्ट झालेले आहे पावसामुळे आणि रोगामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झालेले आहे कापसावर बुरशी तुरीचे पीक नष्ट झाले आहे.

शेतकऱ्यांनी पिक विमा काढला परंतु पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याला मिळेल की नाही या विचारात शेतकरी भ्रमित आहे शेतकऱ्याची आवाज म्हणून शेतकरी मित्र परिवारातर्फे आज तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले.

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या पिकाचा नुकसान पंचनामा करून तहसील कार्यालयात पाठवा शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे.

Farmernews /याकरिता शेतकरी मित्र परिवाराचे अध्यक्ष रवी भाऊ वाघमारे उपाध्यक्ष रामभाऊ सोनटक्के सचिव रामेश्वर घंगारे अमोल गवळी किशोर डकरे आशिष सातपुते जीवन बेलखोडे चंदन चव्हाण गणेश काळबांडे सुरेश गंगारे इम्रान राजू दांडेकर प्रभाकर तडस यशवंतजी बडवाई इत्यादी शेतकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here