Home Blog Page 2

Sunetrapawar /अणुशक्तीनगर येथील प्रस्तावित अल्पसंख्याक मुलींसाठीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीला गती द्यावी.

 

-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार.

मुंबई, ( विशेष प्रतिनिधी )- शिक्षण, कौशल्य विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देत, चेंबूर येथील अणुशक्तीनगर परिसरात अल्पसंख्याक मुलींसाठीच्या प्रस्तावित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उभारणीच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.sunetrapawar

सह्याद्री अतिथीगृह येथे अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध योजनांचा व जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, नगरविकास व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सना मलिक-शेख, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, अल्पसंख्याक विकास विभागाचे सचिव योगेश म्हसे, जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष मितेश नाहटा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. Ajitpawar

 

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी राज्य सरकार विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत असून या प्रयत्नांना अधिक गती देण्यात येणार आहे. विशेषतः मुलींच्या उच्च तांत्रिक शिक्षणासाठी दर्जेदार सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.ajitpawar

बैठकीत ‘मार्टी’ संस्थेशी संबंधित विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संस्थेसाठी स्वतंत्र लेखा उघडणे, कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी मंजूर पदे तात्काळ भरणे, तसेच तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर कार्यालय सुरू करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

अल्पसंख्याक समाजातील तरुणांना आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही विचारविनिमय झाला. कौशल्य विकास, तंत्रज्ञानाधारित शिक्षण आणि रोजगाराभिमुख उपक्रमांद्वारे युवकांना सक्षम करण्यावर सरकारचा विशेष भर राहील, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या कामकाजाला गती देणार

 

Gamenews /तरूणाई लुडो, सापशिडी आणि तीनपत्तीच्या डिजिटल जाळ्यात! मनोरंजनाकडून जुगाराकडे वाटचाल; पालकांची चिंता वाढली

 

– उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे काम अधिक वेगाने व परिणामकारक करण्यासाठी पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक (एमडी) नेमण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या प्रस्तावांचे तातडीने परीक्षण करून पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Sunetrapawar महामंडळाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश देत, जैन समाजाच्या सर्व घटकांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी ठोस उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला. जैन तसेच अल्पसंख्याक विकास विभागाच्या विविध मंडळावर प्रलंबित अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न लवकर मार्गी लावण्याची ग्वाही देत, महामंडळाच्या कामासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Gamenews /तरूणाई लुडो, सापशिडी आणि तीनपत्तीच्या डिजिटल जाळ्यात! मनोरंजनाकडून जुगाराकडे वाटचाल; पालकांची चिंता वाढली

ऋषिकेश सुरवसे

उमरगा: उन्हाळ्याच्या सुट्टीतील मनोरंजनाचे साधन म्हणून सापशिडी,लुडो तीन पत्ती, या खेळाकडे पाहिले जात होते. मात्र, इंटरनेटच्या युगात या खेळांना आता जुगाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातील तरूणाई या ऑनलाईन जुगाराकडे आकर्षित झाली असून यामध्ये किशोरवयीन मुलांचेही प्रमाण लक्षणीय आहे. विशेष म्हणजे, स्किल गेमच्या नावाखाली हे प्रकार सुरू असून, यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. या ऑनलाइन गेम मुळे अनेकांच्या आयुष्याचा खेळ होत आहे. इंटरनेटच्या अनेक साइटवर हे ॲप उपलब्ध आहेत.

त्यावरून हे गेम डाऊनलोड करण्यात येतात. ॲपवर आपला स्वतःचा आयडी तयार करावा लागतो.

यासाठी दोन प्रकार आहेत, पहिल्या प्रकारात पूर्वी पासून त्यावर आयडी असलेली मंडळी नवीन युजर्सचे नाव आणि मोबाईल क्रमांक ॲप ॲडमीनला पाठवतात. त्यानंतर ॲडमीन यूजशी संपर्क साधून त्याचा आयडी तयार करतो. दुसऱ्या प्रकारात जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यास समोरील व्यक्ती आयडी तयार करून देतो. आपल्या आयडीवर लॉगिंग केल्यानंतर यूजर्स पाहिजे त्या खेळाला जुगार खेळण्यासाठी निवडू शकतो.ludogame

यामध्ये त्याने जितकी रक्कम आयडीवर डिपॉझिट केली असेल, त्या प्रमाणात तो खेळू शकतो. जितकी रक्कम लावली, त्याच्या दुप्पट रकमेचे आमिष खेळाडूला दाखविण्यात येते. यदाकदाचित जिंकल्यास जिंकलेली रक्कम युजर्स विड्रॉल करून घेवू शकतो. यासाठी ॲपची दुसरी टीम विड्रॉलचे काम करते.crimenews

या टीमच्या व्हाट्सअप ॲप क्रमांकावर युजर्सचा आयडी क्रमांक आणि बँक खात्याची माहिती पाठवावी लागते. त्यानंतर काही वेळात त्याच्या बँक खात्यात पैसे जमा होतात. हरल्यास लावलेली रक्कम गमवावी लागते. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.

 

तरुणांना जाहिरातीतून भुरळ

सोशल मीडियाचे फेसबुक, इंस्टाग्राम, तसेच विविध चैनलवर सध्या नियमित ऑनलाइन जुगाराच्या जाहिराती दिसून येत आहेत.games

Gamenews/यामध्ये एव्हिएटर, तीन पत्ती, जंगली रमी, लुडो, तसेच क्रिकेटशी संबंधित खेळाच्या जाहिरातींचाही समावेश आहे. जाहिरातीच्या माध्यमातून या जुगारांच्या खेळाकडे आकर्षित करून तरुणाईला भुरळ घालण्यात येत आहे.

Breakingnews /विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह

 

प्रतिनिधी : सचिन वाघे | हिंगणघाट

हिंगणघाट तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये रस्ते, नाली बांधकामे व इतर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार, निकृष्ट दर्जाची कामे, निधी अपहार आणि आर्थिक अनियमिततेबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाही संबंधित प्रकरणांवर प्रभावी कारवाई होत नसल्याचे गंभीर वास्तव समोर येत आहे. विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी (BDO) तसेच काही ग्रामसेवकांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थ, तक्रारदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, अनेक ग्रामपंचायतींमध्ये रोड-नाली बांधकामांमध्ये अंदाजपत्रकातील विसंगती, निकृष्ट साहित्याचा वापर, नियमबाह्य मंजुरी आणि शासकीय निधीचा गैरवापर होत असल्याचे उघड होत आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केवळ चौकशीच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप आहे.hingnghatnews

“तक्रार दाखल करा, चौकशी करू” अशा आश्वासनांनंतरही ठोस प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई होत नसल्याने संगनमताचा संशय बळावत आहे.wardhanews

विशेषतः ज्या ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांचा कार्यकाळ संपला असून प्रशासक नेमण्यात आले आहेत, त्या ठिकाणी प्रशासन केवळ कागदोपत्री राहिल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्ष व्यवहार, आर्थिक मंजुरी, कागदपत्रे आणि कामकाजावर ग्रामसेवकांचेच वर्चस्व असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कागदोपत्री विकासकामे दाखवून निधीचा अपहार झाल्याची चर्चा ग्रामीण भागात रंगू लागली आहे.

काही प्रकरणांमध्ये माध्यमांकडे माहिती आल्यानंतर प्रशासनात तात्पुरती हालचाल दिसून येते; मात्र नंतर ही प्रकरणे पुन्हा थंड बस्त्यात जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. परिणामी पंचायत समिती प्रशासन, विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी व ग्रामसेवकांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. Breakingnews

ग्रामस्थांच्या मते, ग्रामपंचायत स्तरावरील विकासकामे ही ग्रामीण नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी थेट संबंधित असताना त्यामध्ये होणारा भ्रष्टाचार हा जनतेच्या हक्कांवर घाला आहे. त्यामुळे सर्व संशयित कामांची स्वतंत्र, निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. Policenews

Bscnews/सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम; बी.एस्सी. नर्सिंगचा निकाल १०० टक्के!

Collector /जिल्हा प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन पारदर्शक प्रशासन सुनिश्चित करावे, अन्यथा ग्रामीण विकास प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास अधिकच ढासळण्याची भीती व्यक्त होत आहे.

Bscnews/सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम; बी.एस्सी. नर्सिंगचा निकाल १०० टक्के!

 

कणेरी -कोल्हापूर( विशेष प्रतिनिधी उदय नरे )

Bscnarsing/श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान संचलित सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालयाने आपल्या गुणवत्तेचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या बी.एस्सी. नर्सिंगच्या (B.Sc. Nursing) परीक्षेत महाविद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे.kolhapur

या परीक्षेत महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, बहुतांश विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्यासह (Distinction) प्रथम श्रेणीत यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे नर्सिंग शिक्षण मिळावे, या उद्देशाने परमपूज्य श्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे महाविद्यालय कार्यरत आहे.

 

यावेळी विशेष प्रावीण्य सह अनेक विद्यार्थ्यांनी विषयांनुसार विशेष गुण मिळवले आहेत. तसेच सिद्धगिरी हॉस्पिटलच्या सुसज्ज सोयी-सुविधा आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनामुळे व प्रॅक्टिकल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मिळालेला दांडगा अनुभव या यशाचा मुख्य पाया ठरला आहे.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना महाविद्यालयाच्या व्यवस्थापक विवेक सिद्ध यांनी सांगितले की, ” परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि सिद्धगिरी मठाकडून मिळणारे पाठबळ यामुळेच हे यश शक्य झाले आहे.kolhapur

 

Tahsilnews /तहसीलदारांच्या आदेशालाही हरताळ? मंदिर ट्रस्टच्या इमारतीवर तोडफोड सुरूच – सुमित आहुजांचा आरोप

भविष्यात हे विद्यार्थी आरोग्य सेवेमध्ये आपले मोठे योगदान देतील, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Bscnews/”या घवघवीत यशाबद्दल प्राचार्या रेगिना सातवेकर, उपप्राचार्य सुरज चोपडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य लीना काळे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Forestnews //सोनोशी पिंपरखेड मार्गावरील जंगलात अस्वल आढळला..

 

सोनोशी पिंपरखेड या जंगलाच्या परिसरामध्ये आज सकाळी साडेआठच्या दरम्यान काही सुनील जायभाये आणि शुभम वाघमारे कामानिमित्त रस्त्याने जात असताना त्यांना परमेश्वर मुंडे यांच्या शेतालगत अस्वल आढळून आल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या गहू शाळु यासारखी पिके काढणे सुरू असताना व काही ठिकाणी शेतीची नागरटी सुरू असताना अस्वल दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच या जंगलामधून सतत दुचाकी चार चाकी इत्यादी वाहने मोठ्या प्रमाणात चालू असतात जंगलाच्या मधून जाणारा हा रोड थेट सिदंखेडराजा जातो.

त्यामुळे प्रवासी वाहतुकीलाही आता धोका निर्माण झाला आहे या रोडवर सतत वाहनाची ये जा सुरू असते त्यामुळे अस्वल आढळल्याने आता भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.Forestnews/

सध्या उन्हाचा पारा चढत आहे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था जंगलामध्ये नाही व इतरही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे कोणतेही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे वन्य प्राण्यांची अशी भटकंती होताना दिसत आहे.

Aswalnews/त्यामुळे वनविभागाने या बाबीकडे विशेष लक्ष देऊन अस्वलाचा शोध घेऊन त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात यावे असे मागणी होत आहे

Crimenews /१७ वर्षांपासून शासकीय जागेचे भाडे थकीत असल्याचा आरोप; २० लाखांहून अधिक वसुली रखडल्याने खळबळ

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा : सिंदी (रेल्वे)
लघु पाटबंधारे विभाग येथील शासकीय वसाहत व कार्यालयीन जागेचे भाडे मागील तब्बल १७ ते १८ वर्षांपासून थकीत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या थकबाकीमुळे शासनाचे सुमारे २० लाख रुपयांहून अधिक आर्थिक नुकसान झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते सुधाकर विठोबाजी वाघमारे यांनी मुख्य अभियंता, लघु पाटबंधारे विभाग (दक्षिण विभाग), नागपूर यांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे.
सन २००८ मध्ये पळसगाव (बाई) येथील एका संस्थेला सिंदी (रेल्वे) येथील लघु पाटबंधारे विभागाची वसाहत व कार्यालयीन जागा ३० वर्षांच्या करारावर देण्यात आली होती.wardhanews

वार्षिक अंदाजे ६८,८०० रुपये भाडे निश्चित असतानाही, पहिल्या वर्षानंतर कोणतेही भाडे भरले गेले नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

याच ठिकाणी शिष्यवृत्ती घोटाळ्याशी संबंधित तपास सुरू असताना काही कागदपत्रे जाळल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आल्याचेही निवेदनात नमूद आहे. तसेच इमारतीतील दरवाजे व खिडक्या चोरीला गेल्याच्या घटनांवरही संशय व्यक्त करण्यात आला असून, याबाबत विभागाकडून कोणतीही ठोस नोंद नसल्याचा दावा करण्यात आला आहे.hingnghatnews

याशिवाय, संबंधित संस्थेच्या माध्यमातून बोगस संस्था स्थापन करून शिष्यवृत्ती निधीचा गैरवापर झाल्याचा तसेच त्या निधीतून शासकीय जमिनीच्या शेजारी खासगी जमीन खरेदी केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात शासकीय मालमत्तेचा गैरवापर, महसूल बुडवणे आणि संभाव्य आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून थकीत भाडे तात्काळ वसूल करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.crimenews

Crimenews /दरम्यान, या प्रकरणाची प्रत जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक व संबंधित लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आली आहे.

Crimenews /हिंगणघाट परिसरात गांजाची वाहतूक उघड; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, 1.55 लाखांचा मुद्देमाल जप्त

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : अंमली पदार्थांच्या विरोधात वर्धा पोलिसांनी धडक कारवाई करत गांजाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात अटक केली. या कारवाईत सुमारे 1 लाख 55 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.hingnghatnews

वर्धा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे.

 

त्या अनुषंगाने 24 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हिंगणघाट पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना, मुखबिरामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून जाम ते हिंगणघाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मौजा रिमडोह शिवारात, कोचर खरर्डा फॅक्टरीजवळ सापळा रचण्यात आला.wardhanews

यावेळी सुझुकी बर्गमन मोपेड (क्र. एमएच 32 ए.डब्ल्यू. 4877) वरून गांजाची वाहतूक करणारा आरोपी अब्दुल रिजवान उर्फ टोनी अब्दुल रज्जाक शेख (वय 30, रा. संत कबीर वार्ड, हिंगणघाट) याला रंगेहात पकडण्यात आले. आरोपीकडून 2 किलो 228 ग्रॅम गांजा तसेच मोपेड असा एकूण 1,55,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत सदर गांजा नागपूर येथील जावेद शेख (रा. ऑटोमॅटिक चौक, यशोधरा नगर) याच्याकडून पुरवठा करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.hingnghatnews

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Crimenews /या पथकात पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते तसेच कर्मचारी अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अक्षय राऊत, दिनेश बोथकर व अभिषेक नाईक यांचा सहभाग होता.

Wardhanews /ऑडिटशिवायच संस्थांना मान्यता; वर्ध्यात भोंगळ कारभार उघड”

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा जिल्हा जिल्ह्यातील काही नोंदणीकृत संस्थांकडून 2017 नंतर लेखा परीक्षण (ऑडिट) करण्यात आले नसतानाही, अशा संस्थांना विविध शासकीय विभागांकडून मान्यता व प्राधान्य दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते सचिन वाघे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मिळवलेल्या प्रमाणित कागदपत्रांच्या आधारे हा प्रकार उघड केला आहे. त्यांच्या मते, अनेक संस्थांमध्ये दीर्घकाळ ऑडिट न झाल्याची बाब स्पष्ट असूनही संबंधित विभागांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.hingnghatnews

दरम्यान, नियमांनुसार प्रत्येक नोंदणीकृत संस्थेस दरवर्षी लेखा परीक्षण करणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून अशा संस्थांना विविध योजना, निधी व मान्यता दिली जात असल्याने हा गंभीर प्रकार मानला जात आहे.

“ऑडिट नसलेल्या संस्थांना मान्यता देण्याचे निकष काय?”, “संबंधित विभागांनी पडताळणी का केली नाही?” आणि “जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?” असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Wardhanews /या पार्श्वभूमीवर, सर्व संबंधित संस्थांची सखोल चौकशी करून विशेष लेखा परीक्षण करण्यात यावे, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संस्थांवर व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सचिन वाघे यांनी केली आहे.

Nagarparishadnews /सिंदी नगर परिषदेत आंबेडकर जयंतीला शिष्टाचाराचा अवमान? मुख्याधिकारीसह कर्मचारी अनुपस्थित; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

सिंदी (रेल्वे)भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी शासकीय शिष्टाचाराचे पालन न झाल्याचा गंभीर आरोप सिंदी (रेल्वे) येथील नगर परिषद प्रशासनावर करण्यात आला आहे.

Wardhanews याप्रकरणी स्थानिक नागरिक सुधाकर विठोबाजी वाघमारे यांनी जिल्हाधिकारी वर्धा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून मुख्याधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

तक्रारीनुसार, १४ एप्रिल २०२६ रोजी देशभरात संविधान निर्मात्यांना अभिवादन करण्यात येत असताना सिंदी नगर परिषद कार्यालयात मुख्याधिकारी पौर्णिमा गावित व अनेक कर्मचारी अनुपस्थित होते.hingnghatnews

शासकीय नियमानुसार अशा राष्ट्रीय महापुरुषांच्या जयंतीदिनी प्रतिमा पूजन व अभिवादन करणे अपेक्षित असताना ते पार पडले नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, नगर परिषदेचे काही लोकप्रतिनिधी शहरातील इतर ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित होते; मात्र प्रशासकीय प्रमुखांनी कार्यालयात उपस्थिती दर्शवली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही बाब केवळ निष्काळजीपणा नसून हेतुपुरस्सर दुर्लक्ष असल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.nagarparishadnews

या प्रकारामुळे संविधानाप्रती असलेल्या आदरभावाला धक्का बसल्याचे सांगत, दोषी अधिकाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, तसेच त्यांच्या सेवापुस्तकात नोंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची दखल घेऊन वरिष्ठ प्रशासन कारवाई करणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Wardhanews /१५ महिन्यांपासून चर्चा नाही; प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष — वर्ध्यात कर्मचारी बेमुदत संपावर

 

७ वेळा आंदोलन करूनही दखल नाही; जुनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी शिक्षक-कर्मचारी संतप्त

वर्धा (प्रतिनिधी सचिन वाघे ):

सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वारंवार प्रयत्न करूनही कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचा आरोप करत २१ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यात बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे.hingnghatnews

समितीच्या वतीने सांगण्यात आले की, मागील १५ महिन्यांत सात वेळा लक्षवेधी आंदोलन करूनही मुख्यमंत्री स्तरावर चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विधानसभेच्या पटलावर मान्य झालेल्या मागण्यांकडेही शासनाने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी व शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.wardhanews

जुनी पेन्शन योजना (२००५ पूर्वीची) लागू करणे, कंत्राटी व रोजंदारी कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, रिक्त पदे भरणे, आरोग्य विमा योजना लागू करणे तसेच विविध सेवाशर्तीतील प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याच्या मागण्या प्रलंबित असल्याचे समितीने नमूद केले आहे. Tahsilnews

“प्रलंबित मागण्यांचे धोंगडे भिजत ठेवले जात असून कर्मचाऱ्यांबाबत दुजाभाव केला जात आहे,” असा आरोप समितीने केला आहे.

Tahsilnews /दरम्यान, “अभी नहीं तो कभी नहीं” असा नारा देत सर्व कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकजुटीने संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संपामुळे शासकीय कार्यालये व शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.