Home Blog Page 223

गांधीग्राम पुलासाठी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या वतीने दिलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला आले यश

0

 

अकोट अकोला मार्गावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीवरील पुलाला, पडलेल्या भेगा मुळे हा पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे अकोट व तेल्हारा तालुक्याचा तसेच मध्यप्रदेशातील संपर्क अकोला जिल्ह्यशी पुर्णपणे तुटलेला होता.

त्यामुळे अकोट तालुक्यातील जनतेमध्ये शासना विषयी प्रचंड चिड निर्माण झाली होती. शेतकरी, विद्यार्थी, सरकारी नोकर, व्यावसायिक, आणि पेशंटची, खुप गैर सोय होत होती.

पेंशटची गैर सोयी दोन जनांना जिव गमवावा लागला होता.
त्यासाठी अकोट तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी सर्व पक्षीय संघर्ष समितीची स्थापना करून त्यांनी दि 15/11/2022 धरणे आंदोलनाला सुरुवात केली व आठ दिवस आंदोलन सुरू ठेवले
या आंदोलनाला परिसरातील नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील अनेक आमदार, लोकप्रतिनिधी, व नेते मंडळींनी उपस्थिती दर्शविली.

या आंदोलनाची दखल खुद केंद्रिय मंत्री नामदार नितीन गडकरी साहेबांनी घेतली व पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. या आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते मनोहररावजी शेळके, कांग्रेस पक्षाचे चे पुरुषोत्तमजी दातकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजुभाऊ मंगळे, शिवसेनेचे नितीनभाऊ ताथोड संरपच निंभोरा, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुरेंद्रभाऊ ओंईबे, गांधीग्रामचे संरपच ठाकरे, शिवसेनेचे दिलीप लेलेकर, श्रीकृष्ण गावंडे, अनिल ओहे, राजुभाऊ एखे, मुश्ताक शाहा, मधुकरराव पाटकर, संतोष शिवरकार, भिमराव पळसपगार,प्रकाश गवई, भिमराव तायडे,सुनील अघडते, कालेखा पठाण, मारोती सपकाळ, सुभाष फुरसुले,शंकरराव कुटे, संजय मांजरे, आंनदभाऊ अढाऊ, अभि खडे, कैलास संदानशिव, गणेशराव खोडके,मंगेशभाऊ ताडे, सुदर्शन किरडे, दिलिप अवधूत, बाळासाहेब इंगळे, विलास वसु,अय्याज अली रेल, सलिम भाई रेल, विलास जाधव,शरदभाऊ वाघोलीकर, सुनीलभाऊ बांगर, विनोद वसु पाटील, हर्षल कोल्हे, उमेश खंडारे, गणेश बुटे, पुर्णा खोडके,
या सर्वांचे आंदोलनाला सहकार्य लाभले.

या आंदोलनाला सगळ्यात जास्त महेनत वंचित बहुजन आघाडीचे नेते मनोहररावजी शेळके साहेब यांनी घेतली. त्यांचे वडील आजारी असतानाही त्यांनी आंदोलन बंद पडु दिले नाही. हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात असतांनाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या आंदोलनामुळेच पुलाचे काम लवकर सुरू करण्यात आल्याचे जनतेमध्ये चर्चा असुन परिसरातील सर्व नागरिक आंनद व्यक्त करत आहेत.

“भालोद येथील बौद्ध वस्तीवर जातीयवाद्यांकडून हल्ला”घटनेचा सर्व थरातून निषेध क्राईम जळगाव जिल्हा विशेष

0

 

विकी वानखेडे  यावल

यावल तालुक्यातील भालोद येथे महाविद्यालयात हिंगोणा येथील तरुणा सोबत झालेल्या वादात सोडवासोडव केल्याचा राग म्हणून रावेर तालुक्यातील सावदा,कोचूर,न्हावी,फैजपूर,चिनावल येथील जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी थेट भालोद येथील बौद्ध वस्तीवर लाठ्या काठ्या,लोखंडी रॉड,फायटर व सोबतच दगडफेक करत हल्ला केला जवळपास ६० ते ७० लोकांनी अचानकपणे भ्याड हल्ला केल्याने सर्वत्र

पळापळ सुरू झाली यात अनेक जण जखमी झाले असून या हल्ल्यात रोहित लोखंडे व आशुतोष भालेराव हे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.आशुतोष याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या डोक्याला १० ते ११ टाके बसलेले आहे तर रोहित याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि.२७डिसेंबर २२ रोजी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास यावल तालुक्यातील भालोद येथील बौद्ध वस्तीवर ललित सुनील वाणी,भूषण नेमाडे,चेतन सोनवणे,प्रशांत सोनवणे,हेमंत दिलीप पाटील सर्व राहणार न्हावी,ता-यावल,भास्कर चौधरी,गणेश उर्फ देवा देवकर राहणार सावदा ता-रावेर,कल्पेश पाटील,सुनील संतोष चिमणकर,पवन सुतार सर्व राहणार कोचुर,ता-रावेर,भूषण जाधव,नीरज झोपे,रितेश चौधरी,शिवम बाविस्कर राहणार सावदा,इंद्रजीत पाटील,मयूर भारंबे,शुभम भारंबे सर्व राहणार फैजपूर ता-यावल व त्यांच्या सोबत जवळपास ३० ते ४० जणांनी हल्ला चढविला या हल्ल्यांमध्ये आशुतोष अशोक भालेराव वय २१ वर्ष तसेच रोहित मधुकर लोखंडे वय २० वर्ष दोघे राहणार भालोद हे गंभीर जखमी झाले यापैकी रोहित लोखंडे याची प्रकृती चिंताजनक असून ते जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल आहेत.

यादरम्यान भरत चौधरी आणि शुभम कराड यांच्या मध्ये झालेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या रोहित लोखंडे याचा राग मनात आल्याने वरील जातीयवादी मानसिकतेच्या मुलांनी भालोद येथील बौद्ध वस्तीवर दगडफेक करून लाठ्याकाठ्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करून अनेकांना जखमी केले.यात रोहित लोखंडे याला डोक्यावर मारहाण करून गंभीर दुखापत करून”हे महारडे खूप जास्त मातले आहेत यांना धडा शिकवावा लागेल”अशा प्रकारची जातीयवाचक शिवीगाळकरून फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी व लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.या जातीयवाद्यांची मुजोरी इथवरच थांबली नाही तर ज्या महिला आपल्या मुलांना यांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करीत होत्या त्यांनाही

मारहाण करून त्यांच्या सोबत अश्लील वर्तन करण्यात आले.आरोपी ललित सुनील वाणी व गणेश उर्फ देवा देवकर यांनी त्यांच्या हातातील
कोणत्या तरी हत्याराने आशुतोष भालेराव यांच्या डोक्यावर वार करून दुखापत केली असून सदरचे भांडण सोडविण्यासाठी आलेले साक्षीदार सुलभा मधुकर लोखंडे,उज्वला अशोक भालेराव

,संगीता रुपेश भालेराव यांना सुद्धा वरील आरोपी यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या अंगावर विटांचे तुकडे फेकून मारले.तसेच सुलभा मधुकर लोखंडे यांचे ब्लाउज पाडून तिला लज्जा
वाटेल असे कृत्य केले.

वरील गुन्ह्या संदर्भात फैजपूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध र.नं २२४/२०२२ भा.द.वि कलम १४३,१४७,१४८,१४९, ३२६,३२४,३५४,३२३,३३७,५०४ सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१६ चे कलम तीन ३(१)(आर)(एस)(३)(१)(डब्लू) (आय) (ii) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर डॉ.कुणाल कुमार सोनवणे हे करीत आहे.सदरील भ्याड हल्ल्याचा विविध राजकीय व सामाजिक संस्था,संघटना तसेच सर्वच थरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

किनगाव येथील नेहरू विद्यालयात सैन्यदलात भरती झाल्याबद्दल मंगेश पाटील यांचा संन्मान.

0

 

यावल( प्रतीनिधी) विकी वानखेडे

किनगाव येथील रहीवाशी व नेहरू विद्यालयातील विद्यार्थी मंगेश संजय पाटील याची तोफखाना रेजिमेंट देवळाली कँम्प नाशीक येथे अग्नीविर म्हणून ट्रेनिंग सेंटरला निवड करण्यात आली.

म्हणून त्याचे किनगावसह परीसरातुन कौतुक होत आहे मंगेश पाटील हा सर्वसामान्य कुटुंबातील असुन आपल्या मेहनतीने,जिद्दिने व परीस्थीतीवर मात करत सैन्यदलात भरती झाला

असुन मंगेश पाटील याची सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक सि.के.पाटीलसर पर्यवेक्षक के.आर.पाटीलसर उप शिक्षक आर.डी.गवई,एम.डी.शीकोकार,आर.आर.कंखरे,उप शिक्षीका श्रीमती एस.पी.भोईटे,एस.पी.यावलकर,पी.बी.देशमुख इ.सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मंगेश पाटील याचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सावली सेवा प्रकल्पाच्या वर्धापनदिनी विजयबाप्पु देशमुख यांच्या वतीने अंध बांधवांना किराणा किट व ब्लॅंकेट वाटप

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

शेगाव: सावली सेवा प्रकल्पाच्या आठव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन आपल्या संत नगरीचे समाजभुषण विजयबाप्पु देशमुख यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र संजय व अंकुश यांच्या शुभहस्ते प्रकल्पातील तथा परीसरातील मोठ्या संख्येने उपस्थित अंध बांधवांना महिनाभर पुरेल अशी किराणा साहित्य किट तथा थंडीपासुन संरक्षणार्थ ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

सदर सुंदर कार्यक्रमाला प्रकल्पातील दिव्यांग ज्ञानेश्वर याने या जन्मावर जगण्यावर शतदा प्रेम करावे हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले याप्रसंगी डॉ गजानन मुंढे सर यांनी अध्यक्षीय भाषणातुन संजय व अंकुश देशमुख यांचे सदर उपक्रमाबद्दल कौतुक केले प्रकल्पाचे संचालक प्रशांत देशमुख यांनी प्रकल्पाविषयी माहिती देऊन वर्धापनदिनाचे महत्व सांगितले

याप्रसंगी दिव्यांग बांधवांना किराणा साहित्य व ब्लॅंकेट घेऊन अतिशय आनंद झाला

बुलडाणा उपजिल्हाधिकारी, भिकाजी घुगे लिपिकसह एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना बुलडाणा एसीबीने केली अटक

0

 

इस्माईल शेख शेगाव शहर प्रतिनिधी

बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या मध्यम प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांची शेतजमिनी प्रकल्पात जाते अश्या बाधित शेतकऱ्यांना या कार्यालयाच्या माध्यमातून मोबदला दिला जातो.

बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पात हिंगणा ईसापूर ता नांदुरा येथील एका शेतकऱ्याची जमीन गेली होती त्याचा मोबदला देण्याच्या नावाखाली बुलडाणा मध्यम प्रकल्प कार्यालयच्या उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी एकूण मोबदल्याचे 10 टक्के अर्थात 2 लाखाची मागणी केली होती व त्याला कार्यालयात कार्यरत लिपिक खरात यांनी प्रोत्साहन दिलं होतं.

तसेच एडव्होकेट अनंता देशमुख यांनी मध्यस्थी केली होती.

त्या शेतकऱ्याने याची तक्रार बुलडाणा एसीबी कडे केली असता दिनांक 28 डिसेंबर रोजी सापळा रचून मध्यम प्रकल्प कार्यालय परिसरात उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,लिपिक नागेश खरात यांच्यासाठी 1 लाखाची लाचेची रक्कम स्वीकारतांना एडव्होकेट अनंता देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आले.या कारवाई नंतर एसीबी पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपिक खरात व एडव्होकेट देशमुख यांना ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर बुलढाणा जिल्हा महसूल प्रशासनात एकच खळबळ बुलढाणा.

Lपाणबुडी मोटार पंप चोरी करणारा चोरटयांना पोलिसांनी केले जेरबंद

0

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

आगर, पोलीस स्टेशन उरळ दिनांक 10/12/2022 रोजी शेतकरी फिर्यादी नामे मंजूर सुभान देशमुख वय 70 वर्ष रा. लोहारा ता बाळापुर अकोला यांनी पोस्टे ला रिपोर्ट दिला की त्यांनी त्यांचे गाव लोहारा येथील शेख नूर शेख कासम यांचे शेत ठोक्याने पीक काढण्याकरिता केलेल्या शेतातील विहिरीमधील सीआरआय कंपनीच पानबुडी मोटार पंप किंमत अंदाजे 40000/- रुपये असा कोणीतरी अज्ञात इसमानी दिनांक 07/12/2022 चे रात्री दरम्यान चोरून नेली आहे अशा फीचे जबानी रिपोर्ट कलम 379 भादवी प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

होता सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता तात्काळ ठाणेदार वडतकर साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास पथक तयार करून ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांना गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारावर ग्राम लोहारा येथील दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी नामे 1. प्रीतम आनंदा मोरे वय 22 वर्ष, 2. युवराज अविनाश मोरे वय 21 वर्ष दोन्ही रा. लोहारा यांना अटक करून त्यांचे जवळून चोरीस गेलेला CRI कंपनीची पानबुडी मोटार पंप किंमत अंदाजे 40000/- रु. चा जप्त करण्यात आला आहे.

कार्यवाही करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,Asi राजाभाऊ बच्चे , PC सुनील सपकाळ, हरिहर इंगळे ,शैलेश घुगे, ठाकूर मेजर व दहलीवाले यांनी कार्यवाही केली.

वैज्ञानिक डॉ.उमेश वावरे यांना विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगनघाट :- यशवंत भारती लोककल्याण संस्था नागपूरच्या वतीने देण्यात येणारा ‘ विदर्भ भूषण ‘ पुरस्कारासाठी हिंगणघाट येथील वैज्ञानिक डॉ. उमेश वावरे यांची निवड करण्यात आली असता त्याना सामाजिक क्षेत्रात विदर्भ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,

आज २७ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमातंर्गत जागतिक बँकेचे माजी सल्लागार तथा कृषी तज्ञ डॉ. रमेश ठाकरे , माजी खासदार ब्रिगेडीयर सुधीर सावंत , सामाजिक न्याय विभागाचे डॉ. सिद्धार्थ गायकवाड, साहित्यिक व लेखक डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. पी. शिवस्वरूप आदींच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार सोहळा पार पडला,

अत्यंत गरीब कुटुंबातील डागा मिल मजदूराचा मुलगा असलेले डॉ. उमेश वावरे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत उच्च शिक्षण घेऊन एकूण १७ देशात विज्ञान जगतात यशस्व

वैज्ञानिक म्हणून भारताचा झेंडा रोवला तसेच हिंगणघाटचे नाव चमकावले. डॉ. उमेश वावरे यांनी केलेल्या विज्ञान जगतात शोध कार्याबद्दल अमेरिका, साऊथ आफ्रिका, कतार ,मलेशिया यासह अनेक देशांनी त्यांना पदवी बहाल केली आहे. विज्ञान संशोधन क्षेत्रात काम करताना भारतातर्फे फ्रान्स, यु एस ए, साऊथ आफ्रिका, ब्राझील, कतार मलेशिया, इटली या देशांच्या संयुक्त वैज्ञानिक दलामध्ये डॉ. उमेश वावरे यांना सहभागी करण्यात आले होते. यामध्ये संशोधन कार्यात अकरा वर्ष सेवा दिली.

शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी डॉ. उमेश वावरे यांनी जवळून पाहिल्या. समाजातील उपेक्षित वंचित आम आदमीच्या कल्याणासाठी काहीतरी केले पाहिजे ही तळमळ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी निर्णय घेत मोठ्या पगाराची नोकरी सोडून हिंगणघाट येथे स्थानापन्न होऊन समाजसेवेचे कार्य हाती घेतले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन सदर संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठित विदर्भ भूषण पुरस्कारासाठी डॉ. उमेश वावरे यांची निवड करून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.

राष्ट्रवादीचा मोर्चासह धरणे आंदोलन मागण्या मान्य न झाल्यासआंदोलनाचा इशारा – सौ नंताताई पाऊलझगडे

0

 

विठ्ठल अवताडे ( जिल्हा प्रतिनिधी)

स्थानिक शेगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय विविध मागण्या घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश सचिव सौ नंदाताई पाऊलझगडे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला ,या मध्ये वाढीव तीस गावाला पाणीपुरवठा त्वरित सुरू करण्यात यावा ,

रखडलेले लंपि आजाराचे अनुदान तत्काळ मिळणे ,अंनसुरक्षेतून शेतकऱ्यांची वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावे , तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक विमे,आणि अल्पभूधारक शेकरी आणि भूमिहीन शेतमजूर यांच्या जीवन हमी साठी आमदमी विमा योजनेचे नूतनीकरण करून पूर्ववत सुरू करण्यात यावी ह्या प्रमुख मागण्या घेऊन आज मोर्चा निघाला आणि तहसील येथे धरणे आंदोलन ही करण्यात आले मागण्या तत्काळ मान्य कराव्या अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला ,

या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश सचिव सौ नंदाताई पाऊलझगडे , तालुका अध्यक्ष संजय गव्हांदे,पांडुरंग पाटील शहर अध्यक्ष दिनेश साळुंके , विद्यार्थी जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे यांच्या सह तालुका कार्यकारणी शहर कार्यकारणी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत मोर्चा नंतर धरणे आंदोलन करून तहसीलदार यांच्या मार्फत हे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले तर प्रतीलीपी मा. कृषिमंत्री , मा. पाणीपुरवठा मंत्री , मा.ग्रामीण पाणीपुरवठा अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा मा. उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग खामगांव यांना पाठवण्यात आले

देशात सह विदेशात विखुरलेले विद्यार्थी आले एकत्र, २८ वर्षांनी पुन्हा फुललावर्ग

0

 

यावल ( प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

यशाने भारावू नये, अपयशाला घाबरू नये, संकटाला तोंड देऊन यशस्वी मार्ग काढावा ही गुरूंची शिकवण जीवनाच्या प्रवासात उपयोगी पडली : अभियंता भाग्यश्री डाके

 

यावल : शालेय शिक्षणात गुरुजनांनी दिलेले मंत्र आत्मसात केल्याने आपल्या जिवनात मिळालेल्या यशाने आपण भारावलो नाही, अपयशात खचलो नाही व अल्पवयात परदेशात आलेल्या संकटावर मात करून स्वत:हाला सावरले, कुटुंबाला सावरले व आज सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणुन आयरलँड येथे कार्यरत आहे. तेव्हा ज्या गुरूजणांनी आपणास घडवले त्या गुरूजणांचे ऋण व्यक्त करण्या करीता सात समुद्रापार आपण स्नेहमेळाव्या आलो असे प्रतिपादन आयरलँड स्थित किनगावची विद्यार्थीनी तथा सॉफ्टवेअर इंजिनियर भाग्यश्री ढाके हिने केले.

किनगाव ता. यावल येथील नेहेरू विद्यालयाच्या सन १९९४ मध्ये इयत्ता १० वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रविवारी पार पडला तब्बल २८ वर्षांनंतर देश विदेशातुन विद्यार्थी एकत्र आले होते. यात प्रामुख्याने या स्नेहमेळाव्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणुन आयरलँड येथे कार्यरत असलेली व अनेक संकटावर मात करून आयरलँड येथे स्थिरावलेली भाग्यश्री ढाके ही विदेशातुन खास करून या कार्यक्रमात गुरूजणांच्या सन्मान करण्या करीता उपस्थित झाली होती विदेशात असतांना पतीचे अकाली निधनातुन स्वत:हाला व कुटुंबाला सावरण्याची शक्ती गुरूजणांच्या शिकवणीतुन मिळाल्याचे तीन मनोगतात प्रसंगी सांगीतले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यध्यापक व्ही.एस. पाटील होते तर प्रमुख उपस्थित तत्कालीन शिक्षक बी.डी. देशमुख, व्ही. बी. पाटील,पी.एन.सुरवाडेर जी.एस.साळुंके, एम.एस.पाटील, डॉ. हिरालाल खंबायत, ए.एफ. पाटील, एन. बी. पाटील, एन. बी. मोरे, जी.एम. महाजन, संजय अहिरे, के. एस. सुरवाडे, प्रदिप भोलाणे, आय.के.बर्डे, आर.एस. सोनवणे सह माजी विद्यार्थी, विद्यार्थीनींची उपस्थिती होती या कार्यक्राम मनोगत आर.एस. सोनवणे. बी. डी. देशमुख. व्ही.बी. पाटील. डॉ. हिरालाल खंबायत. अमोल कुवरे, भाग्यश्री ढाके, सुवर्णा पाटील, नथ्थु महाजन. डी.एस. सुरवाडे, रविंद्र ठाकुर आदींनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचा प्रस्तावना व सुत्रसंचालन डी.एस. सुरवाडे व रविंद्र ठाकुर यांनी केले तर उपस्थितांचे आभार नथ्थु महाजन यांनी मानले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता समीर तडवी, नथ्थु महाजन, अजीत तडवी, नितिन धांडे, शामकांत महाजन, मधुकर लोहार, वसंत सोनार, विठ्ठल पाटील, प्रदिप पाटील, धनराज तेली, रवी वारे, प्रमोद पाटील,प्रदिप महाजन, शेखर पटेल आदींनी परिश्रम घेतले.
आधी फुलणारा वर्ग आता बहरला.

२८ वर्षानंतर इयत्ता १० वी चा हा वर्ग पुर्वी फुलायचा मात्र, आता बहरला आहे. पुर्वीचे वर्गातील या विद्यार्थींनी समाजात विविध क्षेत्रात कार्य करतांना आपला एक वेगठा ठसा उमटवला आहे. आज या विद्यार्थ्यांना पाहुन आम्हाला अभिमान वाटतो. क्रिडा शिक्षक म्हणुन अनेक खेळाडू घडवले त्यांचा एक वेगळा आनंद आहे.
बी.डी. देशमुख, माजी क्रिडा शिक्षक,
विद्यार्थ्यांमध्ये आपले प्रतिबिंब बघतो.

किनगावच्या नेहेरू विद्यालयात १७ वर्ष ज्ञानदानचे कार्य केले अनेक विद्यार्थी घडवले व आज जेव्हा तुम्हा विद्यार्थ्यांना बघतो तेव्हा त्यांच्यात आपण स्वत:हाचे प्रतिबिंब बघतो समाजातील विविध क्षेत्रात आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती बघुन आपण केलेल्या कार्याचा अभिमान वाटतो व आज या कार्यक्रमातुन पुन्हा आपल्या त्या बाल विद्यार्थ्यांना बहरलेले बघुन मन भरून आले.

व्ही.एस. पाटील, माजी मुख्यध्यापक नेहेरू विद्यालय किनगाव.-पुर्ण- फोटो आहे

कोल्हापूर जिल्हा लोक कलाकार यांचे श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्याशी कोल्हापूर बोलोली येथे बैठक

0

 

तानाजी कुऱ्हाडे कोल्हापूर
_______________________________________
कोल्हापूर दि.२५ डिसेंबर बोलोली ता.करवीर
महाराष्ट्र राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकल लोक कलाकार व कलाकार संस्थांना २०२० कोरोना वायरस व लॉकडाउन मुळे लोक कलाकारांना कार्यक्रम नसल्यामुळे प्रत्येक कलाकाराला ५०००/पाच हजार रुपये प्रमाणे आर्थिक मदत म्हणून जाहीर करण्यात आली होती.पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये २८० लोक कलाकार यांना कोरोना मदत ५०००/रुपये प्रमाणे मिळाली आहे.बाकीचे लोक कलाकार फक्त आशेवरच आहेत.

तसेच कोल्हापूर जिल्हा परिषद येथे २०१९/२० ते २०२२ या वर्षामध्ये वयवृध्द लोक कलाकारांचे कमेटी नसल्यामुळे काही वर्षांपासूनचे अर्ज व नवीन अर्ज वयवृध्द मांनधनसाठी मोठ्या संख्येने जमा होत आहेत.लोक कलाकार यांना जास्तीत जास्त मदत व लोक कलाकार यांचे कोल्हापूर जिल्हा येथे वयवृध्द लोक कलाकारांची कमेटी स्थापन व्हावी असे सर्वांनी सगळ्याचें मत मांडले आहे

ह्या सर्व लोक कलाकारांचे अपेक्षा व म्हणने पाहून श्रमिक कलाकार व कामगार कल्याण बहुउद्देशिय मंडळ महाराष्ट्र राज्य
महाराष्ट्र अध्यक्ष तानाजी कुऱ्हाडे यांनी कोल्हापूर जिल्हा लोक कलाकारांचे विषय व अडचणी पाहून कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री माननीय.श्री.दीपक केसरकर साहेब यांना आपण भेटून आपल्या लोक कलाकारांचे मार्ग काढू असे म्हणाले.

माननीय पालकमंत्री दीपक केसरकर साहेब आपल्याला नक्की मदत करतील आणि आपले लोक कलाकारांचे प्रश्न सोडवतील असे ही तानाजी कुऱ्हाडे यांनी आपले मत व्यक्त केले.

या बैठकीला सखाराम भित्तम, एकनाथ पाटील पासार्डेकर,लक्षुमन सावंत, शिवाजी पाटील,भगवान कुंभार,वसंत कांबळे, किरण येडुडकर,श्रीकांत राणे,बाळू चौगुले, बळवंत सुतार, भिकाजी पाटील असे शाहीर व लोक कलाकार उपस्थित होते.