Home Blog Page 51

Hingnghat/ दहशतवाद्याच्या पुतळयाला जाळून हिंगणघाट मनसे कडून निषेध

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat :हिंगणघाट :- काश्मिर येथील पहलगाम इथे 22 एप्रिल रोजी भारतीय नागरिक यांना हिंदू धर्म विचारून दहशतवादी कडून गोळ्या मारण्यात आल्या.

त्या निषेदार्थ दी. 25/4/25 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंगणघाट विधानसभाच्या वतीने आंबेडकर चौक इथे पहलगाम दहशतवादी याचा फोटो व पुतळया ला जाळून मनसे कडून रोष दाखविण्यात आल्या.

Pahalgam attack / मुर्तीजापुरातील दांपत्य थोडक्यात बचावले..!

व या घटनेत मृत्यू झालेल्या हिंदू नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली यावेळेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत कातरकर मनसे अध्यक्ष केतन ता्यवाडे, जिल्हा सचिव राजू बोंबले , ता संघटक हरि महाजन स, ता सचिव संजू हिंगणे स,ता संघटक देवा काटकर,श सचिव योगेश नासरे श उपाध्यक्ष कामेश बावणे, रमेश राऊत, अजय खंदार, श सरचिटणीस

Hingnghat :केशव उमाटे श संघटक राम कांबळे, वी अध्यक्ष शरद खोंड,स अध्यक्ष वा सागर घवघवे स अध्यख ची रोशन जाधव, स अध्यक्ष खै अक्षय थुल, आकाश पोटफोडे कृष्णा काळे राहुल बावणे, विक्की खडसे, धीरज भालेकर,सारंग देशपांडे,मंगेश वरखेडे रिता बावणे, कांचन बावणे, सोनल ता्यवाडे,संध्या बावणे, दीपा बावणे, ज्वाला भाजीखाये, परी चवरे पिंकी भगत,

Pahalgam attack / मुर्तीजापुरातील दांपत्य थोडक्यात बचावले..!

 

अकोला मूर्तिजापूर विलास सावळे

Pahalgam attack:मूर्तिजापूर :-जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला, या हल्ल्याच्या दिवशीच मुर्तीजापुर येथील रहिवासी राकेश हुंदानी त्यांची पत्नी व दोन मुली यांच्या सह नातेवाईक असे ऐकून ८ जण पहलगाम येथे पोहचले.

परंतु दैव बलवत्तर म्हणून दहशतवादांच्या हल्ल्यातून हे दांपत्य बचावले. दि.२१ एप्रिल रोजी मूर्तिजापूर करिता राकेश हुंदानी, पत्नी सिमरन हुँदानी व दोन मूली दृष्टी हुँदानी, अनन्या हुँदानी व त्यांच्या नातेवाईकांनी जम्मू काश्मीरच्या सहलीकरिता आपली यात्रा प्रारंभ केली.

Hingnghat/ भानापूर येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण कार्यवाही करण्याची मागणी

व २२ एप्रिल रोजी हे दांपत्य आपल्या नातेवाईकांसह जम्मू काश्मीर च्या पहलगाम येथे पोहचले असता त्यांनी राहण्याकरता बुकिंग केल्या असलेल्या हॉटेल वर जात असतांनाचं अचानक काही अंतरावर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याचे वृत्त त्यांना भारतीय लष्कराच्या जवानांकडून समजले.

या दांपत्यांना व नातेवाईकांना काही हॉटेलच्या काही अंतरा पूर्वीच भारतीय लष्कराच्या जवानांनी अडवून त्यांना सुरक्षित स्थळी ठेवल्या ने मुर्तीजापुर येथील राकेश हुंदानी त्यांची पत्नी ,दोन मुली व नातेवाईकांचे दैव बलवत्तर म्हणून बाल बाल बचावले.

विशेष महाराष्ट्र चे उपमुख्यमंत्री यांनी भेटून याना मुंबई कड़े रवाना केले.

Pahalgam attack:मूर्तिजापुर येथील समाज सेवक सुनील लक्षवाणी, लखन अरोरा, गोपाल दायमा मूर्तिजापुर मतदार संगतिल आमदार हरीश पिंपले व खासदार अनुप धोत्रे यांनी सपर्क करुण सुख रूप परत अन्याची आश्वासन देऊन मुंबई ला परत आणले.हुँदानी परिवार सहकार्य करणार च्या खुप खुप आभार मानत आहे.

Pahalgam / पहल्गाम येथील अतिरेकी हल्ल्याचा हिंगणघाट मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Pahalgam:हिंगणघाट – दिनांक २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बैसरण व्हॅली येथे झालेल्या भीषण अतिरेकी हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. या हल्ल्याचा हिंगणघाट मुस्लिम समाजाकडून तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. समाजाचे प्रतिनिधी उपविभागीय अधिकारी, हिंगणघाट यांच्यामार्फत भारत सरकारला निवेदन पाठवून ही घटना अमानवी आणि भ्याड असल्याचे स्पष्ट केले.

हिंगणघाट मुस्लिम समाजाने या घटनेचा तीव्र निषेध करताना म्हटले आहे की, देशाच्या ऐक्य, शांतता आणि सौहार्दाच्या विरोधात घडवून आणलेली ही क्रूर घटना संपूर्ण मानवतेला लज्जास्पद आहे. या हल्ल्यात अतिरेक्यांनी धर्म विचारून लोकांची हत्या केल्याचे समोर आले असून, अशा प्रकारच्या हिंसेला इस्लाम धर्म कधीच मान्यता देत नाही. इस्लाम आणि हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या शिकवणीनुसार मानवतेचे रक्षण करणे, दया, करुणा आणि शांततेचा प्रचार करणे हाच खरा धर्म आहे.

Shegaonnews / विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्वपक्षीय नेते हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाज यांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले

कुरआनमध्ये स्पष्ट सांगितले आहे की, “ज्याने एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतला, त्याने संपूर्ण मानवजातीचा जीव घेतला, आणि ज्याने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला, त्याने संपूर्ण मानवजातीचा जीव वाचवला.” त्यामुळे अशा हिंसक कृत्यांना इस्लामशी जोडणे हे पूर्णतः चुकीचे आहे.

हिंगणघाट मुस्लिम समाजाने सरकारकडे मागणी केली आहे की, या हल्ल्याची उच्चस्तरीय व पारदर्शक चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाहीत. अतिरेकी संघटनांच्या मुळावर घाव घालून देशातील नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिली जावी, अशी देखील मागणी करण्यात आली.

Pahalgam:या अमानवी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना समाजाकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली असून त्यांच्या परिवारांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आली आहे. जखमींच्या त्वरित बरे होण्याची प्रार्थना करण्यात आली आहे. हिंसा कोणत्याही धर्माचा भाग नाही. हिंगणघाट मुस्लिम समाज नेहमी शांतता, ऐक्य आणि मानवतेच्या बाजूने उभा राहणार आहे.

Hingnghat/ भानापूर येथे वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण कार्यवाही करण्याची मागणी

 

प्रतिनिधी सचिन वाघे

समुद्रपूर :- दि. २४ एप्रिल २०२५ रोज गुरुवारला शिव सेना( उध्दव बा ठाकरे) पक्षाच्या वतीने उप जिल्हा प्रमुख सतीश धोबे यांच्या प्रमुख उपस्थितीत वन विभाग कार्यालय समुद्रपूर येथील अधिकारी धनविज यांना निवेदना द्ववारा समुद्रपूर जोन मध्ये येत असल्या गोविंदपूर च्या लागून असलेले भानापूर येथील वन विभागाच्या जागेवर काही लोकांनी बळजबरीने कब्जा करून शेत तयार करून पेरणीसाठी तयारी केली आहे.

काही लोकांनी तर वन विभागाची जमीन स्वतःच्या ताब्यात घेऊन मकत्यांने दिले असल्याचे दिसून आले. वन विभाग असल्या लोकांवर कार्यवाही करत नसल्याने त्यांची हिम्मत वाढली आहे. त्या भागातील शेतकरी अतिशय त्रासून आहे.

Shegaonnews / विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्वपक्षीय नेते हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाज यांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले

जर वन विभागाने हे जमीन आपल्या ताब्यात घेतले नाही तर भविष्यात अतिक्रमण करणार व पुढे मालकी हक्क मिळवून घेण्याचे प्रयत्न करतील. वन विभागाच्या वन परीक्षेत्र अधिकारी गावंडे तसेच सहायक वनसंरक्षक अधिकारी पवार यांच्याशी फोन वर चर्चा केल्यावर अधिकाऱ्यांनी वरील विषयावर तातडीने कार्यवाई करू म्हणून आश्वासन दिले. जर वन विभागाने या ठिकाणी सत्ताधारी लोकांच्या दबावात येऊन कार्यवाही करण्यास दिरंगाई केली तर गावातील लोकांना घेऊन शिव सेना आंदोलन करण्याचा इशारा दिला.

Hingnghat :भविष्यात होणाऱ्या परिणामाला वन विभाग दोषी राहील असे निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले. निवेदन देतांना उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगर सेवक मनीष देवडे, उप शहर प्रमुख अनंता गलांडे, युवा सेनेचे चे तालुका संघटक पंकज लाटकर, शेतकरी सेल चे प्रमुख शितल चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते.

Shegaonnews / विश्व हिंदू परिषद बजरंग दल सर्वपक्षीय नेते हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाज यांच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले

 

इस्माईल शेख शेगाव /बुलडाणा

Shegaonnews:दिनांक 25 एप्रिल रोजी स्थानिक तहसील कार्यालय येथे काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हिंदू पर्यटकांच्या हत्या व त्याला पाठबळ असणाऱ्या पाकिस्तान याच्या विरोधात विश्व हिंदू परिषद बजरंग दल शेगाव शहर यांच्या नेतृत्वात निदर्शने व मृत पावलेल्यांना निरपराध हिंदू बांधवांना श्रद्धांजली व तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले,

आणि कट्टर इस्लामिक मानसिकता असणाऱ्या जिहादी पाक पुरस्कृत दहशतवादी संघटना यांच्यावर कठोर कारवाई करून केंद्र सरकारने न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली ,आज त्या घटनेवर संपूर्ण देशामध्ये रोष आहे व हा हल्ला देशाच्या एकात्मता आणि अखंडतेवर हल्ला आहे.

Brekingnews /आर्णी येथे अभिलेखागार विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार अधिकारी करतात दुर्लक्ष !

या घटनेचा सर्वांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन निषेध केला पाहिजे ,व सरकारने आपली जबाबदारी समजून यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी या माध्यमातून करण्यात आली.

यावेळी नगर संघ चालक श्याम सुंदर तेल्हारकर ,विश्व हिंदू परिषद शहराध्यक्ष मनीष नारनोलिया, प्रखंड उपाध्यक्ष सुनील जंजाळ प्रखंड मंत्री सोमेश कांबळे, नगर संयोजक अतुल ठोंबरे, नगर सहसंयोजक अभिषेक कनोजे, नगर मंत्री अक्षय जोशी , सुरज हिवराळे, हरिओम तिव्हाने , सिद्धेश्वर डिवरे, माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल ,भाजप शहराध्यक्ष ज्ञानेश्वर आप्पा साखरे, युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ढमाळ,

Shegaonnews:राजेश अग्रवाल ,जयेश गाडोदिया सतीश मुरारका, पवन धनुका, विजय राठी, सुनील भरतीया, पवन महाराज शर्मा, मुकिंदा खेडकर, दीपक शर्मा, आशिष पांडे , अशोक चांडक ,राजेंद्र ढोले, प्रकाश गोयंका ,शुभम भुसारी, डॉक्टर मोहन बानोले, अरुण चांडक, नंदू पाटील, दीपक ढमाळ, प्रकाश रावलानी, भरत पालडीवाल, अंजली जोशी ,प्रीती तिवारी, किरण शर्मा ,चेतना खेते ,संगीता आखरे, यासह असंख्य हिंदुत्ववादी संघटना व कार्यकर्ते उपस्थित होते..

Brekingnews /आर्णी येथे अभिलेखागार विभागात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार अधिकारी करतात दुर्लक्ष !

 

 

विदर्भ प्रतिनिधी सचिन वाघे

 

Brekingnews:आर्णी :- यवतमाळ जिल्हातील आर्णी तहसील कार्यालयात संदीप हा शेती सबंधित कागदपत्रे काडासाठी गेला होता त्याने अर्ज अभिलेखागार विभागात दिला. तेथील अधिकारी याने आजच प्रमाणित प्रत पाहिजे असल्यास 1000 रुपयाची मागणी केली. संदीपने 1975 चा 7/12,फेरफार पंजी पाहिजे 3 दिवसानी पाहिजे असल्यास किती रुपये लागतील ?

कर्मचारी याने प्रती वर्ष 10 रुपये या प्रमाणे सांगितले आम्ही 3 दिवसांनी सांगू इतकेच नाहीतर तुम्ही आले आणी साहेबांची सही झाली नाही तर पुन्हा परत जा लागेल शेवटी विचार करून संदिपने एक हजार रुपये अधिकारी याला दिले त्यांनी दोन तासांनी बोलावले मला प्रमाणित प्रत दिली मी पावती मागितली तर अगोदर देण्यासाठी नकार दिला परंतु न्यायालयीन कामासाठी आवश्यक आहे.त्यामुळे 150 रुपयाची पावती दिली.

Policenews / जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापा – पाच आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त

संदिपने तहसीलदार यांना अधिकारी विरोधात लेखी तक्रार अर्ज दिला आज पर्यन्त तहसीलदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही तर याच विभागात माहिती अधिकारातून दी. 3/12/2024 ते 31/12/2024 पर्यंत कार्यालयीन आवक जावक अर्ज नोंद असलेल्या रजिस्टर बुकाची प्रत मागितली असता फक्त जावक नोंदी असलेली नोंदीची प्रत दिली आवक नोदी असलेली माहिती देण्यात आली नसल्याने तहसीलदार यांना प्रथम अपील अर्ज केला असता सुनावणी तहसीलदार यांच्या समोर दी. 23 /04/2025 ला घेण्यात आली उपस्थित सबंधित विभाग अधिकारी याने आवक नोदी नाही.

फक्त जावक नोंदी आहे सांगितले तसेच तहसीलदार यांना दिलेली जावक माहिती सुद्धा ही कार्यालयीन बुकातील नाही दाखवली तहसीलदार यांनी तुम्ही आयुक्त कडे अपील करू शकता असे सांगितले आज अधिकारी यांना तक्रार करून पुरावे देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही अधिकारी करत नाही तर लक्ष्मी दर्शन दिल्यावरच या विभागात काम होते आज अधिकारी यांना मोठया प्रमाणात पगार मिळत असुन सुद्धा भ्रष्टाचार करून अधिकारी / कर्मचारी महिन्याला लाखों रुपये गैर मार्गाने भ्रष्टाचार करून कमाई करतात इतकेच नाहीतर मोठया प्रमाणात सरकारी महसूल हिशोबात सुद्धा गडबड करण्यात आले आहे.

Brekingnews :या विभागाचे वार्षिक व्यवहार ( ऑडिट )करणाऱ्या अधिकारी याच्यावर प्रश्न निर्माण होतो चौकशी झाल्यास महाराष्ट्रातील सर्वात मोठा भ्रष्टाचार दिसेल यावरून संपूर्ण तहसील मध्ये भ्रष्टाचार किती असेल? तक्रार करून सुद्धा याची दखल घेण्यात येत नाही उलट सहमती असल्यामुळे तक्रारी, पुरावे असुन सुद्धा अधिकारी करतात दुर्लक्ष

Policenews / जुगार अड्ड्यावर पोलिसांची छापा – पाच आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त

 

इस्माईल शेख

Policenews:शेगाव – दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5.30 ते 6.30 दरम्यान शेगाव शहरातील डम्पिंग ग्राउंड येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत पाच आरोपींना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोउपनि. कुणाल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत खालील आरोपींना अटक करण्यात आली:1. पंकज सुभाषराव पाटील (वय 42, रा. जळका भडंग, ता. खामगाव)2. आकाश सुभाष भारसाकळे (वय 31, रा. एकलारा बानोदा,

Pahalgam Terror Attack / हिंगणघाट जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेध

ता. संग्रामपूर)3. सुनिल सुरेश माजोळकर (वय 34, रा. सुरभी कॉलनी, आकोट रोड, शेगाव)4. कृष्णा सुभाष सारवान (वय 28, रा. खळवाडी, आकोट रोड, शेगाव)5. अमोल भागवत दळी (वय35,रा. खेर्डा, ता. शेगाव)या छाप्यात पोलिसांनी आरोपींकडून 10,100 रुपयांची रोख रक्कम, 100 रुपयांचे जुगार साहित्य, चार मोबाईल फोन (एकूण किंमत अंदाजे

Policenews:21,000 रु.), तसेच दोन मोटारसायकली (किंमत अंदाजे 1,40,000 रु.) असा एकूण 1,71,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.सदर प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 230/2025, कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा अंतर्गत नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोहेका. संतोष गवई यांच्याकडे देण्यात आला आहे.

Pahalgam Terror Attack / हिंगणघाट जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेध

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Pahalgam Terror Attack /:हिंगणघाट :- दि.२३/४/२०२५ला कारंजा चौक हिंगणघाट येथे मा.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार वर्धा जिल्हा संपर्कप्रमुख राज दिक्षित तसेच निरीक्षक संदिप बर्डे व

Ladki bahin yojna / लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचा अपडेट! या दिवशी 1500 रुपये लवकरच खात्यात जमा होणार

जिल्हाप्रमुख गणेश ईखार,शुभांगी ठमेकर यांच्या सहमतीने राजु हिंगमिरे जिल्हासंघटक यांच्या नेतृत्वात जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तान मुर्दाबाद चे नारे देत निषेध करण्यात आला.

या हल्ल्यामधील निष्पाप मृत आत्म्यास शांती मिळावी म्हणून मेणबत्त्या लावून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली… त्याप्रसंगी शिवसेना पक्षाचे श्री.राजू हिंगमिरे जिल्हासंघटक, अमित गावंडे तालुकाप्रमुख हिंगणघाट, सुनिता तांबोळी शहरप्रमुख महिलाआघाडी, गोस्वामी शहर समन्वयक महिला आघाडी,अमित काळे शहरसंघटक, दिनेश काटकर

Pahalgam Terror Attack:उपजिल्हाप्रमुख युवासेना, प्रविण वैरागडे तालुका प्रमुख वाहतूकसेना, राहुल फुलझेले उपशहरप्रमुख,सतिश तांबोळी विभागप्रमुख,घुंगरुड,कुलभूषण वासनिक,अमोल देशपांडे,कार्तिक दाते,ओम बावणे,विक्की धात्रक,गुगलानी,डोकेजी,चैतन्य नारायणे,अनिकेत लायसटवार व समस्त शिवसैनिक व शहरांतील नागरीक उपस्थित होते.

Pahalgam Terror Attack / पाहलगाम दहशतवादी हल्ला: बुलढाण्याच्या कुटुंबाचा जीव हॉटेलमालकाच्या मदतीने वाचवला

 

Pahalgam Terror Attack:काश्मीरमधील पर्यटकांच्या आवडत्या पहलगाम येथील भयानक दहशतवादी हल्ल्याच्या सायंकाळी, बुलढाणा जिल्ह्यातील एका कुटुंबाला जीवदान मिळाले.

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये सुरू झालेल्या गोळीबारात अनेकांच्या प्राणांचा बळी गेला, पण बुलढाण्यातील पाच जण एका हॉटेल मालकाच्या सतर्कतेमुळे वाचले. या घटनेत तीन पुरुष आणि दोन महिला असलेले जैन कुटुंब सुरक्षित राहत हॉटेलमध्ये आश्रय घेतले.

हॉटेलमालकाने त्यांना गोळीबार सुरू असताना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळे त्यांचे प्राणी वाचले.

Nail loss Case / केस व नख गळती प्रकरण: केंद्रीय पथकाची बोंडगावात रुग्णांची तपासणी

२८ लोकांच्या मृत्यूने झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात, बुलढाण्याचा हा जैन कुटुंबाचा जीव वाचल्याची माहिती आली आहे.

हे कुटुंब १८ एप्रिल रोजी मुंबईहून जम्मू काश्मीर भेटीस गेले होते.
सोमवारचा दिवस (२२ एप्रिल) सकाळी हॉटेलमालकाने अचानक फायरिंग सुरू झाल्याच्या धोक्याबाबत कुटुंबाला सावध केले.

कुटुंबातील सदस्य हे हॉटेलच्या आतच सुरक्षित होते, ज्यामुळे ते बचावले.
या कुटुंबात जिल्हा प्रतिनिधी अरुण जैन यांचा भाऊ, त्यांची पत्नी आणि तीन मुले यांचा समावेश आहे.

हल्ल्याच्या वेळेस त्यांचा जीव वाचवण्याकरिता हॉटेलमालकाचा मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचा ठरला.

पाहलगाममधील हल्ल्याचा संक्षिप्त आढावा:

काश्मीरच्या पहलगाम येथील हा दहशतवादी हल्ला मंगळवारी दुपारी झाला, ज्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा देखील समावेश आहे.

सुरक्षा दलांनी त्वरित परिस्थिती हाताळली असून, भारतीय सैन्य, CRPF व स्थानिक पोलिसांनी मोठा मोर्चा काढला आहे. या हल्ल्यामुळे जागतिक नेत्यांनीही भारतासोबत एकजुटीची भावना व्यक्त केली आहे.

बुलढाण्यातील जैन कुटुंबाचे तपशील:

नावे: निलेश जैन, पारस अरुण जैन, ऋषभ अरुण जैन, सौ. श्वेता निलेश जैन, अनुष्का निलेश जैन
कुटुंब मुंबईहून काश्मीरला गेले होते, आणि जम्मू काश्मीरमधील विविध ठिकाणी फिरून २१ तारखेला पहलगाममध्ये आले.

२२ एप्रिल सकाळी हॉटेलमधून बाहेर पडण्याचा विचार असताना, हॉटेलमालकाने गोळीबार चालू असल्याचे सांगून बाहेर न जाण्याचा सल्ला दिला.

Pahalgam Terror Attack:या प्रकारातील मदतीने दहशतवादी हल्ल्यातून अनेकांचे प्राण वाचवले जात आहेत, तर इतर ठिकाणी सुरक्षा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

Nail loss Case / केस व नख गळती प्रकरण: केंद्रीय पथकाची बोंडगावात रुग्णांची तपासणी

 

बुलढाणा: जिल्ह्यातील बोंडगाव व इतर काही गावांमध्ये वाढत असलेल्या केस व नख गळतीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाने आज शेगाव तालुक्यातील बोंडगाव येथे भेट दिली.

त्यांनी रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती घेतली आणि आवश्यक नमुने संकलित केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते उपस्थित होते.

Wardhanews/ वर्धा जिल्ह्यात 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

या पथकात ICMR, राष्ट्रीय रोग नियंत्रण विभाग, जल जीवन मिशन अंतर्गत पाणी गुणवत्ता विभाग, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे त्वचारोग तज्ज्ञ, FSSAI, भारतीय गहू व जव संशोधन केंद्र (हरियाणा), प्लांट क्वारंटाईन विभाग आणि कृषी मंत्रालयाचे तज्ज्ञ यांचा समावेश आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव व नांदुरा तालुक्यातील एकूण तेरा गावांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या निर्देशानुसार हे तज्ज्ञ पथक जिल्ह्यात दाखल झाले असून, गावोगावी जाऊन रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून आजाराच्या मूळ कारणाचा शोध घेत आहे.

Nail loss Case:ही कारवाई आजाराच्या स्रोताचा शोध घेऊन योग्य उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित करण्यात महत्त्वाची ठरणार आहे.