Lonarnews/ छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज एमआयडीसी परिसरात एका २५ वर्षीय तरुणीवर प्रेमाच्या नावे घडलेल्या भयावह घटनेचा उलगडा झाला आहे.
आरोपी आयुब अमीर पठाण (वय २८, लोणार) या तरुणीला ओळख करून घेऊन तिच्यावर जबरदस्तीचे अवैध कृत्य केले. हा प्रकार २०२३ पासून सुरु होऊन २०२५ च्या जानेवारीतही सुरू होता.
आरोपीने तरुणीला अनेक वेळा एका हॉटेलमध्ये आणि पिकअप वाहनात बलात्कार केला. त्याचबरोबर तिला बुरखा घालण्यास आणि गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती केली.
नकार देताच त्याने तिची बदनामी करण्यासाठी तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. तरुणीने ही स्थिती स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितली. पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
तरुणी मोडीत काढण्याचा प्रयत्न करताना आरोपीने तिला शिवीगाळ व धमक्या दिल्याची माहिती मिळाली आहे. २५ जानेवारी २०२५ रोजी तरुणीला पिकअप वाहनात नेत त्याने बलात्कार केले
, तर २६ जानेवारीला तिला आणि तिच्या भावांना जीवेमारण्याची धमकी दिली. या सगळ्या घटनेमुळे वाळूज परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.
ही कारवाई चिखलठाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असून आरोपीविरुद्ध तातडीने कायदेशीर प्रक्रिया केली जात आहे.
Lonarnews :या घटनेने स्थानिक समाजात मोठा सवाल निर्माण केला आहे, विशेषतः लव्ह जिहाद आणि हत्याराच्या नावाखाली होणाऱ्या अत्याचारांवर प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
हिंगणघाट दि.२१ एप्रिल स्थानिक तहसील कार्यालय परिसरात आज सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान झालेल्या अपघातात एका ७४ वर्षीय दिव्यांग महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मृतक महिला शहरातील संजय गांधी शाळेमागील न्यू यशवंतनगर येथील रहिवासी असून सावित्रीबाई राजाबाबू तिवारी अशी तिची ओळख आहे.
दुपारी ही मृतक महिला सायंकाळी ४ वाजताचे दरम्यान ती महिला संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजाकरिता आली होती.
कामकाज आटोपुन ही महिला तहसील कार्यालयाचे आतील मुख्य द्वारासमोरचे परिसरात आली,याच परिसरातून निघालेल्या कार क्रमांक एम एच ३२- एएन ८४४४ ने चिरडून काढले.
परिसरातील उपस्थित काही नागरिकांनी या कार मधील ३ इसमाना दमदाटी करून महिलेला उपचारार्थ दाखल करण्यास सांगितले. कारचालक व इतरांनी सदर महिलेला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व या दरम्यान या तिघांनी तेथून कार क्र. एम एच ३२- एएन ८४४४
सह पळ काढला
अपघातादरम्यान तिचे जवळ असलेल्या आधार कार्डवरती असलेल्या मोबाईल क्रमांकावरून तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली.
मृतक महिलेचे कुटुंबीय स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पोहोचले असता त्या महिलेचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी कळविले.
Brekingnews:सदर प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार देण्यात आली. अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मीकांत दुर्गे, पोलिस कर्मचारी अंगेश्वर चौधरी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
Mahsulnews:समुद्रपूर:- समुद्रपूर तालुक्यातील चिखली (उमरी) येथील कुक्कुटपालनाची परवानगी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी ठाणेदार, तहसीलदार यांनी तात्काळ आंदोलन स्थळी येऊन भेट दिली.
समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखली अतर्गत मौजा उमरी येथे कुकुटपालन (पोल्ट्रीफार्म) असून प्रोडक्शन सुद्धा सुरु आहे. या कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहेत. परिणामी गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. गावातील लहान मुले, वृद्ध व अन्य दुर्गंधी पसरल्याने आजारी पडत आहे.
उमरी येथील प्रदीप मिलमिले यांच्या सहा वर्षीय मुलगा यामुळेच आजारी पडला आहे. दुर्गधी मुळे त्याला श्वास घेणे कठीण झाले. त्यांची रक्त तपासणी केली असता त्यात दोष आढळून आलेत. आजार बळावल्याने या सहा वर्षीय मुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. कुकुटपालनाच्या दुर्गंधी मुळे आजूबाजूचे असलेले शेतकरी शेती सुद्धा करू शकत नाही आहे. यामुळे शेतकर्यांचा उदरनिर्वाचा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण होत आहे. त्यामुळे कुकुटपालनाची तातडीने परवानगी रद्द करण्यात यावी. याकरिता दिनांक ११ मार्च २०२५ ला तहसीलदार यांना निवेदन दिले. यानिवेदनाची प्रशासनाने दखल सुद्धा घेतली नाही किवां गावात जाऊन सुद्धा बघितलं नाही, यानंतर २ एप्रिल २०२५ रोजी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.कुकुटपालन शेड गावाला लागून असल्याने आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गावातील नागरिकांचा आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
यानंतर कुकुटपालनामुळे गावातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास स्थानिक प्रशासन जबाबदार राहील? यानंतर सुद्धा कारवाई न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श.प) व गावातील नागरिक मिळून आक्रमक भूमिका घेऊ यानंतर जे काही प्रतिसाद उमटेल त्याचे सर्वस्वी जबाबदार शासन / प्रशासन राहील असे निवेदन देण्यात आले होते.
आठ दिवसात उपविभागीय अधिकारी यांनी अहवाल सादर करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.तेव्हा प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले व आठ दिवसात कारवाई करून कुकुटपालनाची परवानगी रद्द न केल्यास आक्रमक भूमिका घेऊ असे अतुल वांदिले यांनी सांगितले.
Mahsulnews :-यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वांदिले, शहराध्यक्ष मधुकर कामडी, जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे,दशरथ ठाकरे, दिव्यांग सेलचे प्रदेश संघटक मारोती महाकाळकर,हिंगणघाट शहराध्यक्ष बालू वानखेडे, समाजसेवक सुनील डोंगरे, अमोल बोरकर,गणेश वैरागडे,माजी नगरसेवक राजू भाईमारे, सुनील भुते, श्रीकांत भगत,सुभाष चौधरी, महादेव वांदिले, सुधाकर वाढई,युवक तालुका अध्यक्ष तुषार थूटे, ईश्वर पोफळे (तंटामुक्ती अध्यक्ष), विठ्ठल नन्नावरे(उपसरपंच), अनिल भगत (शिवणी उपसरपंच), हरिभाऊ ढगे वासी उपसरपंच,उमाकांत पोफळे, विजय सालवटकर ग्रा.स, रंजना कानमोडे ग्रा.स, मेघा कुमरे ग्रा.स, सविता उईके ग्रा.स, किशोर डुकरे, प्रभाकर मिलमिले, खुशाल ताजन, परमेश्वर पोफळे, गजानन पोफळे, देवा आमने, वसंतराव चौखे, प्रभाकर भरडे, जीवन नारनवरे,पुरुषोत्तम सालवटकर, संदीप सालवटकर, निलेश डुकरे, बंडू डुकरे, कवडू बावणे, अक्षय चाफले, विजय मुके, वाल्मीक तपासे, डोमा शेंडे, रवींद्र नखाते, गुलाब भगत,अतुल चौधरी, अमोल मुडे, सुनील घोडखादे,गोकुळ टिपले, पंकज भट्ट,रोशन थुटे, सोहम शेंडे, आकाश हुरले, कुणाल गोल्हर यांच्यासह चिखली (उमरी) गावातील शेकडो नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
jayshree tai shelke:-छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याच्या दोन प्रतिष्ठित सुनांचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील करवंड गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे.
या गावात जिजाऊ माँसाहेबांच्या सहाव्या सुनबाई आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी राणी गुणवंताबाई राजे भोसले
तसेच तंजावरचे राजे छत्रपती व्यंकोजी राजे यांच्या पत्नी राणी दीपाताई राजे यांचे स्मारक उभारण्याची मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
करवंड गावाला ऐतिहासिक दृष्टिकोनातून मोठे महत्त्व आहे कारण इथले इंगळे परिवार हे स्वराज्यासाठी समर्पित होते. या गावात पूर्वी ५२ बुरूज होते,
पण सध्या केवळ ३-४ बुरूज उरले आहेत, ज्यामुळे हा वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शिवसेनेच्या ॲड. शेळके यांच्या मते, या गावाचा इतिहास उजळवण्यासाठी आणि जिल्ह्याच्या गौरवात भर घालण्यासाठी या दोन्ही कर्तृत्ववान सुनांचे स्मारक उभारणे आवश्यक आहे.
बावनबुरुजी परिसरात या गावाचे नाव आजही महत्त्वपूर्ण आहे, मात्र प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या या गावाचा ऐतिहासिक कधी लक्षात येत नाही.
jayshree tai shelke:त्यामुळे शासनाने या स्मारकांच्या निर्मितीला प्राधान्य देण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
RanjitKasle:पुणे – निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांच्या आरोपांनी निवडणुकीच्या काळात ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी त्यांना दहा लाख रुपये दिले गेले असल्याचा धक्कादायक दावा केला होता.
मात्र, आता या आरोपांच्या पार्श्वभूमीवर रंजित कासले यांच्या अडचणींमध्ये मोठी भर पडत आहे. त्यांनी ज्या कंपनीचा उल्लेख करून दहा लाख रुपये स्वीकारल्याचा दावा केला होता,
त्या कंपनीच्या संचालकांनी या पैशांचा वापर मुलाच्या फी भरण्यासाठी केला असल्याचे प्रतिपादन पोलिसांपुढे केले आहे. या तक्रारीनंतर कासले यांच्यावर संशयाची छाया अधिक वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यात पत्रकार परिषदेत कासले यांनी त्यांच्या बँक स्टेटमेंटसह ईव्हीएम छेडछाडीपासून दूर राहण्याच्या नावाखाली देण्यात आलेल्या पैशांचा उल्लेख केला होता.
तसेच, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा पण दावा त्यांनी केला होता.
मात्र, वाल्मिक कराडच्या एन्काऊंटर संदर्भातील चर्चाही काळ्या पडद्यामागे झाली असल्याचा आरोप कासले यांनी यापूर्वी केला होता.
त्यानंतर संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनचे संचालक सुदर्शन काळे यांनी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार नोंदवली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, दहा लाख रुपये कासले यांना “उसे” म्हणून, म्हणजे मुलाच्या शिक्षण फी भरण्यासाठी दिले गेले होते.
या संदर्भात त्यांनी पुरावेही सादर केले आहेत. यामुळे कासले यांचा आरोप सध्या विचाराधीन असून त्यांचे वर्तन पोलिस तपासाच्या प्रकाशात आले आहे.
ही माहिती समोर आली आहे की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या दिवशी, 21 नोव्हेंबर रोजी संत बाळूमामा कन्स्ट्रक्शनच्या नावाने कासले यांच्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले होते.
त्यावेळी कासले परळी मतदारसंघातील ईव्हीएमसंबंधी ड्युटीवर होते. त्यांनी ईव्हीएममध्ये छेडछाडी होण्याची शक्यता असल्यामुळे दूर राहण्याचा सल्ला असल्याचे सांगितले होते.
मात्र या सर्व आरोपांवर निवडणूक आयोगाने देखील काही खुलासे केले आहेत आणि कासले यांना त्या वेळी ड्युटीवर नसल्याचे सांगितले आहे.
RanjitKasle/सदर प्रकरणात कासले आणि संबंधित पक्षांमध्ये काय निर्णय होतो, हे पुढील तपासात स्पष्ट होईल; मात्र आतापर्यंतची घडलेली घटनाक्रम त्यांच्या विरोधात अधिक पुरावे समोर येण्याची शक्यता दर्शवते
Hingnghat:हिंगणघाट :- राणी दुर्गावती सभागृहामध्ये रविवार दिनांक 13/04/2025 रोजी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे फॉउंडेशन, चंद्रपूर हया संस्थेमार्फत रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.सदर प्रशिक्षणात एकूण 120 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते वरील प्रशिक्षणात विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
जसे सॅनिटरी पॅड, हर्बल मास्कीटो फाईल, नोट बुक मेकींग, डिटर्जन्ट केक मेकींग, टी पावडर मेकींग, फुटवेअर मॅन्युफॅक्चरींग तसेच कोकोनट आईल तयार करणे.
हया विषयावर मार्ग दर्शन करण्यात हे प्रशिक्षण पुर्णतः मोफत होत. हया कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा वंदना सुर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होत्या तर संस्थेचे प्रशिक्षक अतुल इदाने यांनी विविध विषयावर यथोचित माहीती दिली.
Hingnghat:जिल्हा को आडीनेटर खोब्रागडे मॅडम, वनिता पराते, सविता वाकडे, माधुरी मालेकर या सर्वानी अथक परीश्रम घेतले.
हिंगणघाट : – हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ३२२ खडसंगी ते हिंगणघाट-कानगाव झालेल्या महामार्गाचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असून त्या कामाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी केली सविस्तर चर्चा, दोषींवर कारवाई व्हावी याकरिता अतुल वांदिले यांनी जयंत पाटील यांच्याकडे केली मागणी.
हिंगणघाट शहरातून गेलेला राष्ट्रीय महामार्ग क्र. ३२२ खडसंगी -हिगणघाट- कानगाव महामार्गाचे काम मागील चार वर्षापासून सुरु आहे. ४८ किलोमीटर चा हा महामार्ग असून *२८५.९२ कोटीचा* करारनामा झाला आहे.
खडसंगी -हिगणघाट- कानगाव असा डांबर व सिमेंट कॉन्क्रीट चा रोड निर्माण करण्याचे काम मागील चार वर्षापासून थंड पद्धतीने सुरु आहे. या निर्माण कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असून करोडो रुपयाचा भष्ट्राचार केला जात आहे.
विविध खेड्यापासून तर हिंगणघाट शहरापर्यंत या रस्त्याबाबत वारंवार तक्रारी केल्या जात असताना देखील गुणवत्ता तपासणीसाठी रस्त्यावर एकही अधिकारी आजपर्यंत आलेला नाही. पीडब्ल्यूडी विभागाचे या संपूर्ण प्रकरणाकडे मागील चार वर्षापासून दुर्लक्ष आहे.या हायब्रिड हंम्प महामार्गाचे काम पगारिया कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले.
या कंपनीला रस्त्याच्या कामाचा अनुभव नसताना देखील कोणत्या आधारावर या कामाचा निविदा मंजूर करण्यात आल्या आहेत ? चार वर्षा पूर्वी या महामार्गाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र चार वर्षापासून या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे सुरु असून महामार्गाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहे. रस्त्याच्या बाजूला मुरूम न टाकता माती टाकण्यात आली आहे. तसेच महामार्गाच्या बाजूला नाली आडवी -तिडवी घेण्यात आली आहे.
Brekingnews:या महामार्गाचे काम अत्यंत सुमार दर्जाचे असल्यामुळे आठ महिन्यामध्ये सदर रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यांना पॅचेस लावण्याचे काम करावे लागत आहे. या महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात भष्ट्राचार झाला असून या झालेला कामाची चौकशी करण्यात यावी तसेच येणाऱ्या विधानसभा अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी केली आहे.
Ranjit Kasle:बीड येथील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले याच्या राजकीय आणि व्यावसायिक कारवाया राज्यात खळबळ उडवून दिल्या आहेत.
सध्या संभाजीनगर पोलीस महानिरीक्षकांच्या आदेशानुसार त्याला भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३११(२)(ब) अंतर्गत सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच, बीड पोलिसांनी त्याला पुण्यातील स्वारगेट येथून ताब्यात घेतले आहे.
रणजीत कासलेवर अनेक गंभीर आरोप आहेत. त्याने फेक एन्टाऊंटर, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते,
ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. सुरतच्या एका व्यापाऱ्याची फसवणूक प्रकरणही त्याच्या तपासात असल्याचे समोर आले आहे. या आर्थिक व्यवहारांच्या तपासणी दरम्यान कासलेवर आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.
बीडच्या भगवान कांडेकर यांनी शिवाजीनगर पोलिसांत कासलेविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली.
त्यानंतर १४ एप्रिल रोजी गुन्हा नोंदवण्यात आला, आणि १७ एप्रिल रोजी त्याला अधिकाऱ्यांकडून बडतर्फीची कारवाई करण्यात आली.
कासलेने मागास जातींबाबत वादग्रस्त वक्तव्यही केले असून, यामुळेही त्याच्याविरुद्ध बड्या प्रमाणात आवाज उठले. सध्या तो बीड पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे.
त्याच्या आरोपांची चौकशी करायची की नाही याचा प्रश्न राजकीय व कायद्यानुसार गांभीर्याने विचाराधीन आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणात अशा आरोपांना कितपत विश्वास ठेवावा यावर मत व्यक्त केले आहे.
Ranjit Kasle:रणजीत कासलेच्या कारवायांनी राज्यातील पोलीस व्यवस्थेत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
Ranjit Kasle:नुकत्याच बीड जिल्ह्यात झालेल्या एका निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या नाट्यławाच्या घडामोडींनी राजकीय वातावरणातील हंगामी खळबळ थांबत नाही. रणजीत कासले या निलंबित पोलीस अधिकाऱ्याने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर त्यांच्याविरुद्धची आरोपांची रेलचेल सुरू झाली आहे.
कासले यांच्या आरोपांची धामधूम अशी की परळी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात १० लाख रुपये जमा केल्याचा दावा त्यांनी केला होता.
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात सेवारत होते. त्यांच्यावर आरोप आहे की सायबर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते गुजरातमध्ये गेले आणि तिथे आरोपींकडून रोकडी मिळवली.
या प्रकरणात त्यांना निलंबित करण्यात आले. यानंतर कासले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोपांचा डोंगर उभा केला. परळी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या निवडणुकीत मुंडे यांचे विरोधी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना निवडणुकीत प्रशासनाच्या गैरवापराचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी न्यायालयातून केली जावी, असे त्यांनी म्हटले आहे.
पुण्यातील एका हॉटेलमधून रणजीत कासले यांना बीड पोलीसांनी अटक केली. पोलीसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करत त्यांची पोलीस दलातून हकालपट्टी केली आहे.
मागील काही दिवसांपासून कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडिओज शेअर करत धनंजय मुंडे, मुख्यमंत्री फडणवीस आणि बीड पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले होते.
Ranjit Kasle:अलिकडेच कासले पुणे विमानतळावर उतरले होते, तेव्हा त्यांनी माध्यमांशी बोलताना निवडणुकीतील वाढीव घोटाळ्याचा दावा केला.
Relvenews:हिंगणघाट :- भारतीय रेल्वेच्या गौरवशाली इतिहासाला १७१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे वतीने हिंगणघाट रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
त्यांनी भारतीय रेल्वेच्या समृद्ध परंपरेला उजाळा देत भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागपूर विभागाचे विभागीय वाणिज्य निरीक्षक मंगेश तितीरमारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून हिंगणघाट रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर बसंतकुमार बल, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. किरण वैद्य, नारायण सेवा मित्र परिवाराचे महेश अग्रवाल, आर.पी.एफ. ठाणेदार हरीवंशसिंग,
विनोद पोतदार, युनुस भाई आणि वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे संघटक राजेश अ. कोचर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार रेल्वे लाईन ची पूजा करून झाली. रेल्वे ची लाइन ही केवळ लोखंडाचे रूळ नसून ती भारतीय रेल्वेच्या कार्याचा आणि कोट्यवधी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आधारस्तंभ आहे, ही भावना या पूजेतून व्यक्त करण्यात आली.
यानंतर वर्धा-बल्लारशाह यात्री संघाच्या सदस्यांनी प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन यथोचित स्वागत केले. याप्रसंगी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि रेल्वे सुविधा तसेच गाड्यांच्या थांब्यांसंबंधी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
प्रास्ताविक अध्यक्ष दिलीप बालपांडे यांनी तर संचालन बाबुसिंग गहेरवार यांनी केले.
Relvenews:उपस्थितांचे आभार डी.के. गुरुनुले यांनी मानले. या कार्यक्रमाला लिलाधर मडावी, रवी जुमडे, राष्ट्रपाल कांबळे, चंद्रशेखर खापरे, सचिन वाघे अब्दुल कदिर बख्श, वर्धा-बल्लारशाह यात्री संघाचे सदस्य आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.