Home Blog Page 181

घाट बोरी येथील वन विभागाचया रोपवन लागवडीच्या भ्रष्टचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर निलंबन ची कारवाई करा!,,, अन्यथा आंदोलनचा इशारा!!,

0

 

आझाद हिंद शेतकरी संघटनेचे वतीने उप वन संरक्षक बुलडाणा यांना निवेदन सादर,,!!

जिगाव प्रकल्प अंतर्गत स्टेट कॅम्प योजनेच्या निधीचया भरश्टा चारची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करा,!!,

 

आझाद हिंद शेतकरी संघटनेचया वतीने शेख सईद शेख कदिर यांनी आज दिनांक 11ऑगस्ट 2023 रोजी उपवन संरक्षक बुलढाणा यांना निवेदन दिले निवेदन नमूद केले की वनपरिक्षेत्र घाटबोरी अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव सकर्शा येथील शासकीय जमिनीवर जिगव प्रकलप स्टेट कम्पा योजने अंतर्गत झालेल्या रोपवन लागवडीच्या नावाखाली भ्रष्ट अधिकाऱ्यांनी स्वतःचा स्वार्थ साधला असल्याचे नमूद केले, संबंधित अधिकाऱ्यांक्या अर्थपूर्ण सहकार्याने शासकीय जमिनीवर तलावातून शेकडो वाहने मुरूम, माती,रेती, चे अवैधरीत्या उत्खनन करून व परिसरात मोठ मोठे रस्ते बनवून रेती साठा गोळा करून वाहतूक केली जाते,

शेकडो हेक्टर शासकीय तथा वन जमिनीवर रोप वन लागवडी करिता मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त झाला रोप लागवडीचे नावाखाली व वृक्ष लागवडीच्या नावावर शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी चा संबंधित अधिकारी यांनी भ्रष्ट चार केला, नावापुरतीच जमिनीवर वृक्ष लागवड केली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांन हाताशी धरून निधी खरची केल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले,रोपवन ल संरक्षण नसल्याने रोपवन मद्ये गुरे ढोरे चारत असून रोपवन हे पूर्णपणे उध्वस्त झालेले आहे,

भ्रष्ट अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची तसेच लागवडीच्या भराष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची तसेच फौजदारी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आझाद हिंद संघटनेचे विदर्भ अध्यक्ष शेख सईद शेख कदिर यांनी उप वन संरक्षक बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनातून केली.

मागणी पूर्ण न झाल्यास 15 दिवसानंतर आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला त्यावेळेस आझाद हिंद संघटनेच जळगाव जामोद तालुका अध्यक्ष शेख रसूल भाई तसेच आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जळगाव जामोद तालुका अध्यक्ष शेख अझरभाई पत्रकार राजेंद्र ससाने यांची उपस्थिती होती निवेदनाच्या प्रती वन मंत्री मुंबई,जिल्हा अधिकारी बुलडाणा,अड सतीशचंद्र रोठे,बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ यांना देण्यात आल्या,

अभयसिंह मारोडे यांच्या उपोषणाला आजाद हिंद शेतकरी संघटने चा जाहीर पाठिंबा – मा.कलीम शेख

0

 

 

दि.9 ऑगस्ट बुधवारी क्रांतीदिनी बेरोजगार शिक्षकांच्या न्याय हक्क मिळवून देण्यासाठी तहसील संग्रामपूर येथे उपोषणाला बसले आहे त्यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाठिंबा देण्यात आला.

आणि संग्रामपूरचे तहसीलदार आणि गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन तात्काळ उपोषणाची दखल घ्या आणि सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या थांबवून नवीन बेरोजगार शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत या विषयावर निवेदन देण्यात आले.

त्यावेळी आजाद हिंद शेतकरी संघटने चे तालुका अध्यक्ष शेख कलीम व शेख वसीम तंटामुक्ती अध्यक्ष मुफ्ती समि हाजी शफियोदींन सबीर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती…

अब होगा न्याय
बेरोजगार शिक्षकांच्या नियुक्त्या झाल्याचं पाहिजेत
आजद हिंद शेतकरी संघटना महाराष्ट्र

 

डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांना “युवकांची राजकारणात सकारात्मकता वाढविण्यासाठी समाज माध्यमाची भूमिका”विषयावर पीएचडी प्रदान

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगावः पुष्करणा ब्राह्मण समाजातील प्रगल्भ बुद्धीच्या असलेल्या छत्तीसगड की बेटी म्हणून प्रख्यात डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांना युवकांची राजकारणात सकारात्मकता वाढविण्यासाठी समाज माध्यमांची भुमिका एक विश्लेषण, मुल्याकंन या विषयावर डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

सदर पीएचडी डॉ. सुभाष चंद्राकर यांच्या मार्गदर्शनात पुर्ण केली. राष्ट्रपती पदकाव्दारे सन्मानित डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांनी समाजमाध्यमाव्दारे युवापिढी राजकारणात सशक्त अशंतः व गुणात्मक दोन्ही बाजूंचे सविस्तर विश्लेषण केले आहे. देशात अशा प्रकारचे हे पहिलेच संशोधन आहे. कर्मवीर चक्र प्राप्त डॉ. प्रियंका व्यास बिस्सा यांच्या अध्यायनातुन युवकांची राजकारणातील भुमिका प्रभावी ठरणार आहे.

प्रियंका व्यास बिस्सा ह्या शेगांव येथील हिंदू महासभेचे दिवंगत राष्ट्रीय नेते शालीग्रामजी जोशी यांची नात असून अकोल्याचे प्रख्यात अभियंते राजेश रामकिसन व्यास यांच्या स्नुषा आहेत.

प्रियंका बिस्सा यांना पीएचडी मिळाल्याने पुष्करणा ब्राह्मण समाजा मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत असून समाज बांधवांनी एकमेकांना पेढे खाऊ घालून आनंद साजरा केला तसेच खामगाव अकोला शेगाव तेल्हारा इत्यादी ठिकाणच्या समाज बांधवांनी तसेच श्रीमती सरस्वती व्यास, सौ. शिलादेवी व्यास, . राजेश व्यास, देवेश व्यास देविका व्यास यांच्यासह व्यास परिवारातील अन्य मान्यवरांनी प्रियंका बिसा व्यास यांचे अभिनंदन कौतुक केले आहे.

शेगांव ग्रामीण पोलिसांचा वरली जुगारवर छापा, ६ हजार रू चा मुद्देमाल जप्त

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.तालुक्यातील ग्राम तिंत्रव येथील सुरु असलेल्या वरली जुगार व अवैध दारू विक्रीवर ग्रामीण पोलीसांनी दि.९ ऑगस्ट रोजी दु.४.३० वा छापा मारला असता आरोपी कडुन ६ हजार १७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हकीकत अशा प्रकारे आहे की यातील नमुद घ ता वेळी व ठिकाणी यातील आरोपी याचेवर पंचासमक्ष – खबरेप्रमाणे जुगार व प्रोव्ही रेड केला असता आरोपीचे कब्जातुन आकडे लिहलेल्या कार्बनची १ नग कागदी मोठी चिठ्ठी कि. 00/- रु. वरली मटका जुगाराचे नगदी २८० रु एक नग डॉट पेन कि. ५/- रु. एक SAMSUNG कंपनीचा जुना वापरता मोबाईल हैंडसेट ज्याचा IMEI क्र. 350894211465341. ज्यामध्ये जिओ कंपनीच सिमकार्ड क्र. 8767833701 कि. अं. ५ हजार रुपये असा एकुण ५ हजार ,२८५ रुपयांचा जुगार माल तसेच घटनास्थळावरील थैलीची झडतीमध्ये आरोपीचे कब्जातून विनापरवाना ९० एम. एल. च्या एकुण २५ नग बॉटल प्रत्येकी कि ३५ रु प्रमाणे ८७५ रु ची दारु, एक नग वायरची थैली कि. १० रुपये, असा एकुण ८८५ रुपयाचा प्रोव्हीशन माल असा एकुण ६ हजार १७० रुपय जप्ती करुन ताब्यात घेतला

.या प्रकरणी सरतर्फे फिर्यादी पो.ना. सुधाकर प्रभाकर थोरात वय ३९ वर्ष नेमणुक मा. उप वि.पो. अ. सा. कार्यालय खामगांव यांनी दिलेल्या लेखी रिपोर्टवरुन शेगांव ग्रामीण पोलीसांनी आरोपी – विलास रामदास डोंगरे वर्ष ३२ वर्षे रा आडसुळ ह. मु. तित्रव ता. शेगांव जि. बुलढाणा याचे

विरुद्ध अप.नं १८१/२०२३ कलम १२(अ) मजुका,सह कलम ६५(ई) मदाका अन्वये सदरचा गुन्हा दाखल करुन तपास मा पो नी सा आदेशाने बीट पोहेका अरुण मेटांगे यांचेकडे देण्यात आला आहे

पंचायत समिती चामोर्शी येथे “मेरी माटी,मेरा देश” उपक्रम उत्साहात साजरा.

0

आमदार डॉ देवराव होळी यांच्या शुभहस्ते अनावरण.

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:- पंचायत समिती चामोर्शीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात विर जवानांनी आपल्या जीवाची बाजी लाऊन आम्हा सर्वांना इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले.त्यामुळे आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत.या घटनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण देशात “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अभियान मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात येत आहे.त्या मधीलच एक महत्वपूर्ण भाग म्हणून “मेरी माटी मेरा देश” हा उपक्रम दिनांक ९ आगस्ट रोजी साजरा करण्यात आला.
दरम्यान गडचिरोली निर्वाचन क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर देवराव होडी यांच्या शुभहस्ते शिलावरणाचे अनावरण करण्यात आले. प्रसंगी सर्व उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना शपथ देण्यात आले.पंचप्रण शपथ पुढीलप्रमाणे,
मी अशी शपथ घेतो की,विकसित भारताच्या विकासासाठी माझी भागीदारी प्रामाणिकपणे पार पाडीन,गुलामीच्या मानसिकतेतून मुक्त होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीन.देशाच्या समृद्ध वारशावर अभिमान बाळगिन आणि देशाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्नशील राहीन,देशाच्या एकता आणि अखंडते साठी सदैव प्रयत्नशील राहीन.देशाप्रती माझे कर्तव्य आणि जबाबदारीचे मी पालन करीन.देशाच्या प्रतिष्ठेसाठी वीरांच्या कार्यावर प्रेरित होऊन देशाचे रक्षण,सन्मान,आणि प्रगतीसाठी समर्पित राहीन

जय हिंद कार्यक्रमाला पंचायत समिती चामोर्शीचे गट विकास अधिकारी सागर पाटील, सहायक गटविकास अधिकारी भिमराव व्यनखंडे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, शिक्षण विस्तार अधिकारी नेताजी मेश्राम,यशवंत टेंभुर्णे, राजेश कोत्तावार,कृषी विस्तार

अधिकारी काळबांधे,केंद्र प्रमुख हिम्मतराव आभारे,गट साधन केंद्र चामोर्शी येथील विषय साधनव्यक्ती चांगदेव सोरते, विवेक केमेकर,संसाधन शिक्षक रवी खेवले,दशरथ गहाणे,कु मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण,उमेश पोहाणे,शिक्षक वर्ग,पंचायत समिती चामोर्शी येथील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी,महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.

किरकोळ सामान आणायचा आहे असे सांगून शेगाव बस स्थानक येथून 19 वर्षीय तरुणी बेपत्ता, शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये मिसिंग रिपोर्ट दाखल

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

भाची सोबत शेगाव बस स्टैंड वर आलेल्या 19 वर्षीय तरुणी किरकोळ सामान आनायला जाते असे सांगून निघून गेली ती बराच वेळ पर्यंत आली नाही त्यामुळे सदर माहिती तरुणीच्या भावांना देण्यात आली.

त्यावरून तरुणीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये हरविल्याची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गवई बकल नंबर 715 करीत आहेत

 

🔹

धावत्या रेल्वे समोर उडी मारून इसमेची आत्महत्या

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

धावत्या रेल्वे समोर उडी मारून इसमाने आत्महत्या केल्याची घटना ओळखली झाली आहे याबाबत रेल्वे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव नागझरी लोहमार्गावर खंबा किलोमीटर नंबर ५४७/२० या ठिकाणी रेल्वे समोर उडी मारून धनगर नगरातील इसमाने आत्महत्या केल्याप्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे .

याबाबत रेल्वे पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव रेल्वे स्टेशनचे डेप्युटी स्टेशन मास्तर यांनी दिलेल्या मेमो मध्ये माहिती दिली की ट्रेन क्रमांक 12 844 च्या लोको पायलेट ने माहिती दिली की शेगाव नागझरी रेल्वे स्टेशनच्या मदत लोहमार्ग किलोमीटर नंबर ५४७/२० वर एका इसमाने गाडी समोर येऊन आत्महत्या केली.

याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलीस विभागातील आरक्षक समाधान गवई घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर प्रेताची पाहणी केली असता कमरेवर मार लागलेला दिसला सदर मृतकाची ओळख धनगर नगरातील हेमंत संभाजी खांडेकर 43 असल्याचे समजले या प्रकरणी शेगाव रेल्वे पोलीस स्टेशन मध्ये मार्ग दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी अधिक तपास शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ए एस आय लंकेश्वर करीत आहेत

२२ ऑगस्ट ला सिंदी नगरवासियांचा चक्का जाम आंदोलन

0

 

सिंदि रेल्वे घर टॅक्स वाढ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी प्रकरणात प्रशासनाने जी आश्वासने दिली ती पूर्ण न झाल्याने

;- सिंदी (रेल्वे) शहरांतील नगर पालिकेने घर करामध्ये अवाजवी कर वाढवलेला आहे. तो कर रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह सिंदी रेल्वे येथील सर्व पक्षीय नेते, जनसामान्य नागरिकांनी न. पा. मुख्याधिकारी यांना वारंवार निवेदने दिली.

नगरपालिकेवर भर पावसात मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चा सुद्धा काढला असता या मोर्चात मोठ्या प्रमाणात शहरातील अनेक राजकीय पक्ष, विविध संघटना व सामान्य नागरिकांनसह रस्त्यावर उतरून नगर पालिका प्रशासनाला कर टॅक्स वाढ प्रकरणात जॉब विचारला असता मुख्याधिकार्यानी १५ ऑगस्ट पर्यंत टॅक्स कर वाढ कमी करून देऊ अशे सर्वांसमोर आश्वासन दिले परंतु आज अस लक्षात येते की प्रशासनाने सिंदी रेल्वे वासियानकडे पाठ फिरवली.

तसेच *कायमस्वरुपी मुख्याधिकारी नगर पालिकेला मिळावा यासाठी जिल्हाधिकारी यांचाशी खासदार रामदास तडस, विधानसभा आमदार रामदास आंबटकर, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले तसेच सिंदी शहरातील प्रतिष्ठीत नागरिक यांनी जिल्हाधिकाऱ्याशी त्यांचा दालनात चर्चा केली असता या चर्चेतून १५ दिवसामध्ये नगर पालिकेला मुख्याधिकारी मिळणार अशे आश्वासन देण्यात आले परंतु आता महिना होत आहे नाही मालमत्ता कर ही कमी झाला नाही

मुख्याधिकारी सुद्धा नगर परिषद ला मिळाले नाही अशे पोकळ आश्वासन देऊन सिंदी रेल्वे शहर वासी यांची दिशाभूल प्रशासनाकडून होत आहे.* करीता येणाऱ्या १५ तारखेच्या आत जर घर टॅक्स (कर) कमी झाला नाही तसेच कायमस्वरुपी मुख्याधिकारी न. पा. येथे रजू झाला नाही तर *दि २२- ऑगस्ट रोज मंगळवार ला सिंदी रेल्वे येथे सिंदी शहरातील नागरिकांसह चक्का जाम आंदोलन करणार असा इशारा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिला आहे.*

सिंदखेड राजा तालुक्यातील अतिवृष्टी पावसामुळे दोन मंडळा मध्ये पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई द्या -मनसेची मागणी

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

तालुक्यामध्ये दिनांक 05 व 06 जुलै रोजी दोन दुसरबीड व किनगाव राजा या मंडळा मध्ये ढग फुटी व अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याच्या शेतातील माती पूर्ण खरडून गेली आहे फळबागांचे नुकसान झाले आहे तसेच सोयाबिन, कपाशी, चे सुद्धा खूप नुकसान झाले आहे

शेतकऱ्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे तरी संबंधित अधिकाऱ्याने पंचनामे करून हेक्टरी 50 रु आर्थिक मदत देण्यात यावी असे ना झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल

अशी मागणी मनसे जिल्हा अध्यक्ष शिवा दादा पुरंदरे, जिल्हाउपाध्यक्ष निलेश देवरे, तालुकाध्यक्ष अभिजित देशमुख, विधानसभाअध्यक्ष सिधु गव्हाड, विद्यार्थी सेना जिल्हाअध्यक्ष अतिश राजे, शहर अध्यक्ष घनशाम केळकर, गव तहसिदार याना निवेदन देण्यात आले.

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे थकवलेले हप्ते बँक खात्यावर वितरीत करा – स्वाभिमानीची मागणी

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

पी एम किसान सन्मान निधी योजनेचे थकवलेले हप्ते बँक खात्यावर वितरीत करा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि. ७ ऑगस्ट रोजी संग्रामपूर तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले या निवेदनात नमूद आहे की,

प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने प्रती शेतकरी २ हजार रुपये हप्ता देण्यात येतो. आणि वर्षाला ३ हप्ते असे एकुण प्रती शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये सरकारकडून वाटप करण्यात येत असल्याचा अनेक महिन्यांपासून सरकार मोठा वाजा गाजा करत आहे.

पंरतु हकिकत वेगळीच आहे. कित्येक महिन्यापासून पीएम किसान सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत. तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अजुन २ हजार रु. खात्यावर वितरीतचा मुहूर्तही झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे. शेतकरी कार्यालयात चकरा घालून हैराण झाले आहेत, लोकप्रतिनिधींनी या योजनेच्या कागद पत्रासाठी क‌‌ॅम्पचे उद्घाटन करुन मोकळे झाले आहेत.

शेतकऱ्यानी के वाय सी केल्या शिवाय पी एम किसान सन्मान निधी खात्यावर जमा होणार नाही असे प्रशासनातील कर्मचाऱ्यांकडुन वेळोवेळी सांगण्यात येत आहे

. पंरतु गेल्या एक वर्षापासून शेतकऱ्यांची के वाय सी झालेली असतांना शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता खात्यावर जमा होत नाही. अशी शेतकऱ्यांची ओरड आहे. अगोदरच महापुराने ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचा सर्वच बाजुचा आधार तुटल्याने पुर्णपणे शेतकरी खचुन गेला आहे.

करीता तत्काळ आपल्या स्तरावर पीएम किसान निधीचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी प्रयत्न करुन निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात यावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सोबत घेऊन तहसील कार्यालया समोर सोमवार दि. १४ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे ,

यावेळी स्वाभिमानी पक्षाचे तालुका अध्यक्ष विजय ठाकरे, अजय ठाकरे,विशाल चोपडे, गोकुळ गावंडे, संजय धरमकार, प्रफुल करांगळे, राजेंद्र ठाकरे, रवी चोपडे, विठ्ठल जळमकार, मोहन चोपडे, सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते..