Home Blog Page 415

भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी वतीने परभणी जिल्हा स्तरीय अभ्यास वर्ग अंतर्गत राष्ट्रीय स्वस्थ स्वयंसेवक अभियान राबविण्यात आले

0

 

अजहर पठाण परभणी

परभणी सेलू तालुक्यातील वालुर येथे भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्य वतीने परभणी जिल्हा स्तरीय अभ्यास वर्ग अंतर्गत राष्ट्रीय संस्थ स्वयंसेवक अभियान राबविण्यात आले या अभियानाचे आयोजन डॉ संजय लोंढे साहेब प्रदेश सहसंयोजक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र राज्य यांनी केले होते या राष्ट्रीय स्वस्थ स्वयंसेवक अभियान कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ सुभाष कदम जिल्हाध्यक्ष भाजप परभणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर बाबासाहेब जामगे जिल्हा महामंत्री भाजप परभणी सुरेश भाऊ भुमरे जिल्हाध्यक्ष भाजप युवा मोर्चा परभणी भाजपा किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष उद्धवराव नाईक डॉ विद्याताई चौधरी जिल्हाध्यक्ष भाजप महिला आघाडी आय आय टी सेल प्रमुख भाजप परभणी डॉ मनोज पोरवाल महानगर जिल्हाध्यक्ष भाजप वैद्यकीय आघाडी परभणी डॉ उमेश देशमुख भाजपा प्रवक्ते परभणी डॉ पंडित दराडे जिल्हा उपाध्यक्ष भाजप परभणी जयसिंग भाऊ शेळके जिल्हा उपाध्यक्ष भाजपा परभणी भागवत दळवी जिल्हा चिटणीस भाजप परभणी अभिजीत रोडगे महामंत्री भाजप युवा मोर्चा परभणी रामप्रसाद पोळ जिल्हा उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा परभणी महादेव जिल्हा कोषाध्यक्ष भाजप युवा मोर्चा परभणी भाजपा तालुकाध्यक्ष सेलू बाळासाहेब जोगदंड युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सेलू शिवहरी शेवाळे भाजपा किसान मोर्चा सेलू तालुका अध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील अल्पसंख्यांक सेल तालुका अध्यक्ष सेलू आजार भाई पठाण ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सेलू बाजीराव बोडखे ह भ प दतरावजी मगर महाराज सोंन्नेकर सदाशिव भाऊ निकम कृषी उत्पादन बाजार समिती माजी उपसभापती सेलू शहराध्यक्ष कपिल भाऊ फुलारी नाईकवाडे अण्णा माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपा महिला तालुका अध्यक्षा सेलू वनिता ताई चाफेकर किसान मोर्चा महिला तालुका अध्यक्षा अर्चना राऊत चंद्रकांत चौधरी आबा वायद भाई पठाण विठ्ठल भाऊ कोकर सेलू तालुका सचिव गणेश खेडकर सेलू तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रदीप झिंबरे भाजपा किसान मोर्चा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष एकनाथ टाकरस सोशल मीडिया युवा मोर्चा गजु भाऊ नांद्रेकर किसान मोर्चा उपाध्यक्ष बळीराम गटकळ किसान मोर्चा चिटणीस गोविंद भाऊ मगर किसान मोर्चा उपाध्यक्ष वैभव देशमुख किसान मोर्चा चिटणीस कंस मानमोडे किसान मोर्चा चिटणीस मसूद अन्सारी वालूर शहराध्यक्ष बंडू आरे युवा मोर्चा शहराध्यक्ष वालूर शिवाजी जीवनी युवा मोर्चा कोषाध्यक्ष दत्ता गिरी चिकलठाणा किसान मोर्चा सर्कल प्रमुख अशोक शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा किसान मोर्चा सेलू तालुकाध्यक्ष दगडोबा जोगदंड पाटील यांनी प्रयत्न केले कार्यक्रमात चंद्रकांत बाबा चौधरी डॉ पंडित दराडे डॉ सुभाष कदम सुरेश भाऊ भुमरे बाबासाहेब जामगे डॉ संजय लोंढे डॉ विद्या ताई चौधरी आदी मान्यवर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ संजय लोंढे यांनी केले तर सूत्रसंचालन भागवत दळवी गोविंद मगर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर मनोज पोरवाल यांनी मानले

पाच लाखासाठी यावलच्या माहेरवाशीनीचा छळ; यावल पोलीसात पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

नोकरीसाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी यावल येथील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्यांविरोधात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, माधुरी भुषण फुसे (वय-२८) रा. नेहरू नगर, रामानंद नगरजवळ ह.मु. मेन रोड यावल यांचा विवाह जळगाव येथील भुषण यशवंत फुसे यांच्याशी ३० मार्च २०१९ रोजी रितीरिवाजानुसार झाला. लग्न झाल्यानंतर आठ दिवसातच पती भुषण यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणे सुरू केले. त्यानंतर पती भुषण याला नोकरी लागण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी मारझोड करण्यास सुरूवात केली. लग्नाला वर्ष झाल्यानंतर मुलबाळ होत नाही म्हणून सासरे यशवंत फकीरा फुसे, सासु सुमित्रा यशवंत फुसे, ननंद पुनम हितेंद्र असवाल आणि नंदोई हितेंद्र भगवान आसवाल सर्व रा. नेहरू नगर जळगाव यांनी गांजपाठ केला. हा प्रकार असहाय्य झाल्याने विवाहिता यावल येथे माहेरी निघून आल्यात. यावल पोलीसात धाव घेवून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीसात पती भुषण फुसे, यशवंत फुसे, सासु सुमित्रा फुसे, ननंद पुनम असवाल आणि नंदोई हितेंद्र आसवाल यांच्याविरोधात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगणघाट पोलीस स्टेशन येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कडून रक्षाबंधन दिवस साजरा केला.

0

 

दी.22 ऑगस्ट
हिंगणघाट :- रक्षाबंधन दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंगणघाट च्या वतीने कोरोना काळात दिवसरात्र आपल्या सेवेत असणारे. आपल्या हिंगणघाट पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवांना यांना राखी बांधून . रक्षाबंधन साजरा करण्यात आला .
यावे उपस्थित जिल्हा संघटन मंत्री शिवेशजी हारगोडे, संजय खत्री,गौरव तांबोळी , किर्तेश साबळे,सनी बासनवार, स्वयम तांबोळी, , समिक्षा तांबोळी, दिप्ती चल्लिरवार, वैष्णवी पुट्टावार, पायल कोल्हे ,करुणा ठाकरे,गायत्री ठाकरे, प्रियंका लोखंडे किरणं डफ सर्व अखिल भारतीय विद्यार्थी परीषदचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सूर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा

पत्नीकडे वाईट नजरेने का पाहतो म्हणून तेलाच्या केटली ने डोक्यावर मारून केले जखमी

0

 

पत्नीकडे वाईट नजरेने का पहातो? असा जाब विचारीत एका दारूविक्रेत्याने तेलाच्या केटलीने मारहाण केल्याची घटना शहरातील निशाणपुरा वार्ड येथे दुपारी घडली.
शहरातील नेताजी वार्ड येथील रहिवासी अजय विलास साठोणे हा रुपेश व शुभम या मित्रांसोबत हमाली कामावर जात असताना आरोपी अजय नागोराव ठोंबरे रा. निशानपुरा याच्या घरी गेले. रुपेश व शुभम दारू पिण्याकरिता घरात गेले असता अजय साठोणे घराबाहेरच उभा होता.
आरोपी अजय ठोंबरे हा तेथे आला व फिर्यादि अजय साठोणे सोबत वाद घालु लागला. तू माझ्या घरी दारू पिण्यासाठी का येतो ? माझ्या बायकोकडे वाईट नजरेने का पाहतो ? यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला . यावेळी आरोपी अजय ठोंबरे याने तेलाची केटलीने अजय साठोणे याचे डोक्यावर मारहाण करीत त्याला जखमी केले.फिर्यादिचे तक्रारीवरुन हिंगणघाट पोलिसांनी कलम ३२४ ,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला, पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.

विसावा वृध्दाश्रम अचलपूर माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन रक्षाबंधन

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती-: अमरावती जिल्ह्यातील विसावा वृध्दाश्रम अचलपूर व माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन आज दिनांक
२२ /८ /२०२१रोजी वृद्धाश्रम येथे मोठ्या उत्साहात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन चे पदाधिकारी
यांनी विसावा वृध्दाश्रम येथील वृद्ध व्यक्तींना भाऊ बहिणीचे नाते वृनांनू बंधन जोपासता यावे यासाठी आम्ही सर्व माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन च्या वतीने सामाजिक बांधिलकी अंगीकारुन सलोखा निर्माण करण्याचे कार्य करतं आहे विसावा वृध्दाश्रम येथील सर्व वृद्ध व्यक्तींना भाऊ बहिणीचे नाते आम्ही निर्माण झाले आहे. सुरवातीला आश्रमातील सर्वच वृद्ध व्यक्तींना राखी बांधून सर्व
पेढा भरविला त्या नंतर अल्पोपहार देण्यात आला यावेळी माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशनचे पदाधिकारी सौ.शारदा उईके.विजया फाटकर.दिपाली विधळे सोनम गाठे व माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा सौ दिपा अमोल
तायडे उपस्थित होत्या विसावा वृध्दाश्रमाचे संस्थापक सचिव ॲडोकेट.भास्कर कौतिक्कर व आश्रमातील सर्वच वृद्धांनी माहेर मल्टीपरपज वुमन फाउंडेशन च्या सर्व पदधिकार्यांचे आभार मानले

नंदोरी चौकातील उड्डाणपुलावर मॉर्निंग वॉक ला जाताना अज्ञात वाहनाने दिली धडक !

0

 

हिंगणघाट :- स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी विठ्ठल ज्ञानेश्वर लाटकर वय 48 वर्ष यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. अपघात हा पहाटेच्यावेळी 5 वाजता नंदोरी चौकातील राष्ट्रीय महामार्गावरील उड़ाण पुलावर मॉर्निंग वॉकला जातांना पहाटे घडला असून यावेळी एका अज्ञात वाहनाने श्री लाटकर यांना धडक दिली.अपघातानंतर त्यांना स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता उपस्थित डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
श्री लाटकर हे विकास विद्यालय कोरा येथे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
आज दि.22 रोजी दुपारी त्यांचे पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करत आहे.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा

महावितरणकडे नऊ महीन्यांपुर्वी तक्रार देवुन ही जंगलागलेले विद्युत खांब बदलेले जात नाही अप्रिय घटनेची शक्यता

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील मेन रोड वरील गवत बाजार परितरातील भाजी बाजार या ठीकाणचे सार्वजनिक विद्युत पुरवठा करणारे इलेक्ट्रिक पोल जंगल्यामुळे खालच्या बाजूला खराब होऊन खूप झुकला आहे व रस्त्याच्या टर्निंग वर असल्याने वाहनांचा धक्का लागून केव्हाही पडू शकतो तसे झाल्यास मोठी जिवीत व वित्तीय हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही , यासंदर्भात तक्रार केल्यावर देखील महावितरण कंपनीचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे . या संदर्भातील मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील मुख्य बाजारपेठेतील गवत बाजार हे क्षेत्र भाजीपाला विक्रीसाठी प्रसिद्ध आहे यामुळे या परिसरात नागरीकांची नेहमीच वर्दळ असते , याच ठीकाणी मेन रोडवरील वळणावर सार्वजनिक विद्युत पुरवठा करणारा विद्युत खांब हा पुर्णपणे जंगलागल्याने जिर्ण झाला असुन तो कुठल्याही क्षणी कोसळण्याची भिती या परिसरातील नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत असून , याबाबत त्या वळणावर रहीवाशी असलेले उच्च शिक्षीत तरूण अनिल त्र्यंबक पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार तोंडी सुचना देवुन व दिनांक १७ /११ / २०२० रोजी यावल येथील महावितरणचे सहाय्यक अभियंता यांना लिखित तक्रार अर्ज दिला असतांना ही मागील नऊ महीन्यांपासुन या संदर्थात अद्याप महावितरण विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही . या मार्गावरील विद्युत खांबाच्या ठीकाणी जवळपास रोज भाजी बाजार भरत असतो व ती खरेदी करण्यासाठी नागरिकांची व वाहनांची खूप मोठी गर्दी असते.जर हा जिर्ण झालेल्या सार्वजनिक विद्युत पुरवठा करणार खांब पडला किंवा मोटर वाहनाने धडक देवुन कोसळल्यावर खूप मोठी जीवित व आर्थिक हानी होऊ शकते असे तक्रारीत म्हटले आहे.महावितरणच्या कार्यालयामध्ये रितसर तक्रार करूनसुद्धा जंगलागुन जिर्ण झालेले बदलला गेला नाही.भविष्यात जर काही अप्रिय घटना घडल्यास त्यास सर्वस्व महावितरण कंपनी जबाबदार राहील.तरी यावलच्या महावितरण. विभागाने या संदर्भात गांभीर्याने दखल घेवुन तात्काळ या ठीकाणचे जिर्णखांब बदल करावा असे म्हटले आहे .

यावल शहरातून अल्पवयीन मुलीला फूस पळविले; यावल पोलीसात गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

शहरातील एका भागात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची १५ ऑगस्ट रोजी घडली. पाच दिवसानंतर पिडीत मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहिती अशी, यावल शहरातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या नातेवाईकांसह राहते. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता तिच्या राहत्या घरात टी व्ही पाहात असतांना तिला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून आणि आमिष दाखवत पळवून नेल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलीच्या वडीलांसह सर्व नातेवाईकांनी तिच्या मैत्रिणीकडे व नातेवाईकडे प्रत्यक्ष जावून शोध घेतला. परंतू त्यांची मुलगी कुठेच आढळली नाही. पिडीत मुलीच्या वडीलांना काल शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने मुलीला पळवून नेल्याची तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार नितीन चव्हाण करीत आहे.

मोदी सरकारच्या गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर निशेध मोर्चा

0

हंसराज उके अमरावती जिल्हा प्रतिनिधी

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील आज दि.२१/ ८ / २०२१ ला तहसिल कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने गॅस इंधन विरोधात निशेध मोर्चा काढण्यात आला व आंदोलन करण्यात आले .व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महिला अध्यक्ष सौ.संगीताताई ठाकरे तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ.कल्पनाताई वानखेडे यांचे प्रमुख उपस्थितीत गॅस व इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करुन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.यावेळी रेखाताई येवतकर व अस्मिता ताई भडके तालुका अध्यक्ष नांदगाव खंडेश्वर कोहळा जिल्हा जेटेश्वर सरपंच सौ. शोभाताई मोहोड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष मनोज गांवाडे अनिकेत मेश्राम अक्षय गिलबे ग्रामीण तालुक्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते महीला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते या निशेध मोर्चाचे आयोजन तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ अस्मिता ताई भडके यांच्या उपस्थितीत तहसीलदार साहेब यांना निवेदन देवून मोदी सरकारच्या धोरणा विरोधात निशेध करण्यात आले.

अण्णा हजारे यांना भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास सुरू ठेवण्याचा सदस्यांकडून आग्रह.

0

 

राळेगणसिद्धी येथील बैठकीत राज्यातील माजी जिल्हाध्यक्षांची बैठक संपन्न.

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास संस्थापक तथा प्रणेते आदरणीय अण्णा हजारे यांनी आपले जन आंदोलन यापुढे अखंड सुरू ठेवावे आणि आंदोलनात सहभागी सदस्यांना, नागरिकांना,तरुणांना प्रेरणा द्यावी असा आग्रह राज्यातील माजी जिल्हाध्यक्ष,संघटक,निमंत्रक यांनी केल्याने न्यासाची एक आदर्श नवीन घटना तयार करून आंदोलन पुन्हा मोठ्या जोमाने सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन आदरणीय अण्णा हजारे यांनी उपस्थित माजी सर्व जिल्हाध्यक्ष व सदस्यांना दिल्यामुळे राज्यातील सर्व माजी जिल्हाध्यक्ष यांच्यासह विश्वस्त मंडळात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी न्यासाच्या राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारण्या बरखास्त केल्या होत्या त्यामुळे आंदोलनाची गती मंदावली होती आणि कामकाज ठप्प झाले होते त्यामुळे अण्णांच्या पुढील आंदोलनाकडे माजी जिल्हाध्यक्ष,सदस्य व ट्रस्टी मंडळी व इतर राज्यातील राजकारण्यांचे समाजसेवकांचे आणि सर्व स्तरातील महिला,पुरुष,तरुण मुले,मुली,विविध संघटना नागरिकांचे लक्ष वेधून होते आणि अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते.या सर्व प्रश्नांना फुल स्टॉप मिळाला.
बुधवार दि.18ऑगस्ट2021रोजी राळेगणसिद्धी येथे आदरणीय अण्णा हजारे आणि विश्वस्त मंडळी यांच्या उपस्थितीत आंदोलन न्यासाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी जिल्हा निमंत्रक,माजी जिल्हा संघटक यांची एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली समाजातील सामुदायिक जनहितासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास यांची भूमिका,ध्येय,उद्दिष्ट हेच महत्त्वाचे ठरणार असल्याने न्यासाचे काम पुन्हा जोमाने सुरू करण्यासाठी सदस्यांची, जिल्हाध्यक्ष यांची भक्कम फळी ट्रस्टी ऍड.शाम आसावा,ऍड. अजित देशमुख,अशोकजी सब्बन,बालाजी कोपलवार,शेख अलाउद्दीन,अर्ते यांच्यासह इतर ट्रष्टीच्या मार्गदर्शनाखाली लवकरच भक्कम फळी निर्माण करून आदरणीय अण्णा हजारे यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली लवकरच भ्र.वि.जनआंदोलन न्यासाचे काम पूर्ववत मोठ्या जोमाने सुरू केले जाईल असे मीटिंगमध्ये जाहीर करण्यात आले. यामुळे सर्व उपस्थितांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले, बैठक यशस्वीतेसाठी दत्ता आवारी,कैलास पठारे,शेख अन्सार यांनी उत्कृष्ट नियोजन पूर्वक परिश्रम घेतले.

*लोकायुक्त कायद्यात सर्वांची चौकशी करण्याचे अधिकार*
लोकायुक्त कायदा झाल्यास पुरावे असतील तर आमदार, खासदार,मंत्री यांची सुद्धा चौकशी करून शिक्षा करण्याचा अधिकार लोकायुक्तयास राहणार आहे, कोणाकडे जाण्याची गरज राहणार नाही,कारण लोकायुक्तास सत्र न्यायालयाचे अधिकार देण्यात आले आहेत,तसेच न्यासाचे माजी जिल्हाध्यक्ष सदस्य यांनी तक्रारअर्जा पर्यंत मर्यादित न राहता समाजाचे इतर अनेक सामुदायिक प्रश्न,समस्यांकडे आपले लक्ष केंद्रित करून आंदोलने करायला पाहिजे असे बैठकीतील उपस्थितांना मार्गदर्शनपर सूचना आदरणीय अण्णा हजारे यांनी दिल्या.