Home Blog Page 247

नगरपालिका प्रशासन जीवित हानी झाल्यावर पूल दुरुस्ती करणार का ?

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- शास्त्री वार्ड प्रकाश दाळ मिल रोडवरील पूल जून जुलै च्या महिन्यात अतिवृष्टी पाऊस पडल्यामुळे पूल पूर्ण खराब झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या ज्या जीवाला धोका निर्माण झाला आहे . या पुलामुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होऊ शकते त्यामुळे हिंगणघाट नगरपालिका प्रशासनाने या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी , येथील जागरूक स्थानिक रहिवासी अजय परबत यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून समोर आणली . हिंगणघाट नगर पालिका प्रशासन यांनी तात्काळ पूलाची दुरुस्ती करावी . याबाबत तीन महिने झाले तरी नगरपालिका प्रशासना कडून याच्या दुरुस्ती बाबत कोणतीही भूमिका घेतली नाही या बाबत अजय परबत हे मुख्याधिकारी यांना निवेदन देणार आहे.

भारतीय जनता पार्टी च्या वतीने नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करावे,तहसीलदारांने निवेदनाची घेतली दखल:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)दिनांक-१७/१०/२०२२ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर केले होते की,जालना तालुक्यातील मागील पंधरा दिवसापासून परतीच्या पावसाने जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये हाहाकार माजवला असून,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन,कापूस,मका,तुर,द्राक्ष इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अनुदान,मदत जाहीर करुन वितरित करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जालना तालुक्याचे वतीने करण्यात आली होती.या निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी आदेश काढून,ग्रामसेवक तलाठी,मंडळ अधिकारी,कृषी सहायक यांनी नुकसान झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करावे या संदर्भात आदेश काढले आहे.या आदेशामध्ये असे म्हटले आहे की संबंधित अधिकारी,कर्मचारी पंचनामा करण्यास हलगर्जीपणा करत असेल तर त्यांना निलंबित करण्यात येईल त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने काळजीपूर्वक शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करावे व नुकसान झालेल्या पिकांचे अहवाल तहसीलदार यांना पाठवावे व विनाविलंब मदत मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष गजानन नरवडे यांनी केली आहे.

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी जळगाव पोलीस अधिक्षकपदी एम. राजकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

0

 

विकी वानखेड़े यावल

गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. गेल्या काही दिवसांपुर्वीच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यात जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांची देखील बदली झाली आहे. आयएएस अधिकाऱ्यांनंतर आता आयपीएस अधिकाऱ्यांची देखील बदलीचे आदेश काढण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आता नागपूर लोहमार्ग पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांची वर्णी लागली आहे. जळगाव पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांची बदलीचे पदस्थापना राखून ठेवण्यात आले आहे. लवकरच त्यांची पदस्थापना होण्याचे आदेश होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक संपन्न:

0

 

प्रतिनिधी:(संभाजीनगर)दिशा समिती अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली
छत्रपती संभाजीनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीची बैठक झाली.त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.याप्रसंगी दिशा समिती सह अध्यक्ष म्हणून केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ.भागवत कराड उपस्थित होते.रावसाहेब दानवे यांनी प्रत्येक घटकांच्या शेवटच्या माणसांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना कश्या पोहचतील,त्याला लाभ कसा मिळेल याविषयी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.यावेळी दिशा समिती सह अध्यक्ष खा.इम्तियाज जलील,जिल्हाधिकारी श्रीआस्तिक कुमार पांडे,आ.हरिभाऊ नाना बागडे,आ.रमेश बोरनारे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना,महापालिका आयुक्त अभिजित चौधरी,जि.प.सदस्य स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थिती होते.

चुंचाळे येथे ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी स्व खर्चाने कमी वजनाच्या बालकांना पोषण आहाराचे वाटप

0

 

विकी वानखेड़े यावल

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेलं चुंचाळे येथील ग्रामसेवका प्रियंका बाविस्कर यांनी
चुंचाळे येथे
कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप स्व खर्चाने केले

22 विद्यार्थ्यांना पोषण आहार चे सौखर्चाने वाटप केले
,
यापूर्वीही गेल्यावर्षी कै.दिगंबर कोळी राहणार चुचाळे तालुका यावल येथील निराधार वृद्ध यांचे डोळ्यातील मोतीबिंदू चे ऑपरेशन सुद्धा श्रीमती प्रियंका बाविस्कर ,ग्रामसेविका चुंचाळे यांनी केला होता
ग्रामसेविका प्रियांका बाविस्कर पत्रकारांशी बोलताना यावेळी सांगत होते की,

आपणही निसर्गाचे कुठेतरी देणे लागतो यासाठी असे कार्य करत राहावे जेणेकरून जगण्याचे समाधान वाटेल स्वतःसाठी न जग ता दुसऱ्यांसाठी काहीतरी केले त्याचे समाधान झाले किंवा एखाद्याचे मन तृप्त झाले त्यातच आपला आनंद वाटतो,

ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांनी स्वत हा दिवाळी साजरी नकरता स्व खर्चाने ग्रामपंचायत चुंचाळे येथील ४ अंगणवाडी कमी वजन बालक कुपोषित बालक यांना आहार वाटप केले ,ग्रामसेवक प्रियंका अशोक बाविस्कर .यांनी 22 विद्यार्थ्यांना पोषण आहार चे स्वतः खर्चाने दिले यावेळी ग्रामसेवक प्रियांका बाविस्कर यांनी सांगितले की मला खूप आनंद होत आहे की माझ्या हातून असे काम घडत आहेत


यांच्यासह अंगणवाडी सेविका अशा तडवी कीर्ती बारेला ग्रामपंचायत शिपाई मनीष पाटील संगणक चालक सुधाकर कोळी यांच्यासह गावातील

यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते तसेच चांगल्या उपक्रमाने गावामध्ये चर्चा होत आहे

_आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते आनंदाचा शिधाचे वितरण_

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाचा उपक्रम “आनंदाचा शिधा”अंतर्गत आज हिंगणघाट शहरातील स्वस्त धान्य दुकानांमधून उपक्रमांची सुरूवात आमदार समीरभाऊ कुणावार यांच्या शुभहस्ते करण्यात आली यावेळी श्रीमती शिल्पा सोनूले,उपविभागीय अधिकारी हिंगणघाट,श्री.सतीश मासाळ, तहसीलदार हिंगणघाट, श्री.समशेर पठाण,नायब तहसीलदार हिंगणघाट, श्री.सुहास टोंग, पुरवठा निरीक्षक अधिकारी हिंगणघाट यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला *प्रातिनिधिक स्वरूपात शहरातील टिळक चौक, दत्त मंदिर वार्ड,हरी ओम मंगल कार्यालय समोरील, इंदिरा गांधी वार्ड, शास्त्री वार्ड,मुजूमदार वार्ड येथील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य किट वितरीत करण्यात आली या किट मध्ये १लिटर पाॅमोलियम तेल, १ किलो चणा डाळ,१किलो तुर डाळ,१किलो रवा देण्यात येणार असून नाममात्र फक्त १०० रूपयामध्ये हि किट राशन कार्डधारकांना मिळणार आहे हिंगणघाट शहर व ग्रामीण ५१३१४ व समुद्रपूर शहर व ग्रामीण २८३०० असे एकूण ७९६१४ कुटुंबांना लाभ मिळणार आहे सर्वसामान्यांची दिवाळी गोड केल्याबद्दल आमदार समीरभाऊ कुणावार यांनी मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री.देवेंन्द्रजी फडणवीस यांचे आभार मानले वितरण*कार्यक्रमाला माजी नगरसेवक चंदूभाऊ मावळे,सोनू गवळी नरेश युवनाथे ,पद्मा कोडापे,देवा कुबडे, सौरभ पांडे, अनिल गहरवार,वसंत पाल, बळवंत वाघे, स्वप्निल वाघे,अनिल गहेरवार,मारूति साठे,पिता गाडेकर,धनंजय उपम,गजानन वाट आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

वर्धा जिल्ह्यातील मंडळ अधिकारी लावणार निषेधात्मक काळ्या फिती

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

वर्धा :- जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्यांचे मागील तिन वर्षापासून मासिक वेतनात कमालीची अनियमितता होत असुन त्यांना देय असलेली कालबद्ध पदोन्नती ची थकबाकी, वैद्यकीय बिले मिळालेली नसल्यामुळे मंडळ अधिकाऱ्यांच्या कुटुंबाचे आर्थिक बजेट पूर्णतः कोलमलडे आहे. याबाबत विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर,जिल्हा शाखा वर्धा च्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना वारंवार पाठपुरावा करूनही हा मुद्दा ऐरणीवर राहिल्याने शेवटी संघटनेने जिल्हाधिकारी वर्धा यांना एक महिन्यापूर्वी आंदोलनाची नोटीस दिलेली आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व मंडळ अधिकारी दिनांक 21-10-22 ला निषेधात्मक काळ्या फिती लावून काळी दिवाळी साजरी करणार व दिनांक 1-11-22 पासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूकीची कामे वगळता इतर सर्व शासकीय कामात असहकार आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची नोटीस विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर जिल्हा शाखा वर्धा चे जिल्हाध्यक्ष संजय भोंग, उपाध्यक्ष योगेश निकम, महम्मद शफी, सचिव दिलीप मुडे, सहसचिव रामकृष्ण सायरे, कोषाध्यक्ष वासुदेव डेहने यांच्या स्वाक्षरीने देण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ झामरे, माजी सचिव श्याम चंदनखेडे, संजय नासरे, गजानन मसाये, देविदास हेमने, गुलजार नकोरिया, एम एस घुले, मुरलीधर लवणकर, पि एम एकापुरे, ज्ञानेश्वर कापकर, मुक्ता किरपाल, धर्मेंद्र गायकवाड, तेजराम बागडे एम एम दुबे, संदीप हनुमंते, डि आर कुटे, आर एच पुनसे, कुमार बारसागडे, अरविंद तराळे, हरीश गाखरे मंडळ अधिकारी उपस्थित होते

जन्मदिवसाच्या निमित्ताने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर

0

 

 

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पक्षाचे रुग्णसेवक श्री सूरज दादाजी कुबडे व धीरज देवनाथ नंदरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने दि 19 आक्टोबरला संतोषी माता मंदिराच्या सभागृहात भव्य बिपि शुगर व रक्त तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या अध्यक्षस्थानी रणरागिणी संस्थेच्या अध्यक्षा संगीता श्रीकांत बढे (वर्धा )होत्या,.प्रमुख अतिथी पत्रकार सतीश वखरे, रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे,पतंजलीचे वसंतराव पाल गुरुजी,वृक्षप्रेमी गोपाल मांडवकर,डॉ भूषण वासाडे, मंदिर सदस्य शिवाजीराव जाधव प्रहारचे शहर अध्यक्ष अतुल जाधव,अजय खेडेकर उपसरपंच जाम ग्रा. पं., राहुल पाटील सदस्य जाम ग्रा. पं.,प्रहारचे अजय लढी, सतीश गलांडे,रवी धोटे निवृत्त जवान श्रीकांत फलके,हे उपस्थित होते.
यावेळी कोरोनाच्या काळात उत्तम आरोग्य विषयक जनजागृती करणाऱ्या हिंगणघाट शहरातील 46 आशावर्कर यांचा त्याच्या सेवा कार्याची दखल घेऊन गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी आशा वर्कर उज्ज्वला झुंझूरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या शिबिरात 122 स्त्री-पुरुष रुग्णांची तपासणी करून नोंदणी करण्यात आली.ही आरोग्य विषयक तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्र टाका ग्राउंड ,हिंगणघाटचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रतीक डांगरे व सहकारी दीक्षा बोधनकर,प्रिया लोहकरे,अरुणा सुरडकर व चमुने उत्तम प्रकारे केली.
यावेळी सत्कार मूर्ती रुग्णसेवक सूरज कुबडे व धीरज नंदरे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रसमुहाने सामाजिक भान जोपासून राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले.
पाहुण्यांचे स्वागत पवन वाघमारे,अमोल रामगुंडे,अमित गोहणे,हर्षल बोबडे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल वाघमारे यांनी केले.संचालन निर्दोष भांदककर यांनी व आभार चेतन डफ यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री विठ्ठलराव कुबडे, सुभाषराव बोरघरे, राजूभाऊ ठाकरे,देवाजी कुबडे,गीता देवनाथ नंदरे, सुमन दादाजी कुबडे आशुताई चरडे,अमोल वाघमारे,अजय ठाकरे,किशोर देवढे,अमित गोजे,समीर मानकर,रितेश गुढधे,धनंजय मोहले,पवन वाघमारे,आशिष कुबडे,संदीप प्रजापती, प्रवीण चरडे,संकेत कावळे,आदित्य खडसे, वृषभ कोल्हे, प्रद्यून इटनकर, ओम शेंडे,गणेश कुबडे यांनी परिश्रम केले

चुंचाळे येथील सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहातील २७ गरजवंत विद्यार्थ्यांना ड्रेस व मिठाई वाटप..

0

 

 

उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाऊंडेशन ठाणे यांचा अभिनव उपक्रम

यावल तालुका (प्रतिनिधी)
विकी वानखेडे

ठाणे येथील उत्कर्ष एक सामाजिक जाणीव संस्था एक दिवा शिक्षणाचा एक दिवा आनंदाचा दिपोत्कर्ष टप्पा ४ या फाऊंडेशन च्या मुळगाव जळगाव येथील रहिवासी बिंदीयाताई सोनवणे यांनी सामाजिक दायित्व जपत नुकताच येणाऱ्या दिवाळी सनाचे औचित्य साधून चुंचाळे तालुका यावल येथील श्री समर्थ सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहातील २७ गरजवंत विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेस व चप्पल तसेच मिठाई वाटप केले
श्री समर्थ सुकनाथ बाबा वनवासी वसतीगृहाचे अधिक्षक चंद्रकांत तुकडू चौधरी (तेली) व त्यांच्या पत्नी सौ.वदंनाताई चंद्रकांत चौधरी
यांनी आपल्या वसतीगृहातील गरिब गरजवंत विद्यार्थ्यांची समस्या हेरुन व त्यांची दिवाळी सुद्धा आनंदाने साजरी व्हावी या हेतूने दातृत्वशाली उत्कर्ष एक सामाजिक जाणीव फाऊंडेशन च्या बिंदीयाताई सोनवणे यांच्या माध्यमातून दि.१७ आक्टोबंर रोजी वसतीगृहात जाऊन २७ विद्यार्थ्यांना ड्रेस व चप्पल व मिठाई वाटप करण्यात आले मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून बिंदीयाताई सोनवणे यांना मनस्वी आनंद वाटला असे त्यांनी मनोगतात सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री समर्थ रघुनाथ बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सचिव जगन्नाथ राजाराम कोळी यांनी भूषविले .यावेळी नायगाव येथील प्रगतिशील शेतकरी काशिनाथ पाटील,शाळेचे मुख्याध्यापक व्हि जी तेली, अधिक्षक चंद्रकांत तुकडू चौधरी, डि बी मोरे,एम आर चौधरी,एस एस पाटील, वाय वाय पाटील,सुधिर चौधरी, प्रशांत सोनवणे,एस बी गोसावी, राकेश अडकमोल सर, शिक्षीका एन जी पाटील,जमीला तडवी, शारदा सुधिर चौधरी, वदंना चौधरी,ए बी बोरसे,रविंद्र पाटील, कैलास निळे, अरुण कोळी, योगेश कोळी,बाजिराव पाटील आदी उपस्थित होते.प्रास्ताविक शिक्षक डि बी मोरे व एस बी गोसावी यांनी केले तर आभार वसतीगृहाचे अधिक्षक चंद्रकांत तुकडू चौधरी यांनी मानले.

जालना एमआयडीसी येथून पंचक्रोशीतील जनतेला रस्ता मोकळा करून दिल्याबद्दल आभार:

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

प्रतिनिधी:(जालना)केंद्रिय मंत्री मा.श्री.रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.भास्कर आबा दानवे साहेब यांच्या विशेष प्रयत्नांमुळे व मा.श्री.घनश्याम गोयल यांनी दरेगाव ते एमआयडीसी येथून जाण्यासाठी १२ फुट रस्ता दिल्याबद्दल,दरेगाव गावकऱ्यांच्या व पंचक्रोशीतील जनतेच्या वतीने जाहीर आभार.भारतीय जनता पार्टी चे विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा गंगाधर गायके यांच्या प्रयत्नाला यश.यावेळी भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस उद्धव ढवळे पाटील,सरपंच बबन ढवळे पाटील,विश्वोंबर तिरुखे पाटील,राजु झिने,जनार्दन चौधरी, ज्ञानेश्वर ढवळे,गणपत ढवळे,व सर्व गावकरी यावेळी उपस्थित होते.