Home Blog Page 186

यावल येथे महाराष्ट्र ग्रामीण शेड्अल बँकेचा वर्धापन दिन ग्राहक ,व्यापारी आणी शेतकरी यांच्या उपस्थित संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा १४वा वर्धापन दिन ग्राहक ,शेतकरी,व्यापारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावल शहरातील नागरीकांच्या तत्पर सेवेशी असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण शेड्रअल बँकेचा १४ वा वर्धापन येथील शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बॅंकेच्या शाखेतील दालनात संपन्न झाला

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रगतीशील शेतकरी प्रमोद नेमाडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन शहरातील प्रसिद्ध ज्वेलर्सचे व्यापारी पिन्टू सोनार व बॅंकेच्या यावल शाखेचे व्यवस्थापक हिंगणेकर , सुरेश पाटील, अय्युब पटेल , सुनिल गावडे, तेजस यावलकर, अशोक तायडे यांच्यासह आदी मान्यवर व परिसरातील ग्राहक आणी शेतकरी बांधव याप्रसंगी उपस्थित होते .

दरम्यान १९७६ साली स्थापन झालेली बँक ही भारत सरकार उपक्रम असलेली व बॅंक ऑफ महाराष्ट्र व्दारा पुरस्कृत असलेली ही बँक पुर्णत : सरकारी मालकीची आहे व विविध बॅंकांच्या एकत्रीकरणातुन २६ / ०६ /२००९ रोजी आस्तित्वात आलेली बँक असुन , महाराष्ट्र राज्यात या बँकेच्या ४२२ शाखा असुन, बँकेचा २५००० कोटीचा व्यवसाय आहे .

बँकेंच्या यावल शाखेत वर्धापना दिना निमित्त विविध विमा योजनेचे श्रीमती चंद्रकला प्रविण तळेले ( अपघात विमा ) गोविंदा खैरे ( अपघात विमा ) , गोविंदा पोपट माळी, ( प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा ) जितेन्द्र जोहरी ( प्रधानमंत्री जिवन ज्योती विमा ) अशा चार लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले .

यावेळी प्रमोद नेमाडे,पिन्द्ग सोनार यांनी आपले विचार मांडलेत मयुर यांनी बँके संदर्भातील विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली ,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार सुधाकर बाउस्कर यांनी मानले .

शालेय जिवणातच कौशल्य आत्मसात केली पाहीजे – नितीन बच्छाव किन्ही हायस्कुल मध्ये मुलींना शिलाई मशिन वाटप.

0

 

प्रतिनिधी l विकी वानखेडे

शालेय जिवणातच मुला-मुलींनी विविध कौशल्य आत्मसात करुन विकास साधला पाहीजे.शैक्षणिक प्रगतीबरोबरच व्यवसायमुल्य शिकुन भविष्यात त्याचा वापर आपण केला पाहीजे.कोणते शिक्षण,व्यवसाय ठराविक मर्यादित न ठेवता आपल्यास जे जमेल त्यात आपण आपण भविष्य उज्वल करता आले पाहीजे असे मार्गदर्शन माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी कार्यक्रमात केले.

तालुक्यातील किन्ही येथिल सर्वोदय हायस्कुल मध्ये समता फाउंडेशन व हायस्कुल यांच्या संयुक्तपणे मुलींना सायकल वाटप करण्यात आले.यावेळी जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख उपस्थित होते.यावेळी मुख्याध्यापक डी पी साळुंके यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

समता फाउंडेशन व सर्वोदय हायस्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने संगणक आणि शिवणकाम हे कोर्स विद्द्यार्थ्यार्थांसाठी शाळेत शिकविले जातात.

शाळेतील मुले व मुली आनंदाने एक प्रकारचे जीवनावश्यक व्यावसायिक शिक्षण घेत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर समता फाउंडेशन चे मालक पुरुषोत्तम अग्रवाल गरीब आणि होतकरू मुलींसाठी शिवण मशीन मोफत देत असतात जेणेकरून त्यांचा आधार घेऊन भविष्यात मुली स्वतःच्या पायावर उभे राहतील व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतील याच नियोजनार्थ आमच्या किन्ही शाळेतील मुलींसाठी दहा शिवण मशीन चे वाटप परिसरातील किन्ही ,खंडाळा मोंढाळा कन्हाळे गावातील मुलींना मा माध्यमिक शिक्षणाधिकारी नितिन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी एजाज शेख साहेब तसेच शिवणकाम विभागाच्या पर्यवेक्षिका आशा तडवी, भुसावळ पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील,खजिनदार प्रशांत सोनवणे,चेअरमन डॉ मधुकर चौधरी,सेक्रेटरी संजयभाऊ चौधरी संचालक प्रविण फिरके अरुण पाटील पत्रकार हर्षल पाटील शाळेचे मुख्याध्यापक डी पी साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले.

सदर कार्यक्रमात शिक्षणाधिकारी यांनी आपल्या वाणीतून उपक्रमाची मनापासून स्तुती केली व ज्याप्रमाणे मुलींना शिवण मशीन वाटप करण्यात आले त्याप्रमाणे मुलांना सुध्दा प्राविण्य संपादन केल्या नंतर गरजू मुलांनाही मशीन वाटप कराव्यात ही अपेक्षा व्यक्त केली तर फाउंडेशन च्या पर्यवेक्षिका आशा तडवी यांनी शिवण मशीन विभागाचे कार्य व महत्व विशद केले

शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची रूपरेखा स्पष्ट केली आणि फौंडेशनचे मालक पुरुषोत्तम अग्रवाल व संपूर्ण टीम चे मनापासून आभार मानले तर पतपेढीचे अध्यक्ष गोपाळ पाटील संचालक प्रशांत सोनवणे यांनीही आपले मनोदय व्यक्त करून समाधान व्यक्त केले.

शेवटी शाळेचे पर्यवेक्षक डी सी बाविस्कर यांनी अध्यक्षीय भाषणातून समता फौंडेशन आणि शाळा यांचा घनिष्ट संबंध असून दोघेही विद्द्यार्थी लाभासाठी कार्य करीत आहे व विकास साधत आहे असे स्पष्ट केले व गरीब गरजू मुलांना सुध्दा मोफत संगणक द्यावेत अशी विनंती केली कार्यक्रमासाठी फौंडेशनचे संगणक विभागाचे शिक्षक विजय तायडे सर, शिवणकाम विभागाच्या पर्यवेक्षिका तडवी मॕडम शिक्षिका सरोदे मॕडम शाळेतील तिन्ही विभागांतील सर्व शिक्षक बंधु-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आडावड हायस्कुलचे उपमुख्याध्यापक खुशाल कंखरे व अतुल पाटील सर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री जे ए ढाके यांनी केले तर आभार सौ व्ही एन पाटील यांनी मानले.

भर पावसात जनता हजारोच्या संख्येने उतरली रस्त्यावर….

0

 

कर वाढीच्या निषेधार्थ अतुल वांदिलेच्या नेतृत्व पालिकेवर धडकला सर्व पक्षीय जनआक्रोष मोर्चा …..

सिंदी रेल्वे (ता. २१) :नगर पालिकेने वाढविलेल्या अव्वाढव्य
मालमत्ता कर (घर टॅक्स) वाढीच्या निषेधार्थ सामान्य सिंदीकरांनी एकत्र येत राकाचे अतुल वांदिलेच्या नेतृत्वात शुक्रवारी (ता.२१)ला दुपारी ११ वाजता सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा पालिकेवर धडकला.
सविस्तर वृत्त असे की, सिंदी (रेल्वे) येथे नगर पालिका प्रशासनाने करामध्ये ३५% ते ४०% नी वाढ केलेली आहे.

ती अवाढव्य वाढ कमी करण्याकरीता पालिकेचे मुख्याधिकारी आश्रमे यांना शहरातील जनतेच्या वतीने घरटैक्स कमी करण्याबाबत ३० जुन ला निवेदन देण्यात आले होते. परंतु त्यावर मुख्याधिकारी साहेबांनी कोणताही तोडगा काढला नाही.

त्यानंतर परत १२ जुलै ला प्रभारी मुख्याधिकारी विजय आश्रमा यांना मोर्चेकरांनी घेराव घालीत मागणीसाठी आंदोलन केले. तरी सुद्धा न.पा.प्रशासनाने कोणत्याही प्रकारे कार्यवाही केली नाही व समाधानकारक उत्तर सुद्धा दिले नाही.

वारंवार निवेदन देवून सुद्धा पालिका प्रशासन कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे सामान्य गोरगरीब सिंदीवासीयांच्या मनात पालिका प्रशासनाच्या विरोधात आक्रोश निर्माण झाला होता.

यांचा उद्रेक म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात सिंदी शहरातील सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील सर्व सामान्य नागरीकानी शुक्रवारी (ता.२१) ला बाजारपेठेतील गांधी चौकातुन करवाढी विरुद्ध जनआक्रोश मोर्चा काढला.

सकाळ पासुन शहरात जोरदार पाऊसाच्या सरीवर सरी कोसळत असतांनी सुध्दा हजारोच्या संख्येने सिंदीकर मोर्चात सहभागी झाले होते. पालिका प्रशासना विरुद्ध घोषणा देत मुख्य रस्त्याने जात मोर्चा पालिका कार्यालयावर धडकला येथे वांदिले यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय शिष्टमंडळानी मुख्याधिकारी आश्रमे यांच्या सोबत चर्चा केली. मात्र कोणतेही समाधान व्होवु शकले नसल्याने रोष व्यक्त करुन मोर्चेकर रित्या हाताने परतले.

यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्यासह सिदी रेल्वे शहरातील काग्रेसचे, शिवसेनेचे(उध्दव ठाकरे) , भाजपाचे, वंचित बहुजन आघाडीचे, आरपीआयचे आदी सर्व पक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते…

“जनतेचा जनआक्रोश मान्य असुन शहरातील वाढविलेल्या मालमत्ता करा बाबत मा. जिल्हाधिकारी साहेबांना पत्रव्यवहार करुन अवगत करतो आणि शासन नियमाच्या आधीन राहून मा. जिल्हाधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार काय मार्ग निघतो ते आपण येत्या १५ आॅगस्ट पर्यंत मोर्चेकरांना कळवू. ”
विजयकुमार आश्रमा
प्रभारी मुख्याधिकारी
नगर परिषद सिंदी रेल्वे

” येत्या १५ आॅगस्ट पर्यंत प्रशासनाने यावर तोडगा काढवाॎ अन्यथा उग्र आणि आक्रमक आदोलन करु. हजारोच्या संख्येने चक्का जाम आदोलन करू यामुळे होणार्‍या परिस्थितीला प्रशासन स्वतः जबाबदार राहील”
अतुल वांदिले
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी (शरद पवार)

औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा येथे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात; प्रथम एडमिशन घेणाऱ्या वि्यार्थ्याचे पुषपगुच्छ देउन संस्थेच्या वतीने स्वागत!

0

 

नांदुरा, प्रतिनिधी

दूध डेअरी भागात असलेल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक वर्ष २०२३- २४ करीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ०६ व्यावसायायिक र्कोसेससाठी १४४ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी www. admission. dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज केलेले आहे त्यानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पहिली प्रवेश फेरी २१ ते २५ जुलै २०२३ या दरम्यान घेण्यात येणार आहे.

आज दिनांक २१ जुलै रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदुरा येथे प्रथम प्रवेश घेणारा विद्यार्थी विवेक विनोद खंडारे याचे संस्थेच्या वतीने पुषपगुच्छ देवुन स्वागत करण्यात आले याप्रसंगी श्री. जी एस मगर, श्री. एस जी हरणे,श्री. एम झेड कादरी, पंडित मॅडम, शेख मॅडम यांच्यासह शिक्षकवृंद उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी अर्ज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नांदुरा या संस्थेमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करावा. संकेतस्थळावर अर्ज, प्रवेश पद्धती, नियमावली व वेळापत्रक उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य जी.एन.काळे यांनी केले आहे.

सुटाळा बु. येथे मतदार जनजागृतीसाठी चुनाव पाठशाळा चे आयोजन

0

 

अर्जुन कराळे शेगाव

खामगाव,दि.18
आगामी वर्षात येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर मतदारामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने तहसिल कार्यालय खामगांव च्या वतीने सुटाळा बु. ग्रामपंचायत चुनाव पाठशाळा चे आयोजन करण्यात आले.

चुनाव पाठशाळा या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सुटाळा बु. ग्रामपंचायतच्या सरपंच सुलोचनाताई वानखडे हया होत्या तसेच सदर कार्याक्रमाला ०२६ – खामगांव विधानसभा मतदार संघ, मतदार नोंदणी अधिकारी तथा मा. उपविभागीय अधिकारी खामगांव तसेच ०२६-खामगांव विधानसभा मतदार संघ, सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार खामगांव यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येणा-या स्विप म्हणजेच मतदार जागरुकता आणि सहभाग कार्यक्रमाचा एक भाग म्हणून ०२६ – खामगांव विधानसभा मतदार संघात चुनाव पाठशाळा या अनोख्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमात ०२६ खामगाव मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी स्थानिक लोकांना निवडणुकीबद्दल व मतदानाबद्दल मार्गदर्शन केले त्यांनी १८ वर्ष पूर्ण झालेल्या नवमतदारांची नाव नोंदणी तसेच मयत व स्थलांतरीत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळणे, मतदान ओळखपत्राला आधारशी संलग्न करणे याबाबत आवाहन केले. तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार खामगांव श्री अतुल पाटोळे यांनी मतदार यादी शुध्दीकरण करण्याबाबत व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मार्गदर्शन केले.

मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीचे शुध्दीकरण करण्यासाठी निवडणुक आयोगामार्फत आयोजीत करण्यात येणा-या विविध कालबद्ध कार्यक्रमांमधील एक भाग म्हणुन सुटाळा बु. येथे चुनाव पाठशाळेचे आयोजन करण्यात आले असे सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी तथा खामगाव तहसीलदार अतुल पाटोळे यांनी कळविले.

स्काँलरशीप परीक्षेत शेगाव तालुक्यातून प्रथम, तर जिल्ह्यात 6 वा मेरीट चि.श्रीशांत भास्कर डोसे

0

 

विठ्ठल अवताडे शेगाव /बुलढाणा

वर्ग 8 वी पूर्व माध्यमिक स्कॉलरशिप २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेत श्री संत गजानन महाराज इंग्लिश स्कूल शेगावचा विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक श्री.भास्कर डोसे सरांचा मुलगा चि. श्रीशांत याने शहरी विभागातील गुणवत्ता यादीत जिल्ह्यातून 6 वा शेगाव तालुक्यातून 1 ला येण्याचा बहुमान मिळविला ,

त्याने जिद्दीने अभ्यास करून हे यश मिळविले आहे , सध्या असणाऱ्या वातावरातील बहुतांश विद्यार्थी यांनी त्याचा आदर्श घ्यावा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही ,

कारण या वयात अश्या पद्धतीने अभ्यास करून जिद्द मनात ठेवली तर भविष्यात असे विद्यार्थी यशस्वी होतात , श्रीशांत ने आपल्या यशाचे श्रेय आईवडील, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व डिजायर कोचिंग क्लास खामगाव चे संचालक श्री विवेक दांडगे सर यांना दिले

मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार. एस.एम.देशमुखांची मोठी घोषणा

0

 

मराठी पत्रकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची पुण्यात उत्साहात बैठक भं.जि.म.पत्रकार संघाचा सहभाग

भंडारा :
कोरोना काळानंतर अनेक पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तसेच कोरोनानंतर पत्रकारांची आर्थिक परिस्थिती चिंतनाचा विषय झाला आहे. आरोग्यासह इतर प्रश्नांसाठी अनेकदा पत्रकारांना मदतीची गरज भासते.

अशावेळी प्रत्येकवेळी आपण पत्रकारांना मदत करू शकू, अशी परिस्थिती नसते. त्यामुळे आता पत्रकारांनी स्वतःसाठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

त्यानुसार आता लवकरच गरजवंत पत्रकारांसाठी पत्रकारांकडून मदत निधी उभारण्याचा अनोखा उपक्रम मराठी पत्रकार परिषदेच्या मार्फत हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी पत्रकार परिषद पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार आहे’ अशी घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी केली आहे.

याप्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख, पुणे विभागीय सचिव नाना कांबळे, भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, कार्यकारीणी सदस्य व जिल्हा प्रसिध्दी प्रमुख प्रा.बबन मेश्राम,यशवंत थोटे,नितीन लिल्हारे आदींची उपस्थित होती.

याप्रसंगी राज्य सरकारच्या अधिस्विकृती समितीवर नियुक्त झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या १६ सदस्यांचा, तसेच मराठी पत्रकार परिषदेचे विविध मेळावे, उपक्रम यशस्वी करणाऱ्या जिल्हा संघांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

राज्य अधिस्वीकृती समितीवर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर, महिला उपाध्यक्षा जान्हवी पाटील, संजय पितळे (ठाणे) आदींचा समावेश आहे. तसेच कार्यक्रमाला मुंबई, पुणे, गडचिरोली, भंडारा, नागपूर, धुळे, अमरावती, बीड, लातूर, जळगाव, जालना, परभणी, नगर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, यवतमाळ, ठाणे, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड यासह ३६ जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

‘राज्यभरामध्ये कोणत्याही पत्रकाराला अडचणीच्या काळात जेव्हा मदतीची गरज भासते, तेव्हा प्रत्येकवेळी मराठी पत्रकार परिषद स्वतः पुढाकार घेत त्याला मदत करण्याचा प्रयत्न करीत असते.

पत्रकारांसाठी असलेल्या पेन्शन योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील जास्तीतजास्त पत्रकारांना मिळावा, यासाठी परिषदचे पदाधिकारी प्रयत्न करीतच असतात. पण त्यापेक्षाही आता पत्रकारांनी स्वतःसाठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली असून त्यामधूनच ‘पत्रकारांसाठी मदत निधी’ उपक्रम सुरू करण्यात येत आहे,’

असे सांगून एस.एम.देशमुख पुढे म्हणाले, ‘पत्रकारांसाठी उभारण्यात येणाऱ्या या मदत निधीमध्ये आपण मराठी पत्रकार परिषदेसंबंधी असलेल्या प्रत्येक पत्रकाराला एक हजार रुपये निधी देण्याची विनंती करणार आहोत. हा निधी ऑनलाइन स्वरुपात थेट अकाउंटमध्ये जमा करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

अशा निधीतून किमान एक करोड रुपये जमा करण्यात येतील, व त्यामाध्यमातून वर्षाला मिळणाऱ्या ७ ते ८ लाख रुपये व्याजातून किमान २० ते २५ पत्रकारांना मदत करण्याचे नियोजन आहे. या उपक्रमासाठी मराठी पत्रकार परिषद स्वतः पाच लाख रुपये जमा करीत आहे. बीड जिल्हा पत्रकार संघाने सुद्धा एक लाख रुपये जमा करण्याची तयारी दाखवली आहे. मी स्वतः अकरा हजार रुपये देणार आहे. प्रत्येक जिल्हा संघाने किमान ३ लाख रुपये व तालुका संघांनी किमान १ लाख रुपये जमा करावेत, अशी अपेक्षा आहे. हे पैसे जमा झाल्यानंतर त्यासंबंधीचे व्यवहार अतिशय पारदर्शी राहतील.

एका क्लिकवर सर्वांना मदत निधीबाबत माहिती मिळेल, यादृष्टीने ही योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी लवकरच एक तज्ज्ञ कमिटी नियुक्ती केली जाणार आहे. विशेष म्हणजे जे पत्रकार एक हजार रुपयांचा मदत निधी देतील, त्यांनाच या निधीमधून मदत दिली जाणार आहे. प्रत्येक पत्रकाराला वाटले पाहिजे की, हा आपल्या हक्काचा पैसा आहे, त्यामुळेच या योजनेत प्रत्येक पत्रकाराला सहभागी होता यावे, यादृष्टीने तिचे नियोजन करण्यात आले आहे,’ असेही देशमुख म्हणाले.

‘आगामी काळात पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अधिक सक्षम करण्याची गरज आहे. सध्या मराठी पत्रकार परिषदेचा डिजिटल मिडिया विभाग सुद्धा चांगले काम करीत आहे. या माध्यमातून १६ जिल्ह्यामध्ये डिजिटल मिडियाच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. डिजिटल मिडियाचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे त्यासाठी प्रयत्नशील आहेत. आगामी काळात डिजिटल मिडियाला सोबत घेऊनच आपल्याला काम करावे लागणार आहे,’ असेही ते देशमुख यांनी सांगितले.

मुख्य विश्वस्त किरण नाईक म्हणाले, ‘मराठी पत्रकार परिषद ही संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक दोन ते तीन महिन्यात बैठक घेण्याची गरज आहे. परिषदेची चळवळ ही महाराष्ट्रभर वाढवण्यावर आगामी काळात भर देण्याची गरज असून त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रयत्न करावेत.

जिल्हा व तालुका संघ हे सक्षम करावे लागणार असून त्यादृष्टीने काम सुरू करावे. परिषदेच्या राज्य कार्यकारिणीकडून जे काही उपक्रम राबवण्यात येतील, ज्या काही सूचना जिल्हा व तालुका पातळीला येतील, त्या सूचनांची, उपक्रमांची अंमलबजावणी स्थानिक पातळीवर करावी. त्यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने पुढाकार घ्यावा. पत्रकारांनी संघटीत झाल्यानंतर त्यांची ताकद खूपच मोठी असते, हे नेहमी दिसून आले आहे. तुम्ही संघटीत राहा, आम्ही २४ तास तुमच्या सोबत आहोत. तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेऊ,’ अशी ग्वाही नाईक यांनी दिली.

प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी सांगितले की, ‘अधिस्विकृती समितीमध्ये सर्वात जास्त नावे मराठी पत्रकार परिषदेची आहेत, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात सर्वात मोठे नेटवर्क परिषदेचे आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. आपल्या परिषदेमध्ये योग्य व्यक्तीला योग्य वेळी संधी देण्याचे काम केले जाते. परिषदेने आपल्याला काय दिले, यापेक्षा आपण परिषदेला काय देतो, याचा विचार प्रत्येक पदाधिकाऱ्याने करणे महत्त्वाचे आहे. परिषद नेहमीच योग्य व्यक्तीला, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तीला संधी देत असते.’

कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर व भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणाले की, ‘परिषदेचा एक कार्यकर्ता म्हणून आजपर्यंत मी काम करीत आलो आहे. परिषदेने खूप काही दिलं आहे. आपण चांगल्या संस्थेसोबत जोडले गेलो आहोत, याचा अभिमान बाळगला पाहिजे. परिषदेसाठी जास्तीतजास्त चांगल काम कसे करता येईल, यासाठी प्रयत्न करा.’

याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत विविध विषयांवर मत मांडताना चर्चेमध्ये सहभाग घेतला. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनांची योग्य दखल घेतली जाईल, असे बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांनी सांगितले. सूत्रसंचालन परिषदेच्या उपाध्यक्षा जान्हवी पाटील यांनी केले तर पुणे जिल्हाध्यक्ष सुनिल लोणकर यांनी आभार मानले.

*महाराष्ट्रात २५ तरुणांची टीम तयार करणार*
‘मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रात तरुण पत्रकारांची एक टीम तयार करण्यात येणार आहे. या माध्यमातून परिषदेची दुसरी फळी तयार करण्याचे काम सुद्धा होईल. ही टीम म्हणजे परिषदेची एक देखरेख करणारी यंत्रणा असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने या टीमसाठी नावे सूचवण्याची गरज आहे. ही टीम तयार झाल्यानंतर त्यांना ट्रेनिंग देण्याचे काम परिषदेतील ज्येष्ठ मंडळी करतील.

जेणेकरून परिषदेचे काम सध्या सुरू आहे त्यापेक्षा चांगले करण्यासाठी ही टीम यशस्वी होईल,’ असेही एस.एम.देशमुख यांनी स्पष्ट केले.

…….

११२ वर फोन करून खोटी माहिती पुरवणाऱ्या इसमा वर गुन्हा दाखल…

0

सिंदी रेल्वे…. वार्ड नंबर ८ येथील अजय रामभाऊ लोंढेकर त्यांच्या अंगणातील नागोबा मंदिराजवळ मटणाची पिशवी व चिप्स पॅकेट टाकले आहे अशी खोटी तक्रार ११२ वर कॉल करून केल्याने सिंदी पोलीसांनी अजय लोंढेकर विरोधात भा.द.वी. च्या कलम १७७ अनव्ये अदखलपात्र गून्हा नोदविला आहे.

लोंढेकर यांनी ११२ वर कॉल करुन अंगणातील नागोबा मंदिरा समोरच मटणाच्या व चिप्स च्या पिशव्या टाकल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो अशी तक्रार प्राप्त होताच सहायक पोलीस निरीक्षक वंदना सोनूने पोलिस कर्मचाऱ्याना सोबत घेऊन घटनास्थळावर जाऊन पाहणी केली असता तक्रारीच्या अनुषंगाने अशी कोणतीही वस्तू घटनास्थळावर आढळली नाहीं. सदर घटनास्थळाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांची चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले.

लोंढेकर यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने असा कोणताही प्रकार घडलेला नसल्याने लोकसेवकास खोटी माहिती दिली म्हणून अजय रामभाऊ लंढेकर यांचे विरुद्ध भा.द.वी चे कलम १७७ अनुवये गुन्हाची नोंद करण्यात आली असून या पुढे असा प्रकार पुन्हा घडू नये याकरिता न्यायालयाची परवानगी घेउन पुढील तपास करण्याबाबत साहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी महिती दिली….

शिंदी (रेल्वे) येथील घरघुती कर (घरटॅक्स) वाढ संदर्भात माजी गृहमंत्री यांची जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा…

0

 

तोडगा न निघाल्यास २१ जुलै ला होणार सिंदी (रेल्वे) नगर पालिकेवर जनतेचा जनआक्रोश मोर्चा…..अतुल वांदिले प्रदेश सरचिटणीस रा. काँ. पार्टी..

 

हिंगणघाट – हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील सिंदी (रेल्वे) येथे घरघुती (कर)घरटॅक्स दरात ३५ ते ४० टक्के वाढ केल्याने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले व संतप्त नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालीत वाढ केलेला घर टॅक्स तात्काळ रद्द करावा अशी मागणी केली होती.

यावेळी अतुल वांदिले यांच्यासह शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व शहरातील प्रतिष्ठित नागरिकांसह मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित होते यादरम्यान सिंदी रेल्वे येथील संतप्त नागरिकांनी देखील नगरपालिका प्रशासनाच्या गोंधळ धोरणाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला होता.

सिंदी रेल्वे येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी महिन्यातील तीसही दिवस गैरहजर असतात, यामुळे नागरिकांच्या अनेक समस्या प्रलंबित राहत असल्याची ओरड सुरू होती.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सिंदी रेल्वे येथे जात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व सर्व नागरिकांना सोबत घेऊन नगरपालिकेत मुख्याधिकारी कार्यालयात जाऊन मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.

सिंदी रेल्वे येथे प्रत्येक नागरिकांचा घराचा टॅक्स 35% ते 40% टक्क्यांनी वाढवण्यात आलेला आहे याबाबत अतुल वांदिले यांनी माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांच्याशी चर्चा केली असता विषयाची दखल घेत अनिलजी देशमुख यांनी वर्धा जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.

यावर लवकरात लवकर मार्ग काढण्यात यावा. जो काही सामान्य नागरिकांना भूदंड भरावा लागत आहे. तो कर सामान्य जनता 5 ते 10% टक्केच कर वाढ नागरिक भरू शकतात. त्यापेक्षा जास्त कर सामान्य जनता भरू शकत नाही. असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना स्पष्ट शब्दात सांगितले.

परंतु आताही जर कर (घरटॅक्स) कमी करण्यात नाही आला तर येत्या २१ तारखेला जनतेचा जनआक्रोष मोर्चा नगर पालिकेवर धडकणार यांचे जे काही पडसाद उमटणार त्याची सर्वश्री जवाबदारी शासन प्रशासनाची राहील अशी भूमिका अतुल वांदिले यांनी स्पष्ट केली.

आज ग्राम चिंचोली येथे स्वर्गीय ऋषी दादा पाटील जयंती निमित्त, विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले,

0

 

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव.छत्रपती शिवाजी महाराज , बोधिसत्व डॉ,बाबासाहेब आंबेडकर ,यांच्या प्रतिमेला पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, सरपंच सौ अरुणाताई बोबडे, प्रमुख उपस्थिती मधे, माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा, श्री ज्ञानेश्वर दादा पाटील, सिद्धिविनायक इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन,श्री,सागर दादा फुंडकर, ,श्री,विजयजी भालतिडक ,श्री भूषणजी दाभाडे, गट विस्तार अधिकारी ,श्री वैराळ साहेब, उपसरपंच, गौतम इंगळे,
व भरकटत चाललेला तरुण वर्ग , विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख मार्गदर्शक ,श्री डी आर गावंडे सर व श्री प्रा, नंदलाल उन्हाळे सर यांची उपस्थिती होती,

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाषन ,शशिकांत पाटील भेंडे यांनी केले, तर यावेळी ऋषी दादा दादा प्रतिष्ठान चे, संस्थापक अध्यक्ष ,महेश पहुरकर,शाखा अद्यक्ष,भगवान लोळे,प्रविण काळे कार्याध्यक्ष,मंगेश कोकाटे सचिव,ऋषी ढगे – खजिनदार
शुभम चव्हाण,गौरव धांडे,चेतन पोटे,वैभव नांदोकर,प्रविण चव्हाण,अक्षय शेंडे,अभी ढगे,ज्ञानेश्वर गायगोळ,तुकाराम गायगोळ,विकास ढगे,भूषण ढगे, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले तर आभार प्रदर्शन भगवान लोळे यांनी केले