Home Blog Page 49

Crimenews / बुलडाणा जिल्ह्यात चाललं तरी काय?अबब १६ लाखांच्या गुटख्याची वाहन पकडले एवढं गुटका येते तरी कुठून???

0

 

Crimenews:डोणगाव प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर स्थानिक गुन्हे शाखा व डोणगाव पोलिसांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई केली.

आज, दि. २७ मार्च रोजी सकाळी समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली हे वाहन पकडण्यात आले. या कारवाई एकूण २१ लाख ९० हजार ८३२ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून गुन्हा दाखल केला.

ManojJarange / मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली: बीडमधील मेळाव्यात रुग्णालयात दाखल

आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास मजार खान अफसर खान (रा. साखरखेर्डा) हा मालवाहू पिकअप वाहनातून (क्रमांक एमएच ०४ -एचडी १४६२) अमडापूर येथून डोणगाव येथे प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमडापूर येथील कमळजा देवीच्या मंदिराजवळ गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला.

Crimenews / बुलडाणा जिल्ह्यात चाललं तरी काय?अबब १६ लाखांच्या गुटख्याची वाहन पकडले एवढं गुटका येते तरी कुठून???

त्यावेळी पिकअप वाहनाने तेथून पळ काढत पथकाला गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करत असताना हे वाहन जानेफळ मार्गे डोणगावच्या दिशेने जात असल्याने पाठलाग करणाऱ्या पथकाने डोणगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती दिली.

Crimenews:या दरम्यान डोणगाव पोलिस समृद्धी महामार्गाजवळ पोहोचण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने महामार्गाच्या पुलाखाली या पिकअप वाहनाला अडविले. कारवाईनंतर वाहन डोणगाव पोलिस ठाण्यात आणून तपासणी करण्यात आली.

ManojJarange / मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली: बीडमधील मेळाव्यात रुग्णालयात दाखल

0

 

ManojJarange:शुक्रवारी रात्री, बीडमध्ये आयोजित मेळाव्यात मराठा आरक्षणाच्या चळवळीचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांनी मेळाव्यात भाषण करताना चक्कर येऊ लागल्याने थोडा वेळ थांबून पुन्हा सुरुवात केली,

पण भाषण संपल्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेने त्यांना बीडच्या मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा मेळावा मराठा समाजाच्या एकजूटीसाठी आयोजित केला गेला होता.

Loan Recovery/ कर्जासाठी जीव गेला तरीही पैसे भरावे लागतील; मृत कर्जदाराच्या कर्जाची वसुली कशी?”

बीडच्या मेळाव्यातील प्रकार बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या असमयी निर्घृण हत्येच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

यावेळी मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख व्यासपीठावर होते. देशमुख यांच्या हत्येचा घटनाक्रम सांगताना व्यासपीठावर उपस्थित असलेले अनेक जण भावूक झाले होते.

मनोज जरांगे यांनी आरोपींना फाशीवर जाईपर्यंत शांत बसणार नाही असं एल्गार केलं.

मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती स्थिर मनोज जरांगे यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले.

डॉक्टरांनी म्हटलं आहे की त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि रक्ताच्या चाचण्या सामान्य आल्या आहेत.

ManojJarange:हालचालीपणाने त्यांना 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे.

Loan Recovery/ कर्जासाठी जीव गेला तरीही पैसे भरावे लागतील; मृत कर्जदाराच्या कर्जाची वसुली कशी?”

0

 

Loan Recovery:कालांतराने लोकांची कर्ज घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी लोक कर्ज काढतात आणि ते ईएमआयच्या स्वरूपात परतफेड करतात. मात्र, कर्ज घेतलेल्या व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाल्यास, कर्जाची वसुली कशी करावी हा प्रश्न समोर उभा राहतो.

बँका अशा परिस्थितीत काय करतात?

प्रक्रिया कशी असते?

कर्जदाराचा मृत्यू झाल्यास, बँक त्याच्या सहअर्जदाराशी संपर्क साधते. जर सहअर्जदार कर्जाची परतफेड करण्यास असमर्थ असेल तर बँक जामीनदाराशी संपर्क साधते. जामीनदारानंही कर्जाची परतफेड नकारल्यास, बँक कायदेशीर वारसदारांशी संपर्क साधते.

Murdernews / नागपूरमध्ये वादविवादानंतर निर्घृण हत्या; एका पित्याची भावनिक कहाणी

जर कोणीही कर्जाची परतफेड करू शकलं नाही, तर बँका मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याचा मार्ग निवडतात**. गृहकर्ज किंवा वाहन कर्जाच्या बाबतीत बँका मृत व्यक्तीचं घर किंवा वाहन जप्त करतात आणि त्याचा लिलाव करून कर्ज वसूल करतात. पर्सनल लोनाच्या बाबतीत, बँका इतर कोणतीही मालमत्ता जप्त करून कर्ज वसूल करतात.

बँकांना कर्जाची वसुली करताना आरबीआयच्या फेअर प्रॅक्टिस कोड चे पालन करावे लागते. या नियमानुसार बँकांनी शांतपणे आणि न्याय्य पद्धतीने वसुली करावी लागते. ग्राहकांना कोणत्याही प्रकारे त्रास देण्यावर ती बँदी आहे.

सहअर्जदार यादीत आहे. सर्वप्रथम सहअर्जदारांकडून कर्जाची वसुली करण्याचा प्रयत्न केला जातो.जामीनदाराची भूमिका: सहअर्जदार नसल्यास, जामीनदार डिफॉल्टसाठी जबाबदार असतो.कायदेशीर वारसदार: जामीनदारानंही नकारल्यास वारसदारांकडून वसुली केली जाते.

मालमत्ता जप्ती: सर्व पर्याय वापरूनही वसुली झाली नाही तर मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव केला जातो.

Loan Recovery:कर्ज वसुली प्रक्रियेत कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले जाते आणि ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण केले जाते. बँकांना कर्ज वसूल करण्यासाठी वेळोवेळी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Prashantdikkar/ शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांचा जामीन मंजूर..

0

इस्माईल शेख / शेगांव / बुलडाणा

Prashantdikkar:शेतकरी नेते प्रशांत डिक्कर यांच्यावर जिगाव प्रकल्पातील काही ठेकेदारांनी व अधिकाऱ्यांनी केलेल्या कट कारस्थानातून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र इलेक्ट्रॉनिक मीडिया समोर फिर्यादीने पोलीस स्टेशनच्या आवारातच दिलेल्या मुलाखतीमध्ये पैसे दिले नसल्याचे कबूल केले होते. त्यावरून सदरचे गुन्हे हे शेतकरी नेत्याला खोटा गुन्हा दाखल करून बदनाम करण्यासाठी दाखल केला असल्याची चर्चा होती.

Murdernews / नागपूरमध्ये वादविवादानंतर निर्घृण हत्या; एका पित्याची भावनिक कहाणी

सदर प्रकरणात आज शेगाव येथील न्याय दंडाधिकारी न्यायालय यांच्या समोर ॲड. वीरेंद्र झाडोकार यांनी जोरदार युक्तिवाद करून संपूर्ण प्रकरण मा. न्यायालयाच्या निदर्शनास खंडणीच्या गुन्हेबाबात लावलेली कलमे या प्रकरणामध्ये लागू होत नसल्याचे मा. न्यायालयाच्या निदर्शनास ॲड. विरेंद्र झाडोकार साहेब यानी जामिनावर अर्जावर युक्तिवाद करताना आणुन दिले. तसेच सदरचे गुन्हे हे राजकीय दबावाखाली दाखल केलेले आहेत ही बाब सुद्धा मा. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

त्यावरून मा. न्याय दंडाधिकारी प्रथमश्रेणी न्यायालय शेगाव यांनी आज प्रशांत डिक्कर यांच्या जामीनावर आदेश पारित करून त्यांना जामीनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. तसेच सदर आदेशामध्ये खंडणीची कलमे ही या प्रकरणात लागू होत नाही असं निरीक्षण सुद्धा नोंदवलेल आहे.

Prashantdikkar :त्यामुळे भविष्यात या प्रकरणाला निश्चितच वेगळं वळण मिळेल अशी चर्चा होत आहे. असे सदरचे गुन्हे हे खारीज करण्याकरता मा. उच्च न्यायालय याचिका सुद्धा दाखल करण्यात येणार आहे.

Murdernews / नागपूरमध्ये वादविवादानंतर निर्घृण हत्या; एका पित्याची भावनिक कहाणी

0

 

नागपूरच्या इमामवाडा परिसरात 26 मार्चला एक धक्कादायक घटना घडली,

Murdernews:ज्यामध्ये एका पित्याला त्यांच्या मुलीची छेड काढल्याच्या विरोधात धारदार शस्त्रांनी हल्ला करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मृताचे नाव नरेश वालदे असून ते 53 वर्षांचे रंगकामाचा व्यवसाय करणारे होते. ही घटना त्यांच्या मुलीला सतत त्रास देणाऱ्या तरुणांविरुद्ध ते विरोध करत असताना घडली.

Chandrashekhar Bawankule :/ आम्ही मुस्लिम विरोधी नसून भारतात पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्यांविरोधात उभे; चंद्रशेखर बावनकुळे

नरेश वालदे यांच्या कुटुंबातील सदस्यांनी फिर्याद दिल्यानुसार काही तरुण बराच काळापासून त्यांच्या मुलीला सतत त्रास देत होते. या विरोधात नरेश वालदे यांनी टोकाची भूमिका घेतली आणि त्यांचा आरोपींशी वाद झाला. त्यानंतर आरोपींनी नरेश यांचा जीव धोक्यात आणला.

बुधवारी, 26 मार्च रोजी त्यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला आणि त्यांना जट्टारोडी परिसरात भेटायला बोलावले. तिथे जेव्हा ते गेले, तेव्हा आरोपींनी त्यांची हत्या केली.

नरेश वालदे हे त्यांच्या वृद्ध आई आणि तीन मुलींसोबत नागपूरच्या इमामवाडा परिसरात राहत होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली होती, पण पोलिसांनी तेव्हा याबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही.

Murdernews :या घटनेनंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून घटनेची तपास सुरू आहे. आरोपींची नावे निलेश उर्फ नाना मेश्राम आणि इश्वर उर्फ जॅकी सोमकुवार अशी आहेत.

 

 

Chandrashekhar Bawankule :/ आम्ही मुस्लिम विरोधी नसून भारतात पाकिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्यांविरोधात उभे; चंद्रशेखर बावनकुळे

0

 

Chandrashekhar Bawankule :नागपूर येथे अलीकडच्या काळात राजकीय वातावरणात लक्षणीय बदल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

27 मार्च 2025 रोजी त्यांनी स्पष्ट केले की, “भारतीय जनता पक्ष मुस्लिम विरोधी नाही, पण जे लोक भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा फडकवतात त्यांच्या विरोधात स्पष्टपणे उभे आहोत.

Om Birla Rahul Gandhi / राहुल गांधींनी प्रियंका गांधींबरोबर केलेल्या ‘त्या’ कृतीने संतापले ओम बिर्ला; भारतीय जनता पक्षाने व्हिडीओ शेअर केला

बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नाशिक आणि परभणी येथील रॅलींमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याचा आरोप केला, ज्यामुळे राजनीतिक तळाठिंबावर आघात झाला आहे.

“पाण्याची कमी असूनही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागत असेल, ही गोष्ट देशाच्या दृष्टीने दुर्दैवाची आहे,” अशा शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Chandrashekhar Bawankule :नुकत्याच नागपूरमधील दंगलीनंतर काँग्रेसने सत्य शोधन समिती स्थापन केली असून, त्यांनी भाजप आणि पोलिसांच्या भूमिकेवर शंका व्यक्त केली आहे. समितीने राज्यपालांकडे विशिष्ट समाजाला टार्गेट केल्याचा आरोप केला आहे

Om Birla Rahul Gandhi / राहुल गांधींनी प्रियंका गांधींबरोबर केलेल्या ‘त्या’ कृतीने संतापले ओम बिर्ला; भारतीय जनता पक्षाने व्हिडीओ शेअर केला

0

 

Om Birla Rahul Gandhi:नवी दिल्ली, बुधवार – लोकसभेतील एक वादग्रस्त प्रसंग नुकताच घडला, ज्यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधींच्या सहभागाचा समावेश आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी राहुल गांधींना सभागृहाचे शिष्टाचार आणि नियम पाळण्याचा इशारा दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाने एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी त्यांच्या बहिणीच्या हनुवटीला हात लावत आहेत आणि त्यांच्याशी बोलत आहेत, हे दिसून येत आहे.

Namo Shetkari / नमो शेतकरी योजनेसाठी १६४२ कोटी रुपयांची मान्यता; शेतकऱ्यांना लवकरच २००० रुपये मिळणार

ओम बिर्लांनी सभागृहाच्या कामकाजादरम्यान राहुल गांधींना शिष्टाचाराचे पालन करण्याची आठवण करून दिली, ज्यानंतर काही काळ सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

काँग्रेसने या नंतर आरोप केले की त्यांना बोलण्याची वेळ दिली नाही, मात्र भाजपाने राहुल गांधींवरच टीका केली आहे. भाजपाचे IT सेल प्रमुख अमित मालवीय यांनी “संसदेच्या नियमांचे पालन करण्याची वेळ आलेली आहे,” असं ट्विट करून राहुल गांधींवर निशाणा साधला.

Om Birla Rahul Gandhi / राहुल गांधींनी प्रियंका गांधींबरोबर केलेल्या ‘त्या’ कृतीने संतापले ओम बिर्ला; भारतीय जनता पक्षाने व्हिडीओ शेअर केला

राहुल गांधींनी त्यांच्यावरील आरोपांना उत्तर देतांना, “अध्यक्षांनी मला बोलू दिलं नाही, ते निघून गेले आणि सभागृह तहकूब केलं,

X LINK Open 

Om Birla Rahul Gandhi: ज्यामुळे मला महाकुंभ आणि बेरोजगारीवर बोलण्याची संधी मिळाली नाही,” असं म्हटलं. काँग्रेसच्या अनेक खासदारांनी यामुळे नाराजी व्यक्त केली आणि सभागृहाच्या चालण्यात भाजपाची हस्तक्षेपाची तक्रार केली

BeedSantosh Deshmukh/ संतोष देशमुखांचा काटा का काढला? आरोपी सुदर्शन घुलेची कबुली

0

 

BeedSantosh Deshmukh :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात एक महत्त्वपूर्ण वळण आले आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीतील ताज्या अपडेट्स अनुसार, वाल्मिक कराड गँगच्या सुदर्शन घुले , जयराम चाटे आणि महेश केदार या तीन आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे.

ही कबुली या प्रकरणाला नवे वळण देऊन वाल्मिक कराडच्या विरोधातील पुराव्यांची ताकद वाढवणारी आहे.

सुदर्शन घुले याने पोलिसांना सांगितले की, आवादा कंपनीच्या आवारात त्याला आणि त्याच्या साथीदारांना मारहाण झाली होती.

त्यादिवशी त्यांच्या एका मित्राचा वाढदिवस होता. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे त्यांना आव्हान देण्यात आले होते.

तसेच, खंडणी मागण्यात संतोष देशमुख अडथळा ठरत होते, हे घुले याने कबुली दिली. याचा बदला म्हणून त्यांनी संतोष देशमुखांची हत्या केल्याचा कबुलीजबाब दिला आहे.

9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. महेश केदार याने हत्या करताना व्हिडीओचा शूट केल्याची कबुली दिली,

BeedSantosh Deshmukh :तर जयराम चाटे याने त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत. या प्रकरणाच्या तपासात अॅड. उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचे पुरावे कोर्टात सादर केले आहेत. या पुराव्यांमुळे वाल्मिक कराड याच्या विरोधातील सर्व आरोप मजबूत झाले आहेत.

BankOfMaharashtra/ हिंगणघाट बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक यांना मारहाण,शिवीगाळ आरोपी फरार

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

BankOfMaharashtra:दि.२७ मार्च :कर्जापोटी गहाण असलेल्या संपत्तीचा लिलाव केल्यानंतर वास्तूचा खरेदीदारास ताबा मिळवून देण्यास गेलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक व सहयोगी अधिकाऱ्यांना अर्वाच्य शिवीगाळ करीत मारहाण केल्याची घटना दि.२५ रोजी शहरातील शिवसुमन कार्यालय येथे घडली.

या वास्तूचे मूळ मालक तथा बँकेचे थकीत कर्जदार वामन गणपत मावळे व त्यांच्या पत्नीसह कुटुंबीयांवरती कारवाई करण्याची मागणी बँक व्यवस्थापनाने केली असून हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी मावळे कुटुंबीयांवरती गुन्हा नोंद केला आहे.

Aditya Thackeray / दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे आणि इतरांवर आरोप; काय आहे प्रकरणाचा ताजा वळण?

बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या स्थानिक मुख्य प्रबंधक अविनाश सुरडकर यांनी उपरोक्त प्रकरणी हिंगणघाट पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी मावळे कुटुंबीयांनी शिवीगाळ करीत त्यांना व इतर सहकाऱ्यांना मारहाण करीत हल्ला केल्याची तक्रार केली आहे.

घटनेच्या पार्श्वभूमीनुसार बँक ऑफ महाराष्ट्र येथील उद्योजक वामन मावळे यांना व्यवसायाकरिता २ कोटी रुपये कर्ज दिले होते, त्यांची पत्नी अनिता मावळे यांना सुद्धा रुपये ९५ लाख पोल्ट्री फार्म कुक्कुटपालन व्यवसायाकरिता कर्ज दिले होते, या कर्जापोटी मावळे कुटुंबीयांनी तालुक्यातील सेलू(मुरपाड )येथील शेती तसेच माता मंदिर वार्ड,हिंगणघाट शिवसुमन मंगल कार्यालय बँकेला गहाण करून दिले होते.

SunilNarineUodate/  आयपीएल 2025: सुनील नरेनशिवाय कोलकाताचा विजय, क्विंटन डिकॉकची अदाकारी

कोट्यावधी रुपये कर्ज थकीत झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांनी शिवसुमन मंगल कार्यालय, तसेच सेलू (मुरपाड) येथील पोल्ट्री फार्मची व इतर गहाण मालमत्ता जप्त केली.

वारंवार कर्ज खेळण्याचा तकादा लावल्यानंतरही कर्जदारांनी रकमेची परतफेड केली नसल्यामुळे बँकेने त्यांचे विरोधात कारवाई सुरू केली, त्यांच्याकडे गहाण असलेली मालमत्ता लिलावाद्वारे विक्रीस काढली,यात स्थानीक माता मंदिर वार्ड येथील शिवसूमन मंगल कार्यालय या वास्तूचा सुद्धा लिलाव करण्यात आला, न्यायालयाचे पूर्वपरवानगीने हा लिलाव झाला असून लिलावामध्ये बोली लावून ही मालमत्ता येथील उद्योजक महेश घुमडे यांनी खरेदी केली.

घुमडे यांनी हे मालमत्ता खरेदी करीत सर्व पूर्तता केल्यानंतर बँकेला रीतसर ताबा हस्तांतरित करण्याची मागणी केली.
दि.२५ रोजी बँकेचे मुख्य प्रबंधक अविनाश सुरडकर त्यांचे सहकाऱ्यांसह शिवसुमन मंगल कार्यालय येथे पोहचून घुमडे यांना प्रत्यक्ष ताबा देण्याचा प्रयत्न केला असता श्रीमती अनिता वामन मावळे, वामन गणपत मावळे व इतर कुटुंबियांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार केली आहे. सदर ताबा हस्तांतरित करण्यासाठी बँकेने जिल्हा न्यायालयाचा आदेश प्राप्त केला असल्यामुळे परवा बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी घटनास्थळी हजर होते.

BankOfMaharashtra:परंतु मावळे कुटुंबीयांपैकी साहिल वामन मावळे,अनिल गणपत मावळे,सूर्यकांत गणपत मावळे,नकुल वामन मावळे, अनिता वामन मावळे बँक व्यवस्थापक व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
हिंगणघाट पोलिसांनी मावळे कुटुंबीयांवरती भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलम ११५(२),१२१(१),१२६(२),१३२,१८९(२),१९०,
१९१(२),२९६,३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत वर्मा करीत असुन आरोपी फरार असल्याची माहिती आहे

Aditya Thackeray / दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे आणि इतरांवर आरोप; काय आहे प्रकरणाचा ताजा वळण?

0

 

Aditya Thackeray:मुंबईतील बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नवीन ट्विस्ट आला आहे.

जून २०२० मध्ये दिशाचा मृतदेह मालाड येथील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून आढळला होता. तेव्हापासून या प्रकरणात अनेक वादविवादांचे वारे वाहू लागले आहेत.

SunilNarineUodate/  आयपीएल 2025: सुनील नरेनशिवाय कोलकाताचा विजय, क्विंटन डिकॉकची अदाकारी

ताज्या घटनाक्रमात, शिवसेना नेते संजय निरुपम यांनी आदित्य ठाकरे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा आरोप केला आहे. यासोबत अभिनेते डिनो मोरिया आणि सूरज पंचोली यांचीही नावे चर्चेत आहेत.

दिशा सालियानचे वडील सतीश सालियान यांनी त्यांच्या मुलीच्या मृत्यूप्रकरणी नवीन चौकशीची मागणी कोर्टात केली आहे.

Whatsap News / मुख्यमंत्री फडणवीस यांची क्रांतिकारी घोषणा: सरकारी सेवा आता व्हॉट्सअॅपवर उपलब्ध

त्यांनी आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. हे प्रकरण आतापर्यंत आत्महत्या म्हणून पाहिले जात होते, मात्र संजय निरुपम यांनी असा दावा केला आहे की दिशाचा मृत्यू हत्यादित्य ठाकरे. याचिकेत सीबीआय तपासाचीही मागणी करण्यात आली आहे.

दिशा सालियानचा मृत्यू: ८ जून २०२० रोजी दिशा सालियानचा मृतदेह मुंबईच्या मालाड परिसरातील एका इमारतीच्या १४व्या मजल्यावरून पडून सापडला.

आरोप: संजय निरुपम यांनी आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध गंभीर आरोप केले. त्यांच्या मते, दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीत आदित्य ठाकरे आणि अन्यांवर आरोप आहेत.

दिशाच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे आणि आदित्य ठाकरे आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.

न्यायालयातील पुढील कारवाई दिशा सालियानच्या वडिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली असून, ही याचिका २ एप्रिल २०२५ रोजी सुनावणीसाठी सुरु होईल.

कोर्टातील हा प्रक्रियेमुळे आदित्य ठाकरे आणि इतरांवरील आरोपांचा तपास डिसेंबरमध्ये होऊ शकतो. त्यावेळी घडलेल्या पार्टीतील अन्य लोकांची नावेही चर्चेत आहेत.

Aditya Thackeray :या प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांनी राजकीय वातावरणात भांडावली घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप नेते नारायण राणे यांनीही आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.