Home Blog Page 311

नगरपरिषद महिला सफाईकर्मीना बॅटरी रिक्षा ट्रॉली द्या : राजूरेड्डी

0

 

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

घुग्घुस : घुग्घुस नगरपरिषदेच्या वतीने महिला सफाईकर्मी हे तीन चाकी रिक्षाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे कार्य करीत असतात
मात्र त्यांना देण्यात आलेले रिक्षे हे आता खराब झाले असून शहरात प्रचंड प्रमाणात उन्हाचा तडाखा वाढला असून या भीषण उन्हात तीन चाकी रिक्षा ओढणे हे अत्यंत त्रासदायक असून हे महिला शक्तीचे छळ करण्यासारखे असून मानवीय दृष्टी कोनातून बॅटरीवर चालणारी रिक्षा उपलब्ध करून देण्याची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष राजूरेड्डी यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सौ.अर्शिया जुही यांना दिले आहे.

मुख्याधिकारी यांनी दिलेल्या इमारत जमीन धस्त आदेशावर प्रश्नचिन्ह

0

 

हिंगणघाट दि.७ एप्रिल
शहरातील कारंजा चौकस्थित चोथानी परिवाराचे वीआईपी सायकल या दुकानाची इमारत मध्यरात्री जमीनदोस्त करण्यात आल्याचे घटनेने शहरात सर्वत्र खळबळ माजली आहे.
काल मध्यरात्री आपल्या सायकल दुकानावरती काही मंडळी बुलडोजर तथा जेसीबी चालवीत असल्याची माहिती मिळताच चोथानी हे पोलिस व प्रशासनाकड़े मदतीसाठी धावले,परंतु हे दिवाणी न्यायालयाचे प्रकरण आहे,असे सांगून त्यांना मदत नाकारण्यात आली.

चोथानी हे गेल्या ६०-७० वर्षापासून येथे भाड़ेकरू आहेत,त्यांचा सायकलचा मोठा व्यवसाय आहे,काल जेसीबीने केलेल्या अवैध कारवाईत त्यांच्या ४०० सायकली व इतर विक्रीचे लाखो रुपयांचे साहित्य उध्वस्त झाले.
अधिक माहिती घेतली असता,जयेश हरीभाई चंदाराणा रा. तहसील वार्ड व राजेश कोचर, नीरज चोरडिया, राकेश चंदाराणा, डॉ.प्रमोद सिंघवी यांनी गेल्या ४ जानेवारी २०२२ रोजी हेमलता मदनमोहन पुरोहित यांच्याकडून याच घराची खरेदी केली.
चंदाराणा व इतर हे शहरातील मोठे व्यावसायिक आहेत,वादातील मोक्क्याच्या जागा कमी किमतीत घेऊन त्यातून मोठा नफा मिळवायचा यात त्यांचा हथखंडा आहे.
या व्यावसायिकांनी लगेच दि. २१ मार्च २२ रोजी (जयेश चंदाराणा, राकेश चंदाराणा ,राजेश कोचर, नीरज चोरडिया डॉ.प्रमोद सिंघवी यांनी) एक अर्ज केला.


यामध्ये जागेच्या मालमत्तेबद्दल वर्णन करीत हिंगणघाट राम मंदिर वार्ड येथील आराजी ४२१.८० चौ.मी.प्लॉट व यावरील मकान नगरपालिका मालमत्ता क्र. ९१ सदर मकान जीर्ण झाले असून १०० ते १५० वर्ष जुनी इमारत आहे .
सदर इमारत नगरपालिकेने पाडावी,अशी विनंती केली . मुख्याधिकारी यांनी सदर अर्जाची अतीशीघ्रतेने दखल घेऊन २२ मार्च रोजीच जयेश चंदाराना व इतर यांना नोटीसद्वारे सदर जीर्ण बांधकाम पाडण्याचा आदेश दिला.
अतीतात्काळ चौकशी करून सदर इमारत फार जुनी असून शिकस्त झालेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे सदर इमारतीच्या तळमजल्यावर पुढील बाजूस श्री हरीश शंभूलाल चौथानी यांचे व्हीआयपी सायकल विक्री व दुरुस्तीचे दुकान आहे,श्री हरीश शंभूलाल चौथानी यांचे वापरामधील इमारतीचा भागात लाकडी फळीची लादली असून झुकलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे आतील बाजूस लोखंडी बिमद्वारे आधार देण्यात आलेले आहे व उत्तरेकडील भिंत जीर्ण अवस्थेत आहे तसेच इमारतीच्या दक्षिणेकडील व उत्तरेकडील प्रथम माळ्याचा कोपरा जीर्ण अवस्थेत आहे व तो भाग कधीही पडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नोटीसीद्वारे सांगण्यात आले, सदर इमारत वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे त्या पासून जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही,करिता आपणावर महाराष्ट्र नगरपरिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १९५ अन्वये नोटीस बजावण्यात येत असून सदर इमारत १५ दिवसाच्या आत पाडून टाकण्यात यावी.असेही सांगण्यात आले.
जयेश चंदाराणा व इतरांनी याच आदेशाचा आधार घेत ही कारवाई केली.


दि. 6 एप्रिल ला चंदाराणा व इतरांनी मुख्यधिकार्‍यांना अर्ज केला आपण दिलेल्या आदेशानुसार जयेश चंदाराना व इतर यांनी सांगितले की आम्ही कारवाई केली त्यामधील काही भाग जमीनधस्त करण्याचा राहिले हा भाग व्हीआयपी सायकल स्टोअर्स संचालक हरीश शंभूलाल चौथ्यानी यांच्या ताब्यात आहे व त्यांनी आपल्या आदेशाची अवहेलना केली . त्यामुळे आमची आपणास विनंती आहे की आपण स्वतः चौकशी करून कारवाई करावी व येणारा खर्च आम्ही भरण्यास तयार आहो, व ही कारवाई अतिशीघ्र करावी ज्यामुळे जीवित आणि वित्त आणि होणार नाही ही जबाबदारी आमची नाही त्यामुळे कृपया ही कारवाई ताबडतोब करावी असे मुख्याधिकारी यांना निवेदनातून विनंती केली .
त्यानुसार लगेच त्याच दिवशी संध्याकाळी ४ ते ५ दरम्यान मोकाचौकशी केली.
यानंतर रात्री ११.३० च्या दरम्यान व्हीआयपी दुकानदारावर बेकायदेशीरपने कारवाई करून जमीनदोस्त केले .
*हिंगणघाट पोलीसांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही*
*मुख्याधिकाऱ्यांनी अतिशीघ्र केलेली कारवाई संशयास्पद*
चोथानी यांचेकडे नगरपालिकेने दिलेले सर्टिफाइड कॉपी आहे.दि.३ जानेवारी रोजिचे हिंगणघाट नगरपालिकेने स्वतः प्रमाणपत्र दिले आहे.
त्यामध्ये इमारतीचे बांधकाम हे १९६० चे दर्शविले आहे. सध्या याला ६२वर्षे झाली आहेत.
मग जयेश चंदाराणा व इतरांनी दिलेल्या माहितीवर मुख्याधिकारी यांनी विश्वास कसा केला ?
डॉ. प्रमोद सिंघवी व जयेश चंदाराणा यांची मुख्याधिकारी यांच्या निवासस्थानी भेट दिल्याची माहिती प्राप्त झाली!अशा अनेक कारणावरून मुख्याधिकारी जगताप यांनी दिलेल्या आदेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे ७ मार्चला लेखी मध्ये तक्रार केली .
प्रकरण न्यायप्रविष्ट असतानासुद्धा. खाजगी व्यक्तींकडून जोर जबरदस्तीने जेसीबी मशीन द्वारे दुकान जमीनधस्त केले दुकानातील ७० ते ८० लाख रूपयांच्या मालाचे नुकसान केले .तसेच प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाचा अवमान करून पाडण्यात आल्याचा आक्षेप चोथानी यांनी घेतला आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

गजानन महाराज संस्थान मध्ये श्रीरामनवमी निमित्त महाप्रसादाचे आयोजन

0

 

शेगाव प्रतिनिधी अर्जुन कराळे

श्री.संत गजानन महाराजांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवा पासुन संतनगरीत श्री.गजानन सेवा समितीच्या माध्यमातून उत्सवा निमित्ताने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते मात्र दोन वर्षापासून कोरोना निर्बंधामुळे ह्या आयोजनात खंड पडला होता,आता शासनाने सर्व निर्बंध हटविल्या मुळे रामनवमी उत्सवापासून महाप्रसादाचे आयोजन पुर्ववत सुरू होत आहे.
श्री गजानन सेवा समिती, शेगाव-नागपूर-अकोट ह्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संतनगरीत शेगाव येथे रामनवमी,प्रगटदिन व ऋषीपंचमी या उत्सवासाठी महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातुन लाखो भक्त पायदळ दिंडी, व वाहनाने श्रींच्या दर्शनासाठी येत असतात या येणाऱ्या भक्तांना समितीचे वतीने दोन दिवस अखंडपणे महाप्रसादाचे सेवाभावातुन वाटप करीत असते, मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे यात खंड पडला होता,आता श्रींच्या आशिर्वादाने सर्व सुरळीत सुरु झाल्याने रामनवमी उत्सवा पासुन दोन दिवशीय महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात येणार आहे
अग्रसेन चौकातील मुरारका जिनात दि. ९ एप्रिल ला सकाळी ८ वा.पासून रामनवमी दि.१० एप्रिलच्या रात्रीपर्यंत अखंड महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी रामनवमी उत्सवासाठी येणाऱ्या दिंड्या, भाविक भक्त व पंचक्रोशीतील दर्शनार्थींनी या महाप्रसादाचा लाभ घेवुन सेवेची संधी द्यावी असे आवाहन श्री गजानन सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे

नांदगाव बोरगाव येथील झोपडपट्टीवासी यांची पाण्याची समस्या एका महिन्यात सुटेल

0

 

पालकमंत्री सुनील केदार यांच्या कडे समस्या सांगितल्यानंतर 5 मार्चला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन ओंबासे यांनी नांदगाव येथे भेट दिली.
चौकशी करून नांदगाव बोरगाव येथील झोपडपट्टी यांची पाण्याची समस्या सोडून एक महिन्याच्या आत येथील झोपडपट्टी रहिवासी यांना पाणी उपलब्ध होईल. असे झोपडपट्टी वासियांना सांगितले .
हिंगणघाट पंचायत समिती गट अधिकारी चौधरी यांनी प्रशासकीय कामाची पूर्तता करून नांदगाव येथील पाण्याच्या टाकीवरून पाण्याची पाईप लाईन टाकून झोपडपट्टी वस्ती मध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. सूर्या मराठी न्यूज कडून बोरगाव नांदगाव झोपडपट्टीवासी यांची पाण्याची समस्या ला वाचा फोडली, पाठपुरावा केला त्याला यश मिळाले.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचा स्थापना दिवस साजरा

0

 

त्याग, तपस्या व समर्पना मुळे भाजपा मोठा पक्ष- देवराव भोंगळे

मुस्लिम बांधवाचा पक्ष प्रवेश

(चंद्रपूर घुग्घुस)प्रतिनिधी
रमेश सुध्दाला

भारतीय जनता पार्टीचा 42 वा स्थापना दिवस बुधवार 6 एप्रिलला घुग्घुस येथील मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण आटोपल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीव्ही वर प्रसारित होणारे संबोधन ऐकण्यात आले.
भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मुस्लिम समाजाचे मोहसीन अली सलमानी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश घेतला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे भाजपात स्वागत केले.
याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली व मोठा पक्ष तयार केला. त्याग, तपस्या व समर्पण यामुळे 42 वर्षामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहचला आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती कडे वाटचाल सुरु आहे, त्यांनी राबवलेल्या जनकल्याणकारी योजनांमुळे गोर गरीब जनतेचे भले होत आहे. सर्व कार्यकर्ता, पदाधिकारी व जनतेला भाजपाच्या स्थापना दिनाची शुभेच्छा देतो.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, भाजपा वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, सुचिता लुटे, साजन गोहने, भाजपाचे बबलू सातपुते, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, मा.आ.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपाचा स्थापना दिवस साजरा
भारतीय जनता पार्टीचा 42 वा स्थापना दिवस बुधवार 6 एप्रिलला घुग्घुस येथील मा. आ. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण आटोपल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टीव्ही वर प्रसारित होणारे संबोधन ऐकण्यात. तसेच भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त मुस्लिम समाजाचे मोहसीन अली सलमानी यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपात प्रवेश घेतला भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भाजपाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे भाजपात स्वागत केले.
याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली व मोठा पक्ष तयार केला. त्याग, तपस्या व समर्पण यामुळे 42 वर्षामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यात पक्ष पोहचला आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विलक्षण प्रगती करत आहे. त्यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे देशाच्या गोरगरीब जनतेचे भले होत आहे. विकासाच्या नवीन योजना जनतेपर्यंत पोहचत आहेत. कार्यकर्ता, पदाधिकारी व जनतेला भाजपाच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा देतो.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी सरपंच संतोष नुने, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, सुचिता लुटे, साजन गोहने, भाजपाचे विनोद चौधरी, बबलू सातपुते, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मधुकर मालेकर, नीलकंठ नांदे, जनार्दन देवतळे, विठोबा बोबडे, बालाजी धोबे,बबन कोयाडवार, इसरार अहमद सिद्दीकी, निरंजन डंभारे, हनीफ शेख, भारत साळवे, शरद गेडाम, राजेश मोरपाका, प्रवीण सोदारी, आरवट सरपंच सुलभा भोंगळे, देवाडा सरपंच उमा लोनगाडगे, भाऊराव ताकसांडे, दिलीप ठाकरे, शंकर रामिलवार, राजेंद्र लुटे, सुशील डांगे, पांडूरंग थेरे, स्वप्नील इंगोले, रंजित पाठक, विवेक तिवारी, आनंद उईके, मंगल वैरागडे, शारदा नलभोगा, धनराज पारखी, नारायण बावणे, विनोद जंजर्ला, सिनू कोत्तूर, प्रज्ज्वल अंड्रस्कर, मोसीम अली, अंकित करकडे, मार्डा माजी सरपंच सुभाष पिंपळशेंडे,भीमय्या येरला, दिलीप रामटेके, तालुका महामंत्री विजय आग्रे, धानोरा ग्रामपंचायत सदस्य विनोद खेवले, अक्षय किन्नाके, मधुकर कामातवार, भारत टिपले उपस्थित होते.

पाणिप्रश्न पेटला संगितराव भोंगळ यांनी उपसले उपोषणअस्त्र

0

 

पातृर्डा ग्रामस्थांचा पाणीबाणीचा लढा!

पातृर्डा वासियांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या पाणिप्रश्न आता ज्वलंत बनला असुन आज दि.५ एप्रिल पासुन जि.प.चे माजी उपाध्यक्ष संगितराव उपाख्य राजु पाटिल यांनी लोकशाही मार्गाने उषोषणअस्त्र उगारले आहे. या उपोषणाला समस्त ग्रामस्थांचे समर्थन मिळत असल्याने हा “पाणिबाणी” लढा ज्वलंत रुप घेत आहे.
पातृर्डा वासियांच्या भविष्यातील ५० वर्षे मुबलक व शुध्द पाणी मिळावे यासाठी मागिल ५ ते ६ वर्षांपासुन संगितराव भोंगळ यांचे नेतृत्वात व मार्गदर्शनात गावकर्यांचा संघर्ष सुरु होता. अनथ प्रयत्नांनी या पाणीसंघर्षांची फलश्रृती होवुन पातृर्डा गावाकरिता २ कोटी ३१ लाख ८१ हजारांची पाणिपुरवठा योजना मंजुर करण्यात आली. मात्र, अत्यंत जिव्हाळ्याचा हा प्रश्न असतांना संबधित विभागाच्या अधिकार्यांनी उपरोक्त पाणिपुरवठा योजनेची निविदा अडकवून ठेवत गावकर्यांच्या आनंदावर विर्जण टाकले.
याबाबत संबधित विभागाला वारंवार सुचना,विनंती व प्रत्यक्ष चर्चेनंतर सुध्दा हा प्रश्न सुटत नसल्याने अखेर संगितराव भोंगळ यांचे नेतृत्वात उपोषण सुरु केले. पातृर्डा गावाकरिता ग्रामिण पाणिपुरवठा विभागाने जलजिवण मिशन अंतर्गत योजना मंजुर झालेली आहे.
सद्याच्या परिस्थितीत पाणी टाकी व पाईप लाईन ची अवस्था अत्यंत जिर्ण स्वरुपाची असल्याने नव्याने मंजुर झालेल्या योजनेअंतर्गत काम तत्काळ सुरु व्हावे अशी मागणी संगितराव भोंगळ यांची असतांना प्रस्तावित कामाला तांत्रिक मंजुरात असुन देखील सदर कामास म.जि.प्रा ने स्वताःच्या कृती आराखड्यात प्रस्तावित करुन गोंधळ निर्माण करत पाणिपुरवठा योजनेचे काम थांबविले. व उपरोक्त कामाची निविदा अडवुन ठेवली.
परिणामी लोकशाही मार्गाने उपोषण करत असल्याचे संगितराव भोंगळ यांनी माध्यमांना सांगितले.
या प्रश्नासंदर्भात दि.१५ मार्च रोजी गावकर्यांना सभेच्या माध्यमातुन संबोधित करत संगितराव भोंगळ यांनी या योजनेबाबत कशा पध्दतीने संबधित विभाग अडवणुक करत निविदा थांबविल्याने प्रशासनाला जागे करण्यासाठी अखेरीस उपोषणाच्या माध्यमातुन हा पाणीसंघर्ष सुरु ठेवु व जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही अशा ईशारा संबधित विभागाला संगितराव भोंगळ यांनी दिला.
या संदर्भात दि.१७ फेब्रु.रोजी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डाॕ.राजेंद्र शिंगणे पत्राद्वारे संबधित विभागाला सदर कामाची फेर ई निविदा प्रसिध्द करुन काम तत्काळ सुरु करण्याचे स्पष्ट शब्दात निर्देश दिले आहेत.मात्र, संबधित विभागाचे अधिकाऱ्यांनी निविदा सोडणे आवश्यक असतांना दुर्लक्ष करत पातृर्डा वासियांच्या पाणिसंघर्षांची थट्टा चालविली आहे.
त्यामुळे उपरोक्त मंजुर झालेली पाणिपुरवठा योजना संबधित विभागाच्या अधिकार्यांनी त्यांचे स्तरावरुन आदेश देत निविदा सोडत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी. अशा आशयाचे पत्र दि.२९ मार्च रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले होते. उपरोक्त पत्रात ५ एप्रिल पासुन आमरण उपोषण करुन असा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज पासुन आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.

न्याय मिळेपर्यंत माघार नाही-संगितराव भोंगळ

हा नुसता पाणिप्रश्न नाही तर भविष्यातील ५० वर्षांचे गावकर्यांचे भविष्य आहे. मागिल ५ ते ६ वर्षापासुन शासन व प्रशासनाला यांचे गांभिर्य लक्षात आणुन दिले.या संघर्षांची फलश्रृती होवुन २ कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला सर्व काही व्यवस्थित असतांना संबधित विभागाचे अधिकारी निविदा अडवुन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करत नसल्याने आमरण उपोषण करत आहोत असे संगितराव भोंगळ यांनी स्पष्ट केले.
आज गावातील पाण्याची टाकी व पाईपलाईन जिर्ण अवस्थेत असतांना सर्व गावकर्यांना मुबलक स्वरुपात पाणी उपलब्ध होत नाही मात्र, ही योजना कार्यान्वित झाल्यास भविष्यातील ५० वर्षे प्रत्येक कुटुंबाला शुध्द व मुबलक पाणी मिळेल हा माझ्या व ग्रामस्थांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामुळे जो पर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत माघार घेणार नसल्याची रोखठोक भुमिका संगितराव भोंगळ यांनी घेतली आहे

वड्री सोसायटीचे चेअरमन उमाकांत पाटील तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सावळे यांची बिनविरोध निवड

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

 

तालुक्यातील वड्री येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअमरनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची निवड करण्यात आली आहे . वड्री तालुका यावल येथील विविध कार्यकारी सहकारी सहकारी सोसायटीची पंचवार्षीक निवडणुक नुकतीच संपन्न होवुन , यात भाजपा पुरस्कृत जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सौ सविता अतुल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातुन या निवडणुकीत सर्व जागांची बिनविरोध निवड झाली होती . आज दिनांक ४ मार्च रोजी वड्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सभागृहात जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सौ सविता अतुल भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत सोसायटीची चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाच्या निवडी करीता घेण्यात आलेल्या सभेत चेअरमनपदी उमाकांत प्रभाकर पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी रमेश सोना सावळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे . यावेळी या वेळी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडीच्या सभेला नवनिर्वाचित संचालक लिलाधर भगवान चौधरी , व्ही पी चौधरी , प्रमोद चौधरी , पकंज चौधरी , सचिन चौधरी , फत्तु तडवी, लुकमान तडवी, मुबारक तडवी , भागवत भालेराव , रेखा सुनिल पाटील , छाया रविन्द्र पाटील यांच्या सरपंच अजय भागवत भालेराव , अतुल भालेराव आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते . या सभेत निवडणुक निर्णय आधिकारी म्हणुन संदीप शिंदे हे होते तर त्यांना संस्थेचे सचिव सुनिल सुरवाडे व शिपाई शब्बीर तडवी यांनी सहकार्य केले . यावेळी नवनिर्वाचीत चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यासह संचालकांचे सौ . सविता भालेराव यांच्या हस्ते स्वागत सत्कार करण्यात आले उपस्थितांचे आभार सचिव सुनिल सुरवाडे यांनी मानले .

अन्यायग्रस्त पीडित शेतकरी यांच्या सन्मानार्थ एल्गार सेना मैदानात

0

 

ग्राम दाढी पेढी गावातील तलाठी व कोतवाल झालेत तहसीलदार

मागण्या पूर्ण न झाल्यास तहसीलदार भातकुली यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा अल्टिमेट

उषा पानसरे असदपूर
दिनाक 6 एप्रिल
अन्याय ग्रस्त पिडीत शेतकरी यांच्या सन्मानार्थ एल्गार सेना मैदानात दाढी पेढी गावात तलाठी व कोतवाल झालेत तहसिलदार
ग्राम दाढी पेढी येथील पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात तात्काळ पैशाची रक्कम जमा करण्याकरिता दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी तहसीलदार मॅडम भात कुली यांना निवेदन देण्यात आले. त्यामुळे ग्राम दाढी पेढी
ग्रामपंचायत येथील 2021 22 ची नापिकी रक्कम मध्यापर्यंत तलाठी कोतवाल तथा शासनाने नेमलेल्या तुझी मित्र यांच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 108 शेतकऱ्याने नापिकी ची रक्कम मिळण्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. तसेच काही शेतकरी बांधव सगळं संदर्भात विचारपुस करण्याकरता तलाठी कोतवाल व कृषी मित्र यांच्या कडे गेले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन वारंवार शेतकऱ्यांची टिंगल उडविली आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांना तात्काळ न्याय देऊन त्यांना ना पिकाची रक्कम त्यांच्या खात्यात पूर्ण करावी. आणि तलाठी व कोतवाल यांना तत्काळ निलंबित करावे . अन्यथा आपण सदर प्रकरणी कुठल्याही प्रकारची कामचुकारपणा करून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केल्यास सदर प्रकरणी शेतकरी तथा एल्गार सेनेच्या वतीने आपल्या दालनात समक्ष शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा मानस सर्व शेतकरी बांधवांनी करायचा ठरवला आहे. त्यामुळे सदर प्रकरणी कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार तसेच जीवित हानी ला तालुक्याच्या तहसीलदार तथा दंडाधिकारी या नात्याने आपणच जबाबदार रहाल याची आपण दखल घ्यावी . अशी माहिती निवेदनाद्वारे देण्यात आली.

गोळीबाराने पून्हा हादरले नांदेड प्रसिध्द बाधंकाम व्यावसायिक संजय बियाणी याच्यांवर गोळीबार हल्लेखोरानी अनेक गोळ्या झाडल्या

0

 

उषा पानसरे मू.का. संपादीका मो. 9921400542 अमरावती

दिनाक 6 एप्रिल

नादेंड येथिल प्रसिध्द बिल्डंर संजय बियाणी याच्यावर मंगळवार दिनांक 5 एप्रिल ला
सकाळी साडेदहाच्या सूमारास गोळीबार झाला या गोळीबारात संजय बियाणी हे गंभीर जखमी झाले दूचाकी वरून आलेल्या दोघानी बियाणी यांच्यावर गोळीबार केला या गोळीबारात संजय बियाणी याचां सह त्याच्यां वाहन चालकही जखमी झाला बियाणी व त्याचा चालकाला येथिल ग्लोबल हाॅस्पिटलमध्ये हलवण्यात आले संजय बियाणी हे सकाळी घराबाहेर पडताच त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या हल्लेखोरानी गोळीबार केला बियाणी यांच्या घरा समोर रक्ताचा सडाच पडला या घटनेची माहीती मिळताच अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे जिल्हा परिषदेचे सदस्य प्रविण चिखलीकर यांनी रूग्णालयात धाव घेतली हल्लेखोर कोण आहेत याचा कसून शोध पोलीस घेत आहे तसेच काही दिवसा पूर्वीच संजय बियाणी त्याच्या गृह प्रकल्पाचा अत्यंत देखणा असा कार्यक्रम घेण्यात आला होता पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या सह नांदेड शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम लाभवण्यात आला होता संजय बियाणी यांच्यावर हंल्लेखोरानी गोळ्या झाडल्या ही धक्यादायक घटणा सी .सी. टीव्ही फूटेज कैमैर्‍यात कैद दोन हल्लेखोर कैमेरा मधे कैद

गडचिरोली जिल्ह्यातील कवींना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली मार्फत “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” उपक्रमाची दखल.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

गडचिरोली:-जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने दिनांक २७ जानेवारी रोजी मराठी विभागाचा उपक्रम मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने आभासी आँनलाईन कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते.
सदर कवी संमेलनात गडचिरोली जिल्ह्यातील सतरा कवींनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदवीला होता.
त्या निमित्ताने आज दिनांक ५ एप्रिल रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या येथे सहभागी कवींना संस्थेचे प्राचार्य डॉ विनित मत्ते यांचे शुभहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान डायट गडचिरोली येथील मराठी विभागाचे विभाग प्रमुख तथा अधिव्याख्याता वैशाली येगोलपवार,अधिव्याख्याता पुनित मातकर, विषय सहाय्यक डॉ विजय रामटेक, निलकंठ शिंदे,कुणाल कोवे, विठ्ठल होंन्डे, प्रदिप पाटील, समुपदेशक प्रभाकर साखरे व जिल्ह्यातील कवी उपस्थित होते.
प्रसंगी रवींद्र गजानन गेडाम,प्रतीक्षा पितांबर कोडापे,हर्षराज सहारे,मारोती आरेवार,सुजाता अवचाट,चांगदेव सोरते यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मान्यवरांची आप-आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषय सहाय्यक निलकंठ शिंदे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार डॉ विजय रामटेके यांनी व्यक्त केले.