Home Blog Page 224

धारणी शहर मध्ये आज पुन्हा मध्यप्रदेशातील बोगस राॅयलटी वर ऐनारे दोन ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले व सोडुन दिले

0

 

संदीप राऊत धारणी

 

धारणी पोलीस स्टेशन चे पि एस आए सुयोग महापुरे हे आपले कर्तव्य पार पाडत असतांना त्यांना मध्य प्रदेशातील देडतलई वरून महाराष्ट्र भोकरबर्डी वन ऊपवज नाका पार करून दोन ट्रॅक्टर धारणी शहर कडे ऐत असल्याची माहिती मिळाली व त्यांनी व त्यांच्या पोलीस टीम ने तात्काळ कारवाई करत दोन्ही ट्रॅक्टर धारणी पोलीस स्टेशन ला लावले मात्र काही वेळातच रेती च्या दलालांनी पोलीस स्टेशन गाठले व ट्रॅक्टर सोडून देण्याकरीता तगादा लावला एवढेच नव्हे तर मोबाईल वर चख्ख तहसीलदार, तसेच त्यांच्या चालक सोबत राॅयल्टी बद्दल बोलने करुन दिले व राॅयल्टी चेक करण्याकरीता धारणीचे पटवारी यांना पोलीस स्टेशन मध्ये पाठवताच त्यांनी ओ,के, असल्याचे लेखी प्रमान पत्र देऊन टाकले व पोलीसांना ट्रॅक्टर सोडून द्यावे लागते मात्र आता प्रश्न असा की राॅयल्टी ऐक हजार ऐकोनतीस की मी अंतरावरून दाखवण्यात आली व वास्तु परीस्थिती मधे मध्यप्रदेशातील देडतलई व धारणी शहर चे अंतर मात्र दहा किलो मीटर आहे या गोष्टीची चर्चा चांगलीस आज धारणी शहर मध्ये आहे विशेष म्हणजे ही रेती महाराष्ट्र च्या सिमेवर असलेल्या गावातीलच आहे परंतु फीरुन मध्यप्रदेशातील बोगस राॅयलटी वर धारणीला ऐत असल्याची माहिती आहे

ग्रामसचिव अनिल बिचुकले आणि गटविकास अधिकारी एस. व्ही. देशमुख यांच्यामुळे घरांपासून मी वंचित माटरगाव खुर्द येथील लाभार्थी गोविंदा वाघ यांचा आरोप

0

 

इस्माईल शेख  शेगाव

 

ग्रामसचिव अनिल बिचुकले आणि गटविकास अधिकारी एस. व्ही. देशमुख यांच्यामुळे घरांपासून मी वंचित माटरगाव खुर्द येथील लाभार्थी गोविंदा वाघ यांचा आरोप

शेगाव  केंद्रशासनाच्या पंतप्रधान घरकुल योजना अंतर्गत प्रपत्र – ड अन्वये ज्या लोकांना स्वतःची घरी नाहीत तसेच भूमिहीन आहेत.अशा नागरिकांना प्राधान्यक्रम देऊन त्यांना घरकुल देण्याची योजना शासनाने आणलेली आहे. परंतु कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याने सामान्य नागरिकांची दमदाटी होते. तशीच दमदाटी माटरगाव खुर्द येथील सचिवाने केली आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेतील मूळ क्रमांक बदलून चुकीची यादी तयार करत ग्रामसेवकांनी आपल्याला घरापासून वंचित ठेवल्याचा आरोप माटरगाव खुर्द येथील लाभार्थी रहिवाशी गोविंदा सूर्यभान वाघ यांनी केला आहे. मला राहायला घर नाही,मी लोकांच्या घरात भाड्याने राहतो, स्वतःची शेती सुद्धा नाही.शेतमजुरी करून मी माझा उदरनिर्वाह करतो घरकुल अपात्र यादीच्या निकशा नुसार मी घरकुल योजने साठी पात्र असून सुद्धा मला घरकुल मिळाले नाही.मला सारासार साचिवाकडून डावलण्याचा प्रयत्न आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी मूळ यादीमध्ये माझे नाव 5 व्या क्रमांकावर होते परंतु ग्रामसेवक अनिल बिचुकले यांनी मूळ यादीमध्ये फेरबदल करून माझे नाव 59 व्यां नंबरावर टाकले ग्रामपंचायत ने आवास योजनेच्या याद्या तयार करताना ग्रामसभेची कार्यवाही व्यापक प्रमाणात प्रसिद्ध न देता फक्त कागदोपत्री सभा दाखवून यादीत मंजुदात घेतलेली आहे. शासन निर्णय 2008 2011 मधील सूचनेचे पालन न करता ग्रामपंचायतने यादीत पूर्ण बदल केला आहे. सचिव कायदेशीर सल्लागार असतात परंतु बेकायदेशीर काम सचिवांनी केले. त्यांना एस.व्ही. देशमुख गटविकास अधिकारी यांनी पाठीशी घालत दिलेल्या तक्रारी व ग्रामपंचायत तिकडून प्राप्त याद्या या नियमात आहेत किंवा नाहीत याची तपासणी साधी सदर गट विकास अधिकारी यांनी घेतलेली नाही. या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर नियमबाह्य कामकाज आहे. असा आरोप गोविंदा सूर्यभान वाघ यांनी केला.
ग्रामपंचायत सचिव(ग्रामसेवक) यांना विचारणा केली असता तुम्हाला आधी भेटयला पाहिजे होता,आता सर्व सेटिंग झालेली आहे .आता कुठे गेला तरी काही होऊ शकत नाही.आणि घरकुलाची माहिती विचारली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. तुझ्याकडून जे होते ते करून घे अशी धमकीच्या भाषेत ग्रामसेवक अनिल बिचुकले यांनी गोविंदा सूर्यभान वाघ यांना दम देण्याचा प्रयत्न देखिल केला. आपले घरकुल मिळावे ही अशा घेऊन लाभार्थी एस.व्ही. देशमुख गटविकास अधिकारी पंचायत समिती शेगाव यांच्याकडे धाव घेतली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. या सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी त्यांनी विकास अधिकारी व अन्य संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन तसेच विनंती अर्ज दिले त्यामध्ये प्रामुख्याने
१) दि.२४/०३/२०२२रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती शेगाव तक्रार
२) दि.१८/०४/२०२२ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती शेगाव तक्रार
३) दि.०४/०५/२०२२ मा. तहसिलदार यांना दिलेला अर्ज
४) दि.२५/०५/२०२२मा. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
५) दि.०७/०६/२०२२ मा. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाला दिलेली तक्रार
६) मा.जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिनांक २८/०५/२०२२ रोजी दिलेला अर्ज
७) दि. ०४/०७/२०२२मा. मुख्याधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा रोजी दिलेला अर्ज
८) दि. ०४/०७/२०२२ मा. जिल्हाधिकारी बुलढाणा यांना दिलेला अर्ज
९) दि.०४/०७/२०२२मा. आयुक्त साहेब अमरावती अर्ज
१०) दि.०४/०७/२०२२ मा. प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रत्यक्ष भेट घेऊन कागदपत्रे पाठवा करण्याचा प्रयत्न केला.
अद्याप मला कुठल्याही न्याय मिळालेला नाही.
०४/०५/२०२२ (आर.टी.आय) शासनाने दिनांक ११ ऑक्टोंबर २००५ रोजी राजपत्रात पुरविलेल्या माहितीचा अर्जाचा नमुना म्हणजे माहिती अधिकार कायदा २००५ यानुसार जन माहिती अधिकारी पंचायत समिती कार्यालय शेगाव प्रधानमंत्री आवास योजनेच्या बाबत सविस्तर बातमी मिळणे बाबत अशा अनेक वेळा माहितीचा अधिकार टाकून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी यास कुठलेही उत्तर दिले नाही, असाही त्यांचा आरोप आहे. जर न्याय मिळाला नाही तर मी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसणार याच्यात समोर मला न्यायाची भूमिका कोणी देण्यास तयार नसेल तर मी आत्मदहनाचा इशारा देत आहे हे टोकाचे पाऊल मी संबंधित अधिकारी यांच्यामुळे घेत आहे अशे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले.

**सूर्या मराठी*न्यूज*
*इस्माईल शेख शेगाव*

संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये ७५ श्रध्दालु भक्तांनी केले रक्तदान

0

 

शेगांव: इस्माईल शेख(प्रतिनिधी):

२५ डिसेंबर २०२२: सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने शाखा शेगांव तर्फे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये संत निरंकारी मिशनचे ७५ श्रद्धाळू भक्त तथा सेवादारांनी निस्वार्थ भावानी रक्तदान केले. रक्त संकलनाकरिता उपजिल्हा रुग्णालय शेगाव व जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला येथील डॉक्टर चमू उपस्थित होती.

या शिबिराचे उदघाटन आ.समाधान सोनवणे तहसीलदार शेगाव यांचे शुभ हस्ते करण्यात आले त्यांनी रक्तदान करिता येणाऱ्या रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले आणि मानाव कल्याणकरिता रक्तदानाची जी सेवा करीत आहेत त्यांची प्रशंसा केली.

याव्यतिरिक्त श्री संतोषजी शेगोकार संयोजक तथा ज्ञानप्रचरक जिल्हा बुलडाणा जी यांच्याद्वारे रक्तदान शिबिरामध्ये आलेले गनमान्य अतिथी सी.आर .मिटकरी, सुलताने पतंजली योगपीठ साहित डॉक्टर व त्यांची चमू तथा रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले. ते पुढे म्हणाले मिशन कडून प्रथम रक्तदान शिबिराचे आयोजन दिल्ली येथे नोव्हेंबर १९८६ मध्ये वार्षिक निरंकारी संत समागमाच्या निमित्ताने केले होते त्यावेळेस बाबा हरदेवसिंगजींनी या शिबिराचे उदघाटन केले

आणि मानवतेला हा संदेश दिला की रक्त नालीमध्ये नाही नाडीमध्ये वाहायला पाहिजे.संत निरंकारी मिशनचे सेवादार हा संदेश चरितार्थ घेऊन दिवसरात्र मानवमात्रांची सेवेमध्ये तत्पर आहेत. जनकल्याणाकरिता निस्वार्थी भावाने निरंतर सेवेत कार्यरत आहेत

संत निरंकारी मिशन हे मानवकल्याणाकरिता वेळोवेळी सेवेमध्ये कार्यरत आहेत की ज्यामध्ये मानवतेचा विकास होईल. यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, विनामूल्य आरोग्य निदान शिबीर, नेत्र शिबिर, नैसर्गिक आपत्ती मध्ये जरूरतमंदाना सहायता केली जाते. या सर्व सेवांकरिता राज्य सरकार कडून वेळोवेळी मिशनची प्रशंसा केली जाते आणि सन्मानित केले जाते.

सदर रक्तदान शिबिर हे या वर्षामधील दुसरे रक्तदान शिबीर आहे. प्रथम रक्तदान शिबीरामध्ये ८५ पिशव्या रक्तदान शिबिर झाले आहे.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या गटाचे शहर प्रमुख माजी नगरसेवक राजेश मिश्रा यांच्यावर हल्ला मिश्रा किरकोळ जखमी

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला शहरातील हरीहर पेठ येथील आपसी वादावरून जुन्या आपसी वादावरून झाला हल्ला राजेश मिश्रा वर चार ते पाच जनांनी हल्ला केला या.

हल्ल्यात राजेश मिश्रा यांना किरकोळ जखमी झाले आहे हल्ला आपशीवादाचा असल्याचे बोलले जात आहे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास जागेवरून हा वाद निर्माण झाला

शिवाजी टाउन शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होता तिथे पोलीस बंदोबस्तत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना हा वाद सुरू असताना दिसताच कुठलाही विलंब न करता पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेत वाद सोडण्याचा प्रयत्न केला यापूर्वी दोन्ही गटातील व्यक्तींनी जुने शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे

आज झालेल्या वादातच्या तक्रारी दोघांनीही एकमेका विरुद्ध तक्रारी दाखल करण्याचे काम सुरू होते घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी यांनी जाऊन पाहणी केली व तसेच शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या कार्याकर्त्यासह जुने शहर पोलीस स्टेशन गाठून राजेश मिश्रा यांची विचारपूस केली कृत लिहिल्यापर्यंत तक्रार नोंदणीचे काम सुरू होते पुढील तपास जुने शहर पोलीस स्टेशन करीत आहे

अल्पवयीन मुलीसोबत जबरजस्ती शारीरिक संबध , गोटूसिंग डाबेराव‌ विरूध्द गुन्हा दाखल

0

 

अर्जुन कराळे तालुका प्रतिनिधी

शेगांव . लग्नाचे आमिष देऊन एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्ती बलात्कार प्रकरणी गोटूसिंग गजानन डाबेराव हल्ली मुक्काम रोकडीया नगर शेगाव वय २५ या युवकाविरूध्द शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हकीकत अशा प्रकारे आहे की फी व आरोपी . यांचे मागील चार ते पाच वर्षापासून प्रेम संबंध आहेत नमुद आरोपी फिर्यादीला तुझ्यासोबत लग्न करतो असे आश्वासन देऊन त्याची बहीण घरी नसताना फि ला घेऊन घरी घेऊन गेला व फिर्यादीचे सोबत शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला.

दिनांक १०/१२/ २०२२ रोजी आरोपीने फिर्यादीला मोबाईलवर कॉल करून तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणून शेगाव गौलखेड रोडवरील खदान जवळ घेऊन गेला व त्या ठिकाणी फिर्यादी सोबत शारीरिक संबंध केले दिनांक १२ /१०/ २०२२ रोजी आरोपी याने फिर्यादीला पुन्हा शेगाव येथील गौलखेड रोडवरील खदान जवळ घेऊन गेला व त्या ठिकाणी बोलला की मला माझ्या घरच्यांच्या इच्छेने लग्न करावे लागेल मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही.

व आम्हाला त्रास दिला तर फाशी घेइन अशी आरोपीने फिर्यादीला धमकी दिली कार्यवाही व्हावी फिर्यादी रिपोर्ट वरून आरोपी गोटूसिंग गजानन डाबेराव हल्ली मुक्काम रोकडीया नगर शेगाव याचे विरूध्द अप नं ६३०/२०२२ कलम ३७६,३७६ (२), (एन) ५०६ सह कलम ४ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल करन्यात आला असुन घटनेचा पुढील तपास मा पोनीसा आदेशाने सपोनि गौतम इंगळे हे करीत आहेत.

मळके कपडे घातलेला शेतकरी जेव्हा पोलिस ठाण्यात गेला ठाण्यात असं काही घडलं की, संपूर्ण ठाणेच निलंबित…!

0

 

(तुकाराम राठोड,जालना)

ही गोष्ट सन १९७९ ची आहे.अंदाजे संध्याकाळचे सहा वाजले असतील. इटावा जिल्ह्यातील उसराहार पोलीस ठाण्यात एक शेतकरी आला होता,ज्याच्या अंगावर अतिशय मळके व चुरगळलेले कपडे होते.चेहऱ्यावर मात्र त्याच्या अतिशय तेज दिसून येत होते.

पोलीस ठाण्यातील एकही कर्मचारी त्या शेतकऱ्याकडे लक्ष देत नव्हता.कदाचित त्याला काहीतरी तक्रार दाखल करावयाची असेल.ठाण्यात चौकशी करत तो एका पोलिसाजवळ गेला व तक्रार करायची म्हणून सांगू लागला.

पोलिसांनी त्याला कशाची तक्रार करायची म्हणून विचारलं असता,”माझा बैल चोरीला गेला आहे व त्याबद्दल मला तक्रार करायची आहे”असं त्या शेतकऱ्याने सांगितले.त्या शेतकऱ्याच्या एकंदरीत पेहरावाकडे पाहून,तो पोलिस त्याच्यावर संतापला व त्यालाच उलट-सुलट प्रश्न करू लागला.’

बैल कसा चोरीला गेला ? नीट सांभाळता येत नव्हता का ?’ तू काय करत होतास ?यासारख्या प्रश्नांची सरबत्तीच त्या पोलिसाने लावली होती.बिचारा शेतकरी इतक्या साऱ्या प्रश्नांची उत्तरे देता देता थकला व आपली तक्रार घेण्यास त्याने कळकळीची विनंती केली.

मात्र पोलिसाने अधिकच चिडून तक्रार घेण्यास नकार दिला.नाइलाजाने शेतकरी खाली मान घालून निघू लागला.

पोलिस ठाण्याच्या गेटजवळ जाताच,शेतकऱ्याला मागून एका पोलिसाने आवाज दिला तसा तो थांबला,त्याने मागे वळुन पाहिले.पोलिस त्याच्याजवळ आला आणि म्हणाला काही पैसे देत असशील तर तक्रार घेतो.तेव्हा शेतकऱ्याकडून ३५ रुपये लाच घेऊन त्या पोलिसाने तक्रार घ्यायची मान्य केली.

तक्रार अर्ज लिहून झाल्यावर,सही करणार का अंगठा ? असं त्या पोलिसाने शेतकर्‍याला विचारले,तेव्हा शेतकऱ्याने टेबलावरील पेन व शाईचा पॅड असे दोन्हीही उचलले.पोलिसाच्या मनात प्रश्न निर्माण झाला,याने पेन व पॅड दोन्ही का उचलले असतील ? याला नेमकी सही करायची आहे का अंगठा ?

पोलीसाने तक्रारीचा कागद समोर केल्यावर शेतकऱ्याने त्यावर आपल्या नावाची सही केली “चौधरी चरणसिंह” व आपल्या खिशातून शिक्का काढून त्यावर मारला “प्रधानमंत्री, भारत सरकार”. आता मात्र सर्व पोलिस ठाण्याचीच पळापळ सुरू झाली.

कारण तो शेतकरी म्हणजेच देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते चौधरी चरणसिंह होते ! हे पोलीस ठाणे शेतकऱ्यांच्या तक्रारी दखल घेत नसल्याचं समजल्यावर,चरणसिंह मुद्दामहून मळके कपडे घालून तक्रार नोंदवायला आले होते.

या सर्व प्रकाराबद्दल व शेतकऱ्यांच्या केलेल्या अडवणुकीबद्दल चरणसिंह यांनी संपूर्ण पोलिस ठाण्यालाच तात्काळ निलंबित केले होते.असे पंतप्रधान व असे शेतकऱ्यांचे नेते पुन्हा होणे दुरापास्तच.देशाचे पंतप्रधान व शेतकऱ्यांचे लोकप्रिय नेते चौधरी चरणसिंह यांचा जन्म दिवस 23 डिसेंबर राष्ट्रीय किसान दिन म्हणून साजरा केला जातो.

डीजीटल मिडीया परिषदेची शेगाव तालुका कार्यकारिणी गठीत..

0

 

शेगाव  अर्जून कराळे

अध्यक्षपदी सचिन कडूकार

शेगाव (प्रतिनिधी) : मराठी पत्रकार परिषद संलग्नित डीजीटल मिडीया परिषदेची शेगाव तालुका कार्यकारिणी गठीत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी जाहिर केली.

यात शेगाव तालुकाध्यक्ष पदी सचिन कडूकार यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच उर्वरित कार्यकारणीत उपाध्यक्ष अर्जुन कराळे,रवि शेगोकार,सचिव लक्ष्मण कान्हेरकर,सहसचिव सुरज देशमुख,कोषाध्यक्ष उमेश राजगुरे,संघटक श्रीकांत कलोरे,सुभाष वाकोडे,प्रसिध्दी प्रमुख प्रशांत खत्री, सहसंघटक सागर सिरसाट,सदस्य देवचंद्र सम्दुर,ईस्माईल शेख, ज्ञानेश्वर कुकडे व सल्लागार अनिल उंबरकार,राजेश चौधरी,नंदकिशोर कुळकर्णी,नारायण दाभाडे,श्रीधर ढगे,उमेश सिरसाट यांचा समावेश आहे.

बुलढाणा येथील जिल्हा पत्रकार भवनमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांनी शेगाव तालुका डिजीटल मिडिया परिषद ची कार्यकारिणी जाहिर केली.यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अजय बिल्लारी,सरचिटणीस संदिप शुक्ला,उपाध्यक्ष अनिल उंबरकर,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनराज ससाने,काशिम शेख,संदिप वानखडे,सुभाष लहाने आदीची उपस्थिती होती.

डिजीटल मिडीया शेगांव तालुका कार्यकारणीचा सत्कार.. विकास आराखड्यात पत्रकारांची सकारात्मक भुमिका-दिनेश गिते

0

 

शेगाव  अर्जुन कराळे

बुलढाणा:
मराठी पत्रकार परिषदेशी संलग्नीत डिजीटल मिडीया परिषदेच्या शेगांव तालुका कार्यकारणीचा सत्कार, आधी बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनात करण्यात आला, जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने हा सत्कार झाला.

यानंतर समृध्दी महामार्गासाठी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केलेल्या कार्याबद्दल जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने त्यांच्या दालनात त्यांचा सत्कार करण्यात आला.

अगदी सुरुवातीच्या काळात दिनेश गिते यांनी नायब तहसीलदार म्हणून शेगावला सेवा दिलेली असल्यामुळे, शेगावचे पत्रकार आल्याचे पाहून त्यांनी शेगाव डिजीटल कार्यकारणीचाही पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

यावेळी शेगाव विकास आराखड्यात तिथल्या स्थानिक पत्रकारांनी बजावलेल्या सकारात्मक भुमिकेमुळे काम करण्यास आनंद मिळाल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी केले.

डिजीटल मिडीया परिषदेची पहिली कार्यकारिणी बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात गठीत झाली. यावेळी सर्वानुमते अध्यक्ष म्हणून सचिन कडूकार यांची निवड करण्यात आली. तर त्यांच्यासोबत कार्यकारणीत उपाध्यक्ष अर्जून कराळे, नारायण दाभाडे, रवी शेगोकार, सुभाष वाकोडे, सागर शिरसाट, शेख ईस्माइल, सुरज देशमुख यांचा समावेश आहे.

या डिजीटल मिडीया कार्यकारणीचा सत्कार बुलडाणा जिल्हा पत्रकार भवनात जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, सरचिटणीस संदिप शुक्ला, सचिव शे.कासीम, ज्येष्ठ पत्रकार संजय मोहिते व राजेंद्र काळे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.सुभाष लहाने, प्रसिध्दी प्रमुख संदिप वानखेडे आदींच्या हस्ते कर ण्यात आला.

समृध्दी महामार्गासाठी राज्य शासनाने गौरविल्याबद्दल निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांचा सत्कार बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह शेगाव तालुका डिजीटल मिडीया परिषदेचे पदाधिकारी व पत्रकार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र काळे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्दे, कार्याध्यक्ष अजय बिल्लारी, सरचिटणीस संदिप शुक्ला, शेख कासीम, जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अनिल अंबरकार, धनराज ससाने, तथा शेगांव तालुक्यातील सचिन कडूकार, अर्जून कराळे, रवी शेगोकार, सुभाष वाकोडे, सागर शिरसाट, नारायण दाभाडे, शेख ईस्माइल, सुरज देशमुख यांचेसह अनेक पत्रकार उपस्थित होते.

ना सरकारी कार्यालयं ना बाजार बंद, चीनमधील कोरोनाच्या बातम्या अतिरंजित आणि चुकीच्या; डॉ. अचल श्रीखंडे यांचा चीनमधून संवाद

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

शांघाय ता.२१: चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी काळजीची परिस्थिती नाही, सर्वकाही नॉर्मल असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी ‘एबीपी माझा’ला दिली.

डॉ. अचल श्रीखंडे चीनमधील वास्तविक परिस्थितीची माहिती देताना म्हणाले की, “चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे हे खरं आहे. परंतु त्यामुळे चिंताजनक स्थिती कुठेही नाही. आम्ही डॉक्टर खुश आहोत. आम्हाला किमान कोरोनाचे रुग्ण तपासता येत आहे. लोक खूष आहेत. त्यांना सततची सक्ती होती ती दूर झाली आहे.

जगभरात दाखवण्यात येतंय तशी काही परिस्थिती चीनमध्ये नाही. चीनमध्ये पसरणारा व्हेरियंट हा ओमिक्रॉन आहे. तो वेगाने पसरतो आहे, परंतु अतिशय माईल्ड आहे.

तीन दिवसांच्या उपचारानंतर सर्व वयोगटातील लोक बरे होत आहेत. केवळ दोन गोळ्या आम्ही देत आहोत.”

जगभरात दाखवलं जातंय तशी परिस्थिती चीनमध्ये आजिबात नसल्याचं सांगत डॉ. अखंड अचल म्हणाले की, चीनमधील क्वारंटाईन सेंटर्स बंद करण्यात आली आहेत.

ज्यांना कोरोनाची लक्षणं आहेत त्यांना सात दिवसांसाठी घरातच रहावं लागतं. झीरो कोविड पॉलिसी मागे घेतल्याने लोक रस्त्यांवर मोकळे फिरत आहेत, मॉल्समध्ये जात आहेत आणि आनंद घेत आहेत. कोणीही कशाही पद्धतीच्या चिंतेमध्ये नाहीत.

चीनमध्ये असलेला व्हेरियंट हा ओमिक्रॉन असल्याची माहिती डॉ. अचल श्रीखंडे यांनी दिली. त्याच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेल्या डेल्टा व्हेरियंटमधून भारतीय नागरिक गेले आहेत.

त्यामुळे कोरोनाबद्दल चिंता करण्याचं कारण नसल्याचं ते म्हणाले. डॉ. अचल श्रीखंडे म्हणाले की, कोविडमुळे चीनमध्ये मृत्यूचं थैमान सुरू आहे अशा आशयाच्या बातम्या चुकीच्या आहेत. भारतीयांनीही त्याची काळजी करण्याची गरज नाही. आम्ही सगळे डॉक्टर्स यासाठी तयार होतो, रुग्णालय तयार होती.

हा नॉर्मल फ्लू आहे. रुग्णाला व्हेंटिलेशनची गरज पडत नाही. त्यामुळे आम्ही याला अतिशय नॉर्मली ट्रीट करत आहोत. एक ते दोन दिवसांमध्ये रुग्ण घरी परत जातो आहे.

बहुसंख्य रुग्ण तर रुग्णालयात येतच नाहीत. त्यांना कंपल्सरी सात दिवस घरी थांबायचे आहे. कुठेही काहीही बंद करण्यात आलेलं नाही. ना शाळा बंद आहेत, ना सरकारी कार्यालय बंद आहेत, ना बाजार बंद आहे

शेगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जयंतराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिंदे सरकारचा निषेध

0

 

 

शेगाव  इस्माईल शेख

शेगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याकडून हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे अध्यक्ष बाबत अपशब्द वापरले यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी या वक्ता याबाबत दिलगिरी व्यक्त केली. परंतु हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आलं.परंतू थोर महापुरुषांच्या या सरकारकडून वारंवार अपमान होत आहे.

तरीसुद्धा प्रस्थापित शासन याच्यावर दुर्लक्ष करून सर्व निवेदन तसेच आंदोलनाची बाजू भिजती ठेवत आहे. या शासनाचे निर्ज्यपणा मुळे सर्वसामान्यांची कोंडी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संसदीय मर्यादा व परंपरा पाळणारा पक्ष आहे.

पण तरीही सभागृहात जनतेच्या प्रश्नांवर विरोधकांना बोलू दिले जात नाही.त्यांचा आवाज दडपला जातो.विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे सातत्याने विनंती करीत असतानादेखील विधानसभा अध्यक्षांनी ऐकले नाही.

अश्या सामाजिक,राजकीय महाराष्ट्राची आधुनिकतेची समृद्धीची बाजू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सतत संसदेत, असो वा सामाजिक पातळीवर असो, न्यायाची बाजू मांडण्याचा प्रयत्न पक्ष सदैव करीत असतो. परंतु वारंवार शासनाच्या हुकूमशाहीमुळे पक्षांच्या नेत्यांवर टीका करून महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होत आहे.

असा आरोप शिंदे सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आला. सरकारचा निषेध म्हणून आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी
शेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक शेगाव येथे महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार्‍या सरकारचा धिक्कार असो… निर्लज्ज सरकारचा, निर्लज्जपणाचा कहर… जयंत पाटीलसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…अशा घोषणा देत .

जयंतराव पाटील यांच्या समर्थनार्थ शिंदे सरकारचा निषेध करत या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय अशा शब्दात रोष व्यक्त करण्यात आला.

 

शहराध्यक्ष दिनेश साळुंखे शैलेश पटोकार, गणेश पिसे, संतोष शेगोकार,रवींद्र भिरडे, राजू काठोळे, राहुल वाघमारे,सरफराज खान, अन्साद खान, अहमद खान, कृष्णा देशमुख, बाळू टावरे, पवन नामदास, शौकाब खान, इमाम भाई,गजानन हुसे, सागर डांबरे इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.