Home Blog Page 275

प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त स्व रुचित वांढरे यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-ओबीसी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष,युवा पिढीला प्रेरणा देणारे,अफाट लोकप्रियतेचे धनी,समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या विविध योजना मिळाव्यात यासाठी सातत्याने संघर्ष करणारे स्व रुचित वांढरे हे मागील वर्षी दिनांक २६ आगष्ट ला अल्पशा आजाराने जगातून निघून गेले.त्यांच्या जाण्याने कुटुंब,आप्तेष्ट, नातेवाईक,मोठा मित्रपरिवार हळहळला.कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली.रुचितच्या कार्याने आणि त्यांच्या अचानक जाण्याने त्याला विस्मरण होणे शक्य नाही.हिच त्याला वांढरे परिवार आणि समस्त मित्र परिवारांकडून मनःपूर्वक भावपूर्ण आदरांजली अर्पण.

हिंगणघाट भूमि अभिलेख मध्ये कर्मचारी करतात भ्रष्टाचार वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज

0

 

सचिन वाघे ( प्रतिनिधी)

हिंगणघाट :— पावसाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना जेवढी आतुरता होती त्या आतुरते च्या अनुषंगाने हिंगणघाट येथील भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी यांनी ऐन पावसाळ्यात पाऊस असताना सुद्धा शेतकऱ्यांचे हित जोपासून त्यांच्या शेताची दिलेल्या आदेशानुसार मोजणी केलेली आहे वास्तविक रित्या सकाळी 8 पासून बारा एक वाजेपर्यंत पावसाची संतत धार असते या दरम्यान शेतकऱ्यांचे येणाऱ्या फोनद्वारे त्यांना प्रतिसाद देत त्यांच्या शेतामध्ये पोहोचून त्यांच्या शेताची सुरळीतपणे व योग्य पद्धतीने मोजणी करून दिल्या जात असते मोजणी हिंगणघाट पासून काही अंतरावर असलेल्या सावली वाघ,शेकापूर, मनसावळी,वडनेर,व अन्य येथे करण्यात आलेली आहे त्याअनुषंगाने भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मागील बऱ्याच दिवसांपासून सतत एक सारख्या शेतीच्या मोजणी करत आहे एवढेच नव्हे तर शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे दिवस असून सुद्धा या दिवसांमध्ये त्यांनी भुमिअभिलेख मध्ये असलेल्या पेंडिंग केसेस हाताळण्याचे कार्य सहज आणि सुरळीतपणे सहकाऱ्याला घेऊन केलेले आहे मागील दोन-तीन महिन्यांपासून शेती मोजनीच्या नोंदी झाल्यामुळे आणि मर्यादित कर्मचाऱ्यांमुळे या मोजण्या निकाली काढलेल्या आहे परिसरातील बरेच मोजण्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या द्वारे करण्यात आलेला आहे . तसेच हिंगणघाट येथील पुरपीडित पट्ट्या मध्ये वारस नोंद चुकीच्या पद्धतीने घेण्यात येत आहे मोबदल्यात त चिरी मेरी मोठ्या प्रमाणात होत आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील TLR श्री प्रसन्न भुजाडे यांच्या मार्गदर्शनात बऱ्याचशा पेंडींग प्रकरण निकाली काढलेले आहे.
परंतू भूमी अभिलेख कार्यालयातील नजूल व लीज च्या प्रकरणाबाबत नोंदी केलेले प्रकरण, निकाली निघालेले प्रकरण तसेच पेडिंग असलेल्या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केल्या जात आहे याकडे Deputy Director-भूमी अभिलेख नागपूर, SLR श्री प्रमोद ठुबे -Wardha,या वरीष्ठ अधिकार्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. येथील TLR श्री प्रसन्न भुजाडे हे पूरपीडीत पट्टे, नजूल , लीज चे प्रकरण हाताळणा-या कर्मचाऱ्यावर विशेष प्रसन्न दिसून येत आहे. वरीष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

हिंगणघाट नगरपरिषदेने मोकाट जनावरांसाठी केली कोंडवाडाची व्यवस्था

0

 

हिंगणघाट :- गणेशोत्सवाच्या व पावसाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या मोकाट जनावरांसाठी नगर परिषदेकडुन कोंडवाड्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या कामासाठी नगर परिषदेकडुन सर्व प्रथम शहरामध्ये नागरीकांना नाउसस्पिकर द्वारे सुचना पुढील प्रमाणे देण्यात आली. मुख्य मार्गावरील रहदारीच्या ठिकाणी असलेले मोकाट जनावरे ज्या कोणत्या नागरीकांचे आहे त्यांची आपल्या घरी किंवा आवश्यक त्या ठिकाणी आपले जनावरे बांधून ठेवण्यात यावी. मोकाट जनावरे रहदारीच्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर आढळल्यास आपली जनावरे कोंडवाडयामध्ये जमा करण्यात येईल व जनावर मालकांवर एक मोठा जनावरांसाठी २०००/- प्रति जनावर लहान वासरांसाठी २०००/- प्रति नुसार दंड आकारण्यात येणार अशा

प्रकारच्या सुचना देण्यात आल्या. या कामासाठी नगर परिषदेने १५ पेक्षा जास्त कर्मचान्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच नगर परिषदेला पाकामासाठी कोणत्याही नागरीकांनी प्रास देत असल्यास पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन, हिंगणघाट यांनी १२ या नंबर वर संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याकामामध्ये कोणीही अडथळा निर्माण केल्यास नियमानुसार कारवाई करण्याचा ईशारा पोलिस प्रशासनाकडून सुद्धा देण्यात आलेला आहे.

त्यामुळे याद्वारे हिंगणघाट शहरातील नागरीकांना आवाहन करण्यात येते आपले जनावरे रस्त्यावर रहदारीच्या ठिकाणी मोडू नये आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल व जनावरे कोंडवाडयात जमा करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन सुध्दा याद्वारे करण्यात येत आहे.

शिक्षक सन्मान अभियान प्रणित विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली द्वारा शिक्षक व समाज दत्तक योजनेला उत्तम प्रतिसाद.

0

 

अनिलसिंग चव्हाण मुख्य संपादक.

गडचिरोली:-आज दिनांक:२४ आगष्ट २०२२ ला ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान’ प्रणित विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली द्वारे “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजना” अंतर्गत अभियानाचे राज्य कार्याध्यक्ष बापु भोयर यांनी निवड केलेल्या “सम्राट सतिश हिचामी” या विद्यार्थ्यास निवडपत्र,पालक माहितीपत्र व पुस्तक भेट देऊन विद्यार्थी निवड प्रक्रियेचा गडचिरोली जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी बापु भोयर राज्य कार्याध्यक्ष,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियानाचे गडचिरोली जिल्हा प्रमुख बिदुर अधिकारी,विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली सुरेश उसेंडी,जिल्हा सचिव विद्यार्थी जीवन प्रेरणा मंच गडचिरोली, किशोर हिचामी,अध्यक्ष , शालेय व्यवस्थापन समिती , दर्पणगुडा, सौ.सपना झाडे, सदस्य ग्रामपंचायत वरूर, मुख्याध्यापक भिमा गुजेलवार दर्पणगुडा व गावकरी मोठ्या संख्येने पालक,गावातील नागरिक उपस्थित होते.
गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक,शैक्षणिक व सामाजिक सहाय्य केल्या जाणार आहे.राज्याचे संस्थापक अध्यक्ष विजय ढाकुलकर,राज्य समन्वयक चांगदेव सोरते व इतर सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमांचे कौतुक करून शुभेच्छा दिलेल्या आहेत.

जय बजरंग कनिष्ठ कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा बदललं मागदर्शन

0

 

योगेश नागोलकार

राहेर:जय बजरंग कनिष्ठ कला महाविद्यालय आणि जय बजरंग कला महाविद्यालय चान्नी येथे आज दिनांक २४ आॕगस्ट २०२२ रोजी स्पर्धा परीक्षा बदललं मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून साई करिअर अकॅडमी, मोताळ्याचे संचालक प्रा. प्रमोद कौसकार होते . सरांनी विद्यार्थ्यांना पोलिस, सैन्य, तलाठी, पटवारी भरती बद्दल मार्गदर्शन केले , तसेच या परीक्षांच्या तयारी संबंधी मार्गदर्शन केले.
जय बजरंग कनिष्ठ कला महाविद्यालय चान्नी येथे वर्षभर मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिल्या जाईल. ही सोय जय बजरंग च्या कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देण्यात येईल. सदर उपक्रम प्राचार्य संग्राम इंगळे सर व त्यांच्या सहकारी शिक्षकांच्या सहकार्यातून राबविण्यात येईल.व विद्यार्थीनींनी व विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा लाभ घ्यावा.

ठिय्या आंदोलन करताच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला १ लाख रुपयाचा धनादेश….

0

 

जळगाव जा.:- मौजे वडशिंगी येथील गोपाल वानखडे या अल्पभूधारक शेतकऱ्यांनी स्वतःचे नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून दिनांक १९ नोव्हेंबर २०२१ आत्महत्या केली होती.

या आत्महत्येला ९ महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा या कुटुंबाला तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक वेळेस उडवाउठवचे उत्तरे देवून वेळकाढू धोरण मारून देण्यात आले होते. त्यामुळे या कुटुंबातील व्यक्तींनी किती दिवस शासकीय मदतीपासून वंचित रहावे हा सुद्धा प्रश्न असल्यामुळे आज दिनांक २४ ऑगस्टला तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा भुमीत्रांच्या वतीन युवा आंदोलक अक्षय पाटील यांनी दिला होता.

 

त्यामुळे आज तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला २ तास उलटून सुद्धा संबंधित महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या आंदोलनाला फिरवून न पाहिल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजींनी परिसर दणाणून सोडला होता.

त्यानंतर आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनाने दखल घेत नायब तहसीलदार गायकवाड यांनी या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मृत गोपाल वानखडे यांच्या पत्नील व मुलगा प्रज्वल वानखडे यांना १ लक्ष रुपयांचा धनादेश देण्यात दिला.

यावेळी तुकाराम पाटील, वैभव जाणे, अजय गिरी, अशपाक देशमुख, शुभम रोठे, सोपान पाटील, गणेशसिंग परिहार, विजय पाटील, अवी पाटील तसेच बहुसंख्य आंदोलनकर्ते तहसील परिसरामध्ये जमले होते.

यावल येथे लंपी स्किन डिसीज या गुरांच्या संसर्गजन्य गंभीर आजारावर उपाययोजना व्हावी यासाठी बैठक संपन्न

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यात मागील काही दिवसापासुन गुरांवर लंपी स्किन डिसीज हा गंभीर स्वरूपाचा संसर्गजन्य आजार लागला असुन तो वेगाने पसरत असल्याने या मुळे शेतकरी बांधवांची अनेक मोल्यवान गुरेढोरे दगावली जात असल्याच्या पार्श्वभुमीवर शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यावी यासाठी पंचायत समितीच्या पशुधन विभागाच्या माध्यमातुन सरपंच व ग्रामसेवक यांची तातडी ची बैठक आयोजीत करण्यात आली होती . यावल पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या सभागृहात यावलचे तहसीलदार मेहश पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरेढोरांच्या लंपी या धोकादायक संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभुमीवर तातडीची बैठक आयोजीत करण्यात आली होती , बैठकीत तहसीलदार महेश पवार यांनी तालुक्यातीत ग्रामीण क्षेत्रातील शेतकरी बांधवांना या आजारापासुन अधिक सर्तक व सावधान राहण्याच्या सुचना दिल्या असुन , येणारा पोळा हा सण आपणास अगदी साद्या पद्धतीने साजरा करायचा आहे . सर्व ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रातील गुरढोर यांचे पंचायतीच्या पातळीवर प्रशासनाच्या माध्यमातुन १०० % टक्के लसीकरण करणे हे अत्यंत गरजे आहे . या गुरांवर आलेल्या कोरोना सारख्या संसर्गजन्य धोकादायक लंपी स्किन डिसीज हा आजार खुप मोठया प्रमाणात तालुक्यात व जिल्ह्यात वेगाने वाढत असुन यामुळे शेकडो गुरठोर दगावली जात आहे या गंभीर समस्यामुळे शेतकरी बांधव मोठया संकटात ओढवला गेला असुन या आजारास पुर्णपणे संपाविण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची गरज असल्याने यासाठी यावल पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार महेश पवार , सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे , यावलचे पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉ. एस एन .बढे यांच्यासह बैठकीस तालुक्यात सरपंच , ग्रामसेवक उपस्थित होते .

आ.समिरभाऊ कुणावार यांनी पुरबाधितांसाठी केली भरघोस मदतीची मागणी…आ.कुणावार यांचा सभागृहात एल्गार..

0

 

हिंगणघाट मलक मो नईम

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टि तसेच पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने भरघोस मदत देण्याची मागणी हिंगणघाट-समुद्रपुर,सिन्दी विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी नुकतीच पावसाळी अधिवेशनाचेवेळी सभागृहात केली.
यावेळी त्यांनी मागीलवर्षी महाविकास आघाडीचे सरकारने त्यांचे शासन असतांना शेतकऱ्यांना कुठलीही मदत केली नसल्याची आठवण करुन देत नुकत्याच झालेल्या अतिवृष्टिचेवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पुरग्रस्त भागात भेट देऊन पाहणी केल्याबद्दल तसेच प्रत्येक कुटुंबियास ५ हजार रुपये खावटी दिल्याने त्यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांचे आभार मानले.
राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टि झाली, जिल्ह्यातसुद्धा सतत ३ मुसळधार पाऊस झाला, हिंगणघाट विधानसभा जवळपास १५०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविन्यात आले होते.
राष्ट्रपती निवडणूकीचे निमित्ताने सर्व लोकप्रतिनिधी मुंबई येथे असतांना मूसळधार पावसामुळे सर्वत्र नदीनाले उफाळून वाहु लागले,अनेकांचे घरात पुराचे पाणी शिरले, धनधान्यासह सर्वच गृहपयोगी साहित्य पाण्यात बुडाले असतांना गंभीर पुरपरिस्थितीची निर्माण झाली.आ.कुणावार यांनी सदर आपत्तीची माहिती देताच उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांनी रात्रीच नागपुर गाठले.
दूसरे दिवशी सकाळी उपमुख्यमंत्री फडणवीस तात्काळ हिंगणघाट क्षेत्रात दौरा करीत पुरग्रस्त नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या,अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले.
जिल्ह्यात यावेळी मान्सून खुप उशिरा आला,पिकांची दुबार,तिबार पेरणी शेतकऱ्यांना या हंगामात करावी लागली, शेतकऱ्यांसाठी हे वर्ष नापिकीचे ठरले.
शहरी तसेच ग्रामीण भागातही अतिवृष्टि व नदीनाल्याला आलेल्या पुरामुळे घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले,अतिवृष्टिमुळे धनधान्यासह,गृहपयोगी साहित्याचे नुकसान झाले,शेतीउत्पन्नातही मोठी घट झाली , अतिवृष्टिमुळे शेती ख़रडुन गेली,विजेचे खांब वाकले,अनेक पुलं वाहून गेले,रस्तेसुद्धा ख़रडुन निघाले,अशावेळी सरकारने निकषाचे पलीकडे जाऊन शेतकऱ्यांची मदत करण्याची विधानसभेत मागणी केली.शेतकऱ्यांचे पशुधन पुरात वाहून गेले असल्याने शवविच्छेदनासाठी मृत शरीर मिळणे कठिन झाल्याने शासनाने त्याची दखल घेऊन नुकसानभरपाई देण्याचीसुद्धा मागणी त्यांनी सरकारकडे केली.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अधिकाऱ्यांनी उत्कृठ काम करीत तात्काळ ४८ तासात पंचनामे करुन पुरग्रस्त नागरिकांना मदत केली असल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी करुन प्रशासनातील अधिकाऱ्यांचेही कौतुक केले.
तातडीच्या मदतीची घोषणा केल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांचे तसेच उपमुख्यमंत्र्याचे आभार व्यक्त केले.

विरोधी पक्ष नेता माननीय अजितदादा पवार यांचे अमरावतीत जंगी स्वागत

0

 

उषा पानसरे असदपूर मू.का. संपाकद मो. 9921400542

आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांची अजितदादांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी

विकास पूर्तीचा वादा- अजितदादा अशा घोषणेने रहाटगाव रिंग रोड टी पॉईंट दणाणला

अमरावती २० ऑगस्ट: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय अजितदादा पवार शनिवारी २० ऑगस्ट रोजी अमरावती जिल्हातील धारणी दौऱ्यावर आले आहेत. राज्याच्या विधानसभेचे विरोधीपक्षनेते पदी निवड झाल्यानंतर ते प्रथमच अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असल्याने त्यांच्या स्वागतासाठी अमरावती जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली . शनिवारी सकाळी त्यांचे अमरावती रहाटगाव टी पॉईंट येथे आगमन होताच अमरावतीच्या आमदार सौ . सुलभाताई खोडके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले . राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधिमंडळ समन्वयक संजय खोडके यांनी सुद्धा विरोधीपक्ष नेता अजितदादा पवार यांचे अमरावती आगमना निमित्य हार्दिक स्वागत केले. रहाटगाव रिंग रोड येथे विरोधीपक्षनेते अजित दादा पवार यांचे स्वागत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली . तसेच विरोधी पक्षनेता माननीय अजितदादा पवार यांच्या स्वागतासाठी अमरावतीत विविध भागात पोस्टर्स व बॅनर्स व राष्ट्रवादीचे झेंडे सुद्धा लावण्यात आले. दरम्यान विरोधीपक्ष नेता अजितदादा पवार यांनी आमदार सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला . विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार यांच्या अमरावती आगमनानिमित्य कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून एकच दादा-अजितदादा, विकास पूर्तीचा वादा- अजितदादा अशा गगनभेदी घोषणा देतात रहाटगाव रिंग रोड दणाणून गेला होता. तसेच राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने करण्यात आलेल्या स्वागताचा स्वीकार केल्यानंतर विरोधी पक्ष नेता अजितदादा पवार हे धारणी तालुक्यातील आपल्या नियोजित दौऱ्यावर रवाना झाले. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडकेसमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष-संजय खोडके, माजी महापौर-ऍड. किशोर शेळके, शहराध्यक्ष-प्रशांत डवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष-विजयराव भैसे, माजी महापौर-रीना नंदा, माजी नगरसेवक-जयश्री मोरे ,ममता आवारे,अलका कोकाटे, रतन डेंडुळे, लकी नंदा, भूषण बनसोड, प्रवीण मेश्राम, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक-अजय पाटील मेहकरे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक शहराध्यक्ष-ऋतुराज राऊत,यश खोडके, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष-आकाश हिवसे, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, निलेश शर्मा, प्रशांत महल्ले, जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी-के. एम. अहमद, आनंद मिश्रा, जितेंद्रसिंह ठाकूर, ऍड. सुनील बोळे, डॉ. एजाज खान, पप्पूसेठ खत्री, संदीप आवारे, नितीन भेटाळू, मनोज केवले, राजेश कोरडे, सतीश रोंघे, प्रवीण भोरे,मनिष बजाज, विनोद गासे, प्रमोद महल्ले, योगेश सवई, राजेश्वर लेंधे, मोहन खोडे, राजाभाऊ मोरे, प्रवीण पारडे, दीपक यादव, रोशन कडू, शिवपाल ठाकूर, चेतन वाथोडकर, सोमेश्वर मोरे, डॉ. सुधाकर कालमेघ, सुनील रायटे, अमोल देशमुख, जुमम्मा हसन नंदावले, टी. आर. राठोड महाराज, राजेंद्रसिंह कश्यप, राजीक पटेल, प्रा.डॉ. अजय बॉंडे, प्रदीप घोंगडे, आशीष कपले,बंडू निंभोरकर, किशोर भुयार, महेंद्र भुतडा, अजय दातेराव, अभिषेक हजारे, विनोद देशमुख, नाना पानसरे, भोजराज काळे, ऍड.अमित जामथिकर, प्रवीण ईचे, दिनेश देशमुख, भैया पडोळे, विशाल भगत, राजेश बर्वे, संजय मलणकर,दत्तात्रय बागल, विजय मानकर, प्रमोद सांगोले, सचिन दळवी, मनिष पाटील, सागर इंगळे, प्रथमेश बोके, सारंग देशमुख, आदिल शेख, अर्पण सोनी, अनिल कदम, दिग्विजय गायगोले, जयेश सोनोने, शिवम कुंभलकर, कपिल यादगिरे, महेंद्र किल्लेकर, पुरुषोत्तम गावंडे, शुभम पारोदे, संजय कुकरेजा, वासुदेव बागलकर, संजय तायवाडे, प्रशांत पेठे, अनंत पारिसे, सतीश चरपे, संजय यादव, चंदू चांदोरे, अतुल गवई, नितीन खंडारकर, राहुल पांचाळे, अनिल शिरभाते, रमेशराव मातकर, अमोल वानखडे, संकेत बोके, अभिषेक बोळे, अक्षय पळसकर, अभिषेक धुरजड, संदीप औसिकर, प्रताप देशमुख, किशोर भुयार, श्रीकांत झंवर, किशोर देशमुख, सचिन रहाटे, दिलीप कडू, अजय उर्फ राणा देशमुख, राहुल इंगळे, रत्नदीप बागडे,समीर कडवे, मुकीनदा उकिनकर, महेंद्र सोमवंशी, साहेबराव महल्ले, सुयोग तायडे, शैलेश अमृते, राजेश टाके, आकाश वडणेरकर, सचिन अवजेकर, पंकज गोबरे, सौरभ देशमुख, रणजित कालबांडे, प्रवीण कदम, दिनेश मेश्राम, कर्नलसिंग राहल, राहुल पाटील, निलेश साबळे, पवन आसोपा, छोटू खंडारे, अशोकराव कवितकर,सतीश राऊत, हरिभाऊ डोंगरे ,बादल काळे, गौरव काशीकर, राजेंद्र खडसे, प्रजवल कचरे, सतीश गुलहाने, सनाउल्ला खान ठेकेदार, सादिक भाई कुरेशी, हबीब खान ठेकेदार, शकुर बेग ,सैयद साबीर, बबलू अमापायर, अबरार मोहम्मद साबीर, बाबाभाई ठेकेदार, शेख रेहान, अफसर बेग, नूरखा साब ,कदिर कुरेशी, अब्दुल सत्तार राराणी, युनूस खान , सादिक भाई आयडिया, डॉ. आबीद, यासीन राराणी, सैयद साबीर, जाहिरोद्दीन, सैयद जमादीश भाई, शफीउद्दीन, अक्रम अली ,फारुखभाई मंडपवाले, दिलबर शाह, अहमद भाई, नदीम मुल्ला सर, मोईन खान आदीसह अन्य कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
न्यूज रिपोर्टर उषा पानसरे असदपूर

वाडेगाव येथे अपघात:- एक गंभीर

0

 

बाळापुर पातुर महामार्गावरील वाडेगाव पोलीस चौकी समोर छोटा हत्तीने एकास धडक दिल्याने ४५ वर्षीय नागरिक गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान घडली

बाळापुर पातुर महामार्गावरील वाडेगाव पोलीस चौकी समोर एम पी १३ एच १२५९ क्रमांकाच्या ट्रकने एम एच ३० बि डी ४८३० क्रमांकाच्या छोट्या हत्तीला धडक दिली त्या छोट्या हत्तीने रस्त्याच्या कडेला बसलेल्या कन्हैया तोताराम परसैया वय ४५ वर्ष यांना धडक दिली या अपघातात कन्हैया परसैया हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक पवार, पोलीस काॅस्टेबल गणेश गावंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजुला करून वाहतूक सुरळीत केली.