Home Blog Page 307

आझाद हिंद संघटनेच्या आंदोलनाला यश, अखेर करोडो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी विजय गव्हाड सह चार आरोपींना नांदुरा पोलिसांनी अखेर केले जेरबंद,!,

0

 

आरोपींना तीन दिवसांचा पी, सी, आर,
फसवणूक झालेल्यांनी समोर यावे.. शेख सईद, विदर्भ संपर्कप्रमुख आझाद हिंद शेतकरी संघटना.

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सीमा तायडे,व निर्मला पाटील यांनी दिनाक, 21/12/2021 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय बुलडाणा येथे उपोषण केले होते, त्यावेळी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड,सतीशचंद्र रोठे, विदर्भ संपर्क प्रमुख शेख सईद,शेख कदिर, जिल्हा उपाध्यक्ष सौ वर्षाताई ताठरकर, यांनाही तक्रार निवेदनाच्या देन्यात आले होते. सदर विनंती निवेदनावरून आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन पाठपुरावा केला. त्यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, वडनेर भोलजी येथील विजय गव्हाळ याने युवा शक्ती जागरण मंच,यासह विविध बनावट नावांनी जिल्हाभर महिला गटांची स्थापना केली. सदर गटातील महिलांना रोजगार व साहित्य मिळवून देण्याचे आश्वासन दिले, या आमिषाला बळी पडत जिल्ह्यातील लाखो महिलांनी करोडो रुपये जमा केले होते, परंतु रोजगार आणि वस्तू, साहित्य मिळाले नसल्याने फसवणूक केल्या प्रकरणी फसवणूक झालेल्या महिलांना सोबत घेऊन आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर, मोताळा, नांदुरा,शेगाव, अशा विविध पोलीस स्टेशनला विजय गव्हाळ विरोधात रीतसर एफ आय आर नोंदविन्यात आल्या. आझाद हिंद शेतकरी संघटना व आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने जिल्हाभर उपोषण आंदोलन करण्यात आले. गृह मंत्रालय पर्यंत सदर आंदोलनाची दखल घेण्यात आली त्यानुसार उच्चस्तरीय पोलिस यंत्रणा कार्यान्वित झाली.

तर जिल्ह्यात सर्वप्रथम नांदुरा पोलिस स्टेशन येथे फिर्यादी संकेत सोपान संभरे यांनी दिलेल्या तक्रारी नुसार नांदुरा पोलिसांनी आरोपी विजय गव्हाळ,शरद इंडोले,योगेश करंकर,शिवशंकर धूसर, व अधिक एक अश्या पाच आरोपी विरुद्ध अप,क,619/2020 नुसार कलम 420/ 468//34 भा,द,वी, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले, विजय गव्हाळ गेल्या दीड वर्षांपासून फरार होता हायकोर्टाने बेल नाकारली होती. विजय गव्हाळला जेरबंद करण्यात अखेर प्रथमता नांदुरा पोलिसांना यश प्राप्त झाले.
नांदुरा न्यायालयासमोर हजर केले असता विजय गव्हाळ ला न्यायालयाने 18/4/2022 ते 20/4/2022 पर्यंत तीन दिवसाचा पि,सी,आर, देण्यात आला. सदर गुन्ह्यात जिल्ह्यात व जिल्हा बाहेरही फसवणूक झालेल्या फिर्यादींची तर सदर गुन्ह्यात समाविष्ट असलेल्या सहभागीदार आरोपींची संख्याही वाढू शकते. करोडो रुपयांचे घबाळ समोर येन्याची दाट शक्यता पोलीस प्रशासनाने वर्तवली आहे.पुढील तपास नांदुरा पोलिस स्टेशन चे ठाणेदार भूषण गावंडे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पी,डी,मानकर,तडवी,गायकवाड,राजपूत, निंबोलकर, वेरुळकर,हे करीत आहेत.

लाखो महिलांकडून प्रत्येकी अकराशे, दोन हजार,पाच हजार, तर काही ठिकाणी 50 हजार ,दोन लाख, पाच लाख अशीही रक्कम विविध वस्तू आणि योजनांच्या नावाखाली गंडवल्याचे आलेल्या तक्रारी घेऊन सिद्ध होत आहे. तर यामध्ये विविध कंपन्यांचे बनावट दस्त बनवून त्यावरही लुबाडणूक झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यानुसार तपासात आयपीसी कलम 467 सह विविध गंभीर गुन्हे आनखी दाखल होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील फसवणूक झालेल्या सर्व नागरिकांनी समोर येण्याचे आवाहन आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ संपर्कप्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी केले आहे.

पत्रकारावर भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगणघाट तालुका पत्रकार संघा कडून निवेदन

0

 

दि 20 एप्रिल

हिंगणघाट :- मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्फत:उपविभागीय अधिकारी हिंगणघाट
वर्धा जिल्हा हा पत्रकारितेच्या क्षेत्रात ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला जिल्हा आहे. दिनांक १८ एप्रिल २०२२ रोजी वर्धा नागपूर मार्गावर उड्डाण पुलाजवळ पत्रकार रविंद्रजी कोटम्बकर यांच्यावर रात्री दरम्यान हल्ला झाला असल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारचा हल्ला म्हणजे पत्रकारितेवर झालेला सर्वात मोठा आघात आहे.
आपल्या वर्तमान पत्रातून सतत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न पत्रकार सतत आपल्या लेखनीमधून करीत असतात. परंतु अशा प्रकारचे हल्ले करून पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून होताना दिसून येत आहे. हिंगणघाट शहरातील सर्व वृत्तपत्र प्रतिनिधी तसेच पत्रकार या घटनेचा निषेध करीत आहेत.
या दुर्दवी घटनेत झालेला प्रकार गंभीर आहे. पत्रकार संरक्षण कायद्यानुसार पत्रकार बांधवांना मिळत असलेले कवच सैल होऊ नये यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.
निवेदन देताना ज्येष्ठ पत्रकार रमेशजी लोंढेकर, अनिल कडू, इकबाल पहेलवान, सचिन वाघे कदीर बक्ष, शेख अब्दुलअमीन, शेख जावेद, प्रमोद जुमडे, सुधाकर बोरकर,मोहसीन खान, आकाश बोरीकर, गुरु मुखसिंग बावरा, जितेंद्र शेजवल निखिल ठाकरे, जाकीर भाई , अमोल झाडे, सचिन महाजन होते.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

आरटीओचा देवरी चेकपोस्ट ठरला लुबाडणुकीचा अड्डा, परिवहन मंत्री लक्ष देतील का?

0

 

शासन गरीब तर अधिकारी गब्बर होत आहेत. त्यामुळे आता या विषयाकडे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) लक्ष देतील काय, हाच प्रश्न वाहन चालक विचारत आहेत.
आरटीओचा देवरी चेकपोस्ट ठरला लुबाडणुकीचा अड्डा, परिवहन मंत्री लक्ष देतील का?

 

देवरी : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या गोंदिया (Gondia) जिल्ह्यातील देवरी(सीरपुर बाधं) आरटीओचा चेक पोस्ट येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांच्या आर्थिक लुबाडणुकीचा अड्डा बनला आहे. येथील अधिकाऱ्यांना मेवा दिल्याशिवाय साधा ट्रकसुद्धा या चेक पोस्ट वरून पास होऊ शकत नाही. त्यासाठी येथे चक्क पंटरांची फौज कार्यान्वित झाली आहे. अधिकाऱ्यांच्या या खाऊ वृत्तीमुळे शासनाचा दररोज कोट्यवधींचा महसूल बुडत असून शासन गरीब तर अधिकारी गब्बर होत आहेत. त्यामुळे आता या विषयाकडे परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) लक्ष देतील काय, हाच प्रश्न वाहन चालक विचारत आहेत.

आरटीओच्या (RTO) या चेक पोस्टवर नेमकं चालतं तरी काय, ते जाणून घेऊ या. कोट्यवधी रुपयांचा महसूल लुटणारे परिवहन विभागाचे चेक पोस्ट गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथील आहे. हा चेक पोस्ट मुंबई- कोलकाता जाण्यासाठी महत्वाच्या मार्गावर असल्याने दररोज लाखोंच्या संख्येने वाहने या मार्गावरून वाहने जातात. मात्र महाराष्ट्रात (Maharashtra) प्रवेश करायचा असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जायचे असेल तर तुम्हाला आर्थिक मेवा दिल्याशिवाय जाता अथवा येता येत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, तुमच्या वाहनाचे सर्व कागदपत्र बरोबर असले तरी तुमचे वाहन का थांबविले गेले. तर तुम्ही जो पर्यंत परिवहन अधिकाऱ्यांना 50 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत चिरीमिरी देत नाही, तो पर्यंत तुमचे वाहन पास होणार नाही.
तुमच्यावर कायद्याचा धाक दाखवून काहीतरी कारवाई केली जाणार, हे मात्र निश्चित. यासाठी येथे एक-दोन नव्हे तर पंटरांची अख्खी फौज कार्यान्वित केली गेली आहे. त्यामुळेच चेक पोस्ट सर्व नियमांची पूर्तता केल्यावरही ही अधिकाऱ्यांच्या बनावटी चेक पोस्ट वर पैशाची देन दिल्यानंतर तुमचे वाहन पास होते, असा आरोप येथील ट्रक चालक करतात. त्यामुळे चेक पोस्टवर अवजड वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. यासाठी प्रशासकीय इमारतीत चक्क एका खिडकीतून अवैध वसुलीचा पैसा घेतला जात असल्याच्या आरोप येथून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांनी केला.
विशेष म्हणजे या मार्गाने नियमित वाहतूक करणाऱ्या वाहनांना एक खास टोकनस्वरूपी पास दिल्याची धक्कादायक माहिती वाहन चालक देत आहेत. याबाबतचे चित्रीकरण सुरू असताना अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली आणि ज्या खिडकीतून अवैध वसुली सुरू होती, ती ‘एक खिडकी योजना’ कॅमेरा दिसताच बंद करण्यात आली. शिवाय वाहन चालकांना कुठलेही पैसे न घेता सोडून देण्यात आले. हा प्रकार दररोज सुरू असून वाहन चालकांना आर्थिक भुर्दंड द्यावा लागत आहे. त्यामुळे शासनाने ही अवैध वसुली बंद करावी, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

आधीच इंधन महाग झाल्याने महागाईची मार ट्रक चालकांवर पडत आहे. दुसरीकडे परिवहन अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या अवैध वसुलीमुळे ट्रकचालकसुद्धा त्रासले आहेत. त्यामुळे या चेक पोस्टवरची आर्थिक लुबाडणूक थांबविण्याची मागणी येथील वाहन चालक करीत आहे. अधिकाऱ्यांच्या अवैध वसुलीचे केंद्र ठरलेल्या या ‘एक खिडकी योजने’ची चौकशी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब करतील का, हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे.

हिंगोणा येथे समाज मंदीर रिकामे करण्याच्या कारणा वरून एका वर प्राणघातक हल्ला पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्त्रातील हिंगोणा येथील समाज मंदीर रिकामे करण्याच्या कारणावरून आठ जणांनी महिला व तिच्या मुलीला अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली तर महिलेच्या दिरावर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी १७ एप्रिल रोजी सायंकाळी घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीसात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, सुनिताबाई किरण भालेराव (वय-४२) रा. हिंगोणा ता. यावल ह्या पती, मुलगी आणि मुलासह वास्तव्याला आहे. त्यांच्या घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांनी घराचा सामान गावातील जुने समाज मंदीरात समाजाच्या परवानगीने गेल्या चार महिन्यांपासून राहत आहे. रविवार १७ एप्रिल रोजी सकाळी विवाहितेचे पती बाहेरगावी कामासाठी गेले होते त्यावेळी घरात विवाहिता व तिचे दोन्ही मुले घरी होते. सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास गावातील काही तरूणांनी येवून म्हणाले की, तुम्ही राहत असलेले समाज मंदीर खाली करा तिथे बाबासाहेबांची मुर्ती ठेवायची आहे असे सांगितले. त्यावर विवाहितेने उद्या सकाळी १० वाजता आम्ही आमचे घराचे सामान काढून मंदीर खाली करतो असे सांगितल्याने तरूण तिथून निघून गेले. दरम्यान सायंकाळी ७ वाजता गावातील समाजाचे चेतन वसंत तायडे, अनिकेत वसंत तायडे, आकाश विनोद तायडे, अजय विनोद तायडे, सुर्यभान भागवत तायडे, सुनिता वसंत तायडे, प्रविण चरण तायउे आणि प्रशांत भागवत तायडे सर्व रा. हिंगोणा ता. यावल हे एकत्र येवून समाज मंदीर आत्ताच्या आत्ता खाली करा असे बोलून शिवीगाळ केली. विवाहितेन समजविण्याचा प्रयत्न केला असता सर्वांनी अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली व संसारोपयोगी वस्तू बाहेर फेकून नुकसान केले. त्यावेळी विवाहितेची मुलगी भांडण सोडविण्यासाठी मध्ये आल्याने तिला देखील शिवीगाळ करून मारहाण करून गैरवर्तन केले. दरम्यान विवाहितेचा दीर रणजित रमेश भालेराव हे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांच्यावर चेतन तायडे, अनिकेत तायडे, सुर्यभान तायडे आणि प्रविण तायडे यांनी हातातील चाकूने कपाळावर, हातापायावर वार करून गंभीर जखमी केले. गावातील काही नागरीकांनी येवून भांडणातून सोडवासोडव केली. जखमी झालेले रणजित भालेराव यांनी यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. विवाहिता सुनिता भालेराव यांनी यावल पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी चेतन वसंत तायडे, अनिकेत वसंत तायडे, आकाश विनोद तायडे, अजय विनोद तायडे, सुर्यभान भागवत तायडे, सुनिता वसंत तायडे, प्रविण चरण तायउे आणि प्रशांत भागवत तायडे सर्व रा. हिंगोणा ता. यावल यांच्या विरोधात फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेश बऱ्हाटे करीत आहे.

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील ४५ वर्षीय महिलेने राहत्या घरात साडीने गळफास घेऊन आत्महत्या

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी )विकी वानखेडे

यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील . याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुमनबाई विलास भालेराव (४५) असे मयत महिलेचे नाव आहे.

 

घरात कोणी नसताना आत्महत्या सुमनबाई विलास भालेराव (४५, डांभुर्णी ता.यावल) या आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. रविवार, १७ एप्रिल रोजी सुमनबाई भालेराव यांनी घरात कोणी नसताना दुपारी पंख्याच्या दांड्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान नातेवाईक हे घरी आल्यानंतर त्यांना सुमनाबाई यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आले. त्यांना तातडीने खाजगी वाहनाने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्यांना मयत घोषित केले. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सहायक फौजदार अजिज शेख करीत आहे.

सांगवी खुर्द येथे किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ फ्रीस्टाईल हाणामारी पोलीसात परस्पर गुन्हे दाखल

0

 

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील सांगवी खुर्द येथे किरकोळ कारणावरून दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात परस्परविरोधात १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या घटनेत पहिल्या फिर्यादीत सुनिल रामदास कोळी (वय-४८) रा. सांगवी खुर्द ता. यावल यांनी म्हटले आहे की, त्यांचा मुलगा लखन कोळी हा १५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मुंजोबाच्या कार्यक्रम सांगण्यासाठी जात असतांना गल्लीतील जुन्या भांडणात मारहाण केल्याच्या कारणावरून संजय वसंत धनगर यांच्यासह आठ जणांनी लखन कोळी याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शनिवार १६ एप्रिल रोजी रात्री सुनिल कोळी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शुभम प्रमोद धनगर, निलेश संजय धनगर, संदीप संजय धनगर, गणेश मधुकर धनगर, संजय वसंत धनगर, कैलास वसंत धनगर, प्रमोद वसंत धनगर आणि बबलु कैलास धनगर सर्व रा. सांगवी खुर्द ता. यावल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या गटातील संजय वसंत धनगर (वय-५५) रा. सांगवी खुर्द ता.यावल यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवार १५ एप्रिल रोजी त्यांचा भाचा गणेश मधुकर ठोके याला शिवीगाळ करत असल्याचा जाब विचारला. याचा राग आल्याने लखन सुनिल कोळी, सुनिल रामदास कोळी यांच्यासह इतर १० जणांनी लाठ्या काठ्यांनी गणेश ठोके आणि संजय धनगर यांना बेदम मारहाण केली. याप्रकरणी संजय धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी लखन सुनिल कोळी, सुनिल रामदास कोळी, सागर सुनिल कोळी, चंद्रकांत दिलीप कोळी, दिलीप पितांबर कोळी, ताराचंद दिलीप कोळी, भागवत दिनकर कोळी, रविंद्र पोपट कोळी, विकास गणेश कोळी आणि महेंद्र भगवान कोळी सर्व रा. सांगवी ता. यावल यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक संदीप सुर्यवंशी करीत आहे.

अंबाबारवा अभयारण्ण्यातील सालवन बिट मध्ये आग व सालई गोंद प्रकरणी दोन आरोपी अटक

0

 

संग्रामपूर/-मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजीव विभाग अंतर्गत येणाऱ्या वन अभयारण्य मध्ये दिनांक 3 व 4 एप्रिल रोजी अज्ञात इसमांनी अवैधरीत्या आग लावली होती . सदर आगीमध्ये वान परीक्षेत्रात प . तलई बिट मधील वनखंड क्र . 1249 , 1248 , 1239 एकुण 163 हेक्टर क्षेत्र जळाले तसेच सोनाळा परीक्षेत्रातील सालवन सर्वे नंबर 44,45 मधील एकुण 153 हेक्टर क्षेत्र जळाले होते . त्याअनुषंगाने त्या बाबत वनगुन्हा क्र . अन्वये भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 26 ( 1 ) ब , वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 27,29,30,51 ( I – C ) अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला होता .

वन विभागाला गुप्त माहीती नुसार प्रकरणातील संक्षयीत इसम नामे गंगाराम थानसिंग नरगावे वय 24 वर्ष, 2. रुफानसिंग गुमानसिंग नरगावे वय 38 वर्ष दोन्ही रा . रोहीणखीडकी ता . संग्रामपुर जि . बुलडाणा यास ताब्यात घेवून चौकशी केली असता आरोपींने मेळघाट व्याघ्र प्रकल्प , अंबाबारवा व वान अभयारण्यात अवैधरीत्या गोंद गोळा करण्याच्या उद्देशाने ने सालई झाडांना करवे करुन आग लावण्याबाबत कबुली दिली आहे . त्यांनी दिलेल्या कबुली जबाबावरुन त्यांना अटक करुन न्यायालय संग्रापुर येथे हजर केले असता न्यायालयाने दिनांक 17 ते 20 एप्रिल पर्यत वनकोठडी सुनावली आहे . सदर प्रकरणी तपासादरम्यान इतर इसमही सदर गुन्हयात सामील असल्याचे निष्पन्नास आले असुन त्या अनुषंगाने पुढील तपास सुरु आहे .

यावल शहरातुन तिन लाख रुपये किमतीची कार अज्ञात चोरटयांनी नेली चोरून पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील शहरातील श्रीकृष्ण नगरातून एकाची ३ लाख २० हजार रूपये किंमतीची तवेरा कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, प्रकाश भास्कर पारधे (वय-४२) रा. श्रीराम नगर, यावल हे खासगी कॉन्ट्रॅक्टर आहे. खासगी काम करून आपल्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करतात. १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता त्यांनी यावल येथील श्रीकृष्ण नगरातील प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना कार्यालयासमोर त्यांची मालकीची (एमएच ०४ ईएफ २६५८) क्रमांकाची तवेरा कार पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ३ लाख २० हजार रूपये किमतीची तवेरा कार चोरून नेल्याचा प्रकार शनिवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आला. त्यांनी परिसरात कारचा शोध घेतला परंतू कार कोठेही आढळून आली नाही. सायंकाळी ५ वाजता यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आयपीएस अधिकारी आतिश कांबळे यांच्या आदेशावरून सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत करीत आहे.

.सुधीरभाऊ मुनगंटीवार हेच माझे जीवनदाते उदररोग ग्रस्त रुग्णाचे मनोगत

0

 

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात मोफत उपचार

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस येथील संतोष विठोबा पोतराजे वय ३५ वर्षे हा रोज मजुरीचे काम करीत होता. परंतु जुनाट जठरांत्र मार्गाच्या रोगाने तो त्रस्त झाला, त्यामुळे त्याचा उदरात असह्य दुखणे सुरु झाले. तो खाजगी रुग्णालयात गेला असता त्याला डॉक्टरने शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले. जवळपास 4 लाख 50 हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी लागत असल्याने त्याचे कुटुंब आर्थिक विवंनचनेत सापडले. गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना मदतीसाठी भटकावे लागले. त्यांच्या नातेवाईकांनी संतोष पोतराजे यांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट करून दिली, त्यांनी आपली समस्या दादांना सांगितली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून सर्वतोपरी मदत मिळणार अशी ग्वाही दिली. दुसऱ्याच दिवशी संतोष पोतराजे यांना शस्त्रक्रियेसाठी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तिथे भर्ती करण्यात आले व जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. संतोष पोतराजे यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर ते घरी परतले.घरी परतल्यानंतर स्वस्थ झाल्यावर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रास सहपरिवार भेट दिली व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली. मोफत उपचारासाठी मदत केल्याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे आभार मानले. याप्रसंगी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरण बोढे, संतोष पोतराजे त्यांच्या पत्नी व नातेवाईक उपस्थित होते.

हिंगणघाट शहरातील पाणीटंचाई पाहता येथील वना नदी वरील अपुरा बंधारा पूर्ण करा- माजी आमदार प्रा.राजु तिमांडे

0

 

हिंगणघाट:- १८ एप्रिल २०२२
महाराष्ट्र सुजल अभियाना अंतर्गत हिंगणघाट येथील वणा बांध-यावर के.टी.वेअर बांधणे, इंस्पेक्शन चेंबर बांधणे, ११00 मि.मि. व्यासाची कनेक्टींग मेन टाकणे,पुरामुळे नदीची माती थड वाहून गेल्याने निर्माण झालेली गॅप बुजविण्याकरीता रिटेलींग भिंत व स्टोन पिचींगच्या कामासाठी सुधारीत अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान करण्याबाबत तसेच अमृत योजने अंतर्गत निर्माण केलेल नविन ११ जलकुंभाला पाणी पुरवठा करण्यासाठी जुण्याच बंधा-यला नव्याने सुधारणा करून मंजुरी प्रदान करण्याबाबत माजी आमदार प्रा.राजु तिमांडे यांनी हिंगणघाट शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार, पाणीपुरवठा मंत्री शंकर गडाख, प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग व नगर विकास मंत्रालय मुंबई यांना उपविभागीय अधिकारी मार्फत निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
शासन निर्णय पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग सुनिअ २00१ प्र.क.५६ पापु २२ दि .१० जुलै २00१ व शासन निर्णय नगर विकास विभाग क. संकीर्ण२00८/१३३८/प्र.क. १७१/०८/ 0नवि-२० दि.मार्च २00१ .उपरोक्त संदर्भिय शासन निर्णय १ व २ विषयांकीत बंधारा बांधकामास शासनाची मंजुरी प्राप्त झाली असुन त्यानुसार नगर परिषदेने बंधारा कामाची कार्यवाही केली असुन बंधारा बांधकामामध्ये काही बाबीमध्ये वाढ झाल्याने बंधा-यांच्या किंमतीमध्ये वाढ झालेली आहे.
प्रकरणांत नगर पालिकेने कार्यालयीन पत्र क.नपाहि/मुअ/कावि-५२०/२०१६ दि.१५ .०१.२०१३ अन्वये मा. प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्ता विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडे अहवाल सादर केलेला आहे. बंधा-याच्या बांधकामाची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करण्याच्या दृष्टीने नगर परिषदेने मुख्य अभियंता, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार सेवा, पुणे यांना विनंती केली असता संदर्भिय पत्र क.३ अन्वये सदर तपासणी अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवण प्राधिकरण (गुणवत्ता परीक्षक पथक) यांनी संदर्भिय पत्र क. ४ अन्वये सदर तपासणी मुख्य अभियंता, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ पाटबंधारे विभाग,अमरावती यांचे
कडून.
त्यानुसार सदर प्रस्ताव तपासणी करता अमरावती येथे सादर केला असता त्यांचे विभागाकडून सदर कामाचे क्षेत्र वर्धा जिल्हा अंतर्गत येत असल्याने नागपुर परिमंडळ पाटबंधारे विभाग यांचेकडे देण्यात यावे असे सुचवले. त्यामुळे सदर प्रस्ताव संबंधित विभागाकडे नागपुर येथे प्रत्यक्ष देण्यात आला.परंतु संबंधित विभागाकडून सुध्दा कामाची तपासणी हया विभागाकडून करण्यात येणार नसल्याचे सांगीतले.
सदर प्रकरणी संबंधित सर्व अधिका-यासह मंत्रालयामध्ये बैठक लावून बंधारा बांधकामासंबंधी प्रकरण मार्गी लावण्यात यावे तसेच हिंगणघाट शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजने अंतर्गत ११ जलकुंभ बांधले असुन जुण्याच बंधा-याला नव्याने सुधारणा करून मंजुरी प्रदान करण्यात यावी.अशी मागणी माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी हिंगणघाट शहरातील पाणीटंचाई लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,पाणीपुरवठा मंत्री शंकर गडाख,प्रधान सचिव पाणी पुरवठा विभाग व नगर विकास मंत्रालय मुंबई यांना केली आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा