Home Blog Page 23

Wardhanews /खोट्या 90 दिवसांच्या प्रमाणपत्रांवर वर्ध्यात धडक कारवाई; 65 कंत्राटदारांना नोटिसा

 

प्रतिनिधी सचिन वाघे

वर्धा : बांधकाम कामगारांसाठी 90 दिवसांचे खोटे व बोगस प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी जिल्ह्यातील 65 ठेकेदार व कंत्राटदारांवर सरकारी कामगार अधिकारी कार्यालयाने धडक कार्यवाही सुरू केली आहे. संबंधित कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून काहींची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत.

या प्रकरणात काही कंत्राटदारांनी आमच्या सही व शिक्क्याचा गैरवापर झाल्याचे लेखी निवेदन सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास सादर केले आहे. त्यानंतर संबंधित कंत्राटदारांकडून देण्यात आलेली 90 दिवसांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली असून उर्वरित ठेकेदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

या कारवाईमुळे जिल्ह्यातील दलाल, एजंट, कंत्राटदार व काही संघटनांचे धाबे दणाणले आहे.
नियमबाह्य व प्रमाणाबाहेर काम केल्याचे खोटे प्रमाणपत्र ज्या कामगारांना देण्यात आले आहे, त्या प्रकरणात संबंधित कंत्राटदारांवर फौजदारी कारवाईही करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायत व नगरपरिषदेमार्फत निर्गमित 90 दिवसांच्या प्रमाणपत्रांबाबत अधिनियमाच्या कलम 1(4) नुसार, कंत्राटदाराकडे 10 पेक्षा अधिक कामगार कार्यरत असतील तर अधिनियम 7(1) व नियम 22(1) अन्वये आस्थापनेची नोंदणी बंधनकारक आहे.

Hingnghatnews /दरम्यान, काही 90 दिवसांच्या प्रमाणपत्रांप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फतही स्वतंत्र कारवाई सुरू असल्याची माहिती सरकारी कामगार नोंदणी अधिकारी सचिन अरबट व रीना पोराटे यांनी दिली.

Court news/संग्रापपूर राष्ट्रीय लोक अदालतीस उस्फुर्त प्रतिसाद.[ १५३ प्रकरणे निकाली २१ लाखाचे वर वसुली.]

 

संग्रामपूर(सूर्या मराठी न्यूज ब्युरो)ः- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायाधिश यांचे आदेशावरुन दि.१३/डिसेंबर रोजी दिवाणी फौजदारी न्यायालय संग्रामपूर व तालुका वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोकअदालतीचा कार्यक्रम संपन्न झाला.ह्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये १५३प्रकरणे निकाली काढून विविध प्रकराणातील २१ लाखाचे वर वसुली करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.lokadalat

दिवाणी फौजदारी न्यालय संग्रामपूर व तालुका वकील संघाचे सहकार्याने दि.१३ /डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचेआयोजन करण्यात आले होते.ह्यामध्ये दुरावलेले कौटुंबिक संबध आर्थिक व्यवहारातील वाद,धनादेश प्रकरणे,आपघात नुकसान भरपाई सह विविध स्वरुपातील प्रकरणे सामंस्याने मिटवावित ह्यासाठी पक्षकारांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Court news/ह्या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये दिवाणी फौजदारी न्यायालय मधील ३६० प्रकरणापैकी ९३ प्रकरणे निकाली काढून १४ लाखापेक्षा अधिक वसुली करण्यात आली.तसेच दाखल पूर्व १ हजार ९४४ प्रकरणापैकी ४२ प्रकरणे सामोपचाराने मिटवून ३ लाख ४९ हजार २९९ रु.ची वसुली झाली तर तालुक्यातील काही ग्रामपंचायती व नगर पंचायत संग्रामपूर ह्यांची थकीत कर वसुलीची १८ प्रकरणेषनिकाली काढण्यात आली.

व चांगली वसुली करदात्यांनी भरली.ह्या सर्व प्रणां मिळून २१ लाख रु.चे वर वसुली झाली.
सदर लोक अदालतीचे आयोजन खामगाव न्यायालयाचे न्याधिश ए.एन.मुदतसर ,संग्रामपूर न्यायालयाचे न्यायाधिश एस. एल.रामटेके यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले.ह्या लोक अदालत मध्ये तालुक्यातील पक्षकार,नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असून संग्रामपूर न्यालयातील अधिकारी ,कर्मचारी तसेच तालुका वकील संघाचे पदाधिकारी व ईतर वकील,तामगाव ,सोनाळा पो.स्टे.चे ठाणेदार पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Court news/[ शक्यतोवर कोणीही गुन्हा न करता वा इतर प्रकरणात पोलीसा स्टेशन व न्यालयाची पायरी न चढता प्रथम आपसातच प्रकरणे मिटवावीत,जेणे करुन आपला वेळ वाया न जाता आर्थिक नुकसान होणार नाही,ह्याची सर्वांनी दक्षता घ्यावी,
एस.एल.रामटेके
न्यायाधिश दिवाणी व फौजदारी न्यायालय संग्रामपूर.]

Wardhanews /लहुजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य

 

प्रतिनिधी. गुड्डू कुरेशी

मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरणासाठी नागपूरच्या महामोर्चात वर्ध्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

संग्राम अशोकराव कळणे प्रदेश संघटक लहुजी शक्ती सेना

सिंदी रेल्वे : मातंग समाजाला सर्व क्षेत्रात न्याय्य प्रतिनिधित्व आणि हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी उपवर्गीकरणाची मागणी जोर धरत आहे. या मागणीसाठी येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या मातंग समाज आरक्षण उपवर्गीकरण महामोर्चात वर्धा जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती *लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश संघटक संग्राम अशोक कळणे* यांनी माहिती दिली.

लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे साहेब* यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण उपवर्गीकरणासाठी राज्यभरात आंदोलनाची मालिका सुरू आहे. का आहे. या मुद्याकरिता पूर्वीही समाजाने शासन दरबारी निवेदने, मोर्चे, आंदोलने केली असूनही शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

१४ ऑक्टोबर २०२५ रोजी

शासनाने न्यायमूर्ती अनंत बदर समिती नियुक्त करून तीन महिन्यांत अहवाल देण्याची घोषणा केली होती. मात्र समितीने दिलेल्या मुदतीत ठोस निर्णय न २ घेतल्याने शासनाने मुदतवाढ देऊन समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात येत आहे.

याच निषेधार्थ नोव्हेंबरपासून मुंबई ते नागपूर अशी आरक्षण उपवर्गीकरण महापदयात्रा सुरू असून ही पदयात्रा वर्धा जिल्ह्यातून देऊरवाडा, आर्वी, तळेगाव शा. पंत, कारंजा मार्गे नागपूरकडे रवाना झाली आहे. पदयात्रेचा समारोप १२ डिसेंबर रोजी

नागपूर येथे होणार असून त्याच दिवशी विधिमंडळावर भव्य महामोर्चा आयोजित करण्यात येणार आहे.

Wardhanews /वर्धा जिल्ह्यातील सर्व मातंग बांधवांनी या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन श्री. राजेशजी अहिव, श्री, दिलीपभाऊ पोटफोडे, सुधाकरजी वाघमारे, श्री. श्रावणजी वानखेडे,श्री. गजाननजी बावणे,श्री. महेशजी खोडके, संग्राम कळणे, अमोल खंदार यांच्यासह सुशील बावणे, हेमंत चावरे, प्रमोद ससाणे, अनिल पोटफोडे, अजय डोंगरे, महेश गायकवाड, पुष्पाताई पोटफोडे, प्रशांत खंडाळे, विजय चन्ने, अजय जाधव, मंगेश प्रधान, मयुर वानखेडे, कैलाश वेरागडे, गणेश खडसे आणि राजू खंडाळे प्रफुल्ल चिंधुजी कांबळे, सागर बावणे यांनी केले आहे

Hingnghatnews /रक्तदानाचा महासागर : हिंगणघाटात रोटरीचे भव्य शिबिर

 

प्रतिनिधी – सचिन वाघे

हिंगणघाट : रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० आणि मिशन लाइफ उपक्रमांतर्गत, रोटरी क्लब ऑफ हिंगणघाटतर्फे सोमवारी (८ डिसेंबर २०२५) भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. शहरातील विविध ठिकाणी आयोजित या शिबिराला युवक, महिला आणि नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

या उपक्रमासाठी एच.डी.एफ.सी. (जीवन ज्योती ब्लड बँक), गिमाटेक्स इंडस्ट्रीज प्रा. लि., श्रीमती आशाताई कुणावर कला, वाणिज्य व विज्ञान संस्था तसेच अनेक सामाजिक संस्थांचे सक्रिय सहकार्य लाभले.

शिबिरादरम्यान एकूण 123 पिशव्या रक्ताचे संकलन करण्यात आले. रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शहरात समाजसेवेची भावना पुन्हा दृढ होताना दिसली.
रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटेरियन पितांबर चंदानी, सचिव रोटेरियन मंजुषा मुळे, मितेश जोशी, तसेच प्रकल्प संचालक रोटेरियन शाकीरखान पठाण, जितेंद्र वर्मा, उदय भोकरे, पुंडलिक बकाने आणि सर्व रोटेरियन सदस्यांनी रक्तदाते, स्वयंसेवक व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.

Wardhanews /“तुमच्या थोड्याशा रक्ताने कोणाचे तरी जीवन वाचू शकते,” असे आवाहन आयोजकांनी केले.

Congress news/काँग्रेसच्या फलकाला काळे फासले..

 

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता!

बुलढाणा : बुलढाणा पालिका निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना कुणालातरी पराभव पाण्यात दिसतोय का?

असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, घटनाच तशी घडली, शहरातील मुस्लिम बहुल भागात काँग्रेस पक्षाच्या फलकाला काळे फासण्यात आल्याचे सोमवारी सकाळी निदर्शनास आले.

Congress news/तेलगू नगर चौकातील एका घरावर रीतसर परवानगी घेऊन लावण्यात आलेल्या फलकावर काळे ऑइल टाकून विटंबना करण्यात आली असून, विरोधकांना आपला पराभव पाण्यात दिसत असल्याची चर्चा काँग्रेस मधील कार्यकर्त्यांमधून होत आहे.

Nagarparishadnews /हिंगणघाटमध्ये उद्या महासंग्राम! नगराध्यक्षपदासाठी चौरंगी लढत; वीस प्रभागात बहुकोनी टक्कर

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट : शहरातील राजकीय पारडं कोणत्या दिशेने झुकेल याकडे राज्याचे लक्ष लागले असताना, उद्या २ तारखेला नगराध्यक्ष व नगरसेवक निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चौरंगी लढत रंगली असून, वीसही प्रभागांत अत्यंत चुरशीची, बहुकोनी टक्कर पाहायला मिळत आहे.

नगरसेवक निवडणुकीत काही प्रभागात कमळ विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमने-सामने उभे ठाकले आहेत, तर अन्य प्रभागांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) तसेच अपक्ष उमेदवार मैदानात असून मतदारांना विविध पर्याय उपलब्ध झाले आहेत.

या बहुकोनी लढतीमुळे हिंगणघाट शहरातील सर्वच राजकीय पक्षांचे तसेच स्थानिक नेत्यांच्या राजकीय भवितव्याची परीक्षा होणार आहे. निवडणुकीचे वातावरण तापले असून शहरात नेत्यांची धावपळ, कार्यकर्त्यांची गर्दी आणि मतदारांशी संपर्क मोहीम जोरात सुरू आहे.

Nagarparishadnews /राजकारणात या निवडणुकीनंतर मोठे फेरबदल दिसण्याची चिन्हे दिसत असून, उद्याच्या मतदानाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मतदारांचा कौल कोणा पक्षाच्या पारड्यात वजन टाकतो, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

Yavalnews /मशाल” चिन्हासाठी मंगलमय वातावरण निर्मिती झाली असल्याची चर्चा यावल शहरातील मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

यावल नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक.

यावल दि.३०यावल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ( उभाठा ) व महाविकास आघाडीचे उमेदवार सौ.छाया अतुल पाटील, आहेत ११ प्रभागातील राजकीय व अपक्ष उमेदवारांच्या प्रचार तोफांचा प्रभाव वाढला असला तरी मंगळवार दि. २ डिसेंबर २०२५ रोजी म्हणजे मतदानाच्या दिवशी “मशाल” चिन्हासाठी मंगलमय वातावरण निर्मिती झाली असल्याची चर्चा यावल शहरातील मतदारांमध्ये सुरू झाली आहे.

Sivshenanews /शिवसेना ( उभाठा ) व महाविकास आघाडी तर्फे अनुभवी असलेले तसेच विकासाचा चेहरा आणि सर्वसामान्यांच्या विश्वासास पात्र ठरलेले आणि सर्व स्तरातील नागरिकांच्या सतत संपर्कात राहून अडीअडचणी सोडवणारे प्रभाग क्र.११ ‘ ब ‘ मधील महाविकास आघाडी तथा उभाठाचे उमेदवार अतुल पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभाठाचे उमेदवार सौ.छाया ताई अतुल पाटील यांनी गेल्या २० ते २५ दिवसात ” होम टू होम “प्रचार केला व त्यानंतर महाविकास आघाडीचे बहुसंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते,समाजसेवक, हितचिंतक तरुणांसह प्रचार केला.

त्यात त्यांना यावल शहरातील विविध विकास कामांसाठी आणि उज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातील मतदारांकडून उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.त्यामुळे मंगळवार दि.२ डिसेंबर २०२५ हा मतदानाचा संपूर्ण दिवस त्यांच्यासाठी मंगलमय ठरणार असल्याने मतदार त्यांना प्रचंड मतांनी निवडून देणार असल्याची संपूर्ण ११ प्रभागातील मतदारांमध्ये सार्वजनिकरित्या चर्चा आहे.

Umrganews /नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत यात आमची चूक काय – माजी आमदार ज्ञानराज चौगुले

शिवसेना- काँग्रेस पक्षाचा वचन नामा जाहीर करत पत्रकार परिषद

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा /प्रतिनिधी – नवीन आमदारांना लोक आमदार म्हणत नाहीत अजूनही मलाच आमदार म्हणतात कारण आम्ही जनतेची तेवढी कामे केली आहेत. आम्ही स्वतःला आमदार म्हणू नका भाषणामध्ये सांगतो तरी लोक प्रेमाने आमदार म्हणतात.

नवीन आमदारांनी एक वर्षात किती निधी आणला व काय कामे केली हे जनतेला सांगावे. अशी टीका उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उमरगा नगर परिषदेच्या सभेतील भाषणाचा समाचार घेताना माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी पत्रकार परिषदेत केली.

शिवसेना, काँग्रेस लहुजी शक्ती सेना, रयत क्रांती व मित्रपक्ष शहर विकास पॅनलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या “वचननामा” प्रकाशन व पत्रकार परिषदे दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले.

यावेळी माजी खासदार रवी गायकवाड, शिवसेना नगराध्यक्ष पदाचे उमेदवार किरण गायकवाड, माजी कृषी सभापती जितेंद्र शिंदे, काँग्रेसचे विजय दळगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनोरे, काँग्रेसचे तालुकाप्रमुख अर्जुन बिराजदार, नानाराव भोसले, शिवसेना तालुकाप्रमुख बळीमामा सुरवसे, सुप्रिया घोडके, राहुल शिंदे, स्वाती स्वामी, सचिन जाधव , अश्विनी सोनकांबळे, धनंजय मुसांडे, यल्लमा विभूते, बशीर शेख, शबाना लदाफ, पंढरीनाथ कोणे, अनिल सूर्यवंशी, सुषमा पाचंगे, जानवी कोथिंबीर, ज्ञानेश्वर पाटील, विशाल कानेकर, फातिमा औवटी, विजय वाघमारे जमशादबी शेख, प्रिया पवार, मुस्तफा चौधरी, मुजावर फरहीन, बाबा मस्के, अभिजीत मोरे, रेखा सूर्यवंशी, आरती शिंदे आदी उपस्थित होते.

Umrganews /शिवसेना काँग्रेस व मित्र पक्षाच्या उमेदवारांच्या शहर विकास पॅनलचा प्रचार फेरीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

Ladkibahinyojna/हिंगणघाटात विकासकामांचा वर्षाव; ‘लाडकी बहिण’ अबाधित, ‘लखपती दीदी’ लवकरच – फडणवीस

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट,

दि. २८ नोव्हेंबर :भाजपा–रिपाई (आ.) युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गोकुलधाम येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट शहरासह परिसरातील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला.

‘लाडकी बहिण योजना बंद होणार’ या चर्चांना त्यांनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावत, “योजना अबाधित सुरू राहणार आहे,” असा विश्वास दिला. याचबरोबर राज्यात ‘लखपती दीदी’ ही नवी योजना लवकरच राबविण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ग्रामीण आणि छोट्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून ४०० छोट्या शहरांत घनकचरा व्यवस्थापनासाठी तज्ज्ञ नियुक्त केले जाणार आहेत.

सभेला पालकमंत्री पंकज भोयर, माजी खासदार रामदास तडस, आमदार समीर कुणावार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हिंगणघाटातील महत्त्वाच्या चालू आणि आगामी प्रकल्पांचा आढावा पालकमंत्री आणि आमदारांनी सभेत मांडला.

यामध्ये समृद्धी महामार्गाचे चंद्रपूरशी जोडणीकरण, अमृत योजनेतील १२ जलकुंभ, ४०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय, वणा नदीवरील ६० कोटींचा बंधारा, १७ कोटींचे नाट्यगृह व सांस्कृतिक भवन, नवीन बसस्थानक, उड्डाणपूल, जिल्हा सत्र न्यायालयाची इमारत, नगरपरिषद व एसटी महामंडळाच्या इमारती अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार डॉ. नयना तुळसकर यांचा उल्लेख करताना त्यांच्या घनकचरा व्यवस्थापनातील डॉक्टरेटमुळे शहरात आदर्श निर्माण होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

हिंगणघाटला वैद्यकीय महाविद्यालय मिळवून देण्यात यशस्वी ठरलेले आमदार समीर कुणावार यांनी कॅन्सर हॉस्पिटलची मागणी मांडली असून यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. शेतकऱ्यांसाठी दिल्या गेलेल्या ३२ हजार कोटींच्या मदतीचा उल्लेख करून “२ डिसेंबरला भरभरून मते द्या; सरकार तुमची काळजी घेत राहील,” असे आवाहन त्यांनी केले.lakhpatididi

यावेळी २४ गंभीर आजारांवर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार देणारी नवी आरोग्य योजना लवकरच लागू होणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिली.
गोकुलधाम परिसरातील सभा उत्साहात पार पडली. महिलांची उपस्थिती विशेषत्वाने लक्षणीय होती. दुपारी दीडची वेळ देण्यात आली असतानाही मुख्यमंत्री फडणवीस हे हेलिकॉप्टरने हिंगणघाटच्या बिडकर महाविद्यालयात उतरून तब्बल ४.२२ वाजता सभास्थळी दाखल झाले.

Devendrafadnsvis /सभा समाप्तीला हिंगणघाट व सिंदी (रेल्वे) नगरपालिकेतील भाजपा–रिपाई (आ.) युतीच्या सर्व उमेदवारांना विजय मिळवून देण्याचे आवाहन पालकमंत्री पंकज भोयर यांनी केले.

Umrganews /महात्मा फुले ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार अमोल पाटील यांना जाहीर

कार्य गौरव पुरस्कार ह.भ.प.शामसुंदर महाराज , प्रा.डाॅ.संजय अस्वले, अधिकारी गौरव पुरस्कार सीईओ मैनाक घोष यांना जाहीर
– – – – – – – –
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

Dharashivnews /उमरगा – स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महात्मा जोतिबा फुले पुरस्कारांची घोषणा महात्मा फुले स्मृतीदिनी करण्यात आली असून यात महात्मा जोतिबा फुले स्मृती कार्य गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध विचारवंत ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर आणि प्रा.डाॅ.संजय अस्वले, महात्मा जोतिबा फुले स्मृती अधिकारी गौरव पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी

(धाराशिव)श्री.मैनाक घोष, महात्मा जोतिबा फुले स्मृती साहित्य पुरस्कार श्री.सुरेंद्र पाटील, महात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार श्री.अमोल पाटील , महात्मा जोतिबा फुले स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार श्री.अमर बिराजदार, महात्मा जोतिबा फुले

स्मृती उद्योजक पुरस्कार श्री.स्वामी ॲग्रो इंजिनिअरींग प्रा.लि.,महात्मा जोतिबा फुले स्मृती शेतकरी पुरस्कार श्री.मनोहर हराळकर, महात्मा जोतिबा फुले स्मृती सरपंच पुरस्कार श्रीम सरोजा बिराजदार ,महात्मा जोतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार सर्वश्री श्री.अनिल श्रीरसागर ,श्री.लिंबराज कोरे,श्री.प्रविण अगंबरे, श्री.महादेव शिंदे, श्रीम.वनमाला लोखंडे,श्रीम.भावना चौधरी, श्रीम.सुनिता खंडागळे.आदींना जाहीर झाले

असून सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर स्मृतीदिनी अठ्ठावीस डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

Dharashivnews /त्याचबरोबर याप्रसंगी श्री.शामसुंदर महाराज सोन्नर यांचे ‘ संत विचार आणि भारतीय संविधानातील मुल्य ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे श्री.संजय वैरागकर,श्री.सुर्यकांत वैरागकर,श्री.रघुवीर अरणे,श्री.दयानंद पाटील, श्री.गिरीजाकांत वैरागकर , श्रीशैल्य बिराजदार यांनी दिली आहेत.