Home Blog Page 469

कोरोना जोमात शेतकरी कोमात

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

कोरोना चा कहर सुरूच आहे पंधरा ते वीस दिवसांवर पेरणी येऊन ठेपली आहे दिवसभर बंद त्यामुळे पीक कर्ज बियाने खते आदींचे कामकाज कसे पार पडावे असा प्रश्न आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पडलेला आहे मागील वर्षापासून सुरू झालेले कोरोना संकट थांबायला तयार नाही सध्या मे महिन्याला सुरुवात झाली असून शेतीविषयक कामे उरकून पिक कर्ज सावकारी उसनवारी कर्ज यासारखे व्यवहार आणि यासोबतच बाजारपेठेत जाऊन खरीप हंगामाकरिता बी-बियाणे खते आदी तयारीला शेतकरी महत्त्व देतात परंतु यामुळे खरिपाच्या तयारीवर मोठा परिणाम होत आहे लॉकडावून काळात बँकेच्या वेळ मर्यादित आहेत बँकांना लागणारे कागदपत्र करिता कार्यालयात जाणे तिथे सध्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी असणे यामुळे तोंडावर आलेल्या खरीप पेरणीचे नियोजन कसे करावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे संचार बंदी मुळे सर्व दुकाने कालपर्यंत सात ते अकरा पर्यंत सुरू राहून बंद होतात त्यामुळे यांची चौकशी सुद्धा करणे कठीण झाले आहे व आता सुरू झालेला लॉकडाऊन त्यातच नैसर्गिक नापिकी व दुष्काळामुळे आर्थिक संकट असल्याने काय करावे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडलेला आहे पेरणीचे दिवस जवळ जवळ येत आहे तरी खरीप हंगाम हातातून गेल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या चिंतेत शेतकरी जीवन जगत आहे शासनाने यासंदर्भात कृषी निविष्ठा वेळेत सूट देऊन सर्वतोपरी आर्थिक मदतीचा हात देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज भासत आहे त्यातच शेतकऱ्यांना सरकारकडून पीक विमा किंवा कोणतीच मदत मिळाली नाही परिणामी शेतकरी हा मोठ्या कोंडीत सापडला आहे व येणारा खरीप हंगामाचे नियोजन कसे करावे याचा प्रश्न जळगाव जामोद परिसरातील शेतकऱ्यांना पडत आहे

वृक्षरोपण करून विनोद वानखेडे माजी सरपंच व सुभाष शिंदे उपसरपंच यांनी वाढदिवस केला साजरा

0

 

सचिन वाघे वर्धा
9.5.21
वडनेर :- विनोद वानखेडे माजी सरपंच वडनेर व सुभाष शिंदे उपसरपंच ग्रा.पं.वडनेर यांचे वाढदिवसानिमित्त ग्रा.पं. परिसरात पिंपळ,आंबा ,जांभूळ,कडुनिंब वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपन कार्यक्रमाला वडनेर ग्रा.पं. सरपंच सौ कविता वानखेडे , ग्रा.पं. सदस्य बबनराव आंबटकर, अजयभाऊ ढोक तसेच ग्रा.पं. कर्मचारी यांचे उपस्थितीत ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षाचे लागवड करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
वृक्षाची संगोपन करण्याची हमी ग्राम विकास अधिकारी श्री रामटेके यांनी घेतलेली असून या प्रमाणे प्रत्येकानी वृक्ष लागवड करावी अशा भावना व्यक्त करण्यात आल्या…

चुंचाळे बोराळे गावात भारतमातेचे विरपुत्र महाराणा प्रताप यांच्या जयंती प्रतिमेस अभीवादन करून साजरी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतच्या वतीने मातृभुमीच्या स्वाधीनतासाठी आपल्या संपुर्ण जिवन बलीदान करणारे विरता, पराक्रमा , त्याग आणी देशभक्तीचे प्रतिक महायोद्धा महाराणा प्रताप यांच्या जंयती निमित्त अभीवादनाचा कार्यक्रम संपन्न झाले . बोराळे ग्रामपंचायतच्या कार्यालयात भारतमातेचे विरपुत्र महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतचे उपसरपंच उज्जैनसिंग राजपुत हे होते , याप्रसंगी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस बोराळेच्या पोलीस पाटील माधुरी राजपुत , आशा सेविका सुनयना राजपुत, कैलाससिंग राजपुत , नितिन राजपुत , अनिल वानखेडे, गणेश राजपुत , संजयसिंग राजपुत आणी गावातील ईतर समाज बांधवांनी उपस्थित राहुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या प्रसंगी सर्व उपास्थितांचे आभार मेघराजसिंग राजपुत यांनी मानले, त्याचप्रमाणे चुंचाळे गावात देखील भारतमातेचे विरपुत्र महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात येवुन त्यांना अभिवादन करण्यात आले , या प्रसंगी चुंचाळे चयेथे महाराणा प्रताप जयंती साजरी
चुंचाळे ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सरपंच पती संजय पाटील ,सदस्य सुकलाल पाटील,अनिल कोळी, संजु तडवी, ग्रामपंचायत शिपाई मनीष पाटील,रोजगार सेवक दीपक कोळी, संगणक परिचारक भुरा कोळी,पत्रकार यावल प्रतिनिधी विकी वानखडे,चुंचाळे पत्रकार दिपक नेवे यांचेसह ग्रामस्थ ऋषिकेश राजपूत,उमेश राजपूत,शुभम राजपूत,रतिलाल राजपूत,पवन पाटील,प्रशांत राजपूत,पवन राजपूत उपस्थित होते.

यावल तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरीकांच्या दळणवळणाचे सुरक्षीत साधन एसटी बससेवा कोरोनामुळे पुर्ण बंद

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

संपुर्ण राज्यात कोरोना विषाणुच्या संसर्गा प्रादुर्भाव आरोग्य यंत्रणा ही सर्तक व सज्ज असतांना ही कमी होतांना दिसुन येत नसुन या महामारीचा प्रसार ग्रामीण भागात अत्यंत वेगाने वाढतांना दिसत असुन , महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या ग्रामीण भागातील जवळपास सर्वच एसटी बससेवा ही पुर्णपणे थांबवल्याने ग्रामीण भागातील नागरीकांची लाईफलाईन व दळणवळणाच्या साधनावर मोठा परिणाम जावणत आहे . यावल एसटी आगारातुन तालुक्यातील सुमारे ३५ते ४० गावामध्ये २४शेड्डलय फेऱ्याव्दारे ही सेवा दिली जाते , सर्वसामान्यांची आवडती लालपरी ही जणु मागील काही महीन्यांपासुन प्रवासांची रुसली आहे की काय असे ही ग्रामस्थांमध्ये बोलले जात आहे . यावल एसटी आगारातुन लॉकडाऊन पुर्वी एकुण ७२शेडुअल फेऱ्या सोडल्याजात असे , १४ लांब पल्यांच्या १४ फेऱ्या , मध्य पल्यांचा ६ फेऱ्या तर८ अंतरराज्य फेऱ्यांची बससेवा प्रवासांसाठी दिली जाते, मात्र कोरोनाच्या लॉक डाऊन गोंधळामुळे यावल आगारातुन अत्यंत मोजक्या बससेवा प्रवासांसाठी सोडण्यात येत असल्याने अनेक प्रवासांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी अवैध मार्गाने चालत असलेल्या खाजगी वाहनाने मनमानी भाडे आकारणी देवुन प्रवास करावा लागत आहे . कोरोनाच्या महामारीचे उच्चाटन होवुन सर्वस्थिती पुर्व पदावर सामान्य होई पर्यंत आपल्या गावात सुखरूप व सुरक्षीत पहोचवणाऱ्या लालपरीची आपल्याला प्रतिक्षा करावी लागणार हे सत्य आहे .

मालोद येथे ग्रामसेवकानी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे आदर्श निर्माण करणारे उपक्रम वृक्षारोपण , गरीब व गरजुंना वस्त्र आणि अपंगांना शासनाची 5 % टक्के मदत

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील मालोद येथील ग्रामसेवक राज़ु तडवी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधुन कर्तव्य आणी समाजहीताची व माणुसकीची जाणीव ठेवत विविध सामाजीक व विधायक उपक्रम राबवुन एक आदर्श निर्माण केले असुन त्यांनी केलेल्या प्रेरणादायी या कार्याचे परिसरात कौत्तुक केले जात आहे . यावल पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असलेले आदीवासी कुटुंबातील राजु अन्वर तडवी यांनी आपला वाढदिवसासाठी होणारे अनेक अनावश्यक खर्च टाळुन अतिश्य साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला .सद्या संपुर्ण देशात आणी आपल्या राज्यात व आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणुसंसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावा मुळे लागलेली सर्वत्र संचारबंदी यात अनेक हातावर पोट भरणारी कुटुंब ही रोजगार व कामधंदे अभावी आर्थिक संकटात ओढवलेली गेली आहे . अशा संकटाच्या समयी समाजाला आपले देणे म्हणुन सामाजिक कर्तव्याची जाणीव राखुन ग्रामसेवक राजु तडवी यांनी आपल्या वाढदिवसासाठी होणारे सर्व खर्च टाळुन यातुन मालोद या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी गावातील गोरगरीब व गरजु महीलांना स्वखर्चातुन वस्त्र , मास्क , आणी सेनिटाईझर वितरीत केले तसेच शासनाच्या तरतुदीनुसार अपंगांना ५ % टक्के निधीतुन दहा अपंग महीला व पुरूषांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचे धनादेश वाटप केलीत व आजच्या काळात सर्वाधिक अत्यंत गरजेचे असलेली पर्यावरणाचे व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी अत्यंत आवश्यक अशी विविध वळ /बदाम /आंबा वृक्षांचे ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा परिसरात वृक्षारोपण केले अशा विविध समाजहिताच्या दृष्टीकोणातुन लक्ष वेधणारे मोल्यवान कार्य करून शासनाचे सर्व नियम पाळत आपला वाढदिवस आगळ्या वेगळया उपक्रमानी साजरा करून एक आदर्श निर्माण केले आहे . याप्रसंगी मालोद या आदीवासी गावात संपन्न झालेल्या या आदर्श निर्माण करणाऱ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमा प्रसंगी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ . निलेश पाटील , सहा गट विकास अधिकारी/विस्तार अधिकारी किशोर सपकाळे ,ग्रामपंचायंत विस्तार अधिकारी हबीब तडवी , ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष रूबाब तडवी, तालुका सचिव पुरूषोत्तम तळेते , ग्रामसेवक हितेन्द्र महाजन ,ग्रामसेवक बाळु वायकोळे ,मालोदच्या सरपंच सौ . हसिना सिराज तडवी , उपसरपंच सौ .हुसेनाबाई रमजान तडवी , ग्राम पंचायत सदस्य सौ . जोहराबाई मुजात तडवी , जिल्हा परिषद शाळेचे वाघिरा येथील मुख्याध्यापक शिराज तडवी , बिस्मिल्ला तडवी , अरब सुभान तडवी , सौ . सुनिता नंदकिशोर पाटील , संजय सुभान तडवी , अकबर बाबु तडवी , बिस्मिल्ला नथ्थु तडवी , यांनी या सामाजीक व विधायक उपक्रमात आपला सहभाग नोंदविला , तसेच तालुक्यात व समाजात त्यांचं कौतुक होत आहे

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या रचना दशरथ ढोकपांडे या विद्यार्थिनीचे सेवा कार्याबद्दल होत आहे सर्वत्र कौतुक

0

 

सचिन वाघे वर्धा हिंगणघाट:

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेवा देण्यात यावी या शासनाच्या आदेशानुसार वर्धा बोरगाव मेघे येथील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल एज्युकेशन अंड रिसर्च येथील विद्यार्थी रचना दशरथ ढोकपांडे हि अरिहंत मेडिकल औषध वितरण करणाऱ्या दुकानात निशुल्क सेवा देत आहे.
रचना दशरथ ढोकपांडे ही विद्यार्थिनी मागील चार वर्षापासून वर्धा येथील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून कोरोना चा संसर्ग वाढत असल्यानेआपल्याकडून थोडीफार मदत शासनाला देण्यात यावी या उद्देशाने या विद्यार्थिनीने
मागील एक महिन्यापासून अरिहंत मेडिकल स्टोअर्स मध्ये निशुल्क औषध दुकानांमध्ये सेवा देत आहेत तिचे या सेवा कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे

ग्रामपंचायत कार्यालय येथे हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जा

आज दिनांक 9 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे मेवाड रत्न हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांची 481 जयंती साजरी करण्यात आली सर्वप्रथम सुनगाव येथील सरपंच रामेश्वर अंबडकार यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले महाराणा प्रताप हे मेवाड येथील शूर वीर योद्धा होते ते असे योद्धा होते की त्यांना शत्रू सुद्धा अभिवादन करीत होते त्यांची शौर्यगाथा जगात गाजलेली होती अशा या थोर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी द्रोपदी गवई,उमेश कुरवाडे, राम राजपुत, दिनेश ढगे,राहुल इंगळे,उत्तम ढगे,संतोष वंडाळे, रामेश्वर अंबडकार, पत्रकार गणेश भड,गजानन सोनटक्के,पवन पालीवाल,प्रभुगव ई,गणेश ढगे,गजानन धुळे, संतोष ताडे,विलास मिसाळ, शालिग्राम भगत अनिल भगत उपस्थित होते

सेलू येथिल श्रीराम प्रतिष्ठान तर्फे कोविड सेंटर मध्ये दहा बेड उपलब्ध

0

 

अजहर पठाण सेलू/परभणी

सेलू येथिल श्रीराम प्रतिष्ठान तर्फे शिक्षण महर्षी तथा वाशिम जिल्ह्याचे राष्ट्रवादी पक्षनिरीक्षक श्री.डॉ. संजय रोडगे यांच्या वाढदिवसा निमित्त अपूर्वा महाविद्यालयात लोकांच्या सेवेसाठी परिपूर्ण कोविड सेंटर सुरू करण्यात आले. यात नवीन शंभर बेड उपलब्ध करून देण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे सेलू तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस कडून स्वागत करण्यात आले असून तालुका अध्यक्ष सौ. निर्मलाताई बालासाहेब लीपणे यांनी डॉ. संजय रोडगे यांचे आभार मानले. व कोरोनग्रस्त लोकांना बेड उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे समाधान व्यक्त केले.

लोकप्रिय आमदार राजेश एकडे यांच्या हस्ते पादन रस्त्याचे उद्घाटन,

0

 

सुनिल पवार नांदुरा

नांदुरा :- तालुक्यातील लोकप्रिय आमदार मलकापूर मतदार संघाचे कर्तव्यदक्ष माननीय श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते पालकमंत्री पादन शेत रस्ते योजना अंतर्गत उद्घाटन दहिगाव स्मशानभूमी ते ज्ञानाई आश्रम शिवार पर्यंत करण्यात आले आहे, खुमगाव या गावाचे सरपंच रोहित वसंतराव सोनवणे यांच्या अथक प्रयत्नाने व सातत्याने पाठपुरावा करून सर्वांना यश लाभले, त्यावेळी पदमराव पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक, वसंतराव भोजने जिल्हा परिषद सदस्य, विलास पाटील संचालक मोहन पाटील संचालक संतोष पाटील जिल्हा परिषद सदस्य ,भगवान धांडे पंचायत समिती सदस्य, युवराज देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष, ईश्वर पांडव शिवसेना जिल्हा युवा उपाध्यक्ष, गजानन करांगळे सदस्य, गणेश वावगे सरपंचपती दहिगाव,किशोर पाटील सरपंच माटोळा,संतोष महाराज टिकार, ज्ञानाई आश्रम, ज्ञानेश्वर पठाडे ज्ञानाई आश्रम कार्यकर्ता ,संजय मार्कंड नायब तहसीलदार नांदुरा, अनिल गिरी वरिष्ठ लिपिक, तलाठी तेलरांधे खुमगाव बुर्ती, तलाठी चोपडे दहिगाव, ग्रामसेवक कोलते दहिगाव,किशोर इंगळे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष,निवृत्ती इंगळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता, निलेश पाऊलझगडे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस यावेळी, केदार ,खुमगाव ,बुर्ती,दहिगाव, माटोळा ,या गावातील शेतकरी उपस्थित होते,

कोविड रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करा आकाश बोरीकर जय जवान जय किसान संघटनेचे वर्धा जिल्हाउपाध्यक्ष यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट:-सद्या कोरोना या रोगाने रौद्र रूप धारण केले आहे.दररोज कोरोना रुग्ण संख्येत झपाट्यानी वाढ होत असून मृतांच्या संख्येने देखील उच्चांक गाठला आहे.अश्या परिस्थिती मध्ये रुग्णालयात खाट उपलब्ध नसून ऑक्सिजन तसेच औषधांचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे.वर्धा जिल्ह्यात मोठ्या संख्येने कामगार तसेच मोलमजुरी करणारे लोक आहेत.गोरगरीब सामान्य नागरिक शासकीय रुग्णालयात खाटा नसल्याने खाजगी रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यास नेत असतात मात्र काहींची आर्थिक परिस्थिती एकदम हलाखीची असल्याने ते खासगी रुग्णालयात उपचार घेऊ शकत नाही त्यामुळे पैश्या अभावी देखील निष्पाप लोकांचा या रोगामुळे बळी जात आहे या परिस्थितीत जिल्ह्यातील संपूर्ण खाजगी कोविड रुग्णालय यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करावे.या योजने मध्ये रुपये दिड लाख पर्यंत आर्थिक सहाय्य राज्य सरकार तर्फे देण्यात येते यामध्ये कोविड या रोगाचा समावेश आहे या योजनेअंतर्गत आर्थिक मदत जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला करून द्यावी जणे करून पैश्या अभावी कोणताही रुग्ण दगावणार नाही व औषधांचा व इतर बाबींचा काळाबाजार करणाऱ्यांकडून गोरगरीब जनतेची आर्थिक लूट देखील होणार नाही त्यामुळे तत्काळ या योजनेत जिल्ह्यातील सर्व खाजगी कोविड रुग्णालयाला सामाविष्ट करा अशी मागणी जय जवान जय किसान संघटनेचे वर्धा जिल्हा उपाध्यक्ष आकाश बोरीकर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.