Home Blog Page 185

यावल शहरात विस्तारीत भागात राहणाऱ्या शिक्षकाचा अचानक विहिरीत तोल जावुन पडल्याने दुदैवी मृत्यु

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील विस्तारित भागातील वस्तीत राहणाऱ्या एका विवाहीत शिक्षक तरुणाचा अचानक विहीरीत पडून मरण पावल्याची घटना समोर आली आहे पोलीसात या घटनेची नोंद करण्यात आली आहे .

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार यावल शहरातील विस्तारीत वसाहतीमधील बालाजी सिटी या परिसरात राहणारे व वाघझीरा तालुका यावल येथील आदीवासी आश्रमशाळेत शिक्षक म्हणुन कार्य करणारे नितिन लक्ष्मण निंबाळे वय४५ वर्ष हे दिनांक २४ जुलै सोमवार रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे फिरण्यासाठी गेले असता या परिसरातील बालाजी मंदीरा ,जवळ असलेल्या कोरड्या विहीरीच्या ओठयावर बसले असतांना

अचानक त्यांचा तोल जावुन विहीरीत पडल्याने त्यांचा मृत्यु झाला आहे. याबाबत मिलींद दिलीप मिस्त्रि वय ४२ वर्ष यांनी खबर दिल्याने यावल पोलीसात अक्समात मृत्यु नोंद करण्यात आली असून , पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे . मयत शिक्षक नितिन निंबाळे यांच्या कुटुंबात पत्नी व दोन मुले आहेत .

यावलच्या ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ शिवदास चव्हाण यांनी ममताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केलेत.

जलंब सरपंचांनी कमिशनरूपी भ्रष्टाचाराच्या पैशातून केलेल्या कामाची चौकशी करावी.

0

 

स्वाभिमानीचे गिरधर देशमुख यांची पं. स. कडे मागणी

खामगाव: शेगाव तालुक्यातील जलंब येथील माजी सरपंच सौ. मंगला उत्तम घोपे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे अडीच कोटीची विकास कामे केली. या कामाच्या मध्यमातून
मिळालेल्या २२ लाख ७७ हजाराच्या भ्रष्ट्राचार रुपी कमिशन मधून विकास कामे केल्याची जाहीर कबुली त्यांनी दिली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी,

अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य गिरधर दलपतराव देशमुख, यांनी शेगाव पं. स. गट विकास अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माजी सरपंच यांनी १८ मे २०२३ रोजी विकास कामांचा आढावा सादर करण्याबाबत घेतलेल्या एका कार्यक्रमात वरील प्रमाणे भ्रष्टाचाराची स्पष्ट कबुली दिली आहे.

यानंतर दोन महिन्यांचा कालावधी लोटला असतांना सुद्धा याप्रकरणी काहीच कार्यवाही झालेली नाही. यावरून सदर भ्रष्टाचाराला प्रशासनाची मान्यता दिसून येत असल्याचा आरोपही गिरधर देशमुख यांनी केला आहे.

तसेच विविध मुद्दे उपस्थित करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.विशेष बाब म्हणजे यासंदर्भात गिरधर देशमुख यांनी यापूर्वीच ग्रामपंचायत कडे चौकशीची मागणी केली आहे. परंतु दाद मिळाली नाही.

एक रुपयात पिक विमा भरा देऊ नका जास्त रक्कम उपविभागीय अधिकारी डॉ.रामेश्वर पुरी यांचे आवाहन

0

 

विकी वानखेडे यावल

खामगांव, दि24 मा. आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र जा.क्र./प्रापिदियो /सा-८/२२३४१/२०२३ दि.०५/०७/२०२३ अन्वये शासनाने सन २०२३-२४ पासुन सर्व समावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी शेतकरी विमा हप्त्याची रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे

त्यामुळे शेतक-यांना केवळ १/- रुपया भरून PMFBY पोर्टलवर स्वत: शेतकरी यांना तसेच विमा कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल पिक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करण्याकरीता सामुहिक सेवा केंद्र (csc) केंद्र धारकाला विमा कंपनी मार्फत प्रति अर्ज रक्कम रु ४०/- देण्यात येत आहे या व्यतीरीक्त खामगांव उपविभागातुन (खामगाव / शेगांव) सामुहिक सेवा केंद्र (CSC) में केंद्र धारक शेतक-यांकडुन अतिरीक्त पैसे घेत असल्याबाबत च्या तोंडी तक्रारी प्राप्त होत आहेत..

त्याअनुषंगाने याद्वारे सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, सामुहिक सेवा केंद्र (CSC) येथे सदर योजनेची नोंदणी करताना आवश्यक ते कागदपत्रे घेवून नोंदणी करावी नियमानुसार निर्धारीत करण्यात आलेल्या रकमेचाच भरणा करावा त्या व्यतीरीक्त अतीरीक्त पैसे देण्यात येवू नये सामूहिक सेवा केंद्र (csc) चे केंद्र धारक शेतक-यांकडुन अतिरीक्त पैश्याची मागणी केल्यास त्याबाबत संबंधीत तालुक्याचे तहसिलदार किंवा उपविभागीय अधिकारी खामगांव यांचेकडे तक्रार दाखल करावी असे आव्हान खामगाव उपविभागीय अधिकारी, डॉ. रामेश्वर पुरी यांनी केले.

बाजीराव माणिकराव पाटील यांची विरावली विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड

0

 

यावल( प्रतिनिधी)विकी वानखेडे

विरावली येथील रहिवासी बाजीराव माणिकराव पाटील यांची विरावली विकास सोसायटीच्या चेअरमन पदी निवड करण्यात आली दिनांक 24/07/2023 रोजी निबंध कार्यालयाचे अधिकारी के वी पाटील याच्या अध्यक्षतेखाली चेअरमन पदाची निवडणूक पार पडली

या निवडणुकीत बाजीराव माणिकराव पाटील यांची हजर संचालक मंडळा कडून सर्वानुमते निवड करण्यात आली बाजीराव माणिकराव पाटील भारतीय डाग विभागात पोस्ट विभागात पोस्टमास्तर म्हणून गेले 35 वर्ष विरावली गावात कार्यरत होते

काही दिवसापूर्वी त्यातून निवृत्ती होऊन आपल्या अनुभवाचा आपल्या गावात सहकार क्षेत्राच्या माध्यमातून गावात सेवा व्हावी म्हणून शेतकरी परिवर्तन पॅनल च्या वतीने निवडणूक लढवली होती

त्या सर्वाधिक मतांनी निवडून आले होते यांच्या या चेअरमन निवडी बद्दल त्यांचे सहकारी माजी वि का सो चेअरमन अर्जुन पाटील ,संस्थेचे व्हा.चेअरमन नरेंद्र सोनवणे, संचालक युवराज पाटील , लीलाधर कोळी,नावरे येथील रमेश पाटील , संजय मोतीराम पाटील ,गुलाब पाटील, प्रल्हाद पाटील ,कोकिळा पाटील ,उषा महाजन , प्रमिला पाटील आदी संचालक मंडळ यांनी नवनिर्वाचित चेअरमन यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा दिल्या.

निवड झाल्या नंतर विरावली गावात फटाके फोडत आनंद साजरा करण्यात आला या प्रसंगी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष अजय पाटील सर माजी चेअरमन संजय पाटील , पवन पाटील,गिरीष पाटील,धीरज महाजन माजी नगर अध्यक्ष अतुल पाटील माजी नगर अध्यक्ष राकेश कोलते , राष्ट्रवादी चे विधान सभा प्रमुख अनिल साठे , जिल्ह्याउप अध्यक्ष दीपक पाटील , उंटवद वि का चे चेअमन शशिकांत पाटील जिल्ह्यायुवक सरचिटणीस विनोद पाटील ,राष्ट्रवादी समन्वयक किशोर माळी ,युवक कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे , शहर युवक अध्यक्ष हितेश गजरे,दिनकर पाटील संतोष पाटील केदार पाटील,नयन पाटील ,विजय पाटील महेश पाटील,विशाल पाटील युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील , वि का सो चे सचिव प्रमोद सुरवाडे व कर्मचारी सिकंदर तडवी आदींनी शुभेच्छा देत भावी वाटसाचीस हार्दीक शुभेच्छा दिल्या

चुंचाळे रस्त्याची दयनीय अवस्था काय ते खड्डे काय तो रस्ता आणि काय ते लोकप्रतिनिधीसह संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील चुंचाळे ते चुंचाळे फाटा असलेला रस्ता बऱ्हाणपूर अकंलेश्वर महामार्गाला व जळगाव जाण्यासाठी सोयीचा जोडणारा चुंचाळे ते चुंचाळे फाटा हा ३ किलोमीटर च्या रस्त्याची अंक्षरशा चाळण झालेली आहे.

या रस्त्यांची स्थिती अतिशय कठीण झाल्याने येथील ग्रामस्थांचे जगणेच कठीण झाले आहे यामुळे लोकप्रतिनिधीसह सार्वजनिक बाधकामाचे अधिकारी यांच्याबद्दल संताप व्यक्त होत आहे तर काही सुज्ञ नागरिक व तरुण आदोलंनाच्या पावित्र्यात आहे.

दरम्यान चुंचाळे ते चुंचाळे फाटा पर्यंत असलेला ३ किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खंड्डे पडलेले असून देखील या रस्त्यावरुन मार्गक्रमण करणे म्हणजे अपघाताला निमत्रण देणे आहे या रस्त्याकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचे अक्षंम्य असे दुर्लक्ष झाले आहे का?

असा प्रश्न नागरिकांना पडला आहे हा रस्ता नव्याने करणा गरजेचा आहे गेल्या दोन ते तिन वर्षापासून या रस्याची दुरावस्था झाली आहे यामुळे ग्रामस्थामधून तिव्र संताप व्यक्त होत आहे याच रस्त्यावरून चुंचाळे ,बोराळे ,गायरान,नायगाव,मालोद,आडगाव,दहिगाव,सौखेडासिम,असे अनेक गावे जोडलेली आहेत तसेच जळगाव जाण्यासाठी देखील हा रस्ता सोयीचा ठरतो या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते रस्ता दुरुस्तीचे काम सार्वजनिक बाधकाम विभागाणे त्वरीत हाती घ्यावे अशी मागणी

चुंचाळे सह परिसरातील वाहनधारकांनकडून होत आहे चोपडा मतदार संघाचे आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी लक्ष देत डांबरीकरण करुन घेतले पाहिजे पुर्ण मतदार संघातील गावामध्ये आमदार लताताई सोनवणे यांनी भरपूर निधी देऊन विकास कामे केली आहे

यासाठी मतदारांमधून त्यांच्या कामाचे कौतूक ही केले जाते तरी चुंचाळे ते चुंचाळे फाटा या रस्त्याला निधी उपलब्ध करुण ते काम देखील मार्गी लावावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे ऐवढेच नाही तर काही गरोदर महीलांची प्रसृती ही रिक्षामध्ये करण्याची वेळ आलेली होती,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.त्यात चुंचाळे पासुन चुंचाळे फाटा पर्यंतचा ३ किलोमीटर चा रस्ता चुंचाळे ते दहिगाव ५ कि.मी.रस्ता जीवघेणा झालेला आहे.

अनेकदा मागणी करूनही येथे नविन रस्ता होत नसल्याने ग्रामस्यांमधे तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चुंचाळे गावाची लोकसंख्या ही चार हजाराच्या आसपास आहे. छोट गाव असल्याने बहुतांश कामासाठी यावल किवा जळगाव जावे लागते.त्यामुळे येथुन बाहेर गावाला जाणे व बाहेर गावाहुन गावात येणे ही खुपच मोठे संकट असते.

आठवडे बाजार, शेती साहीत्य,खते,अत्यावश्यक दवाखाना या गोष्टींसाठी तर इच्छा नसतांनाही साकळी येथे जावे लागते. एकुणच या रस्त्याच्या समस्येने येथील ग्रामस्थांचे जगणे कठीण झाले आहे.तरी या जिवघेण्या रस्त्यांवर अनेकदा लहान अपघात झालेले आहे.यामुळे या गंभीर व जिवघेणा ३ किलोमीटर चा रस्ता तात्काळ मार्गी लागावा,अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

दौरे नको पाहणी नको थेट तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करा.:-निलेश देशमुख जिल्हाप्रमुख विद्यार्थी सेना बुलढाणा

0

 

बुलडाणा जिल्ह्यात खास करून घाटाखालील भागात मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. नागरी वस्त्यांचे देखील नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर वरील पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे.

त्यामुळे अतिवृष्टीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना मदतीसाठी पावले उचलण्यात यावीत, जिल्ह्यातील पालकमंत्री कुठे आहे यांना लाज वाटायला पाहिजे दौरे करण्यात पेक्षा मदत जाहीर करा

जळगाव जामोद व संग्रामपुर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्याना पुर आल्यामुळे गावातिल गुरे ढोरे , शेतातिल उभे पराटी, सोयाबिन, तुर पिके वाहून जमीनी खरडुन गेली घरे वाहुन गेल्या मुळे लोक बेघर झाली आहे दौरे न करता तात्काळ सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी उ.बा.ठाकरे शिवसेना.विद्यार्थी जिल्हाप्रमुख निलेश देशमुख यांनी केली व शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील

अतिवृष्टिच हाहाकार , सर्व सामान्यावर वार , परिस्तिति असली दक्ष तरी प्रशासनाच्या मदतीकडेच लक्ष

0

 

ढगफुटी सदृष्य पाऊसाने संग्रामपुर तालुक्यातील सर्व सामान्य माणसापासून तर शेतकरी, शेतमजूर यांचे अतोनात नुकसान झाले.आज सकाळी सर्वात अगोदर पातुर्डा बु येथील प्रयोगशील शेतकरी श्री भाष्करकाका चिकारे यांच्या शेतातील नुकसान पाहणी केली.दुर्गादैत्य व वानखेड ला जोडणारा पुल वाहुन वानखेड गावचा संपर्क तुटला, संबंधित विभागाशी संपर्क करुन येण्याजाण्यासाठी भराव टाकून तातडीने सुरू करा अशी मागणी केली.

 

अमोल मोहोड यांची किराणा दुकान

या पुला जवळच श्री नानाभाऊ भोजने यांच घर संपूर्ण वाहुन गेले त्यांना तात्काळ धान्यांची व्यवस्था करुन देण्याच्या शासनाच्या आदेशाचे पालन करत ग्राम सेवक श्री धनावडे व ग्रा पं सदस्य यांनी अंमलबजावणी केली

.वरवट बकाल येथील कृ उ बाजार समितीच्या आवारात नाल्याचे पाणी घुसून व्यापारी व शेतकरी यांच्या मालाचे नुकसान झाले त्याची पाहणी केली याच वेळी कृ उ बाजार समितीच्या भाड्याने दिलेल्या दुकानात पाणी शिरुन तेथील व्यावसायिक श्री नितीन हागे यांच्या कृषी केंन्द्राचे,श्री शिवदास गोल्हर यांच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे तर रेडीमेड कापड दुकानदारांचे नुकसानाची पाहणी करत श्री काशीरामजी ढगे यांच्या शेतात जाऊन शेती पिकाची पाहणी

केली.वरवट बकाल येथील शेतकऱ्यांची जनावरे दगावली त्यांजी उत्तर तपासणी पशुसंवर्धन अधिकारी यांनी अहवाल बनवल्याची खात्री करून घेतली.येथुन बावनबीर येथील खुप मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी केली.एकलारा येथील शेतकरी श्री मदनभाऊ धुळे यांचा आलेल्या पुराचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटुन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला

.संबधित कुटुंबाला तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.एकलारा गावातीलच पुराचे पाणी घुसलेल्या घराची पाहणी केली यावेळी सरपंच, ग्राम सेवक उपस्थित होते.यानंतर आकोली येथेही खुप मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी केली.आमचे बंधु श्री अमोल मोहोड पाटील यांच्यी किराणा दुकान,पिठ गिरणी वाहुन गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना धीर देत आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचा विश्वास दिला.

आकोली येथीलच एक वयोवृद्ध महिला आपल्या घरातील संपूर्ण वाहुन गेलेल्या सामानाची पाहणी करत असतांनाची आजीच्या डोळ्यातून अश्रूंमुळे उपस्थितांची डोळे पाणावले होते.

येथुन सरळ तहसील कार्यालय गाठुन मा तहसीलदार साहेबांना तालुक्यातील नुकसानीची माहिती दिली,मा कर्तव्यदक्ष आमदार डॉ श्री संजुभाऊ कुटे यांनीही तात्काळ नुकसानाची पाहणी करण्याचे आदेश देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री जानरावजी देशमुख, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा जि प सदस्य श्री राजुभाऊ ठाकरे, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री श्रीकृष्णजी भालतिडक महाराज, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री पवनभाऊ अस्वार श्री संजुभाऊ ठाकरे, श्री अविनाश धर्माळ,श्री शोहेब भाई उपस्थित होते.

४० रक्तदात्यांची रक्तदान करुन कै.जोशीना आदरांजली …!

0

 

कै.शालिग्राम जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सलग दुसऱ्या वर्षी शिबीराचे आयोजन

सिंदी रेल्वे ता.२२ : शहरातील सुपरिचित समाजसेवक तथा शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष कै.शालिग्राम जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जोशी परिवार आणि मित्र मंडळाव्दारे सलग दुसऱ्या वर्षी शनिवारी (ता.२२) ला जैन भवन येथे आयुष्य ब्लड बॅक नागपुर यांच्या सहकार्याने भव्य रक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

………कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.लिलाधर पालिवाल हे होते. तर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक वदंना सोनुने या होत्या. साई क्रिडा मंडळाचे अध्यक्ष गंगाधर कलोडे आणि आयुष्य ब्लड बॅक नागपुरच्या संचालिका भांडवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन आणि कै. शालिग्राम जोशी यांच्या प्रतिमेचे पुजन व श्रध्दा सुमन अर्पण करुन करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरानी कै. जोशी यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.

रक्तदान शिबीराची सुरवात जीवनातील ५१ वे रक्तदान करुन बुलढाणा अर्बन बँकेचे कर्मचारी अतुल बेलखोडे यांनी केली. रक्तदानात विक्रम प्रस्थापित करणारे बेलखोडे यांचा मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे याप्रसंगी कार्यतत्पर ठाणेदार म्हणुन आपल्या कार्याची कमी कालावधीत छाप उमटविणार्या वंदना सोनुने यांचा शाल श्रीफळ आणि मोमेंटो देऊन श्रीमती प्रेमाताई शालिग्राम जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रक्तदान शिबीरात ३० पुरुष आणि १० महीला अशा ४० दात्यानी रक्तदान करुन कै.जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक मोहन सुरकार यांनी केले. उपस्थितांचे आभार आनंद छाजेड यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुग्रेश जोशी, राजु निनावे,चंपु भन्साली, अनिल बाकडे, बालु सोनटक्के, रमेश वंडाद्रे, बंडु उंबरकर आदीनी परिश्रम घेतले.
रक्तदान करतांना माजी नगरसेवक अमोल बोंगाडे आणि सहकारी

शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी:- संगीतराव भोंगळ.

0

शुक्रवार रात्रीपासून पातूर्डा जिल्हा परिषद सर्कल सह संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुका जिल्हा बुलढाणा मुसळधार पावसाचा कहर, त्यामुळे नदी नाल्यांना आला महापूर

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संगीतराव भोंगळ यांनी दिल्या अनेक गावांना भेटी..

तालुक्यातील शेकडो गावात पुराचे पाणी शिरल्याने जनजिवन विस्कळीत
झाले

हजारो एकर जमीन पिकांसह खरडुन गेल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले.

शेतकरी शेतमजुरांना मुसळधार पावसाचा फटका शेतपिकाच्या नुकसानसह मोठ्या प्रमाणात घराची पडझड सुद्धा झाली त्याचबरोबर गुराढोरांच्या चाऱ्याचे व गुराढोरांच्या गोठ्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे घरातील सर्व सामानाचे व धान्याचे सुद्धा नुकसान झाले.

काही घरे जमीनदस्त तर काही घरांची प्रचंड प्रमाणात पडझड झाली
काही ठिकाणी जनावरे व शेती साहित्य नदीच्या पुरात वाहून गेले
सरकारने कोणत्याही प्रकारचे निकष न लावता सरसकट नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना यांना आर्थिक मदत देण्यात यावी

नानकसिंह बावरी यांची अ. भा, सिकलकर विकास मिशनचे उपाध्यक्षपदी नियुक्ती.

0

 

अनिलसिंग चव्हाण बुलढाणा

वर्धा /तळेगाव :-अखिल भारतीय सिकलकर विकास मिशन कार्यक्षेत्र भारतचे उपाध्यक्षपदी नानकसिंह टेहलसिंह बावरी यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की एक श्रेष्ठ समाजसेवक व उपेक्षित समाजाची लोकप्रियता त्याचप्रमाणे समाजातील दुःखी,लोकप्रियता.त्याच प्रमाणे समाजातील दुःखी , कष्टी उपेक्षित समाजाचे कार्य करीत आहात.

आपली वैचारिक बुद्धिमत्ता पाहता सर्व धर्म समभाव व मानवतेच्या क्षेत्रात कार्य करीत आहात .याची दखल घेवून नानकसिंह टेहलसिंह बावरी तळेगाव श्या पं .ता.आष्टी जिल्हा वर्धा यांची अ.भा.सिख मिशनचे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्र अ.भा. शिकलकर विकास मिशनचे भारत क्षेत्र संस्थापक अध्यक्ष कमल सिंह बावरी यांनी नियुक्ती पत्र दिहून सिकलकर समाजासाठी एक उत्तम पदाधिकारी दिले आहे. याबद्दल नानकसिंह व आपले सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.