Home Blog Page 246

मा.आ.बच्चू कडू यांचा सामाजिक दायित्वाचा वारसा जपत एक दिवा दुरितांसाठी उपक्रम साजरा:

0

 

प्रतिनिधी:(धाराशिव)आमचे प्रेरणास्थान मा.आ.बच्चुभाऊ कडू यांच्या आचार -विचाराने प्रेरित होऊन त्यांच्या वैचारिक -सामाजिक संकल्पनेतून दुरितांचे तिमिर जावो या ज्ञानेश्वर महाराजांच्या श्लोकानुसार समाजातील दुरित गरजवंत दिव्यांग,ऊस तोड कामगार,अनाथ तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबात दिवाळीचा आनंद प्रकाश पोहचवण्यासाठी श्री.संतोष राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनाव्दारे एक दिवा दुरितांसाठी उपक्रम राबवण्यात येत आहे.
प्रहार शिक्षक शिक्षकेतर संघटना उस्मनाबाद(धाराशिव)येथे गोरगरीब,गरजू,निराधार,विधवा महिला यांना किराणा मालाचे किट्स वाटप करण्यात आले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री.वैजीनाथ सावंत,जिल्हा कोषाध्यक्ष श्री.रघुनाथ दैन,तालुका उपाध्यक्ष श्री.शहाजी झगडे,तालुका नेते श्री.लक्ष्मण औताडे,तालुका संघटक श्री.सुबराव सुरवसे आदि.पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमात योगदानाबद्ल श्री.वैजिनाथ सावंत व त्यांच्या पदाधिका-यांचे प्रहार संघटनेतर्फे खुप खुप आभार व धन्यवाद.

बंजारा समाजाची दिवाळी पारंपारिक पद्धतीने,विविध लोकनृत्य व लोकसंगीत आणी गीत गायन करून साजरा

0

 

जालना जिल्ह्यासह तालुक्यामध्ये तसेच भारतातील विविध राज्यांत बंजारा समाजाची लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे.त्यामुळे प्रत्येक समाजाची एक भाषा,एक सण,एक गीत,रिती-रिवाज, चालीरीती असते.त्याच प्रमाणे तसेच बंजारा समाजाचे आहेत.
आज दिपावली सण भारतामध्ये पृत्येक समाज मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने आणी घरोघरी लक्ष्मी पूजन करून साजरी केली जाते.

मुली घरोघरी जाऊन हातात दिवा घेऊन मेरा मागतात.मणतात की, “वर्षे दनेरी कोट दवाळी भैय्या तोंन मेरा”,वर्षे दनेरी कोट दवाळी दिदी तोंन मेरा”,”वर्षे दनेरी कोट दवाळी ममी-पापा तोंन मेरा”,वर्षे दनेरी कोट दवाळी आजी-आजोबा तोंड मेरा”. तसेच दुसर्या दिवसी एकत्र येऊन नदी काठी जाऊन फुल घेऊन येतात.व घरोघरी जाऊन शेणाची पुजा करतात.व विवध पृकारच्या बंजारा बोली भाषेत गीत गायन करतात.

तसेच पत्रकार तुकाराम राठोड यांच्या घरी सावंगी तलाव येथे मुली आले असता,त्यांनी आपल्या कॅमेरा मध्ये या गीत गायनाचे शूटिंग केली आहे.यावेळी मुली गीत गायन करत असतांना काय म्हणतात ते आपण व्हिडिओ च्या माध्यमातून पाहुयात.

अशाप्रकारे बंजारा समाजाची दिवाळी पारंपारिक पद्धतीने व विविध लोकनृत्य व लोकसंगीत गीत-गायन करून,साजरा केली जाते.

दिवाळीच्या खर्चाला फाटा देत,धारा येथील युवकांनी केले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग व खाऊ वाटप:

0

 

प्रतिनिधी:(जालना)जालना तालुक्यातील धारा येथील युवक वंकर घेंम्बड व कृष्णा घेम्बड यांनी पारंपरिक पद्धतीने साजरा होत असलेल्या दीपावली या सणावर होणारा व्यर्थ खर्च टाळत,धारा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना बॅग व खाऊ वाटप केले आहे.या त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे ग्रामीण भागातील धारा येथील शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शाळेत जाण्यासाठी अतिशय चांगल्या दर्जाचे बॅग व खाऊ मिळाल्यामुळे,विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण झाला आहे.

यंदा अतिवृष्टीमुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे,शेतकऱ्यांचा लाखो रुपये पाण्यात गेले आहे.व धुळीस मिळाले आहे.त्यामुळे फुल ना फुलाची पाकळी म्हणून गाव खेड्यातील मुला-मुलांची दिवाळी गोड व्हावी या आशेने मी नेहमी मदत करीत असल्याचे वंकर घेंम्बड यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

वंकर घेंम्बड यांनी पुढे सांगितले की,माझा भाऊ कृष्णा घेम्बड यांनी मला फोन केला आणि तो म्हणाला की मला दिवाळी सणानिमित्त होणारा फालतू खर्च टाळून आपल्या गावातील शाळेतील सर्व मुला मुलींना चांगल्या दर्जाची बॅग वाटप करायचा आहे.तर तुझ्याकडे सरांना फोन नंबर असेल तर त्यांना विचार की,शाळेमध्ये किती मुलं-मुली आहे.मी सरांना फोन केला आणि किसन ईरमुरे सरांनी सांगितले की इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत एकूण 50 ते 60 विद्यार्थी आहे.मी सरांना चांगल्या दर्जाची बॅगची व्यवस्था करतो म्हणून सांगितले.सर म्हणाले की तुम्ही कधी या मी येतो.आणि परत मी कृष्णाला फोन केला की सर म्हणाले की तुम्ही या मी येतो.म्हणून मी मुंबई वरून पुणे तसेच दीपावली निमित्त घरी आलो व सरांनी दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांच्या स्वतःच्या घरी न जाता विद्यार्थ्यांसाठी गाव खेड्यांच्या शाळेत आले व आपला अमूल्य वेळ दिला याबद्दल वंकर घेम्बंड यांनी सरांचे आभार मानले.

तसेच वंकार घेंम्बड पुढे म्हणाले की,त्यानंतर मी शंकर भाऊ यांना म्हणालो की,आपण मुलांना बॅग वाटप बरोबर,खाऊ वाटप करू आणि त्यांनी बिस्किट,शेंगदाणा चक्की आणले व शाळेमध्ये सर्व विद्यार्थी पालक व गावातील मित्रमंडळी व शिक्षक यांना बोलावून आज दिपावली निमित्त वाटप केले.याबद्दल शिवराजे ग्रुप धाराचे अध्यक्ष- शंकर घेंम्बड,उपाध्यक्ष- कृष्णा घेम्बड,सचिव- भरत घेंम्बड,सल्लागार-वंकर घेंम्बड यांचे प्रशंसनीय व उल्लेखनीय तसेच सामाजिक कार्य केल्याबद्दल ग्रामीण भागामध्ये एक आदर्श निर्माण झाला आहे. असेच नेहमी समाज उपयोगी कार्य यांच्या हातून घडो हीच आई तुळजाभवानी प्रार्थना करीत आहे.

प्रतिनिधी-तुकाराम राठोड,सावंगी तलाव,जालना

3 युवकाने 17 वर्षीय मुलीला दारू पाजून मुलीवर केला अत्याचार

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- दि. 21 ऑक्टोंबर
17 वर्षीय युवती ही 12 वाजताच्या दरम्यान संत तुकडोजी चौक येथे केक आणायला गेली होती. मैत्रिणीची वाट पाहत होती , या दरम्यान आरोपी आकाश वर्मा व त्याचा मित्र हे तिथे आले व जबरदस्ती मोपेड गाडीवर बसवून नांदगाव रोड कडील महाकाली नगरी येथे नेले आकाश वर्मा यानी जबरदस्तीने दारू माझ्या मुलीला पाजली नशेच्या हालात मध्ये नांदगाव गावा जवळ बंड्या वर 4 ते 6 च्या दरम्यान नेले व त्या ठिकाणी आरोपी आकाश/लाला वर्मा, अक्षय थुल, सुजित गावंडे यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केला असे मुलीच्या आईने सांगितले. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची तुळजापूर ला राज्यस्तरीय सभा.श्री.संतोष(आण्णा)डोंगरखोस प्रदेश कार्याध्यक्ष-राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी मंहासंघ म.राज्य.

0

 

(तुकाराम राठोड/जालना)

जालना-राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची राज्य कार्यकारिणी ची सभा तुळजापूर येथे दिनांक 27 रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत वीर तपस्वी मठ सरकारी दवाखान्यासमोर लातुर रोड तुळजापूर येथे संपन्न होणार आहे.या सभेमध्ये ओबीसी कर्मचारी अधिकारी तसेच विध्यार्थी व युवा यांच्या समस्या व अडचणी संदर्भात विचारमंथन करण्यात येणार आहे.संघटनेचे भव्य राज्य अधिवेशन येत्या काळात होणार असल्याने त्याची पूर्वतयारी या सभेमध्ये होणार असल्याचे राज्य सरचिटणीस अनिल नाचपल्ले यांनी सांगितले.या सभेला सर्व राज्य पदाधिकारी,विभागीय पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी तसेच सर्व ओबीसी कर्मचारी अधिकारी प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.राज्याध्यक्ष शाम लेडे,राज्य कार्याध्यक्ष संतोष डोंगरखोस,राज्य उपाध्यक्ष सुखदेव भालेकर,राज्य कोषाध्यक्ष संजय मंगे,राज्य कार्यालयीन सचिव प्रसाद फर्डे,राज्य समन्वयक विजयकुमार पिनाटे,विभागीय अध्यक्ष मराठवाडा लक्ष्मण दावनकर,कार्याध्यक्ष सुहास दराडे,कोकण विभाग अध्यक्ष अरुण मडके,पुणे विभाग अध्यक्ष प्रभाकर कळमकर,नागपूर विभाग अध्यक्ष राजू बोचरे,आदींसह सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाची भविष्यातील वाटचाल आणि ओबीसी समाजाला नोकरीतील पदोन्नती,नोकरभरती मधील अनुशेष,नॉनक्रिमीलेयरची मर्यादा वाढवून घेणे,सारथी प्रमाणेच महाजोतीने विविध प्रकारच्या योजना विद्यार्थ्यांसाठी राबविणे,परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत इत्यादी विविध प्रश्नांवर चर्चा करून,येत्या दोन महिन्यांत शेगाव जिल्हा बुलढाणा येथे मंत्री महोदय,राज्यातील ओबीसी खासदार,आमदार,जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य अधिवेशन घेणे या बाबींवर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.सदर राज्य स्तरीय बैठकीचे उद्घाटक म्हणून उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री.विलासजी जाधव साहेब हे उपस्थित राहणार आहेत.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य ऍडव्होकेट सन्माननीय श्री.बी.एल.सगर(किल्लारी कर)यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.सदर बैठकीसाठी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन जिल्हा अध्यक्ष संतोष भोजने,जिल्हाकार्याध्यक्ष दिपक हजारे,जिल्हा सरचिटणीस पुरुषोत्तम म्हेत्रे,कळंब तालुका अध्यक्ष अशोक शिंपले,वाशी तालुका अध्यक्ष सखाराम शिंदे,भुम तालुका अध्यक्ष बाळासाहेब कांबळे,परांडा तालुका अध्यक्ष तानाजी तरंगे,उमरगा तालुका अध्यक्ष परमेश्वर साखरे,लोहारा तालुका मच्छिंद्र बोकडे,अध्यक्ष तुळजापूर तालुका अध्यक्ष बालाजी माळी यांनी आव्हान केले आहे.

आनंदाचा_शिधा योजनेचा लाभ/समस्या? समाजसेवक सतीश गलांडे यांनी उजेडात आणले

0

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- महाराष्ट्र सरकारकडून आनंदाचा शिधा योजना दिवाळी निमित्त स्वस्त धान्य दुकानांमधून वाटप करण्यात येत आहे . या किट मध्ये 1 लिटर पॉमोलियम तेल, 1 किलो चणा डाळ, 1 किलो तुर डाळ, 1 किलो रवा देण्यात येणार असून नाममात्र फक्त 100 रुपयामध्ये हि किट राशन कार्डधारकांना मिळणार आहे हिंगणघाट शहर व ग्रामीण 51314 व समुद्रपूर शहर व ग्रामीण 28300 असे एकूण 79614 कुटुंबांना लाभ मिळणार आहे . प्रत्येक शासकीय स्वस्त धान्य दुकानात एक किट शंभर रुपयांच्या मोबदल्यात प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना देण्यात येत आहे पण सरकारी स्वस्त धान्याचे दुकान संत चोखोबा वार्ड क्र.31
प्रो.सलीम काजी
लोक जनशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था हिंगणघाट या दुकानात दोन ते तीन दिवस रोज मजुरी पाडून गोरगरीब लोक ज्येष्ठ नागरिक या योजनेचा लाभ घेण्याकरता चक्क रांगेत उभे आहे म्हणजे जवळजवळ शंभर रुपयाचं राशन घेण्याकरिता 300 ते 400 रुपये रोजी पाडून राशन दुकानाच्या लाईनीत उभे असलेले दिसत आहेत राशन दुकानदाराला याचे कारण विचारले असता ते म्हणतात की सर्वर लिंक नसल्यामुळे असे प्रकार घडत आहे.
दिवाळी निमित्त राबवण्यात आलेली योजना आनंदाचा शिधा या योजनेसाठी तब्बल तीन वेळा हाताचे ठसे थंब घेण्यात येत आहे आणि नंतरच लाभार्थ्यांना राशन देण्यात येत आहे या प्रक्रियेत जवळजवळ एका व्यक्तीस 15 ते 20 मिनिटं या प्रक्रियेमध्ये जात आहे आणि त्यातच लिंक जात आहे यामुळे चक्क दोन ते तीन दिवस राशन दुकानांसमोर लोकांच्या रांगाच्या रांगा उभ्या आहेत… यामुळे आनंदाचा शिधा या योजनेची किट तर नाहीच नाही पण जे रेगुलर मिळणार राशन धान्य आहे ते सुद्धा मिळण्यात अडचण जात आहे. सर्व लिंक नाही त्यामुळे धान्य नाही अशीच समस्या राहिली तर दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकार कडून राबवण्यात येणारी आनंद शिधा योजना सर्वसामान्य जनतेला याचा लाभ मिळेल का ?
हिंगणघाट येथील सतीश खुशालराव गलांडे यांनी याबाबत व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून समोर आणली.
सुहास टोंग(हिंगणघाट पुरवठा निरीक्षक) :- महाराष्ट्रात कालपासून एकाच वेळेस आनंद दिघा किट वाटप होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मशीनवर दबाव आल्यामुळे सर्वर डाऊन झाले . वरिष्ठांकडून निर्देश आले की ऑफलाईन वाटप करण्यात यावे त्यानुसार आम्ही दुकानदाराला ऑफलाईन वाटप 23 ऑक्टोंबर रविवार पासून करायला सांगितले

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा जालना येथे शेतकऱ्यांच्या वतीने आक्रोश व निषेध:

0

 

प्रतिनिधी:(जालना)कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांचा दि.२१/१०/२०२२ रोजी जालना तालुक्यातील उमरी येथे राष्ट्रवादी युवकच्या वतिने निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

 


यावेळी भाऊराव गाडेकर,संतोष मांदळे,संताराम चौधरी,बळीराम गाडेकर,संपत गाडेकर,शिवाजी गाडेकर,संतोष गाडेकर,दिलीप गाडेकर,सुरेश गाडेकर,देविदास गाडेकर,कृष्णा गाडेकर,तुकाराम गाडेकर,राष्ट्रवादी युवक तालुका कार्यध्यक्ष कृष्णा गाडेकर,वक्तासेल उपाध्यक्ष संदिप गाडेकर,विष्णू गाडेकर,अंकुश किनकीने,रतन मांदळे,संग्राम गाडेकर,शाम गाडेकर व अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ज्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी शेती केली नाही.आज ते कृषी मंत्री होऊन सांगतायत की,आज घडीला ओला दुष्काळ जाहिर करण्यासारखी राज्यात परिस्थितीच नाही.त्यामुळे याठिकाणी निषेध करण्यात आला.अशी प्रतिक्रिया या ठिकाणी कृष्णा गाडेकर यांनी दिली आहे.

प्रतिकिर्या- कृष्णा गाडेकर(राष्ट्रवादी युवक तालुका कार्याध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य)सावंगी तलाव,उमरी,तालुका,जिल्हा जालना.

यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चंद्रपूरात आज क्रांतिवीर शहीद बाबुराव शेडमाके यांना अभिवादन !

0

 

अनेक संघटनेच्या वतीने भोजन दान !
आज शुक्रवारी क्रांतीवीर शहिद बाबूराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या १६४ व्या शहिद दिना निमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृहातील शहिद स्मारक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने क्रांतीवीर शहिद बाबूराव शेडमाके यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या वेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, सिध्दार्थ मेश्राम, या शिवाय संगीता येरमे, बंडु पेंदाम, सावन उईक, रवि मेश्राम, दिवाकर मेश्राम, सुनिल मेश्राम, साईनाथ मडावी, कार्तिक कोडापे, रमेश उईके, सविता दंडारे, आशा देशमुख, विश्वजित शाहा, हेरमन जोसेफ, तापोष डे, देवा कुंटा, कल्पना शिंदे, किशोर बोलमवार, वैशाली मद्दीवार कल्पना शिंदे यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागातील इतर कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

🟨🟪शहिद विर बाबूराव शेडमाके यांची पुण्यतिथी शहिद दिन म्हणून साजरी केल्या जाते. या वर्षीसुद्धा समाज बांधवांच्या वतीने शहीद दिना निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कारागृह येथील त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आदिवासी बांधव मोठ्या संख्येने आज उपस्थित झाले आहे.या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने त्यांच्या स्मृतींना अभिवादन करुन आदरांजली अर्पण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले.

दरम्यान शहिद दिना निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आज नागरिकांना या ठिकाणी मसाला भात व पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.🟨🟪सुर्या मराठी न्यूज साठी चंद्रपूरवरून आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे🟨🟪

किनगाव प्रा.आ.केंन्द्रात कोरोणामुळे जिव गमावलेल्या व्यक्तीच्या आठवणीसाठी केले वृक्षारोपण-डाँ.मनिषा महाजन यांचा अनोखा उपक्रम

0

 

यावल ( प्रतिनीधी.) विकी वानखेडे

 

किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा महाजन यांच्या अभिनव उपक्रमातुन व किनगाव ग्राम पंचायत कार्यालयाच्या सहकार्याने “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने कोव्हीड १९ या महामारीमुळे जिव गमावलेल्या व्यक्तींची आठवण म्हणून वृक्षारोपणाचा उपक्रम गुरूवार दि.२० रोजी प्रा.आ.केंन्द्राच्या आवारात राबविण्यात आला ज्यांच्या घरातील व्यक्तींचा कोव्हीड १९ मुळे मृत्यु झाला ते अनपेक्षितच होते परंतु त्यांची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून वृक्षारोपण करण्यात आले झाडे जगली तर माणसे जगतील असा संदेश या उपक्रमाद्वारे डॉ.मनिषा महाजन यांनी दिला कोविड १९ मुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांच्या हस्ते या कार्येक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यात वत्सला तायडे,निलेश रामदास पाटील,अनिल शिंपी,नंदा महाजन,सुशीला रमेश चौधरी या मृत व्यक्तीची आठवण म्हणून प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आले.यावेळी कोरोणामुळे जिव गमावलेल्या अनिल शिंपी यांच्या पत्नी भाऊक झाल्या व त्यांनी सांगीतले की जेव्हा जेव्हा मी प्रा.आ.केंन्द्रात येईल तेव्हा तेव्हा माझ्या पतींची आठवण म्हणून हे झाड साक्ष देईल असे आशा शिंपी यांनी सांगितले व या उपक्रमाबद्दल डॉ.मनिषा महाजन यांचे कौतुक करत आभारही मानले यावेळी सरपंच सौ.निर्मलाताई संजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थीत होते.दोन वर्षांनपुर्वी अनपेक्षीतपणे कोरोनाची लाट आली आणी काहींच्या आयुष्यात अंधार करूण गेली मी आरोग्यसेवा देत असतांना माझ्या डोळ्यांनी हे पाहीले म्हणून कोरोनामुळे जिव गमावलेल्या व्यक्तींच्या परीवाराच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून वृक्षारोपणाच्या कार्येक्रमाचे
आयोजन केल्याचे डाँ.मनिषा महाजन यांनी यावेळी सांगीतले.
डॉ.मनिषा महाजन या नेहमीच नवनवीन उपक्रम राबवीत असतात व परीसरातील रस्त्यावर अपघातग्रस्तांना महीला डाँक्टर असुन देखील वेळ न पहाता अपघातस्थळी आरोग्यसेवा देतात म्हणून त्यांनी राबवलेल्या अभिनव उपक्रमा बद्दल सर्व स्तरातून डाँ.मनिषा महाजन यांचे कौतुक होत आहे या कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.आ.केंद्राचे
आरोग्य सहाय्यक राजेश सुरवाडे आरोग्य सहाय्यीका श्रीमती उषा पाटील आरोग्य सेविका एस.आर.जमरा आरोग्य सेवक दिपक तायडे,जिवन सोनवणे,विठ्ठल भिसे,पवन काळे परीचर सरदार कनाशा,स्वाती बोराडे स्विपर निलेश कंडारे यांनी परिश्रम घेतले.

चंद्रपूरात “बापलेक” उपोषणावर! -प्रशासनाने नाही घेतली दखल !

0

 

चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील महादवाडी येथे वास्तव्य करणारे सिध्दार्थ गोमा रामटेके व रोहीत सिध्दार्थ रामटेके हे बापलेक गेल्या १३आक्टोंबर पासून आपल्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला बसले आहे . एरव्ही उपोषणाला बसायचे म्हणजे छान पैकी एक मंडप उभारला जातो . भेटीसाठी येणा-या जाणां-या साठी दोन चार खुर्च्या ठेवल्या जातात .परंतू हे बापलेक कुठल्याही प्रकारचा मंडप न उभारता चंद्रपूर जिल्हा परिषद समोर साखळी उपोषणाला बसले आहे.आज या उपोषणाचा नववा दिवस आहे.परंतू प्रशासनाने या बाबतीत कुठलीही दखल घेतली नाही.ग्राम पंचायत महादवाडी यांचे कडे भत्ता व वेतनाची रक्कम थकीत आहे.या शिवाय त्यांना ग्राम पंचायतने परत कामावर घ्यावे अश्या प्रकारच्या त्यांचे अनेक मागण्या आहेत.अनेकदा त्यांनी पत्रांचे माध्यमातून या बाबत पाठपुरावा केला पण त्यांचे प्रयत्नाला यश आले नाही.शेवटी साखळी उपोषणाला बसुन त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले परंतु त्यांचे उपोषणाची दखल काल पर्यंत कोणीही घेतली नव्हती.आर्थीक परिस्थिती अत्यंत बिकट असलेल्या या बापलेका कडे जिल्हा प्रशासनाने तातडीने लक्ष पुरवावे अशी मागणी आता सर्वत्र स्तरावरुन होवू लागली आहे.🟣 सुर्या मराठी न्यूज साठी चंद्रपूरवरून आमचे विशेष प्रतिनिधी किरण घाटे 🟣