Home Blog Page 465

कडक लॉक डाऊन मध्ये शिथिलता द्या विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
18.5.21 हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यामध्ये महिन्याभरापासून कडक लॉक डाऊन आहे .दिनांक 8 मे पासून 13 मे पर्यंत कडक लॉक डाऊन जिल्हाधिकारी यांनी घोषित केले त्या वेळी अनेक गोरगरीब जनतेने आपली पाच दिवसाची खाण्यापिण्याची व्यवस्था केली. परंतु त्यानंतर दिनांक 12 मे ला पुन्हा एक नविन आदेश काढून तेच कडक लॉक डाऊन पूर्ववत सुरू ठेवण्यात आले लोकांनी ते पुन्हा पाच दिवसाचे कडक लॉक डाऊन सहन केले. परंतु त्यानंतर 16 मेला एक नवीन आदेश निघाला व त्या आदेशामध्ये अशाच प्रकारचे कडक लॉक डावून सतत 1 जून पर्यंत राहील असे नमूद आहे. अगोदरच सर्वसामान्य जनता लॉक डाउन ने त्रस्त झाली असताना व दहा दिवसाचे कडक लॉक डाऊन सहन केले असताना त्यानंतर पुन्हा 13 दिवसाचे कडक लॉक डाऊन हे जनतेच्या हिताचे नाही म्हणून हिंगणघाट शहरातील व्यापारी संघटनांचे अध्यक्ष, शहराचे नगराध्यक्ष , लोकप्रतिनिधी , कामगार प्रतिनिधी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त सभा घेऊन यावर काही तोडगा काढता येईल का ? याकरिता माननीय उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदन देऊन तारीख व वेळ कळवावी असे निवेदन अनिल जवादे यांनी माननीय उपविभागीय अधिकारी हिंगणघाट यांना दिलेले आहे

वर्धा जिल्ह्यात लाॅकडाॅऊन शिथील करा ! जिल्हाधिकारी यांना डॉ.उमेश वावरे यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
18.5.21
वर्धा जिल्हा संपूर्ण कृषी वर आधारित असुन ग्रामीण लोकांना व मंजूर व ईतर कामगारांना आॅनलाईन चे व्यवहार करणे शक्य नाही .
काही शेतकरानच्या चे भाजीपाला शेतात पडून सडत आहे. त्याना न्याय मिळाला. वेळेवर आणून आपल पोटभर णारे पुष्कळ लोक आहे त्यामुळे त्यानचा वर उपासमारी चि वेळ आली आहे.
मार्गदर्शन तत्वे सागितले आहे त्या नुसार 7ते 11 पर्यंत सर्व दुकाने व भाजीपाला. पेट्रोल पंपु सुरू ठेवा अशे नविन आदेश पारीत करावे अंशी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे. नी जिल्हा अधिकारी वर्धा श्रीमती. प्रेरणा देशभ्रतार यांनाचा सोबत चर्चा करण्यात आली व लवकर च लाॅकडाॅऊन शिथील करू अशे सागनात आले व शासनाच्या गाईड लाईन दिला त्यानचे पालन जनतेनी करावे..निवेदन देताना मनिष कांबळे. राजूभाऊ घोरडे राजेश खानकूरे. दिलिपभाऊ कहूरके. जिवनभाऊ उरकुडे. उपस्थित होते….

गीमाटेक्स वनी युनिट कामगार संघटनेकडून मृतकाच्या परिवाराला आर्थिक मदत

0

 

सचिन वाघे वर्धा
18.5.21
हिंगणघाट :– गिमाटेक्स वणी युनिट येथील कामगार सौ दर्शना सुनील लोणारे ही महिला टी .एफ.ओ.विभागात कामगार म्हणून कार्यरत होती.दि.१२/३/२०२१/ला काही कारणास्तव अल्पस्या आजाराने निधन झाले त्या अनुषंगाने वर्धा जिल्हा सुती मिल मजदुर संघ वणी (हिंगणघाट) येथील सर्व कामगारांच्या पगारातून प्रती १००/कपात करुन तिच्या परीवाराला आर्थीक मदत म्हणुन १५०७००/रु चेक देते वेळी उपस्थित संघटनेचे सचिव . पांडुरंग बालपांडे उप सचिव अश्र्विन ढाले दामोधर देशमुख दीवाकर बरबटकर जयंत बावणे प्रशांत शेळके गणेश बरडे हेमंत भगत सुनिल सुपारे विनोद कावळे प्रमोद येरेकर विजय थुल विनोद कोल्हे राहुल देशमुख लक्ष्मन जयपूरकर .व व्यवस्थापन पैकी मा.डी.जी.एम.गायकवाड साहेब व पराग जुमडे साहेब व इत्यादी हजर होते.

अज्ञात व्यक्तीने तोडले विद्युत कनेक्शन व स्टार्टर ची चोरी

0

 

 

संग्रामपूर तालुक्यातील करमोळा शिवारातील शेतातील बोर वेल विद्युत कनेक्शन तोडले व मीटर पेटीतील स्टार्टर व केबल चोरून नेले अशी तक्रार नऊ मे रोजी करमोळा येथील सुखदेव नामदेव थोटे यांनी संग्रामपूर पोलीस स्टेशनला दिली आहे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हे कृत्य केले असावे अशी लेखी तक्रार दिली आहे परंतु संग्रामपूर पोलीस स्टेशन मार्फत सात ते आठ दिवस उलटूनही कोणतीच चौकशी झाली नाही परिणामी शेतकऱ्याच्या शेतातील असलेले संत्र्याची झाडे ही पाणी अभावी सुकत आहे व चौकशी होत नसल्याने या करणास शेतकऱ्याने पोलीस स्टेशन जबाबदार धरले आहे तरी या घटनेची लवकरात लवकर चौकशी करावी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे

धानोरा गांवा वर शोककळा .मामा भाच्यांसह धरणात बुडवून तिघांचा अंत..!!

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

धानोरा महासिध्द:-जळगांव जामोद तालुक्यातील धानोरा लघु प्रकल्पात (हत्ती पाऊल धरणात) मामा व दोन भाच्यांचा धरणात डूबुन करून अंत झाल्याची घटना आज दि 18 मे रोजी सकाळी7 उघडकीस आली.
सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तीर्थ क्षेत्र धानोरा महासिध्द गावांवर शोककळा पसरली 17 मे रोजी दुपारी 3:30वाजेच्या दरम्यान पुणे येथे जॉब करणारा विनायक गाडगे वय 27 वर्षे सध्या लोकडाऊ मुळे धानोरा येथे घरी आला व्होता व त्याला सोबती त्यांचे काका चा मुलगा तेजस गाडगे वय 18 वर्ष व लग्न समारंभा करिता दाताळा ता मलकापूर वरून आपल्या बहिणीला घ्यायला धानोरा येथे आलेले त्यांचे मामा श्री नामदेव वानखडे वय 43 वर्षे हे तिघे जण धानोरा लघु प्रकल्प परिसरात फिरायला गेले सध्या उन्हाळा असल्याने ते पाण्यात पोहण्यासाठी गेले.
परंतु रात्री उशिरापर्यंत तिघे जण घरी नपरतल्याने नातेवाईकांनी शोध शोध सुरू केली सदर घटनेची माहिती गावचे पोलीस पाटील यांनी पोलीस टेशनला दिली. धरणपरिसरात शोध सुरू असताना त्यांचे कपडे व मोबाईल फोन पाण्याचे काठावर आढळून आले तो पर्यंत रात्र झाल्यानें अंधारात सदर मृतकांचा शोध लागला नाही आज सकाळी पुन्हा शोध घेतला असता पाण्यामध्ये मूरतदेह तरंगताना निदर्शनास आले. पाण्यात पोहणार्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले
गावात सदर घटने बद्दल हळ व्यक्त केली जात आहे.

 

शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा-आमदार राजेश एकडे

0

 

सुनील पवार नांदुरा

शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा अशी आग्रही मागणी आमदार श्री.राजेश एकडे यांनी राज्याचे कृषी मंत्री मा.श्री.दादाजी भुसे यांच्या कडे आज निवेदना द्वारे केली आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे शेतीची मशागत करणे बी-बियाणे व खते खरेदी करणे,शेती उपयोगी अवजारे खरेदी करणे अशा विविध कामासाठी शेतकऱ्याला आर्थिक गुंतवणूक करावी लागते परंतु खरीप हंगाम २०२० चा शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप पर्यंत मंजूर झालेला नाही परिणामी शेतकरी बांधवांनसमोर गंभीर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. मागील १४ महिन्यापासून राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरू असलेले लॉकडाऊन,कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट,मागील खरीप व रब्बी हंगामात झालेले मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान या मुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे व पुन्हा सावकारी कर्ज काढण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.परिणामी आणखी बिकट आर्थिक परिस्थितीला शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागेल.या संपूर्ण बाबीचा सहनुभूतीपूवर्क विचार करून बुलडाणा जिल्हासह मलकापूर विधान सभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा हक्कांचा पीक विमा तात्काळ मंजूर करावा असे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी कृषी मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

रासायनिक खतांच्या वाढत्या किमती मुळे शेतकरी कोमात

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

शेतकऱ्यांची खरीप हंगामाची तयारी करीत असताना लॉक डाऊन मुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला नाही त्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचा माल घरात पडून आहे व कोरोना महामारी अशातच कधी नव्हे ते बियाणे व खतांचे भाव वाढ झाली असून रासायनिक खताच्या किमती जवळपास दीड पटीने भाव वाढले आहेत आतापर्यंत किरकोळ पन्नास-शंभर भाव वाढ व्हायची यंदा मात्र तब्बल दीड पटीने रासायनिक खताचे भाव वाढ झाली आहे बाजारात आता जे खत आहे ते नवीन भावाचे खत येत आहे व ते भाव दीड पटीने वाढले आहेत पूर्वी 1200 रुपयाला मिळायचे आता ते 1900 रुपये नुसार मिळेल 12/ 32/ 16 / खत 1175 ला मिळायचे तेच आता 1800 ला मिळेल एवढे भाव वाढल्यावर शेतकऱ्याने शेती कशी करायची हा प्रश्न शेतकर्‍यांना पडला आहे या वर्षी जुने खत नवीन भावाने लिहून शेतकऱ्यांची फसवणूक होणे ही शक्यता नाकारता येत नाही जुने खत बिलाची पावती न देता नवीन दराने विक्री करतील या करिता शेतकऱ्यांनी खताचे पक्के बिल घेतलेच पाहिजे कोरोना महामारीत शेतकरी शेतात राबराब राबून अहोरात्र अन्न पिकऊन अशा संकटाच्या वेळीही आपले योगदान देशाला देत आहे असे असताना देखील शेतकऱ्यांच्या पदरात येते तर ती फक्त निराशाच शासनाने व लोकप्रतिनिधींनी व कृषी विभागाने या वाढलेल्या रासायनिक खताच्या दरवाडी संदर्भात स्पष्टीकरण द्यावे व शेतकऱ्याला या संकटातून वाचवावे अशी संतप्त जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे

रासायनिक खते व बी बियाणे यांचे भाव कमी करण्यात यावे बहुजन वंचित आघाडी यांनी केलेली मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा
17.5.21
आज देश्यामधे कोरोणा विषाणूचा फार मोठा प्रदुर्भाव सुरू असुन एकिकडे शेतकरी हा को रोणाशी लढा देत आहे. आज अनेक शेतकरा कडे पैसा नाही. बॅक चे कृषी कर्ज अजून पर्यत शेतकराना मिळाले .नाही हातात पैसा नाही व रासायनिक खते तसेच बि बियानाचे भाव हे 600ते 800 रू प्रती बॅग वाढले आहे .अश्या वेळेस शेतकराने काय करावे हा गभीर प्रश्नन शेतकरा सामोर उभा आहे .शेतीचा हंगाम येवून ठेपला आहे .त्वरीत कृषी कर्ज उपलब्ध करून दायवे खताचे व बियानाचे भाव कमी करण्यात यावे अशे निवेदन वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्वात एस. डी.एम.मार्फत. पतंप्रधान .नरेंद्र मोदी भारत सरकार व.कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर भारत सर tvकार यांना देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे .दिलिपभाऊ कहूरके. चारू आटे. विनोद गोडघाङे. उपस्थित होते..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने निवेदन देऊन केला रासायनिक खते व इतर भाववाढिचा केंद्र सरकारचा केला निषेध

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

:-देशामध्ये पेट्रोल व डिझेलच्या किमती दररोज बेसुमार वाढत असून पेट्रोलने देशात शंभरी पार केली आहे.त्यातच केंद्रातील सध्याच्या भाजपा सरकारने रासायनिक खतांच्या किमतीत बेसुमार वाढ करून देशातील शेतकऱ्यांना दुसरा मोठा धक्का देण्याचे काम केले आहे.
केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या १०:२६:२६ ची किंमत प्रति बॅग ६०० रूपयांनी तर डीएपी ची किंमत प्रति बॅग ७१५ रूपयांनी वाढविली. त्यामुळे कोरोनाच्या महामारीत अगोदरच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप सध्याच्या भाजपा केंद्र सरकारने केले आहे. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिव्र शब्दात निषेध करीत आहे. ही दरवाढ केंद्र सरकारने तातडीने रद्द करावी. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिव्र आंदोलन करेल याची कृपया नोंद घ्यावी ही विनंती. निवेदनावर तालुका अध्यक्ष डॉ प्रशांत दाभाडे, जेष्ठ नेते रंगराव देशमुख,शहर अध्यक्ष अब्दुल जहिर,एम डि साबिर, एजाज देशमुख,शेख जावेद,संजय दंडे,शेख बबलु, संदिप ढगे, अब्दुल हमिद यांच्यासह इतर कार्यकर्ते यांच्या सह्या आहेत

शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा-आमदार राजेश एकडे

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तात्काळ मंजूर करा अशी आग्रही मागणी आमदार श्री.राजेश एकडे यांनी राज्याचे कृषी मंत्री मा.श्री.दादाजी भुसे यांच्या कडे आज निवेदना द्वारे केली आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे शेतीची मशागत करणे बी-बियाणे व खते खरेदी करणे,शेती उपयोगी अवजारे खरेदी करणे अशा विविध कामासाठी शेतकऱ्याला आर्थिक गुंतवणूक करावी लागते परंतु खरीप हंगाम २०२० चा शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप पर्यंत मंजूर झालेला नाही परिणामी शेतकरी बांधवांनसमोर गंभीर आर्थिक प्रश्न उभा राहिला आहे. मागील १४ महिन्यापासून राज्यासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सुरू असलेले लॉकडाऊन,कधी आसमानी तर कधी सुलतानी संकट,मागील खरीप व रब्बी हंगामात झालेले मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान या मुळे शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे व पुन्हा सावकारी कर्ज काढण्याची वेळ त्याच्यावर आली आहे.परिणामी आणखी बिकट आर्थिक परिस्थितीला शेतकरी बांधवांना सामोरे जावे लागेल.या संपूर्ण बाबीचा सहनुभूतीपूवर्क विचार करून बुलडाणा जिल्हासह मलकापूर विधान सभा मतदार संघातील शेतकऱ्यांचा हक्कांचा पीक विमा तात्काळ मंजूर करावा असे आमदार मा.श्री.राजेश एकडे यांनी कृषी मंत्री मा.ना.श्री.दादाजी भुसे यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.