Home Blog Page 463

मुख्याध्यापक, सहायक शिक्षकही निलंबित!; मुलाकडून शौचालय साफ करून घेतल्याचे प्रकरण

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

संग्रामपूर तालुक्यातील मारोड (ता. संग्रामपूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील शौचालय एका शाळकरी मुलाकडून साफ करून घेतल्या प्रकरणी यापूर्वी ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आले होते. आता शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र भीमराव रोठे व सहायक शिक्षक मुकुंद सखाराम नरोटे यांना निलंबित केले आहे. ही कारवाई जिल्हा परिषदेच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री विसपुते यांनी केली. निलंबन काळात त्‍यांला लोणार तालुक्‍यातील पिंपळनेरची शाळा मुख्यालय देण्यात आली आहे.

घटनेची चौकशी सुरू असून, जिल्हास्‍तरीय समितीचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. त्‍यानंतर आणखी काही जणांवर कारवाई होऊ शकते. मारोड येथे कोरोना विलगीकरण कक्ष तयार करताना एका शाळकरी मुलाकडून शौचालय साफ करून घेण्यात आले होते. याचा व्हिडिओ सर्वत्र व्‍हायरल झाल्‍याने खळबळ उडाली होती. दुसरीकडे ग्रामसेवक शिवदे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी ग्रामसेवक संघटनेने जि.प. सीईओंना निवेदन दिले आहे

यावल ते सातोद मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय गोदामा पर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणास बहुप्रतिक्षेनंतर सुरूवात

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील यावल ते सातोद मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय धान्य गोदामा पर्यंतच्या रस्त्याच्या दोन वर्षापासुनच्या मोठया प्रतिक्षेनंतर सुरूवात करण्यात आली असुन, या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण तात्काळ व्हावे यासाठी विविध पक्षांच्या वतीने मागणी करण्यात आली होती , अखेर प्रशासनाने याची दखल घेत कामाला अखेर सुरुवात झाल्याने शेतकरी ,पादचारी व वाहन धारकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे . या संदर्भातील वृत्त असे की , यावल ते सातोद या मार्गावरील बुरूज चौक ते शासकीय धान्य गोदामा पर्यंतच्या ५०० मिटर रस्त्याचे डांबरीकराणाचे बहुप्रतिक्षेत असलेल्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात झाली आहे . दरम्यान अत्यंत वेगाने होत असलेल्या या डांबरीकरणाच्या कामात संबधीत ठेकेदाराकडुन डांबराचा अत्यल्प प्रमाणावर वापर करण्यात येत आहे असुन , येणाऱ्या पावसाळयातच हा रस्ता जैसे थे अवस्थेत येण्याची चिन्ह दिसुन येत असुन , यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदरच्या डांबरीकरणाच्या कामावर नियंत्रण नसल्याचे बोलले जात असुन , संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदरचे काम हे अटीशर्तीच्या अधिन राहुन करण्यात येत आहे की नाही याची खातरजमा करणे हे त्यांचे कर्तव्य असुन तात्काळ या डांबरीकरणाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे .

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव विजय कायस्थ हे प्रदीर्घ सेवेनंतर झाले आज कौटुंबीक कार्यक्रमात सेवानिवृत्तपर दिला निरोप

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

येथील कृषी उत्पन्न समिती यावलचे सहसचिव विजय कायस्थ यांचा सेवापुर्ती निरोप समारंभ कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अगदी साद्या पद्धतीने सोहळा पार पडला . दरम्यान यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे जेष्ठ सहसचिव विजय कायस्थ हे आपल्या प्रदीर्घ सेवाकार्यातुन सेवानिवृत्त झाले . यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहातील दालनात आज दिनांक १ जुन २०२१रोजी सकाळी ११ वाजता संपन्न झालेल्या या सेवापुर्ती निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणुन माजी सभापती व संचालक नारायण शशीकांत चौधरी , संचालक उमेश पाटील , सत्तार तडवी , सुनिल बारी , अशोक चौधरी , सचिव स्वप्नील सोनवणे , योगेश चौधरी यांच्यासह आदी कर्मचारी या कार्यक्रमास प्रामुख्याने उपास्थित होते . यावल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षा पासुन कार्यरत असलेले सहसचिव विजय कश्यप यांनी सन१९या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीचे म्हणुन या पदा वरून त्यांनी आपल्या सेवाकार्यास सुरुवात केली होती व आज ते आपल्या सेवेच्या प्रदीर्घ सेवाकार्यातुन सेवानिवृत्त झालेत दरम्यान आज यावल येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमात सहसचिव विजय कायस्थ यांना सेवापुर्ती कार्यक्रमात सपत्नीक निरोप देण्यात आले . या निरोप समारंभा प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांनी सहसचिव विजय कायस्थ यांनी केलेल्या आपल्या प्रदीर्घ सेवेत निष्काम सेवाभावी वृत्तीने केलेल्या उल्लेखनिय सेवाकार्याचा उल्लेख आपले मनोगतपर विचार मांडतांना व्यक्त केले .

बोरखेडा खुर्द ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच आणी ग्रामसेवकानी केला संगनमतांनी गैरव्हवहार व भ्रष्ठाचार चौकशीची जिल्हा परिषद कडे मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील बोरखेडा ग्रामपंचायतमध्ये सरपंच व उपसरपंच आणी ग्रामसेवकाचा मनमानी कारभार व यातुन लाखो रुपयांचा गैरव्यवहार गटविकास अधिकारी आणी उपमुख कार्यकारी अधिकारी ( ग्रा.प. )जळगाव जिल्हा परिषद यांच्या कडुन हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीचे ९ पैक्की सात सदस्य आणी गावातील अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी वरिष्ठ पातळीवर दिल्यावर या सर्व गोंधळाची चौकशी होवुन कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा ईशारा दिला आहे. या संदर्भात यावल पंचायत समितीचे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांनी ग्रामपंचायत बोरखेडा खुर्द तालुका यावल यांनी दिनांक ११ / ८ / २०२० रोजीच्या दिलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीच्या व५ टक्के अबंध निधितुन मागील अडीच वर्षाच्या कालावधीत सरपंच , उपसरपंच तथा ग्रामसेवक यांनी १९ / ०२ / २०१९पासुन तर २४ / ४ /२०२०पर्यंतच्या सर्वसाधारण सभा कोरम पुर्ण असतांना ही तहकुब करून मनमानी कारभार करून संगनमताने शासकीय निधीत मोठा आर्थीक भ्रष्टाचार व गैरव्यवहार केल्याच्या लिखित तक्रारी करण्यात आल्या असुन , या तक्रार अर्जात दर्शविण्यात आलेली कामे व त्यासाठी झालेले खर्च पुढीलप्रमाणे विहीर खोदकाम खर्च ४३००० हजार , एलईडी लाईट ९९९८८, नवीन पाईपलाईन दोन लाख रुपये , जिल्हा परिषद शाळा संरक्षण भिंत दोन लाख रुपये , पेव्हर ब्लॉक खर्च१ लाख८५००० हजार रुपये , ग्राम पंचायत कार्यालय दुरुस्ती ७१ हजार रुपये खर्च , अंगणवाडी अॅक्वागार्ड व गणवेश खर्च१ लाख रुपये , कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सॅनेटाईझर, मास्क , आक्झोमिटर खरेदी १ लाख९९५० हजार खर्च याशिवाय गाव पातळीवर आपले सरकार सेवा केन्द्र दहा टक्के रक्काम अनुसार २लाख५५ हजार२३४ रुपये अशा प्रकारे ग्रामपंचायत च्या माध्यमातुन खर्च झाल्याचे दर्शविण्यात आले असुन या सर्व आर्थिक व्यवहारारात मोठा भ्रष्ठाचार व गैरव्यवहार झाल्याची तक्रार करण्यात आली असुन , याशिवाय ग्रामपंचायत मालकीचे शेतजमीनचे शेत स्वामित्व रक्कम जमा करून ग्रामपंचायतीने वर्ष२०१८ते ३१ / ० ३ / २०२१पर्यंत ग्रामपंचायत मालकीचे शेतचा १ लाख३० हजार प्रति वर्षा प्रमाणे तिन वर्षाकरीता तिन लाख९०हजार रुपये प्रमाणे सदरची रक्कम ही ग्रामपंचायतीकडे जमा झालेली दिसुन येत नसल्याचे दिसुन येत आहे . या व्यतिरिक्त विद्यमान सरपंच जमशेर तडवी , उपसरपंव , तथा ग्रामसेवक यांनी संगनमताने लाखो रुपयांचा भ्रष्ठाचार आणी गैरव्यहार केल्याचे दिसून येत असुन, तात्काळ या बोरखेडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत सर्व झालेल्या भ्रष्ठाचाराच्या आणी गोंधळलेल्या कारभाराची वरिष्ठ पातळीवर निष्पक्ष चौकशी करून संबधीतांवर कार्यवाही करावी अशी लिखित तक्रारी व्दारे मागणी ग्रामपंचायत सदस्य रहीम गुलशेर तडवी , छब्बीर शेखर तडवी , मेहरबान हबीब तडवी , आशाबाई मुबारक तडवी , नसीबा रशीद तडवी , सईदा हमिद तडवी आणी जयश्री सुनिल चौधरी यांच्या वतीने करण्यात आली आहे .

कोरोना संकटात बेरोजगार झालेल्या नाभिक समाजाला जिल्हाधिकारी यांनी व्यवसायाची परवानगी द्यावी : श्री जिवा महाले नाभिक संस्थेची मागणी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

मागील दिड वर्षापासुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या शेकडो नाभिक समाजावर हालाकीची चे प्रसंग ओढवले गेले असुन , आम्हास महाराष्ट्र शासनाने कुटुंबास उपासमारी पासुन वाचविण्यासाठी लॉकडाऊनच्या चाकोरीत राहुन व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी आज यावल येथील श्री जिवा महाले नाभिक बहुऊदेशीय संस्थेच्या माध्यमातुन तहसीलदार महेश पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे . या संदर्भात श्री जिवा महाले नाभिक बहुऊदेशीय संस्थाच्या वतीने देण्यात आलेल्या लिखित निवेदनात म्हटले आहे की , राज्यात मागील दिड वर्षांपासुन सर्वत्र कोरोना संसर्गामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणुन लॉकडाऊन लावण्यात आले असुन, यामुळे सर्व व्यवसाय सोबत नाभिक समाजाचा व्यवसाय देखील बंद झाला असुन यामुळे समाज बांधवांनी आपला परिवाराचे उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न पडला असुन, नाभिक समाजापुढे दुसरे रोजगाराचे साधन नाही , समाजाचा सलुन चालविणे हा जन्मजात व्यवसाय असल्यामुळे समाजा समोर पर्याय नाही . जळगाव जिल्ह्याच्या नाशिक , पुणे आणी मध्यप्रदेश सारख्या राज्यात आमच्या व्यवसायाला शासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली आहे . मग जळगाव जिल्ह्यातील नाभिक समाजाला सलुन व्यवसायाची परवानगी का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे . बेरोजगारीमुळे व रोजगार अभावी आर्थिक संकटात सापडलेल्या समाजाची सहनशक्ती संपली असुन ,सयंम ही सुटले असुन , समाज बांधवांसमोर आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नाही अन्यथा जिव वाचविण्यासाठी आंदोलनाचा दुसरा पर्याय नसल्याने जिल्हाधिकारी हे आमचे पालक असुन त्यांनी आमच्या समाजावर अन्याय होणार नाही अशी पालकतत्व कर्तव्याची जाणीव ठेवुन आम्हास न्याय द्यावा अशी मागणी केली असुन , या निवेदनावर संस्थेचे अध्यक्ष अनिल तोताराम चौधरी , सुपडु शामराव वारूळकर , रविन्द्र सुकदेव आमोदेकर , सुरेश विलास चौधरी , अंनतारे देविदास चौधरी , राहुल उमाकांत चौधरी , शेख सलीम शेख शरीफ ,दिलीप रंगनाथ चौधरी , सुनिल पाडुरंग संनसे,रणजित सुकलाल ठाकरे, सुरेश भिका चौधरी यांच्या स्वाक्षरी आहे .

लॉक डाऊन मुळे व्यवसायात नुकसान गळफास घेऊन आत्महत्या

0

 

सचिन वाघे वर्धा
2.5.21
हिंगणघाट
स्थानिक संत तुकडोजी वार्ड येथील रहिवासी अरविंद पुंडलीकराव चंदनखेडे (४५) यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ७.३० वाजता उघड़कीस आली.
मृतक अरविंद चंदनखेडे हे कंत्राटदार असून संचारबन्दी दरम्यान त्यांचे व्यवसायात मोठे नुकसान झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला,याचे निराशेपोटी त्यांनी इहलोक सोडून जाण्याचा निर्णय घेतला.
मृतक अरविंद हे संत तुकडोजी वार्ड परिसरातील प्रज्ञानगर भागात रहात असून त्यांचेमागे पत्नी,तीन भाऊ,बहिण,२ मुली असा मोठा आप्तपरिवार आहे.
शहरातील शासकीय कंत्राटदार अशोक चन्दनखेड़े यांचे ते छोटे बंधु होते.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास पोहवा वीरेंद्र कांबळे,बंडू महाकाळकर करीत आहे.

मनवेलच्या निराधार विधवा महिलेच्या मंजुर रमाई घरकुलाचे अनुदान थांबविले ४ जुन पासुन यावल येथे आंदोलन : जगनभाऊ सोनवणे

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील मनवेल गावात एका विधवा व निराधार महिलेच्या रमाई घरकुल योजने अंतर्गत मंजुर होवुन बांधकाम झालेल्या घरकुलास सरपंच व ईतरांच्या विरोध असल्याने पावसाळया पुर्वीच आपले घरकुल पुर्ण व्हावे यासाठी निराधार महीलेची भटकंती होत असल्याने दरम्यान तात्काळ या महीलेस न्याय न दिल्यास यावल पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा ईशारा भुसावळ येथील पिपल्स रिपब्लीकन पार्टी ( प्रा . जोगेन्द्र कवाडे सर ) यांच्या वतीने प्रदेश महामंत्री जगनभाऊ सोनवणे यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्राद्धारे दिला आहे . या संदर्भात प्रदेश महामंत्री जगनभाऊ सोनवणे यांनी म्हटले आहे की , यावल तालुक्यातील मनवेल येथील राहणाऱ्या मंगलाबाई रामदास इंधाटे या विधवा व निराधार महिलेचे रमाई या योजनेअंतर्गत घरकुल मंजुर झाले असुन असे असतांना मात्र घरकुलाचे बांधकाम अर्ध्यावर आलेले असतांना ग्रामपंचायतीचे सरपंच जयसिंग देवराम सोनवणे आणी ग्रामसेवक यांनी सार्वजनिक मुतारीच्या विषया वरून काही ग्रामस्थांच्या तक्रारी झाल्याने अखेर या घरकुलाचे बांधकाम बंद झाल्याने उर्वरीत मिळणारे अनुदान रुपाचे हफ्ते थांबविल्याने हे कामबंध करण्यात आले असल्याचे वृत्त आहे . याबाबत सदर मंगला सोनवणे या विधवा व निराधार महीलेने पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे महामंत्री जगनभाऊ सोनवणे यांच्याकडे आपल्याला घरकुलांचे उर्वरीत हफ्ते व ग्रामपंचायतीने काम बंद पाडल्याची तक्रार केल्याने आज सोनवणे हे यावल येथे पंचायत समितीच्या कार्यालयात येवुन त्यांनी विस्तार अधिकारी के सी सपकाळे यांची भेट घेवुन त्यांना मनवेल येथील निराधार महीलेच्या मंजुर झालेल्या रमाई घरकुल योजनेचे लाभ मिळवण्यासाठी होत असलेल्या मानसिक त्रास व अडचणी बाबत ची माहीती दिली व तात्काळ या महीलेचे उर्वरीत घरकुलाचे हफ्ते व बांधकाम सुरू न झाल्यास आपण दिनांक ४ जुन रोजी १o विविध संघटनाच्या माध्यमातुन ताला ठोको आंदोलन करणार तसेच दिनांक ७ जुन रोजी दुपारी २ वाजता यावल पंचायत समिती समोर हल्लाबोल आंदोलन व दिनांक १० जुन रोजी सुमारे २०० स्त्री पुरुषांचे आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा या वेळी जगनभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकारी के सी सपकाळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे .

उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा:-जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर यांची आग्रही मागणी.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

आरमोरी : जिल्ह्यात शासनाने ठरवून दिलेल्या आधारभूत किंमतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने येथील आरमोरी शेतकी खरेदी विक्री सोसायटीच्या मार्फतीने धान खरेदी केल्या जाते.मात्र यावर्षी शेतकऱ्यांचे धान मळणी करून दोन महिन्याचा कालावधी लोटला तरी मात्र शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू झालेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल भावात धान विकावे लागत आहे.शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीचा विचार करण्यात यावा.लवकरात लवकर सात दिवसाच्या आत आरमोरी येथील आधारभूत धांन खरेदी केंद्र सुरू करण्यात यावा, अन्यथा शेतकऱ्यांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या मनीषा दोनाडकर यांनी दिला आहे.
एप्रिल महिन्यात धान्याचे उत्पादन झाले,मे महिना संपूनही गेला तरीही आरमोरी येथे धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही.हि फार गंभीर बाब आहे.फक्त शेतकऱ्यांना आशेवर ठेवण्यासाठी सातबारे ऑनलाइन करण्यात येत आहे. परंतु अधिकचा वेळ धान खरेदी केंद्र सुरू होण्यासाठी लागत असल्याने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्याकडे अल्पशा किमतीत विकण्याची वेळ आली आहे.खाजगी व्यापारीसुद्धा सुरुवातीला ठोकळ धानाला १४०० ते १५०० रुपये दरम्यान भाव देत होते.परंतु आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू होत नसल्याने मागील १५ दिवसापासून खाजगी व्यापारी सुद्धा शेतकऱ्याला १२५० ते १३५० रुपये धानाला भाव देत असल्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळ्यात पावसामुळे २० ते ३० टक्के धान जमीनीच्या खाली गळल्या गेला.त्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांना उत्पादनात खूप मोठी घट निर्माण झाली आहे.धान पिका लागवड करण्यापासून ते कापणीपर्यंत एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च करावा लागत असून उत्पादन मात्र खर्चाच्या तुलनेत होत नाही.शासन धानाची १८६५ रुपये प्रती क्विंटल या हमीभावाने खरेदी करीत असल्या थोडा फार शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो.मात्र मे महिना संपला तरी खरेदी विक्री सोसायटी आरमोरीने धान खरेदी केंद्र सुरू केले नाही.येत्या सात दिवसाच्या आत आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकऱ्यांसोबत आंदोलन करून खरेदी-विक्री सोसायटी आरमोरीच्या व्यवस्थापकासह पदाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंबून ठेवणार असल्याचा इशारा जि.प. सदस्या सौ मनिषा दोनाडकर यांनी दिला आहे.

वडनेर येथील इसमाचा नांदुरा येथे अपघाताने मृत्यू, मृतकाच्या अंत्यविधीसाठी संग्रामपूर येथून येत असलेल्या नातेवाईक महिलेचा नांदुरा येथे ट्रकच्या धडकेने मृत्यू

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-
वडनेर येथील
श्री निनाजी धोंडू कुयटे वय ६८ वर्ष हे खरेदी विक्री समोरून जात असताना त्यांना टाटा कंपनीचे ट्रेलर क्रमांक GJ१३BW९०४५ चालक बिरम नयनु सिंग राहणार खेडा देवणारायान जिल्हा अजमेर राजस्थान यांनी धडक दिली यामध्ये निनाजी कुयटे यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रेलर चालक पोलीसांच्या ताब्यात असून पुढील
तपास पीएसआय दौंड साहेब करीत आहेत. तसेच निणाजी कुयटे यांच्या अंत्यविधीसाठी संग्रामपुर येथून येत असलेले नातेवाईक हरिदास तुळशीराम नागे वय ५२ वर्ष त्यांचा मुलगा विजय आणि पत्नी लीलाबाई यांचा नांदुरा येथे अपघात झाला. यामधे ट्रक वाहन क्रमांक आर जे १९ जि एफ ५९४६ चालक अधूराम दुदी घुगाराम दुदि राहणार तरातराम तहसील चोहटन जिल्हा बारमेर राजस्थान यांनी हरिदास नागे यांच्या दुचाकीला मागून जबर धडक दिली. यामधे लीलाबाई ह्यांचा जागीच मृत्यू झाला. वाहन चालक यांच्यावर कलम २८९,३३७,३०४ अ भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व सदर वाहन चालक पोलीसांच्या ताब्यात आहे. याबाबत पुढील तपास ए पि आय विरकण मॅडम करीत आहे.

वाढदिवस साधपणाने साजरा करीत गरिबांना केले मिठाई चे वाटप

0

 

 

तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

आज यावल येथील शिवसेनेचे शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांची मुलगी कु सायली कवडीवाले हिने आपला वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा करीत गरीब नागरिकांना व गरजू लोकांना यावल येथील शासन मान्य व शिवशक्ती बचतगट संचालित शिवभोजन थाळी माध्यमातून प्रत्येक थाळी पार्सल द्वारा मिठाई चे वाटप केले व एक स्तुत्य उपक्रम राबविला. आपल्या वाढदिवसाचा खर्च न करता गरिबांना मिठाई वाटप करून नव्या पिढी समोर आदर्श ठेवला.यावल येथील शिवभोजन केंद्रावर सुरवातीला स्वराज्य फाउंडेशन चे अध्यक्ष श्री भरत चौधरी ,व शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले यांचे हस्ते दीपप्रज्वलनाने व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला हार अर्पण करून उपस्थित गरजू गरीब नागरिकांना शिवभोजन थाळी पार्सल चे मिठाई सह वाटप करण्यात आले.यावेळी भरत चौधरी,शिवसेना तालुका उप प्रमुख शरद कोळी,शहर उप प्रमुख संतोष धोबी,तालुका संघटक आर के सर,विभाग प्रमुख योगेश राजपूत यांचे हस्ते वाटप करण्यात आले.या साठी शिवभोजन केंद्र संचालक व त्यांचे सहकारी यांनी सहकार्य केले.या स्तुत्य उपक्रम बद्दल कु सायली हीचे वाढदिवसा निमित्त अनेकांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.