Home Blog Page 394

जळगांव जामोद तालुक्यात अतिवृष्टी व वादळी वारामुळे झालेल्या नुकसान ग्रस्त शेताची,,, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेसच्या सचिव तथा जळगांव जा मतदार संघाच्या पक्षनेत्या डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर यांनी केली पाहणी…..

0

 

गजानन सोनटक्के

जळगांव जा तालुक्यातील कुरणगाड,तरोडा,गाडेगांव, सुकळी परिसरात तील गावात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला असल्याने शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याने सदर शासन स्तरावर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई तात्काळ देण्याचा साठी पाठवपुराव करणार असल्याचे आश्वासन डॉ.सौ.स्वातीताई वाकेकर यांनी कुरणगाड महसुल मंडळाच्या कार्यक्षेत्रात कुरणगाड, तरोडा, सुकळी,गाडेगांव,सह तालुक्यातील आदी गावातील क्षेत्रात अचानक अतिवृष्टी पावसामुळे सदर शेत क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या तोंडाशी येणारा पीक हे या वादळी वारा व अतिवृष्टीमुळे हिरावून गेले असल्याने या वादळी वारा अतिवृष्टीमुळे शेत क्षेत्रातील सोयाबीन,मका,कापूस,उडीद, ज्वारी, या सह आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच शेतातील जवळपास च्या नदी नाल्याना आलेल्या पाण्याच्या पुरा मुळे शेतात पाणी शिरल्याने शेत जमीन खरडून गेली असल्याने लागवडीसाठी असलेले शेताचे देखील मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शेतात पाणी साचले असून उभे पीकांची नासाळी झाली आहे या परिसरातील नुकसान ग्रस्तांना तात्काळ आर्थिक मदत करण्यासर्भात राज्य शासन दरबारी पाठवपुराव करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळुन देण्यासाठी कॉग्रेस पक्ष प्रयत्न करणार असून सदैव शेतकऱ्याच्या पाठिंसी खंबीर पणे उभे राहणार असल्याचे यावेळी शेत शिवारातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला.
यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश उमरकर,संरपच राजुभाऊ सित्रे,माजी पं.स.सदस्य गजानन बोदळे,युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील,विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद सपकाळ,रामभाऊ जाणे,युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवदास जाने अविनाश आटोळे,अशोक गिरी,दादाराव आटोळे,सलीम शहा,हकीम भाई,वैभव गवई,ज्ञानेश्वर पांडुरंग जाणे,गणेश जाणे,अरुण जाणे,शिवा जाणे,अजय जाणे,वैभव जाणे,समाधान जाणे,लक्ष्मण जाणे,नकुल जाणे,कुरणगाड सरपंच पती संदेश आठवले,विठ्ठल आटोळे, मोहन आटोळे, राजेश आठवले,संदिप मोरखडे,अर्जुन अवकाळे,तेजराव कोठे,सुरेश आटोळे,अशोक जळमकार आदींचा उपस्थित होती….
यावेळी जळगांव जामोदच्या तहसीलदार मँडम,कुरणगाड चे ग्रामसेवक पवार साहेब,कृषी सहाय्यक भगत साहेब, तलाठी सराफ साहेब ,ग्रामसेवक समाधान जाणे,उपस्थित होते….

सावली( वाघ)येथे आ.समिर कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण

0

 

हिंगणघाट दि.७ ऑक्टोबर
गावाच्या विकासकामासाठी मी सदैव आपल्या पाठीशी असून कोणत्याहीवेळी मी आपल्या सेवेत तत्पर राहिल असे आश्वासन आमदार समिर कुणावार यांनी सावली येथील आगे बढ़ो व्यायाम शाळेच्या लोकार्पण समारोहाचेवेळी सावली(वाघ) जि.प.मतदारसंघातील गावकऱ्यांना दिले.
काल दि.६ रोजी सावली (वाघ) येथील आगे बढो व्यायाम शाळेचा लोकार्पण सोहळा सावली ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आला होता,याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून विधानसभा क्षेत्राचे आमदार समिर कुणावार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नितिन मडावी,सरपंचा सौ.छाया सुभाष राऊत,प.स.सदस्या सौ.मंजूषा ठक,उपसरपंच अनिल ठक तसेच आगे बढो व्यायाम शाळेचे अध्यक्ष विनोद विटाळे इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे फीत कापून रितसर लोकार्पण करण्यात आले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सावली(वाघ) जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य नितिन मडावी यांनी मतदारसंघात आमदार समिर कुणावार यांचे प्रयत्नाने अनेक विकासकामे करता आली असून आमदार कुणावार मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी कधीही कमी पडू देणार नसल्याचे प्रतिपादन केले.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

काचनगाव येथे काँग्रेस कमिटीची स्थापना

0

 

अल्लिपुर :- काचनगाव येथे काँग्रेस कमिटीची स्थापना करण्यात आली. यावेळी अध्यक्ष सतिश अं कापसे , उपाध्यक्ष प्रणय साखरकर , सचिव विजय ढगे , कोषाअध्यक्ष मंगेश खोडे , महासचिव शामरावजी कुभांरे , संघटक संतोष आत्राम , यांची निवड करण्यात आली. व इतर सदस्यगन गजानन देउळकर , प्रविण कन्नाके , शुभम खोडे , अविनाश खोंड , वैभव माहुरे , गोपाल रघाटाटे , योगेश रघाटाटे , सुनिल हिंगे , कार्तीक साखरकर , संजय आत्राम , किशोर मेघरे , वैभव पवार , धिरज खोंड , दसरत महाजन , सुभाष महाजन , दिनेश धरर्मूल , आदिची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित बालु महाजन तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी हिंगणघाट , अंकुश कापसे माजी सरपंच काचनगांव , श्रीराम साखरकर संजय गांधी निराधार समिति सदस्य , मान्यवरांनी निवडी बद्दल अभिनंदन केले. तसेच अध्यक्ष सतिश अंकुश कापसे यांनी रंणजित कांबळे देवळी पुलगाव आमदार , चारुलता टोकस महाराष्ट्र उपाअध्यक्ष , मनोज चांदुरकर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष , राजु धोटे समाज सेवक , रामदासजी काटकर , विलासजी अवचट , नथ्थुजी खोडे ( गुरुजी) , अध्यक्ष यांनी वरीष्ठाचे आभार मानले .
सुर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

नांदगावी चोरट्यानी किराणा दुकान फोडुन सुकामेव्याची केली चोरी

0

 

निलेश पगारे नांदगांव तालुका : (प्रतिनिधी)

शहरातील प्रभाग एक मधील शांतीबाग या सदन वस्तीत एका रात्री तीन ठिकाणी बंद घराच्या चोऱ्या झाल्या असून किराणा दुकान फोडुन दुकानातील सुकामेवा काजु,बदाम,गावरान तूप आदी सह रोख रक्कम व चोरट्यांनी तीन दुचाकी देखील
लंपास केल्या आहे .या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे .घटनास्थळी नांदगांव पोलिसांनी पहाणी करुन पंचनामा केला.
दि ५ रोजी मध्यरात्री शहरातील शांतीबाग या वस्तीमध्ये भारत गॅस गोडाउन जवळील नावंदर किरणां दुकानाचे शटर उचकुन चोरट्यांनी आत प्रवेश करुन आतील काऊंटर मधून २० हजार रुपयांची चिल्लर
,काजु ५० किलो, (अंदाजे किं. ४० ह.रु)
बदाम ३०कि लो(अंदाजे किं. ३२ ह .रु)
गावरान तूप २० किलो( अंदाजे किं.१२ ह. रु )आदी १ लाख २ हजार रूपयांचा एैवज चोरी करुन
भामट्यांनी तेथून बाजूच्या गल्लीत जाऊन कंपाउडच्या भिंती चढून
गोविंद मोगल यांच्या घराच्या मागील बाजूने लोखंडी जाळी काढून आत घुसुन घरातील कपाटातील २५०० रु रोकड,दिड तोळे सोने दागिने( 45 ह रु किंमतीचे) एकुन ४७५०० रुपयांचा माल लंपास केला तेथून बाहेर निघून चोरटे शेजारी एस. पी. पाटील यांच्या घराची झाडा झडती घेतली पण तेथून ते रिकाम्या हाताने परतले नंतर जवळील कचेश्वर मुंडे,व दिगंबर मुंडे (रा. खिर्डीसाठे ) यांच्या मालकीच्या घरासमोरील दोन प्लेटीना नं
(Mh41/AY 6662),
(Mh 15/GN 8165 ) आदी तीन दुचाकी घेऊन पसार झाले.
शहरातील शांतीबाग येथील घरांची व दुकानाच्या चोरीच्या घटना स्थळी पोलीस उप अधिक्षक समिरसिंग साळवे, पो नि. अनिल कातकाडे
सा. पो. नि दिपक सुराडकर ,पोलीस कर्मचारी, आणि नाशीकचे डाॅग स्काॅड ने माग काढले, आणि फिंगर प्रिंट चे ठसे देखील घेण्यात आले .

प्रतिक्रिया :नागरिकांना कोणी संशयीत आढळल्यास पोलिसांना कळवा तसेच राञीच्या वेळी एकमेकांच्या संपर्कात राहुन तसे काही अाढळुन आल्यास अलर्ट रहा नांदगांव चोरीच्या घटनेचे आरोपी लवकरच जेरबंद होतील

यंदा ही कोविड१९च्या नियमांचे काटेकोर पालन करीत नवरात्र उत्सव साजरे करावे : पोलीस निरिक्षक सुधीर पाटील

0

 

यावल( प्रतिनिधि) विकी वानखेडे

येथे उद्या पासुन होणाऱ्या नवरात्र उत्सव व गट स्थापनेच्या पार्श्वभुमीवर यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व महावितरणचे सहाय्यक अभीयंता महेश वावरे यांच्या उपस्थितीत शांतता समितीची बैठक संपन्न झाली . यावल येथील पोलीस स्टेशनच्या आवारात दिनांक ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उद्यापासुन सुरू होणारे नवरात्र उत्सव आणी घटस्थापनाच्या पार्श्वभुमीवर यावलचे पोलीस निरिक्षक सुधीर पाटील व नुकतेच यावल येथे बदलुन आलेले महावितरणचे सहाय्यक अभीयंता महेश वावरे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली . या बैठकीला शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान मोहम्मद खान, चंद्रकांत गंगाधर देशमुख , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा . मुकेश येवले , हाजी ताहेर शेख चाँद , पंचायत समितीचे गटनेते शेखर सोपान पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार पाटील ,प्रमोद नेमाडे , गोपाळसिंग पाटील , इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग पाटील , माजी नगरसेवक गुलाम रसुल गुलाम दस्तगीर , काँग्रेसचे कदीर खान यांच्यासह दुर्गा उत्सव मंडळाचे कार्यकर्ते प्रामुख्याने या बैठकीला उपस्थित होते . यावेळी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी सांगीतले की मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कोरोना विषाणु संसर्गाचा प्रार्दुभाव कमी झाला असला तरी कोविड१९चे नियम मात्र कायम ठेवण्यात आले असल्याची माहीती देवुन सर्व मंडळाचे पदाधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नवरात्र उत्सव साजरा करावा असे आवाहन केले .

सोन्यासाठी केला महिलेची खुन

0

 

दगडू पिंगळे निलंगा/ प्रतिनिधी:

तालुक्यातील गु-हाळ गावात आज दुपारी ३ वाजता बाहेरगावावरून घरी येऊन शेषाबाई मारूती दुधभाते वय ६५ वर्षे या आपल्या शेतात आल्या बाजूच्या शेतात दबाधरून बसलेल्या अज्ञात आरोपीने सदरील महिलेच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याची बोरमाळ मंगळसुञ कानातील असे एकून चार तोळे सोने हिसका मारून काढून घेतले. महिलेने आरडाओरडा करताच आरोपीने त्याच्या हातातील लोखंडी सुरीने गळा कापून आरोपी बाजूच्या तळीखेड वाटेने उसातून पळून गेला आहे. लातूर जिल्ह्यात आरोपी पकडण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली असून सध्या परीसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात काम करणारे शेतकरी धावून आले असता सदरील आरोपी पळून गेला आहे.प्रत्यक्षदृषी पहाणा-यानी सदरील व्यक्तीच्या अंगावर काळा पँन्ट व पांढरा शर्ट होता असे सांगितले आहे.

मनसेची उपोषण मंडपास भेट व जाहीर पाठिंबा

0

 

सुनिल पवार ..नांदुरा ता.प्र.

नांदुरा:- तालुक्यातील ग्राम भोटा येथे जि.प.शाळेमधील दोन शिक्षकांना कार्यमुक्त न करता नियमबाह्य पद्धतीने बदली करण्यात आली या विरोधात ग्राम भोटा येथील जि.प. शाळा समिती व गावकरी पंचायत समिती नांदुरा येथे आमरण उपोषणाला बसले आहेत जो पर्यंत दोन शिक्षक कायमस्वरूपी रुजू होणार नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असे उपोषण कर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.उपोषण कर्ते जि.प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवचरण कि.पारस्कर, सरपंच प्रविण कोकाटे, उपसरपंच तेजराव भोटकर, भिमराव ना.भोटकर, संजय भोटकर, रामकृष्ण पारस्कर,महादेव पारस्कर,शिवहरी पारस्कर, सचिन पारस्कर आदी उपोषणाला बसले आहेत.
यावेळी या उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
यावेळी माजी पं.समिती उपसभापती नांदुरा संतोष बाप्पू देशमुख, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जेष्ठ नेते माजी तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सपकाळ, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष, शिवचरण पारस्कर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा सचिव राहुल चोपडे यांनी उपोषणाला भेट दिली.
व जाहीर पाठिंबा दिला.

बस आणि दुचाकीच्या अपघातात तिघे ठार

0

ऋषी जुंधारे तालुका प्रतिनिधी वैजापूर

वैजापूर: वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे नाशिक औरंगाबाद महामार्गावर पालेजा पेट्रोल पंपाजवळ बस आणि दुचाकीच्या अपघातात तिघे जण ठार झाले.मंगळवारी सायंकाळी ५वाजेच्या दरम्यान औरंगाबाद नाशिक बस क्र(एम एच १४ बी टी ३३४४) औरंगाबादवरून वैजापूरकडे जात असतांना समोरून येणाऱ्या दुचाकीशी (एम एच २० एफ एन ४१७२)धडक झाली . अपघातात दुचाकीवरील तिघे जण ठार झाले.अमोल भाऊसाहेब ठुबे(वय २३ रा.पोखरी ता.वैजापूर),सोमनाथ साहेबराव निकम (वय ३२रा.शिऊर ता.वैजापूर),कडूबा ज्ञानेश्वर ठुबे(वय२२ रा.पोखरी) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत दुचाकीला धडक दिल्यानंतर बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने काही अंतरावर बस रस्त्याच्या खाली उलटली.चालकासह काही प्रवाशांना किरकोळ मार लागला सुदैवाने सर्व ४३प्रवाशी सुखरूप बाहेर काढले गेले.या अपघाताची वैजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.जखमी बसचालक विकास सुर्यवंशी यांच्यावर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

सरकारी खर्चावर फिरुन देखाव्याचा फार्स निर्माण करत आहेत मा.श्री.अशाेकराव पाटील निलंगेकर यांची विराेधी पक्ष नेते फडणवीस यांच्यावर टिका

0

 

दगडू पिंगळे निलंगा/प्रतिनिधी

अतिवृष्टी व मांजरा तेरणा च्या पुराने शेतकरयांचे अताेनात नुकसान झाले आहे आघाडी सरकार शेतकर्यांच्या पाठीशी उभे आहे शासन लवकरच मदत थेट शेतकरयांच्या खात्यात पैसे टाकणार आहे विराेधी पक्ष नेते राजकारण करत आहेत सरकारी पैशावर फिरुन पुरस्थिती पाहण्याचा फार्स निर्माण करुन काेरडी तळमळ दाखवण्याचा प्रयत्न आहे सत्तेत नसल्याने बाेलाची भात बाेलाची कडी आशा शब्दात त्यांनी शेतकरयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत ज्यावेळी ते सत्तेत हाेते तेव्हा काही केले नाही आशा शब्दात काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.अशाेकराव पाटील निलंगेकर औराद शहाजानी येथिल तेरणा मांजरा नदी संगमावरील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आले आसता मंगळवारी म्हणाले
यावेळी माजी सरपंच माेहनराव भंडारे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबुराव भंडारे साेसायटी चेअरमन लक्ष्मण बाेडंगे , दयानंद चाेपने, काँग्रेस शहर अध्यक्ष पद्मसिंह पाटील उपसपंच महेश भंडारे खमर मुल्ला महेंद्र कांबळे पांडुरंग भंडारे असिफ पटेल बक्सु मुल्ला खाशीम मुल्ला व्यंकट दापके आदि उपस्थित हाेते…

आघाडी सरकार मधील मंत्री आमदार यांनी बारा महिने मिळत असलेला पगार शेतकर्‍याना घावा

0

 

उषा पानसरे  कार्यकारी मो. 9921400542

सर्जेराव जाधव भारतीय जनता पार्टी अ जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांची मागणी

मुखे मंत्री मा उद्धवजी ठाकरे साहेब
उप मुखे मंत्री अजित दादा पवार साहेब आपण पुढाकार घेऊन सर्व मंत्री मंडळ व आमदार यांचा पगार शेतकरी यांना दान मनुन द्या
दादा जनतेचाच पैसा आहे तोच द्या

महाराष्ट्रामध्ये ज्याच्या जिवावर आपण जगत आहोत त्या शेतकऱ्यांच् आज अतिवृष्टीमुळे पावसामुळे वाटुळ झालं व नुकसान झालेले आहे सातत्याने मंत्री आमदार आपण आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शेतकऱ्याचा पाठीशी उभा राहू शेतकऱ्यांचा असं करू शेतकर्‍यांचा तसं करून शेतकऱ्यांना वीज पाणीपुरवठा देऊ असे गोड भाषण प्रत्येक आमदार मतदार संघात करतात आज रोजी तुम्ही ज्या शेतकरी राजा च्या जीवावर जगत आहात सरकार म्हणून व विरोधक म्हणून खंबीरपणे उभा राहावा राज्यामध्ये बावीस जिल्ह्यांमध्ये हातातोंडाशी आलेला घास तूर मूग उडीद सोयाबीन कापूस फळबाग व बाजरी मका अशा पिकांच पिकांचे नुकसान झालेला आहे आमदार मंत्री हे टीव्हीवर बोलतात कोणता मंत्री विमा कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करू असे म्हणतात मतदारसंघात आमदार गेल्यानंतर मंत्री गेल्यानंतर पंचनामे करून निकष काढून नदीकाठच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ असे म्हणतात मंत्रीमहोदय आपण प्रत्यक्ष बांधावर न जाता शेतामध्ये घुसुंन पहा गुडघ्याइतके जातात का कमरा इतके चिखलात तुम्ही गेले होते
आमची माय 70 वर्षची घरची मंडळी आमची बहीण तिच्या गळ्यात फुटका सोन्याचा मनी राहिला नाही सगळे खरिपाची बी बियाणे आणण्यासाठी गहन टाकले व आमच्या माईला आमच्या बायकोला बहिणीनं चुलतीने मावशीने
कधी लाली तोंडाला लावली नाही कधी आमची बायको व जेवाण बहीण पार्लर मध्ये गेली नाही वेळे प्रसगी आईला पैसे मागताना बहिणीला मारले आईने आमच्या आर आर आबा भाषणात सांगत असत चित्रकूट बंगल्याच्या बाजूला जे लोक राहतात ना त्यांचे बाथरूम आहेत तर
महाराष्ट्र मधला राब राब राणार 100 एकर ऊस पिकवणार शेतकरी बरोबरी करू शकत नाही
आज आबाची आठवण येते

मंत्री महोदय आपण मनलात विमा कँपणीच्या आधिकारी याच्यावर गुंना दाखलकरु साहेब तुम्ही जर शेतकरी याचे पुत्र असले तर हिंमत दाखवा गुन्हा दाखल करा
मंत्री महोदय दादाजी हुशे साहेब चिखलात फिरा जरा आपण खूप हुशार मंत्री मनुन आपली ओळख आहे आपली वेगळी ओळख आहे महाराष्ट्र मध्ये जातात खोल चिखलामध्ये जाऊन पीक पाहणी आपण बांधावर उभा राहून करू नये नजर कायद्यामध्ये पंचनामे दाखवून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी मदत द्या 50 हजार रुपये मदत देखील कमीच आहे आपण लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आला आपणाला राज्य सरकार कडून एक लाख रुपये पेन्शन माजी आमदारांना महिन्याचा पगार एक लाख रुपये मिळतो आपण महाराष्ट्रातील सर्व आमदाराने एक विचार करून सातत्याने ज्याच्याजवळ आपण निवडून आला निवडून येत आहे आपण हक्काने शेतकऱ्यांना बोलताय मतदारसंघांमध्ये त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला पाहिजे कोणत्याही प्रकारचे निकष न करता राज्य सरकारने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी पुढाकार घेऊन सर्व मंत्री आमदार यांच्या यांचा बारा महिन्याचा पगार शेतकऱ्यांना अनुदान म्हणून जिल्हाधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवा अशी खंत व्यक्त करत आहेत मांडत आहे मी स्टेटमेंट दिले आपणाला निवेदन दिले हे आपल्याला वाईट वाटेल परंतु आपण सर्व पदाधिकारी लोकप्रतिनिधी जनतेचे सेवक आहेत ज्याच्या जीवावर आपण विधानपरिषद विधानसभेमध्ये बसलाय त्या शेतकरी राजाच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आपणाला पगारी ची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही असं माझं मत आहे म्हणून आपण या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून मनाचा मोठेपणा दाखवून सर्व आमदारांनी मंत्र्यांनी देखील जिल्हाधिकारी यांच्या अकाउंटला जमा करून शेतकऱ्यांना भरघोस मदत करावी सर्जेराव जाधव भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा दलित महासंघ प्रदेशाध्यक्ष पत्रकारांशी बोलताना सर्व आपलं दुःख त्यांनी व्यक्त करून शासनाला विनंती केलेले आहे