Home Breaking News Wardhanews/ वर्धा जिल्ह्यात 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट नागरिकांनी काळजी...

Wardhanews/ वर्धा जिल्ह्यात 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट नागरिकांनी काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

0
488

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Wardhanews:वर्धा :- दि. 22 :भारतीय हवामान खात्याने वर्धा जिल्ह्यात दि. 23 व 24 एप्रिल रोजी यल्लो अलर्ट व दि.15 एप्रिल पासुन तापमानामध्ये बरीच वाढ होऊन तापमान 40 अंश सेल्सअस पेक्षा जास्त नोंदविल्या गेले आहे. उष्मालाटेमुळे संवेदनशीलगट यामध्ये कामगार, शेतकरी, रस्त्यावरील विक्रेते, वयोवृध्द, बालके, स्त्रिया इत्यादीवर प्रतिकुल परिणाम होऊन त्यांच्या आरोग्यावर धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात नागरिकांनी व संबंधीत यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

काय करावे सर्वांसाठी अत्यावश्यकः- तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या, अपस्मार, हृदयरोग, मुत्रपिंड, यकृतविषयक आजारामुळे ज्यांना शरीरात द्रवपदार्थ टिकवण्याचा प्रश्न येतो. त्यांनी डॉक्टराच्या सल्ल्यानंतरच द्रवपदार्थ किंवा पाणी प्राशन करावे, ओआरएस (ORS) म्हणजेच तोंडाने घ्यावयाचे शरीरातील पाणी वाढवणारे द्रवपदार्थ, घरगुती लस्सी, भाताची पेज, लिंबूपाणी, ताक. नारळाचे पाणी घ्या.

हलक्या रंगाचे वजनाला हलके आणि सैलसर सुती कपडे वापरा, घराबाहेर असाल तर डोके झाका एखादे कापड वापरा, टोपी घाला, दुपट्टा किंवा छत्री वापरा डोळ्याच्या सुरक्षेसाठी गॉगल वापरा आणि उन्हापासून कातडीचाही बचाव करायला सनस्क्रीन वापरा. अतिउष्णतेमुळे ज्यांना सर्वाधिक हानी पोहोचेल असे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, आजारी किंवा स्थूल व्यक्तीची विशेष काळजी घ्या. दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपाचा वापर करावा.

Policenews / रेडीमेड कापड दुकानातील वादावरून तीन जणांकडून व्यापाऱ्यावर हॉटेलमध्ये हल्ला..

उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही किंवा माहितीचा वापर करण्यात यावा. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती शक्यतो पांढरे कपडे वापरावेत नोकरदार व कामगारांसाठी :- कामाच्या जागी पिण्याचे थंड पाणी पुरवा. सर्व कामगारांसाठी विश्रांतीसाठी सावलीची जागा, स्वच्छ पाणी, ताक, प्रथमोपचार पेटी, आईस पंक आणि ओआरएसही ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात यायचे टाळावे. कामाची आखणी अशी करा की, ताणाच्या श्रमाच्या कामांसाठी दिवसातला तुलनेने कमी वेळ निवडला जाईल. उघड्यावर काम करणाऱ्यांना विश्रांतीच्या वेळा अधिक ठेवा आणि कालावधीही वाढवा अतिउष्णतेच्या क्षेत्रात नव्याने काम करत असलेल्या कामगारांना हलके काम द्या.

कामाचे तास कमी ठेवा. गरोदर महिला आणि आजार असलेल्या व्यक्तीकडे अधिक लक्ष द्या.इमारत अथवा घरे थंड ठेवण्यासाठी :- सूर्यप्रकाश परावर्तित करणारा पांढरा रंग वापरा, छत थंड ठेवणारं तंत्रज्ञान, हवेशीर, हलके, थर्माकोलचे आवरण वापर ज्याद्वारे कमी किमतीत थंडपणा राखता येईल. उष्णता बाहेरून आत येण्याऐवजी ती बाहेरच फेकली जावी, यासाठी तात्पुरते अल्युमिनियम आच्छादित पट्ट्यांसारखे परावर्तक खिडक्यांवर बसवा अथवा ग्रीन नेट चा वापर करा. घर थंड ठेवा, गडद रंगाचे पडदे वापरा रात्री काळ्या काचा, उन्हापासून बचावाची सोय असलेली छते, खुल्या खिडक्या असू द्या शक्यतो सर्वात खालच्या मजल्यावरच राहा. हरित छप्पर, हरित भिती, घरांतर्गत वनस्पती इमारत नैसर्गिकरीत्या थंड बनवून उष्णता कमी करतात.

वातानुकूलन यंत्राचे तापमान २४ सेल्सीअस किंवा त्यापेक्षा जास्त ठेवा. यातून विजेचे बिलही कमी येईल आणि आरोग्यही चांगले राहील.पशुधनासाठी :-पशुधन सावलीच्या छताखाली ठेवा आणि त्यांना भरपूर स्वच्छ आणि थंड पाणी द्या. त्यांच्याकडून सकाळी 11 ते दुपारी 4 काम करून घेऊ नका.

प्राण्याच्या आस-याच्या ठिकाणी छतावर स्ट्रॉच्या नळ्यांनी आच्छादन करा, त्याला पांढरा रंग द्या किंवा शेणाच्या प्लास्टरद्वारे तापमान कमी करा. पशुधनाच्या शेडमध्ये पखे, पाण्याचे फवारे करणारे यंत्र वापरा. अतिउष्णतेच्या वेळी पाण्याचे फवारे मारा आणि प्राण्यांना जवळच्या पाण्याच्या स्रोतावर थंड करण्यासाठी घेऊन जा. त्यांना हिरवे गवत, प्रोटीन फॅटला फाटा देणारा पूरक आहार द्या, मिनरल्सचे मिश्रण आणि मीठ द्या. तुलनेने थंड हवेत त्याना चरू द्या.

काय टाळावे:-उन्हात जायचे टाळा, विशेषतः दुपारी 12 ते 03 मध्ये दुपारी बाहेर असताना श्रमाची कामे टाळा. अनवाणी बाहेर जाऊ नका. अतिउष्णतेच्या काळात स्वयंपाक करणे टाळा.

दारे खिडक्या उघड्या ठेऊन अन्न शिजवण्याचे क्षेत्र स्वयंपाकघर हवेशीर राहील हे बघा. अल्कोहोल म्हणजे दारू, चहा, कॉफी, शीतपेये टाळा त्यातून शरीरातले पाणी कमी होते. उच्च प्रथिनयुक्त मिठाचं प्रमाण जास्त असलेले किंवा तिखट तसेच तेलकट अन्न खाऊ नका.

शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. चमकणारे दिवे किंवा बल्ब्ज वापरू नका, त्यातून अनावश्यक उष्णता निर्माण होते. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.

Wardhanews / आवश्यक खबरदारी घेवून स्वतःची त्याच प्रमाणे आपल्या कुटूंबियांची व मित्र परिवाराची काळजी घ्यावी व प्रशासनाकडून निर्गमित होत असलेल्या सुचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सचिव श्रीपती मोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here