Home Blog Page 484

संचारबंदी काळामध्ये ग्रामसेवकाने मारली एका महिन्यापासून दांडी. ग्रामसेवका अभावी जामोद ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार

0

 

गजानन सोटक्के
जळगाव जा प्रतिनिधी:-

कोरोनाच्या काळात तरी ग्रामसेवकांने मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे परंतु जामोद येथील ग्रामसेवक हे मुख्यालयी तर राहतच नाहीत. त्यामुळे जामोद वासियांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने खूपच त्रास होत आहे लाँकडाऊन चे नियम पाळण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवकाची भूमिका महत्वाची असते गावात ग्रामसेवक राहत तर नाहीच परंतु गेल्या महिन्याभरापासून ग्रामसेवकांनी दांडीच मारली असल्याने गावात लाँकडाऊन चे नियम पाळल्या जात नाहीत जामोद ग्रामपंचायतचा कारभार सध्या ग्रामसेवका अभावी सध्या रामभरोसे सुरू असल्याने गावात कोरोनाचे काळात विविध समस्या निर्माण झालेल्या असल्याने जामोद वासियांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे जामोद हे गांव जळगाव जामोद तालुक्यातील सर्वात मोठ्या लोकवस्तीचे गाव असून येथील लोकसंख्या 20000 चे वर असून येथील ग्रामपंचायत सदस्य संख्या 17 + 1=18 असून ग्रामविकास अधिकारी पदाच्या पोस्टची जामोद ग्रामपंचायत असूनही बरेच वर्षांपासून कायमस्वरूपी ग्रामसेवकच नाही गेल्या तीन महिन्यांपासून महिला सदस्यांसोबत उद्धट वागणूक देणारे वादग्रस्त ठरलेले कैलास चव्‍हाण यांची जामोद येथून बदली करण्यात आली त्यांचे जागी गेल्या तीन महीण्यांन पासून कस्तुरे नामक ग्रामसेवक देण्यात आले ते काही दिवस महिन्यातून तीन ते चार दिवसच येत होते आणि आता तर गेल्या तीन आठवड्यांपासून त्यांचे जामोदात दर्शनच झाले नाही गावात कोरोना चा वाढता शिरकाव सुरूच असतानाही सध्या जामोद ग्रामपंचायतचा कारभार ग्रामसेवकांना अभावी रामभरोसे सुरू असल्याने कोरोनाचे काळात जामोद गावात विविध समस्या निर्माण झाल्या असल्याने जामोद वासियांना ऐैन उन्हाळ्याच्या दिवसात गावातील सांडपाण्याच्या नाल्या कित्तेक दिवसांपासून साफ न केल्याने सदर नाल्यांमधील सांडपाणी हे रस्त्यांवरून वाहत आहे त्यातच येथील पेठ भागातील पथदिवे हे गेल्या सहा महिण्यांपासून बंदच असल्याने रात्रीच्या वेळेस सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते रात्रीच्या वेळेस अंधारातून व चिखलातून दगडांच्या ठोकरा खाव्या लागत आहेत ग्रामपंचायत ने मागे सुरू केलेली कचरागाडी सुद्धा परत गेल्या पंधरा दिवसांपासून चालकास गेल्या चार महिन्यांपासून पगारच न दिल्यामुळे ग्रामपंचायत समोर शोभेची वस्तू होऊन निकामी उभी आहे गावात सर्वत्र केरकचरा सह घाणीचे व चिखलाचे साम्राज्य पसरलेले असल्याने गावात मच्छरांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने जामोद वासियांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे ग्रामसेवका अभावी जामोदात विविध समस्या निर्माण झाल्याने खूपच त्रास सहन करावा लागत आहे तसेच ग्रामपंचायतीची विविध कामे रखडली आहेत ग्रामसेवकाच्या दाखल्यासाठी चकरा मारूनही दाखले मिळत नाहीत आता तरी याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन जामोद ग्रामपंचायतला स्वतंत्र व मुख्यालयी हजर राहणारा ग्रामविकास अधिकारी देण्यात यावा अशी मागणी जामोद येथील जनतेकडून होत आहे

जवळा बाजार येथे आग लागून गोठ्यातील तीन गुरांचा आगीत होरपळून मृत्यू

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

जवळा बाजार ता. नांदुरा येथील श्री.संजय किसनराव शिंगोटे यांच्या गोठ्यात आज सकाळी १०.०० वा. सुमारास अचानक आग लागून त्यांच्या गोठ्यातील तीन गुरांचा आगीत होरपळून मृत्यू झाला व गोठ्यामध्ये ठेवलेली पीव्हीसी पाईप शेतीचे अवजारे जळून खाक होऊन श्री.संजय शिंगोटे यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा.श्री.राजेश एकडे तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तहसीलदार नांदुरा व तालुका पशुवैकीय अधिकारी यांना सदर नुकसानी बाबतचा पंचनामा ईतर आवश्यक बाबीची पुर्तता तात्काळ करावी व आपदग्रस्त शेतकरी श्री.संजय शिंगोटे यांना त्वरित आर्थिक मदत मिळणे बाबत सूचना केल्या.या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक श्री.पदमभाऊ पाटील, श्री.अनिलभाऊ शिंगोटे, सरपंचपती श्री.अशोकभाऊ डीवरे,जवळा बाजार येथील तलाठी उपस्थित होते.

चुंचाळे येथील तरुण धावला गरजूंच्या मदतीसाठी

0

 

यावल तालुका (प्रतिनिधी)विकी वानखेडे

चुचाळे.बोराळे  गावातील पेशंट यांना आता फक्त्त इंधन वर हॉस्पिटल साठी गाड्या मिळणार, कोरोना महामारी मुळे ऍम्ब्युलन्स ची कमतरता भासत आहे, गरजू पेशंट साठी वेळेवर गाडी उपलब्ध व्हावी यासाठी गावातील,
मिरखा नूरखा तडवी यांनी आरोग्य सेवेसाठी हे पाऊल उचलले आहे, सध्या मुंबई महा नगर पालिकेत मिरखा तडवी हे वाहन चालक या पदावर कार्यरत आहेत, तडवी समाजाची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी ऍम्ब्युलन्स च्या संचालक मंडळ तसेच प्रतिनिधी म्हणून सुद्धा काम करतात, गावातील आणी समाजातील चांगल्या कामात त्यांचा नेहमीच सहभाग असतो,
यांचा आदर्श घेऊन प्रत्येक तरूणाने मदतीस बाहेर आले पाहिजे,आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वांनाच मदतीची गरज आहे मात्र ज्यांच्याने शक्य होईल त्यांनी केली पाहिजे.
या कार्याने गावात मिरखा तडवी यांची लोकांविषयी मदत बघून चर्चेला उधाण आले आहे आणि समाजातील व गावातील सर्वत्र यांचे कौतुक होत आहे.

लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी आमदार समीर कुणावार यांनी उपविभागीय कार्यालयात तात्काळ घेतली बैठक .

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 24.4.21
लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी गेल्या सहा दिवसांपासून वर्धा येथील DHO मा. डॉ. डवले साहेब यांना आमदार समीर कुणावार यांनी सतत पाठपुरावा करून त्यांना हिंगणघाट येथील बैठक घेण्यास विनंती केली. त्यानुसार आज दिनांक 24-04-2021 ला ठीक 12.00 वाजता एस डी ओ कार्यालय हिंगणघाट येथे बैठक संपन्न झाली त्या बैठकीला जिल्हा परिषद चे CO मा. श्री. बडे साहेब, DHO डॉ. डवले साहेब, तहसीलदार श्रीरामजी मुंदडा साहेब, नायब तहसीलदार डॉ. शकुंतलाताई पराजे, BDO संगमित्रा कोल्हे, हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. चाचारकर साहेब, हिंगणघाट तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किर्तीताई कुचेवार, ठाणेदार संपतजी चव्हाण साहेब सर्वांच्या उपस्थितीत बैठकीमध्ये हिंगणघाट येथील लसीकरण तातडीने होण्याबाबत चर्चा केली आणि यावेळी हिंगणघाट शहराची लोकसंख्या 01लाख 20 हजार पाहता या ठिकाणी दोनच लसीकरण केंद्र सुरू असून याठिकाणी पुन्हा दोन लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली त्यावर चर्चा होऊन आरोग्य विभागाचे मनुष्यबळ लक्षात घेता त्याच प्रमाणे जिल्ह्याला प्राप्त होणाऱ्या लसीकरणाचा साठा लक्षात घेता त्यांनी एक केंद्र जी बी एम एम हायस्कूल मध्ये सुरू करण्यास मंजुरी दिली असून यासाठी लागणारा स्टॉप त्यांनी घेण्याचे आरोग्य विभागाला सुचविले असून सोमवार पासून हिंगणघाट जी बी एम एम हायस्कूल मध्ये सुद्धा लसीकरणाला सुरुवात होणार आहे लसीकरणाचे डोज हिंगणघाट मध्ये कुठेही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही DHO डॉ. डवले साहेब यांनी या बैठकीत सांगितले.
हिंगणघाट शहरात तसेच ग्रामीण भागात जे कोरोण टाईन पेसेंट्स आहे त्या कोरोन टाईन पेशंटला किमान सात दिवसाचे औषधे देण्यात यावी अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली.
कोरोन टाइन असलेल्या प्रत्येक पेशंटला त्यांच्या घरापर्यंत औषधी पोहोचण्याचे काम आरोग्य विभागाने तातडीने करावे जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील लक्षणे वाढणार नाही या प्रकारची मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली व ती मान्य करून औषधी देणे सुरू झाले.
कोरोना बाधितांच्या नातेवाईकांची व घरच्या लोकांची प्रोटोकॉल प्रमाणे चाचण्या RTPCR व ANTIGEN टेस्ट व्हावी जेणेकरून पॉझिटिव्ह असलेल्या लोकांची टेस्टिंग होईल त्यामुळे कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल.
हिंगणघाट येथील नगरपालिका तर्फे शहरासाठी औषधी चा साठा देण्याचे नगर परिषद ने मान्य केले असून शहरांमध्ये जे कोरोन टाईन पेशंट आहे त्यांच्या घरापर्यंत औषधी चा साठा पोहोचवण्याचे काम नगरपरिषद करणार आहे असे मुख्याधिकारी मा. जगताप साहेब यांनी मान्य केले असून औषधी देण्यास सुरुवात झाली आणि औषधी कमी पडणार नाही अशी ग्वाही मा. जगताप साहेब यांनी दिली.
तसेच सिंधी रेल्वे येथील PSC ला RTPCR व ANTIGEN टेस्ट सुरू करण्यात यावी अशी मागणी आमदार समीर कुणावार यांनी केली त्या मागणीनुसार DHO डॉ. डवले साहेब यांनी सिंधी रेल्वे येथे ANTIGEN टेस्ट उद्यापासून सिंधी रेल्वे PSC येथे सुरु करणार असल्याचे कळविले असून RTPCR टेस्ट सुरू करण्या करिता लवकरच विचार करू असे त्यांनी सांगितले.
कोरोनाला थांबविण्यासाठी लसीकरण हेच एक प्रभावी माध्यम असून जितके जास्त लसीकरण करता येईल तेवढे लसीकरण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि जनतेनी लसीकरण घेतले पाहिजे व शासनाकडून त्यांना लसीकरण देण्यात आले पाहिजे त्यामुळे कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यामध्ये आपल्याला निश्चितच यश मिळणार आहे.
कोरणा चा वाढता प्रकोप पाहता जनतेने अत्यंत सावध राहणे गरजेचे असून कोरोना चा प्रकोप वाढत असून आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण असून अनेकांना ऑक्सीजन बेड मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे जनतेला कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी घराबाहेर पडू नये कोव्हिड च्या त्रिसुत्री चे पालन करावे व स्वतःचा जीव वाचवावा असे आवाहन आमदार समीर कुणावार यांनी यावेळी केले.

लीलाधर मडावी (सामाजिक कार्यकर्ता ) यांची जिल्हाधिकार्‍यांना निवेदनातून मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करा !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट:- 24.4.21 शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे.हिंगणघाट शहर हे उद्यौगिक शहर म्हणून ओळखले जाते त्याच बरोबर या शहराची बाजारपेठ सुध्दा मोठी आहे. हिंगणघाट शहरात मोठी सुतगीरणी व मिल असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात मिल मजदुर वर्ग राहतो. या मध्ये महिला, पुरूष व युवा प्रवर्गातील मजुरांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
हिंगणघाट शहरातील मोठ्या सुतगीरणी व मिल सुरू असल्यामुळे मजदुर वर्गाला कोरोना विषाणुचा संसर्ग होण्याचा आधिक धोका आहे. त्यामुळे मिल मालकांकडून मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांनी जिल्हाधीकारी प्रेरणा देशभ्रतार यांना निवेदनातून केली आहे.
वास्तविक पाहता आपल्या संपुर्ण हिंगणघाट तालुक्यासह जिल्हाची परीस्थीती अतिशय चिंताजनक आहे.दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे रूग्णलयातील ताण सुध्दा वाढत आहे. प्राणवायु व व्हेंटिलेटर अभावी रूग्णांचे हाल होत असून अनेकांचा मृत्यु झाला आहे. व शहरातील लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.जेणेकरून सामान्य घरून आलेल्या मिल मजदुराला कोरोना विषाणुचा संसर्ग होणार नाही आणी मानसिक दुष्ट्या खचलेल्या मजदुर वर्गावर आर्थिक बोझा वाढणार नाही व त्याच्या कुटुंबाची गय होणार नाही. या संपुर्ण परिस्थितीचे गांर्भीय लक्षात घेता ताबडतोब निर्णय घेवून शहरातील मिल मजदुरांचे निशुल्क लसीकरण करण्यात यावे असे मत सामाजिक कार्यकर्ते लिलाधर मडावी यांनी दिलेल्या निवेदनातून व्यक्त केले आहे.

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याला धोका आठवडी बाजारातील कंपोझ डेपोच्या पॅलास्टीक जानवाराने खाल्ले मुळे जनवारानां जीव गमवावे लागले…..

0

 

भगवंत ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर

=नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या आठवाडी
बाजारा लागुन असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्लेटवर नगरपंचायतीच्या स्वच्छता अभियान अंतर्गत संपूर्ण नगरा मधील घरोघरचा व शहरातील
केरकचरा जमा करुन आठवडी बाजाराला लागुन असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या प्लेटवर कंपोस्ट डेपो म्हणून या खाली
जागेवर प्लास्टिक पिशव्या वार्ड नंबर पाच लागुन आहे व त्या वार्ड
बरेच कुंटुब कायमस्वरूपी वास्तव्यात करीत आहे व तेथील
नागरिकांच्या आरोग्याला हानिकारक , प्रदुषण हवेच्या दिशेने नागरिकांच्या घरात जात असुन नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून,पण नगरपंचायत च्या प्रशासकीय अधिकारी मात्र गाढ झोपेत असल्याचे दिसून येते आहे पण नगरपंचायत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कचर्याची नियोजित जागेची निवड अद्याप पर्यंत कुठलेच नियोजन केले नाही त्यामुळे या खाली जागेवर प्लास्टिक पिशव्या पासुन मोकाट जनावरे आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका उदभवत आहे
त्यामुळे या कार्याला रात्री बेरात्री आग सुध्दा लागलेली आहे.आम्हचे प्रतिनिधींनी प्रत्येक्षात पाहुनी केली असता रहिवाश्यांनी सांगितले की आम्हाला प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की आम्हाला घरात पत्त्या उघडुन येतात मोकाट जनावरे सुध्दा बरीचशी पण्ण्या खावुन केलीत रात्री बेरात्री आग सुध्दा लागलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे या समस्ये कडे नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी किती दिवसात नागरिकांच्या आरोग्याचा खेळ थांबवण्यात यशस्वी करण्यासाठी सक्षम आहे याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकां मधे चर्चेचा व विषय सुरू आहे.

एक चार वर्षाच्या चिमुकल्यांनी ठेवला रोजा

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील शहरातील सुर्दशन चित्र मंदीर चौक डांगपुरा या परिसरात राहणारे युवा सामाजीक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांच्या चार वर्षीय चिमकुल्या मुसखर शेख यांने पवित्र रमजान महीन्यातील रोजा ( उपवास ) ठेवले , मुसखर शेख याने दाखवलेल्या या धाडसाचे समाज बांधवांमध्ये सर्वत्र कौत्तुक होत असुन , त्यास आजी ,आई, वडील, काका पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद दिले आहे. कोरोना आमच्या देशाला मुक्ती दे अशी प्रार्थना चार वर्षीय
शेख यांनी काल आपला पवित्र रमजान चा पहिला उपवास ठेवल होता उपास सोडण यावेळी त्यांनी ही प्रार्थना केलीचार वर्षीय मुसर्खर शेखने ठेवले पवित्र रमजानचे रोजा त्याच्या धाडसाचे सर्वत्र होत आहे कौत्तुक

वर्धा सावंगी मेघे येथे शंभर बेडचे कोविड हॉस्पिटल खासगी तत्वावर कोविड रुग्णाच्या सेवेत

0

 

सचिन वाघे वर्धा

23.4.21
महात्मा गांधी आर्युवेद महाविद्यालय सालोड हिरापूर, वर्धा. रूग्णालयात शंभर बेड्सचे खासगी करोना रूग्णालय करण्यात आले आहे.
वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पूर्णत: अतीगंभीर नसूनही ज्यांना भरती होण्याची गरज भासत असेल, अशा बाधित रूग्णांना या ठिकाणी भरती करण्याची व्यवस्था येथे करण्यात आली आहे. ज्या रूग्णाकडे गृह विलगीकरणाची व्यवस्था नाही, अशांची उपचार येथील करोना दक्षता विभागात केले जाणार आहे. रूग्णालयातील वास्तव्य कालावधीत *तज्ञांचे मार्गदर्शन, रूग्णांना चहा, नाष्टा, सकस आहार, औषधोपचार, वैद्यकीय समुपदेशन, आर्युवेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ध्यानधारणा, योगा, आर्युवेदिक काढा, अशा उपयुक्त सुविधा मिळणार आहे.(with 24×7 Oxygen Backup) व आवश्यक भासल्यास सावंगी मेघे रूग्णालयात दाखल करण्यात येईल.

संपर्क: +9325013812

*

तहसीलदार, बि.डि.ओ . तालुका आरोग्य अधिकारी, यांनी केली साखरखेर्डा येथील कोविड सेंटर साठी सहकार विद्या मंदिर याची पाहणी ।

0

 

(कोवाड सेंटर साठी सहकार विद्या मंदिराला पसंती )

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

वाढता साखरखेर्डा परिसरामध्ये कोरोना चा संसर्ग बघता ‘साखरखेर्डा येथे कोरोना रुग्णांसाठी कोवाड सेंटर व्हावे .ही मागणी अनेक दिवसांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी
पालकमंत्री डॉ . राजेंद्रजी शिंगणे यांच्याकडे लावून धरली होती .
त्यादृष्टीने पालकमंत्र्यांनी होकार सुद्धा दिला होता !त्यादृष्टीने अगोदर स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी श्री पलसिद्ध संस्थान येथील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीची पाहणी केली होती .परंतु श्री पलसिद्ध संस्थान हे साखरखेरडा गावातच येत असल्यामुळे ‘तिथे कोविड सेंटरची उभारणी करणे कितपत योग्य हा प्रश्न पडल्यामुळे !

नवीन जागेचा शोध सुरू झाला ‘
त्यादृष्टीने ‘साखरखेर्डा येथील सूतगिरणीच्या जवळील ‘सहकार विद्या मंदिर ची ‘कोविड सेंटर उभारण्यासाठी ‘ दिनांक 23 एप्रिल ला पहाणी
करण्यात आली ‘
यावेळी सिंदखेडराजा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ‘श्री गुणावंत ‘तहसीलदार श्री सुनील सावंत .तालुका आरोग्य अधिकारी डॉ .महेंद्रकुमार साळवे ‘साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप कुमार सुरुशे,साखरखेडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे ‘दुय्यम ठाणेदार दीपक राणे .

माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ जाधव ‘साखरखेर्डा नगरीचे सरपंच दाऊद सेठ कुरेशी ‘तलाठी ‘मांडगे ‘तलाठी श्री शिंगणे ‘तलाठी पवार मॅडम ‘ग्रामसेवक युनियनचे तालुका अध्यक्ष अमित जाधव ‘
उपसरपंच प्रवीण पाझडे ‘माजी सरपंच कमलाकर गवई .माझी पंचायत समिती उपसभापती सुनीलभाऊ जगताप ग्रामपंचायत सदस्य दिलीप बेंडमाळी ‘ललित शेठ अग्रवाल ‘
ग्रामपंचायत सदस्य सय्यद रफिक ‘
माजी सभापती राजू ठोके ‘सहकार विद्या मंदिर चे प्राचार्य ‘आदी पाहणी करतांना उपस्थित होते ‘

यावेळी आता गटविकास अधिकारी ‘ तहसीलदार ‘ तालुका आरोग्य अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे !

व लवकरात लवकर साखरखेर्डा येथे कोविंड सेंटर सुरू व्हावे हीच सर्वसामान्य लोकांची इच्छा आहे ‘
त्यादृष्टीने पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे प्रयत्नरत असून ‘त्यांच्या माध्यमातून साखरखेर्डा येथे लवकरच कोरड सेंटर सुरू होईल अशी अपेक्षा आहे !

वडीला नंतर तो ही झाला सैन्यदलात भरती ! ११ वर्षांनंतर शिंदी येथील तरुण सैन्यभरतीत दाखल !

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

मनामध्ये इच्छा ‘आकांक्षा ‘आणि जिद्द . असली तर मनुष्याला पाहिजे ते मिळू शकते,
अभ्यास जिद्द चिकाटी च्या भरोशावर सिंदखेड राजा तालुक्यातील शिंदी येथील तरुण .प्रवीण लक्ष्मण चांदोरे हा सैन्य दलामध्ये (जी .डी )मध्ये भरती झाला आहे ‘
सिंदखेडराजा तालुक्यातील रिलेशन भरती ही ८ डिसेंबर रोजी बंगलोर येथे आयोजित केली होती ‘
त्यानंतर 12 डिसेंबरला मैदानी चाचणी झाली .
या मैदानी चाचणी मध्ये सुद्धा प्रवीण पास झाला .व त्यानंतर मेडिकल मध्ये सुद्धा पास झाला ‘
अशा तर्‍हेने प्रवीण हा संपूर्ण आवश्यक असलेल्या सैन्यदलातील परीक्षा पास होत गेला !
त्यानंतर कागदपत्रांची तपासणी झाली व नंतर परीक्षेतही तो पास झाला ‘

28 फेब्रुवारीला परीक्षा रद्द झाली होती .त्यानंतर परत एका महिन्याच्या कालावधीनंतर 28 मार्च 2021 ला परीक्षा संपन्न झाली .व 21 एप्रिल रोजी निकाल लागला व त्यामध्ये सुद्धा प्रवीण पास झाला ‘

अशा तर्‍हेने तब्बल ११ वर्षांनंतर शिंदीतील एखादा तरूण सैन्यभरती मध्ये दाखल होत आहे ‘

GD,जी डी मध्ये प्रवीण दाखल झाल्यामुळे सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे ‘

प्रवीण चांदोरी चे वडील लक्ष्मण चांदोरे हे देखील सैन्यदलामध्ये होते ‘हो त्यांनी सुद्धा वीस वर्ष देशाची सेवा केली ‘
व आज त्यांचा लहान मुलगा सुद्धा सैन्यदलामध्ये भरती झाला ।
प्रवीण चांदोरी चे कठीण परिश्रम हेच त्यांच्या यशाचे गमक होय !

तरुणांनी सुद्धा देश सेवेसाठी तत्पर राहावे हीच अपेक्षा !