Home Blog Page 461

पिक विमा कंपन्यांवर फौजदारी दाखल करा मा .आमदार विजयराज शिंदे

0

 

जिल्हाधिकारी घेणार कृषि अधिकारी व पिक विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची तत्त्काळ बैठक आठ दिवसात समस्या सोडविन्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन

जिल्ह्यात 2,95,000 वर पिक विमा धारक शेतकरी

*अजहर शाह*
*बुलडाणा*:-
पिक विमा कंपन्यानी राज्यात हजारो कोटी ची नफेखोरी करत शेतकऱ्यांना पिक विम्या च्या लाभा पासून वंचित ठेवले आहे.बुलडाणा जिल्ह्याची सर्व तालुक्याची आनेवारी 50 % खाली आलेली असून खरीप हंगाम 2020- 21 मधील जवळपास 2 लाख 95 हजारा पेक्षा जास्त विमा धारक शेतकऱ्यांची पिक विमा कंपनी फसवणूक करीत असल्याचा आरोप भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांची 24/5/2021 भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केला आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जिल्हयाची आनेवारी 50% पेक्षा खाली असल्याने विम्याचा क्लेम 72 तासाच्या आत करण्याची जाचक अट विमा कंपनीने रदद् करून ग्राम पातळी वरील सरकारी पंचनामे प्रमाणभूत माणुन पिक विमा धारक शेतकऱ्यांना त्यांची हक्काची नुकसान भरपाई विमा कंपन्याणी दिलीच पाहिजे अशी मागणी यापूर्वी मागील महिन्यात जिल्हाधीकारी यांच्या कड़े भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी भाजपा किसान मोर्च्याच्या वतीने लावून धरली होती.
मात्र महीना उलटत आला तरी या बाबत कोणतीही कार्यवाही जिल्हा प्रशासनाने केली नसून पिक विमा कंपन्याना विशिष्ठ हेतुने पाठीशी घालण्याचा प्रकार कृषि विभाग करत आहे.
झालेल्या चर्चे प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कृषि अधिक्षक व संबंधित पिक विमा कंपन्याची तत्त्काळ बैठक बोलावून हा प्रश्न येत्या आठ दिवसात निकाली काढू असे आश्वासन मा.आमदार विजयराज शिंदे यांना दिले आहे.
निवेदनात नमूद आहे की,
मि आपणाकडे 30/4/2021 रोजी निवेदन देऊन बुलडाणा जिल्ह्यातील पिक विमा काढलेल्या सर्वच शेतकऱ्यांना स्थानिक ग्राम पातळी वरील पंचनामे ग्राह्य धरून विम्या पोटीची हक्काची रक्कम मिळणेसाठी मागणी केली होती.सदर बाबतित मा.जिल्हाधिकारी यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना “योग्य मुदत काळात तात्काळ कारवाई करणे” बाबत आदेशीत केले होते मात्र जिल्हा कृषी अधिकारी यांनी याबाबत दिरंगाई करत माझ्या पाठपुराव्या नंतर तब्बल विस दिवसानी 21/5/2021 रोजी पत्र विमा कंपनीला पत्र पाठवून अहवाल मागितला आहे.
सर्वच पिक विमा कंपन्या ह्या शेतकऱ्यांच्या जिवावर प्रचंड नफाखोरी करीत असून या कंपनीच्या संचालकां सोबत कृषि विभागातील अधिकाऱ्यांचे आर्थिक हित संबंध जोपासले तर जात नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यातील 2020-21 खरीप हंगामातील पीक विमा कंपनीच्या व्यवसाया बाबत पुढील प्रमाणे माहिती मिळते.(11/5/2021) पर्यंतची
सहभागी शेतकरी- 1.19 कोटी
सरंक्षित क्षेत्र- 64.85 लाख हेक्टर
वसूल विमा हफ्ता- 5801 कोटी रुपये
शेतकऱ्यांना भरपाई- 12.30 लाख
भरपाई वाटली – 823 कोटी
कंपन्यांना नफा – 4969 कोटी
म्हणजेच राज्यातील पिक विमा कंपन्यानी हप्त्यापोटी जमा केलेली रक्कम ही शेतकऱ्यांना देय असलेली भरपाई रक्कमेच्या खूपच कमी आहे.
ह्या कंपन्या एका हंगामात जवळपास 5 हजार कोटी रुपयांची नफेखोरी करीत आहे.
बुलडाणा जिल्ह्यात खरिप हंगाम 2020-21 मध्ये पिक विमा मध्ये सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या 2,95,157 एवढी आहे
प्राप्त माहिती नुसार राज्य शासनाने स्थानिक पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ची रक्कम देण्याबाबत या पूर्वीही कळविलेले असताना सदर कंपन्या ह्या आदेशास केराची टोपली दाखवून चार चार महिने शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची पीक विम्याची रक्कम देण्यास टाळत आहे.
पिक कर्ज घेतांनाच शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेतून परस्पर पिक विम्याची रक्कम कपात करून कंपनीकडे जमा होत असते.ह्या पिक विम्याच्या हप्त्यात शेतकरी व केंद्र शासन यांचा संयक्तिक वाटा असतो. त्यामुळे सदर कंपन्या ह्या पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देतांना जी टाळटाळ करत आहे ही बाब “नैसर्गीक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005” मधील तरतूदिंचा भंग करीत आहे.
तरी शेतकऱ्यांच्या नुकसानीचे स्थानिक पातळी पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकऱ्यांना पिक विम्याची नुकसान भरपाई ची रक्कम तात्काळ मिळवून द्यावी तसेच शेतकऱ्यांची व शासनाची फसवनुक करून आर्थिक वेठीस धरणाऱ्या सदर पिक विमा कंपन्यांच्या संचालकांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून कारवाई करावी.
अन्यथा लोकशाही मार्गाने येणाऱ्या आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यां समवेत ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी असा इशारा पुनश्चः भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी जिल्हा प्रशासणाला दिला आहे. या वेळी भाजपा किसान मोर्च्याचे प्रदेश सचिव दीपकजी वारे यांचीही उपस्थिति होती.

बुलढाणा सह 18 जिल्ह्यांमध्ये होम क्वारंन्टाईन सुविधा बंद. महाराष्ट्र सरकारचा निर्णय..

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

१८ जिल्ह्या मध्ये होम क्वारंटाईन बंद ! – महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय – प्रत्येकाने वाचा.राज्यात या पुढे कोरोना पेशंट सापडल्यास – त्याला होम आयसोलेशन मध्ये ठेवता येणार नाही – असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले . त्यानुसार राज्यातील १८ जिल्यातील कोरोना रुग्णाना आता केवळ – कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येईल – होम आयसोलेशन आता पूर्णपणे बंद होम होणार – होम आयसोलेशन मधील रुग्ण बाहेर फिरत असल्याने – हा निर्णय घेण्यात आला आहे .या जिल्ह्यांमध्ये होम क्वारंटाईन बंद. – होम क्वारंटाईन बंद होत असलेल्या जिल्ह्यात – पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, तसेच सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर, तसेच उस्मानाबादचा समावेश आहे .राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी – हि बातमी नक्कीच खूप महत्वाची आहे.

यावल येथे दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १२लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत धनादेश वितरीत ,तहसीलदार महेश पवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत तालुक्यातील  १२ लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्याहस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. यावेळी यावलचे तहसीलदार महेश पवार, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, संगांनियो विभागाच्या नायब तहसीलदार भाग्यश्री भुसावरे, अव्वल कारकुन रविन्द्र मिस्त्री यांची उपस्थिती होती.
दारिद्रय रेषेखालील १२ कुटुंबप्रमुख महीला लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपयांचे धनादेश प्रमाणे २ लाख ४० हजाराची मदत तहसीलदार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलीत.
लाभार्थी याप्रमाणे
सुलोचना गोकुळ सपकाळे रा. उंटावद, संगीता संतोष अडकमोल रा. दहिगाव, वंदना अशोक सोनवणे रा. किनगाव खु, ज्योती संतोष सांळुके रा. किनगाव बु, सुशिला मधुकर अढागळे रा. दहिगाव, मरूबाई सलीम तडवी रा . सावखेडासिम, रजिया महेमुद तडवी रा. सावखेडासिम, कल्पना पन्नालाल सोळंके रा. न्हावी प्र. अडावद, योगीता किशोर पाटील रा. साकळी, अलका धनसिंग कोळी रा. डांभुर्णी, शोभा युवराज सोनवणे रा. डांभुर्णी आणि आशाबाई मच्छिंद्र भालेराव रा. थोरगहाण यांचा समावेश आहे

यावलहुन अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा पोलीसांनी लावला शोध आज केले मुलीला केले कुटुंबाच्या स्वाधीन पोलीसांचे सर्वत्र कोत्तुक

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील धोबीवाडा परिसरातील राहणारी १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी सुमारे दीड वर्षापुर्वी शाळेतुन बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती, दरम्यान मागील आठवड्यात तिचे अपहरण उतरप्रदेशच्या एका व्याक्तीने केल्याची नंतर फिर्याद त्या मुलगीचे आजोबा यांनी केल्यांनतर यावल पोलीसांनी गांर्भीयाने दखल घेत तपासाची चक्रे तात्काळ योग्य दिशेने फिरवुन अखेर त्या अल्पवयीन मुलीस शोध लावुन ताब्यात घेवुन आज तिच्या पालकांचे स्वाधीन केले आहे . या संदर्भात यावल पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी ट्विंकल किरण कोळी ही यावल येथे आपल्या आईचे वडील आजोबा भिमसिंग गंगाराम कोळी रा . धोबीवाडा यावल यांच्याकडे राहुन शिक्षण घेत असतांना दिनांक १९ / ११ / २०१९ रोजी सकाळी ११ , ३० वाजेच्या सुमारास तिला शाळेच्या परिसरातुन कुणीतरी अज्ञात व्यक्ति रिक्शात बसवुन घेवुन गेल्याची माहीती शाळेच्या सुत्रांकडुन प्राप्त झाली होती . दरम्यान याबाबत टिंकल कोळी चे आजोबा भीमसिंग कोळी यांनी आपली नात व तिची आई मनीषा ही सुप्रीम कॉलनी मध्ये जळगाव येथे राहत असल्याने सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुली कडे जाऊन नातू चा शोध घेतला मात्र त्याठिकाणी त्यांची नात व मुलगी या दोघ ही मिळून आल्या नाहीत नंतर त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे देखील ट्विंकल आणि त्याची आई मनिषा त्या दोघांचा शोध घेतला मात्र तरीदेखील ते मिळून आले नाहीत अखेर भिमसिंग कोळी यांनी आपली नात ही बेपत्ता झाल्याची खबर यावेळी पोलिसात दाखल केली होती अखेर दीड वर्षानंतर दिनांक २४ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास अचानक ट्विंकलचा फोन आला आणि आपण देरवा चौक , बडहलगंज गोरखपूर जिल्हा उत्तर प्रदेश सरकारी दवाखान्याच्या मागे राहत असून असल्याची सविस्तर माहिती ट्विंकल कोळी हिने आपल्या आजोबांना दिली व सांगितले की आपण येथे आपले आई सोबत नवीनसिंग उर्फ गुड्डन रामा शंकरसिंग सोबत राहात असुन, ह्याच व्यक्तीने यावलहुन आपणास रिक्षात बसून उत्तर प्रदेश येथे आणले होते तेव्हापासून आपण आपल्या आई बरोबर कानपूर येथे राहात होते परंतु साधारण एक महीन्यांपुर्वी ट्विंकल कोळी हे ची आई मनीषा कोळी या महिलेचे कोरोनामुळे दवाखान्यात निधन झाले व त्यानंतर लागलीच सकाळी चार वाजता ट्विंकल कोळी हिने यावल येथे आपल्या आजोबांशी संपर्क साधून सविस्तर माहिती कळविली या ट्विंकल हिने दिलेल्या या माहितीचा आधार घेउन तात्काळ या वरचे पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले आणि सहायक फौजदार विजय पाचपोळे या दोन अधिकाऱ्यांचे पथक स्थापन करून अल्पवयीन मुली चे आजोबा भिमसिंग कोळी यांना सोबत घेऊन पथक हे उत्तर प्रदेश कडे रवाना झाले व त्यांनी बडहल गंज पोलिसांच्या सहकार्याने देरवा चौक या गावात जाऊन अखेर त्या मुलीची ओळख तिचे आजोबाने केल्यावर आजोबांचे आवाज ऐकुन ट्विंकल ही आजोबा धावत आली नंतर पोलीसांनी तिला ताब्यात घेतले व बडहलगंज पोलिस चौकी मध्ये आणले उत्तर प्रदेश पोलिसांनी कायद्याची पुर्तता करून अखेर हे पथक त्या अल्पवयीन मुलीला घेऊन काल रात्री बारा वाजेच्या सुमारास यावल येथे दाखल झाले यावल पोलिसांनी ट्विंकल कोळी यांच्या कुटुंबातील इतर मंडळीशी संपर्क साधून तिला आजोबासह कुटुंबाच्या स्वाधीन केले यावेळी ट्विंकल चे आजोबा यांनी यावल पोलिसांचे विशेष आभार मानले आपले नातू आपल्या ताब्यात मिळाली या आनंदाने त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले या सर्व तपासकार्यात यावल येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डॉ निलेश गडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच या शोधकार्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आभार मानून विशेष कौतुक केले

अवैध रेती वाहतुकीने खड्ड्यात गेला रस्ता शेकापुर बामर्डा रोडवरील अपघाताचे प्रमाण वाढणार !

0

 

सचिन वाघे वर्धा
25.5.21
वडनेर :–
मागील २ महिन्या पासून वडनेर ते शेकापूर रस्त्यांनी रोज शेकडो टीप्पर रात्र दिवस वाळूची वाहतूक करत आहेत आणि याकडे प्रशासन संपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत.अशातच आता सामान्य जनतेसाठी आणखी मोठी समस्या या रेती वाहतुकीने उभी केली आहे. संबंधित रस्ता २ महिन्यापूर्वी गड्डा मुक्त रस्ता होता आणि त्यानंतर अचानक रेतीचे ट्रक वाहतूक सुरू झाली आणि आता मोठं मोठाले गड्डे पडून संपूर्ण रस्ता गड्ड्यात गेल्याच दिसून येत आहे. येत्या काही दिवसात पावसाळा सुरू होणार त्यानंतर हेच गड्डे सामान्य जनतेसाठी जीवघेणे ठरणार. तसेच या गड्ड्यामुळे जर कुणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न ग्रामस्थांचा वतीने विचारल्या जात आहे.पहिलेच रेतीचे भरधाव तीप्पर मुळे या रस्त्यावर नियमित अपघात घडत असल्याचे घडून येत असल्याचे दिसून येत असताना त्यात आता गड्ड्याची भर पडल्यामुळे सामान्य जनतेनी यातून वाट कशी काढायची हे सुद्धा तालुका प्रशासनाने सांगायला हवे. तसेच ही संपूर्ण परिस्थिती येत्या ७ दिवसात लक्ष घालून ठिक नाही केल्यास वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद चे जिल्हा संघटक अक्षय इंगोले आणि परिसरातील संपूर्ण ग्रामस्थांचा वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

अपंग जनता दल सामाजिक संघटना च्या वतीने महानगर पालिका अपंग विभाग प्रमुख श्री.डी.बी.शिंदे यांना कोरोना योध्दा सन्मानपत्र

0

 

अमरावती :- अपंग जनता दल ही एक सामाजिक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातुन अपंग नेते शेख अनिस पत्रकार याचा मार्गदर्शना मध्ये लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजु अंध , अपंग मदत करण्यात काम सुरु असून समाजिक क्षेत्रातील व अपंग क्षेत्रातील कार्य करणारे समाज सेवक का मदत घेऊन गरीब गरजू अपंगांना घरापर्यंत किराणा व शासकीय मदत व मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये अमरावती शहरातील अनेक समाज सेवक व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी ही सहभाग घेतला असून अशे अधिकारी अमरावती महानगर पालिका अपंग विभाग प्रमुख व अमरावती शहर नोडल अधिकारी श्री.डी.बी.शिंदे यांनी सुध्दा या मदत कार्याला सहभाग दिला होता . म्हणुन अपंग जनता दल ( सामाजिक संघटना ) महाराष्ट्र राज्य अमरावती शहर च्या वतीने अमरावती विभागीय उपाध्यक्ष शेख बब्बू यांच्या हस्ते त्याचा कार्यलयात जाऊन श्री.डी.बी.शिंदे यांना कोरोना सन्मान पत्र , शाल , श्रीफळ , पुश्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.यावेळी मयुर मेश्राम.अन्वर शहा. राजिक शाह. सुफियान शेख. धीरज गोरडरे . नरेश उके भाऊ. रुस्तम शेख. नासिर बेग. गोपाल वनवे. प्रभाकर राऊत. मुतलीक चाऊस, प्रमुख उपस्थित होते

बियाणे मिळण्याचा अर्ज आता ग्रामपंचायत देणार ऑनलाइन भरून युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांच्या प्रयत्नाला यश

0

 

गटविकास अधिकारी यांचे ग्रामपंचायतिना आदेश
नांदगाव खंडेश्वर/
महाडीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयिकरिता सर्व योजनांच्या लाभा अंतर्गत बियाण्याचा लाभ मिळण्याकरिता या पोर्टलवर शेतकऱ्यांनी 20 मे पर्यन्त ऑनलाइन अर्ज स्वीकारण्याचे कृषी विभागाचे आदेश होते परंतु लॉकडाऊन असल्यामुळे सेतू केंद्र, आपले सरकार खाजगी सेवा केंद्र,बंद आहे आणि कडक निर्बंधांमुळे नागरिकांना बाहेर निघण्यावर बंदी असतांना शेतकऱ्यांऑनलाइन अर्ज करावे तरी कुठे आणि कशे असा प्रश्न निर्माण झाल्यामुळें युवा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी आज मा तहसीलदार व मा गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून यावर चर्चा केली व एक तर ऑफलाइन अर्ज स्वीकारा किंवा प्रत्येक ग्रामपंचायतला कॉम्प्युटर ऑपरेटर असून त्या ऑपरेटर मार्फत त्या त्या गावातील शेतकऱ्यांना ग्रामपंचायत मध्ये अर्ज भरून द्यावा अशी मागणी केली त्यावर तात्काळ निर्णय घेऊन लगेच ग्रा प सचिवांना तसे निर्देश दिले

*शेतकऱ्यांनि सदर योजनेचा लाभ घ्यावा*: *प्रकाश मारोटकर*
*शेतकऱ्यांना सबसिडीवर बियाणे देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून लकी ड्रॉ पद्धतीने हा लाभ देण्यात येणार आहे तरी सर्व शेतकऱ्यांनि आपल्या गावातील ग्रा प मध्ये जाऊन ऑपरेटर कडून अर्ज भरून घ्यावा सोबत आधार कार्ड बँक पासबुक 7/12 आठ अ घेऊन जाणे काही अडचण आल्यास 9421739100 या नंबर वर संपर्क साधावा अशे आव्हान प्रकाश मारोटकर यांनी केले*

शेतकऱ्यांना पिक विमा व नुकसानग्रस्तांना तात्काळ भरपाई द्या – माजी मंत्री.आ.डॉ.संजय कुटे.

0

 

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

राज्यातील बहुतांशी जिल्हामध्ये पिक आणेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी असल्यांने अशा परिस्थितीत यापूर्वी शासनाने दिल्याप्रमाणे सरसकट प्रत्येक शेतकर्‍याला पिक विमा मिळाला पाहिजे. या अनुषंगाने सर्व पिकविमा कंपन्यांना आपण आदेश करावे. त्याचप्रमाणे वरील निकष उपयोगात आणून हेक्टरी 10 हजार रुपये सानुग्रह अनुदान सरसकट देण्यात यावे. गेल्या आठवड्यात आलेल्या चक्रीवादळामुळे भालेल्या तुकसानाचे पंचनामे त्वरित करावे व झालेल्या पंचनाम्याप्रमाणे तात्काळ भरपाई मिळवून देण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे यांनी 24 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.राज्यातील शेतकर्‍याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा खरीप हंगाम सुरु होत आहे. सध्या कोरोना महामारीमुळे व नुकत्याच झालेल्या अनेक नैसर्गिक संकटानि हैराण करून ठेवले आहे. खरीपच्या नियोजनात बि-बियाणे, खाते, औषधी, सिंचन व्यवस्था व अत्य प्रकारच्या नियोजनासाठी आर्थिक अडचणी निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कोरोना महानारीमुळे राज्यभरातील बहुतांश दुय्यम कार्यालये बंद असल्यामुळे बँकांकडून कर्ज पुरवठा होणे बंद झाले आहे.यावरील निर्बंध शिथिल केल्यामुळे शेती तारण व्यवस्था सुरळीत होऊन कर्ज पुरवठा होऊ शकेल. त्याचप्रमाणे बँका फक्त 3 तासच काम करत असल्यामुळे सध्या त्यांची प्राथमिकता फक्त दैनिक व्यवहारापुरधीच असून कर्ज प्रकरणे करणे बंद आहेत. त्यांना पूर्णकालींन काम करण्यास मुभा मिळाल्यास पिक कर्ज प्रकरणे त्वरित होतील व शेतकर्‍याचि समस्या सुटेल. याप्रमाणे कार्यवाही त्वरित झाल्यासं अन्य खरीप हेगामाच्या तोंडावर अडचणीत आलेल्या आपल्या राज्यातील शेतकर्‍यांना भरीव मदत मिळून देता येईल तरी उपरोक्त मुद्दयांवर गंभीरतेने विचार करून शेतकर्‍यांना न्याय मिळवूत द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात अली आहे.

ग्रा.पं. वडनेर येथे कोरोणा साथ नियंत्रण आढावा बैठक व साहित्य वाटप 

0

 

सचिन वाघे वर्धा

वडनेर :–ग्रा.पं. वडनेर येथे मा.सौ कविता विनोद वानखेडे यांचे अध्यक्षेत कोरोना संसर्ग नियंत्रण करीता आढावा सभा घेण्यात आली.
सभेला ग्रा.रू. वडनेर चे अधीक्षक डॉ.पाटील, तलाठी इंगळे, गावातील आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रा.वि.अ. रामटेके, उपसरपंच सुभाष शिंदे उपस्थित होते.
गावात कोरोणा ची लागण झालेले 112 रुग्ण होते परंतु नियंत्रण समितीने गृहभेटी देऊन रुग्णांची काळजी घेऊन योग्य मार्गदर्शन केल्यामुळे गावात फक्त 8 रुग्ण असल्याचे आशा सेविकांनी सांगितले.
सभेच्या निमित्ताने ग्रा.पं.वडनेर च्या वतीने आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांना आरोग्य किट चे उपस्थितांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
तसेच गावात कोरोणा प्रतिबंधत लस घेण्याबाबत जनजागृती करून सर्वांनी लस घेण्यात यावी असेही मार्गदर्शन करण्यात आले.
गावात मोठ्या प्रमाणात कोरोणा रुग्ण असताना आरोग्य विभागाने योग्य नियोजन केल्यामुळे रुग्ण बरे झालेले असून काही दिवसात गाव कोरोणा मुक्त होणार असे सरपंच वानखेडे यांनी सांगितले व गाव कोरोणा मुक्त करण्याचा संकल्प उपस्थित सर्वांनी व्यक्त केला.
डॉ. पाटील यांनी सभेला कोरोणा संसर्ग व लसीकरण बाबत मार्गदर्शन केले.

यावल ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण कल्याण समिती ही नांवालाच रुग्णांच्या प्रश्नांकडे कुणाचेही लक्ष नाही समितीच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील ग्रामीण रुग्णालयाची रुग्ण कल्याण समिती मागील १oवर्षापासुन फक्त नांवालाच असल्याचे दिसुन येत असल्याने रुग्णालयात लावलेल्या फलकावरच ही समिती असुन , यातील अनेक सदस्य असलेले अधिकारी हे यावल येथे प्रशासकीय सेवेत कार्यरत नसल्याने ही सामिती अस्तित्वात आहे किंवा काय असा प्रश्न निर्माण झाले असुन ,या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधी यांनी जातीने कोरोनाच्या संकटकाळात रुग्णांच्या आरोग्याशी निगडीत संबधित प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे . दरम्यान यावल येथील ग्रामीण रुग्णालयातील नागरीकांच्या दैनंदीन समस्यांचे निराकरण व्हावे तसेच रुग्णालयाच्या संबंधीत विविध प्रश्न सोडविण्यात करीता शासन मान्यता प्राप्त राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत ,ग्रामीण रुग्णालय रूग्ण कल्याण समितीची स्थापना करण्यात आली असुन , या रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष वाय पी सपकाळे , ( गट विकास अधिकारी यावल ) , उपाध्यक्ष विजयकुमार जयकार ( वैद्यकीय अधिकारी सा . रु . जळगाव ) यांची नांवे दिसत असुन तर सदस्य म्हणुन ९ वर्षापुर्वीच यावलहुन बदलुन गेलेले तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता आर आर चिरमाडे यांच्यासह काही अधिकारी समिती सदस्य तर सेवानिवृत्त झाले आहे तर काहींच्या बदल्या झालेल्या आहेत . या रुग्ण कल्याण समिती मधील अध्यक्षा पासुन तर सर्व कार्यकारणीतील सदस्य हे यावल येथे शासकीय सेवेत कार्यरत नसल्याने या समितीच्या अस्तित्वावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असुन , दरम्यान समितीच अस्तित्वात नाही तर नागरीकांच्या आरोग्यांशी निगडीत समस्या , शासनाकडुन रूग्णालयाच्या देखभाल व दुरुस्ती करीता येणाऱ्या निधीचे काय असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले असुन , रावेरचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी आणी चोपड्याच्या आमदार सौ .लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी तात्काळ या समितीची पुर्नबांधणी करुन रुग्णांना आपल्या आरोग्या विषयी प्रश्न मांडण्या करीता रुग्णालयाशी संबधीत एक कक्ष उभारणी करावी जेणे करून योग्य उपचाराच्या दिशेपासुन भटकलेल्या रुग्णालयास उपचाराची दिशा मिळेल अशी मागणी असंख्य नागरीक करीत आहे .