Home Blog Page 534

छत्तीसगढ व मध्यप्रदेश_सिमेवर असलेल्या महाराष्ट्रातील देवरी तालुक्यात मनसेत_भव्य_पक्षप्रवेश

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर
हे केवळ दृश्य नव्हे सत्यता आहे,

आज गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्या मध्ये मनसे प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थितीत भव्य पक्ष प्रवेश सोहळा घेण्यात आला. देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश घेतला तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मनसे प्रदेश सरचिटणीस मा. हेमंत भाऊ गडकरी यांनी अतिशय मोलाचा मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात नागपुर शहराचे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक संतोष धोटे, जिल्हा उपाध्यक्ष योगेश चनापे, शहर अध्यक्ष प्रशांत निकम, कामगार सेना उपचिटणीस गणेश मुदलीयार, गोंदिया जिल्हा अध्यक्ष हेमंत लिल्हारे, जिल्हा उपाध्यक्ष मुकेश कुमार मिश्रा, जिल्हा उपाध्यक्ष लेखू रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना गवली, कार्यक्रम संचालन तालुका अध्यक्ष सुरेश ठाकरे, देवरी तालुका अध्यक्ष शैलेश राजनकर, सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष अमोल लांजेवार, गोंदिया शहर अध्यक्ष राजेश नागोसे,देवरी शहर अध्यक्ष मंगेश चौबे, देवरी मनविसे शहर अध्यक्ष मोहीत तुरकर, शहर उपाध्यक्ष राकेश चव्हाण, शहर उपाध्यक्ष क्षितिज वैद्य, रजत बागडे, तसेच सर्व मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पाडला.

झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी स्वखर्चाने टँकर पुरवठा.

0

 

बोर‌गाव बु!! येथे खाजगी टँकरने पाणीपुरवठा..

धरण उष्याशी पण कोरड घश्याशी अशी झाली अवस्था…

जाफराबाद तालुक्यातील बोरगाव बु येथील गाव पाणीपुरवठ्याची विहीर पाण्याने अगदी भरलेली असून सुद्धा गावाला पाणी मिळत नाही.आणि या प्रश्नाने गावकरी बऱ्याच दिवसापासून हतबल झाले आहेत. गावकऱ्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पाणी सोडण्याची मागणी केली असून देखील गावाला पाणी मिळत नसल्याची खंत गावकरी व्यक्त करीत आहेत.
गावच्या पाणी पुरवठा विहिरीत मोठा पाणी साठा असून गावाला पाणी प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे आणि हे केवळ ग्रामपंचायत प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे होत असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.कधी पाणी पुरवठ्याची टाकी भरली जात नाही,तर कधी पाईप लाईन तुटली तर कधी टाकी भरण्यासाठी वीज नव्हती अशी एक ना अनेक कारणे ग्रामपंचायत तयार ठेवत असते आणि या मध्ये सर्वात जास्त धावपळ ती गावकऱ्यांची होत आहे.अश्यात गावकऱ्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन देऊन पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली होती परंतु त्याचाही काही फायदा गावाला झाला नसल्याचे गावकरी सांगत आहेत.
तसेच गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत वॉटर फिल्टर देखील बसविण्यात आलेले आहे परंतु गेले कित्येक दिवस कित्येक महिने झालेत परंतु त्या फिल्टर ला देखील पाणी येत नाही त्यासाठी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.आणि विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात या गावाला धामना नदीच्या पाण्याने वेढा देऊन पाणी अक्षरशः गावात घुसले होते गावाला अगदी मे ते जून महिन्यापर्यंत सुद्धा कधीच पाण्याची टंचाई येत नाही. पाणी पुरवठ्याच्या विहिरीला पाणी देखील भरपूर आसून केवळ चुकीच्या नियोजनामुळे किंव्हा हलगर्जी पणामुळे गावाला पाणी मिळत नाही म्हणजे धरण उष्याशी आणि कोरड घाष्याशी अशी आमची अवस्था झाली आहे असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु बोरगाव येथे आताच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली त्यामध्ये पूजा प्रमोद फदाट हे निवडून आले आणि त्यांनी स्वतः हा स्व खर्चाने ट्रॅकर भाड्याने लाऊन स्वतःच्या विहिरीवरून टँकर भरून आणून गावाला पाणी पुरवठा करत आहेत. आणि आता तरी योग्य नियोजन करून गावाला नियमित पाणी पुरवठा करावा अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.

यावल चोपडा मार्गावरील रस्त्यावर अपघाताची मलिका सुरूच आजच्या दृर्घटनेत दोन मोटरसायकलींचा अपघात चार जख्मी

0

 

( प्रतिनिधी)विकी वानखेडे

. येथील यावल चोपडा मार्गावरील रस्त्यावर फॉरेस्ट कार्यालया जवळ आज दुपारी १ वाजेच्या सुमारास दोन दुचाकी मोटर वाहनांचा अपघात होवुन यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली असुन , यातील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असुन दोन जणांना प्राथमिक उपचार करण्यात आल्याचे वृत आहे . या संदर्भातील मिळालेली माहीती अशी की सावदा तालुका रावेर येथील राहणारे संतोष किसन भोई वय ३० वर्ष आणी भुसावळ येथील राहणाऱ्या आशा विनोद भोई वय २५ वर्ष हे त्यांच्याकडील मोटरसायकल क्रमांक एमएच १९डीडी ५८६२या वाहनाने सावदाहुन तोरखेडा तालुका शहादा येथे बहीणीकडे जाण्यास निघाले असतांना यावल चोपडा मार्गावर शहरापासुन सुमारे १ किलोमिटर लांबी असलेल्या फॉरेस्ट कार्यालयाच्या परिसरा जवळील रस्त्यावर चोपडया हुन यावल कडे येणाऱ्या मोटर सायकलने समोरासमोर धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष भोई आणी आशा भोई व अन्य दोन जंण असे चार जण जखमी झाल्याचे वृत्त मिळाले आहे . यातील दोन गंभीर जख्मींना ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार केल्यावर त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय जळगाव पाठवण्यात आले असुन , घटनेच्या ठीकाणी पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यास पहोचल्याचे वत्त आहे. अपघातातील जख्मीना मदतीसाठी रिपाईचे कार्यकर्त विष्णु पारधे, यावल येथिल भोई समाजाचे कार्यकर्त भिका भोई व अन्य सामाजीक कार्यकर्त्यांनी मदत केली .दरम्यान यावल चोपडा मार्गावरील रस्त्याची अवस्थाही अत्यंत दयानिय झाली असुन , या मार्गावर वारंवार अपघात होत असुन देखील यावल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामचुकार कारभाराऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्यावर ही याची साधी दखल घेतली जात नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागा कार्यपद्धती बाबत प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे .

पेनटाकळीच्या पात्रात शेतकऱ्याचे आमरण उपोषण !कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शेतीचे होता हे नुसकान !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

बुलढाणा जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेला मेहकर तालुक्यातील पेन टाकळी येथील प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे शेत जमिनीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुसकान होत असून जमीन नापीक होत आहे ‘म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी दिनांक 5 फेब्रुवारीपासून पेन टाकळी च्या पात्रांमध्ये आमरण उपोषणास सुरुवात केली आहे .सदर पाणी कालव्याद्वारे न नेता पाईप लाईन मधून ११ किलोमीटर पर्यंत नेण्यात यावे .नाही कालव्याद्वारे पाणी इतरत्र येते मात्र ‘अनेक ठिकाणी कालवा उंच व शेत जमीन खाली राहत असल्यामुळे वाहणारे पाणी शेतात साचते त्यामुळे मोठे नुसकान होत आहे ‘मेहकर तालुक्यातील ब्रह्मपुरी ‘दुधा ‘रायपुर ‘ पेण टाकळी ‘आधी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेत जमिनी मध्ये बाराही महिने पाणी साचत राहते ‘त्यामुळे शेतातून उत्पन्न काढणे कठीण झाले आहे ‘त्यामुळे कालव्याचे पाणी पाईपलाईन द्वारे देण्यात यावे ‘या मागणीसाठी शेतकर्‍यांनी पेनटाकळी प्रकल्पावरच आमरण उपोषणास सुरुवात केली आहे ‘यामध्ये ‘सतीश मस्के ,गजानन रहाटे, निखिल पवार, नंदकिशोर पागोरे, दत्तात्रय बाहेकर, दीपक पागोरे, संजय बाहेकर, काशिनाथ बाहेकर ,महादू अवचार, नंदकिशोर काळे ,एकनाथ सास्ते,इतर शेतकऱ्यांचा यात समावेश आहे .प्रकल्पाच्या पाण्यामुळे नुसकान भरपाई पोटी दहा हजार रुपये द्यावे अशी मागणीही यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे ‘आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे प्रशासन कसे लक्ष देते हे पाहणे औचित्याचे ठरेल ‘

शेतकऱ्याच्या शेतातील गोठ्यास अचानक लागली आग शेतकऱ्यांचे एक लाखाचे नुसकान. 

0

 

सिंदखेड राजा ( सचिन खंडारे )

गोरेगाव तालुका सिंदखेड राजा येथेदिनांक 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान गावालगतच असलेल्या गोट्याला आग लागून प्रल्हाद बागुलकर राहणार गोरेगाव तालुका सिंदखेड राजा या शेतकऱ्यांची लागलेल्या आगीमध्ये जवळपास एक लाखाहून अधिक रुपयाचे नुसकान झाले आहे. लागलेल्या सात ते आठ सोयाबीन चे पोते अंदाजे किंमत 36 ते 37 हजार रुपये ची सोयाबीन आगीमध्ये जळून खाक झाली तसेच दोन स्पिंकलर सट, शेती उपयोगी अवजारे, इत्यादी साहित्य लागलेल्या आगीमध्ये जळून प्रल्हाद बागुलकर या शेतकऱ्यांची अंदाजे एक लाख रुपयांपेक्षा जास्त नुस्कान झाले आहे. नेमकी आग कशामुळे लागली होती याचे कारण कळू शकले नाही. परंतु ग्रामस्थांनी वेळेवर मदत करू आग लवकरच आटोक्यात आणली त्यामुळे फार मोठा अनर्थ टळला. लागलेल्या या आगीमध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्याला काहीतरी मदत मिळावी अशी शेतकरी प्रल्हाद बागुलकर यांची मागणी आहे.

भारतीय जनता पार्टी च्या वतीने महावितरण कार्यालयाला ताला ठोको आंदोलन 

0

 

आज ५ फ्रेबुबारी रोजी भारतीय जनता पार्टी संग्रामपूर तालुक्याच्यावतीने लॉकडाऊन च्या काळात महविकास आघाडी सरकारद्वारे वीज देयके कमी करण्यात येतील व १०० युनिट वापरा पर्यंत शेतकरी बांधवांचे वीज देयके माफ करण्यात येतील अशी घोषणा ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी केली होती परंतु आता वीज देयके तर माफ करण्यात आली नाहीतच उलट दिलेली वीज देयके भरावेच लागतील असे मा.ऊर्जा मंत्री यांनी जाहीर केले व राज्यातील ७८ लाख वीज कनेक्शन कापण्याचे काम सुरू आहे तसेच शेतकऱ्यांना डि पी जळाल्यानंतर थकित वीज बिलांच्या ८० टक्के रक्कम भरल्यानंतरच डिपी देण्यात येईल असे आदेश दिले याविरोधात
आज५ फेब्रुवारी रोजी महावितरण कार्यालयावर महाराष्ट्र भर ताला बंद व हल्ला बोल आंदोलन सब स्टेशन वीज वितरण कार्यालय संग्रामपूर येथे करण्यात आले ह्यावेळी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकेश राठी जिल्हा सदस्य डॉ गणेश दातीर मा सभापती पांडुरंग हागे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानदेवराव भारसाकडे विलास इंगळे यांनी भाषणातुन राज्य सरकारला धारेवर धरलेवर सदर आंदोलन *माजी कॅबिनेट मंत्री तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.डॉ.संजयजी कुटे* यांच्या नेतृत्वात करण्यात आले ह्यावेळी सभापती सौ नंदा ताई हागे ,अंबादास चव्हान ,उध्वराव व्यवहारे ,सुभाष हागे, प्रमोद गोसावी ,राजेश मुयांडे, सुधाकर शेजोळे ,भगवान राठी, अविनाश धर्माळ ,संजय उमाळे, रविन्द्र झाल्टे ,गुनवंत खोडके ,गजानन मानखैर, नारायण अवचार, विशाल लोणकर ,भास्कर धुळे ,भागवतराव मारोडे ,संजय कौलकार ,संजय ठाकरे सह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकरीपुत्र अभ्यासिकेची जनक रजेशभाऊ गावंडे यांच्या कार्याची शासनाचे दखल घ्यावी – विद्यार्थ्यांची मागणी

0

 

नांदुरा :- (प्रफुल्ल बिचारे पाटिल )

महाराष्ट्रातील आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या आणि सततच्या दुष्काळाने पीडित असलेल्या विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात गेल्या ५ वर्षांपासून राजुभाऊ गावंडे या सर्वसामान्य शेतकरी पुत्राने कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता गरिबांचे शेतकर्यांचे मुले मुली शिकाव्या यासाठी शेतकरी पुत्र अभ्यासिका नांदुरा येथे सुरू केली.या अभ्यासिकेत विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली.जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू व्हावी.आणि याच तळागाळातील मुलांना सरकारी सेवेत रूजू करून त्यांचे अठराविश्व दारिद्र्य दूर व्हावे.याचे प्रामाणिक प्रयत्नांनी अभ्यासिकेतील ८३ विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड झाली ते राजुभाऊ यांनी स्थापन केलेल्या शेतकरीपुत्र अभ्यासिकेमुळे. त्यामुळे या महान व्यक्तीची शासनाने दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात यावे. यामुळे अनेक लोक यातून प्रेरणा घेऊन गावागावात शेतकरी पुत्र अभ्यासिका सुरू होतील आणि प्रत्येक गावातून MPSC /UPSC मधून शासकीय सेवेत रुजू होतील. अशी मागणी शेतकरी पुत्र अभ्यासिकेमधील शेकडो विद्यार्थिनी निवेदनाच्या माध्यमांतून तहसीलदार यांच्याकडे केली.

फ्रन्टलाइनमध्ये पत्रकारांनाही कोरोनाची लस द्या व कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना विम्याची रक्कम द्या… टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी…

0

 

बुलडाणा :- कोरोना काळामध्ये कर्मचारी सोबत काम करणाऱ्या पत्रकारांनाही फ्रंट लाईट मध्ये समावेश करून त्यांनाही कोरोना लसी देण्यात यावी व कोरोना काळामध्ये कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना तात्काळ विम्याची पन्नास लक्ष रुपयांची रक्कम देण्यात यावी या मागणीसाठी टीव्ही जर्नालिस्ट असोशियनच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी असोशियन चे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, समन्वयक कासिम शेख,कोषाध्यक्ष दीपक मोरे, प्रवक्ता संदीप शुक्ला, गणेश सोळंकी,संजय जाधव, प्रसिद्धीप्रमुख नितीन कानडजे पाटील, बुलडाणा समन्वयक निलेश राऊत तालुका हे उपस्थित होते. तर जिल्हा पत्रकार संघाकडूनही पत्रकारांना कोरोना लस देण्या विषशी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे हे उपस्थीत होते.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी 5 फेब्रुवारीला बुलडाण्याच्या लोणार येथे दौऱ्यावर आले होते.

कोरोना काळामध्ये ज्याप्रमाणे आरोग्य कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, अधिकारी समाज सेवा करण्यासाठी कार्यरत होते,यांच्या खांद्याला खांदा लावून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेले पत्रकार सुद्धा कोरोना काळात समाजामध्ये जनजागृतीचे काम करत होते, त्यांचा समावेश सुद्धा कोरोना लसीकरण करताना फ्रन्टलाइन कर्मचारी म्हणून करण्यात यावा व सर्व पत्रकार बांधवांना ही लस देण्यात यावी. सोबतच कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबीयांना विमा निधीतून पन्नास लाख रुपये तात्काळ देण्यात यावी अशी मागणी टिव्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे आज लोणार येथे करण्यात आली.

सॉटसर्कीट मुळे घराला लागली आग थोडक्यात बचावला घरातील लोकांचा जिव,१,५२,२०० रुपयांचे नुकसान…….

0

 

गोंदिया शैलेश राजनकार

गोोंदिया तालुक्यातील शिरपुर बांध ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या कुंभारटोला गावातील फिरगीं मंगलु कुवरडेलीया यांच्या घराला दि.४ जानेवारी ला सांयकाळी ७.३० वाजता आग लागल्याची घटना घडली. या घटनेत घर मालकाचा सुमारे १,५२,२०० रुपयाचा नुकसान झाला आहे.

सविस्तर असे की, कुंभारटोला गावात वास्तव्यास असनारे फिरंगी मंगलु कुवरडेलीया हे गावाच्या पलिकडे आपल्या नविन घराच्या बांधकामाकरीतां सांयकाळ दरम्यान घरातील सगळे लोकांसह गेले असता ,सांयकाळीच सुमारे ७.३० वाजता त्यांच्या घराला आग लागली असल्याचे समजुन आल्याने गावातील लोकानीं ती माहीती त्यांच्या पर्यंत पोहचवन्यात आली व घराला लागलेल्या आगीवर गावातील लोकांच्या सहकार्याने ताबा मीळविण्यात आनण्यात आला .

पंरतु आग आटोक्यात येई पर्यंत घर मालक फिरंगी कुवरडेलीया यांचा घरात असलेली रोख रक्कम रु ९०,००० हजार , कवेलु – यसिमेटं सीट ११,२००, बास-बल्ली ३०००, कपडे-भाडें-ईत्यादी २०,०००, खाण्याचे सामान व ईतर साहीत्य १०,००० दिवान- फ्यान १८,००० अशा येकुन १,५२,२०० रुपयांचा नुकसान झाला असुन या घटनेचा पंचनामा स्थानीक पटवाळी यानीं केला व घराला लागलेली आग ही सॉट सर्कीट मुळे लागली असल्याचेही सागंण्यात आले आहे. नुक्सान ग्रस्त घरमालकनी जास्तीत जास्त मुआवजा मिळावा हीच मागनी शासन व प्रशासनाला केली आहे.

सिंदखेड राजा येथे अखेर लसीकरणाचा शुभारंभ !आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली कोविड ची लस !कोविड ची लस न घाबरता घ्यावी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र साळवे यांचे आव्हान

0

 

सिंदखेडराजा (सचिन खंडारे )

बहु प्रतिक्षेत असलेल्या कोविड लसीकरणाचा शुभारंभ अखेर सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ४ फेब्रुवारीपासून सुरू झाला ‘ज्या ठिकाणी लस ठेवलेले आहे अशा ठिकाणी सुसज्ज कक्षामध्ये सिंदखेडराजा नगरीचे नगराध्यक्ष श्री सतीश भाऊ तायडे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काझी इतर मान्यवर तसेच पत्रकार बंधु यांची प्रामुख्याने उपस्थिती होती ‘यावेळी लसीकरणाची सुरुवातग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ . एस एम बिराजदार यांना कोविड ची लस देऊन लसीकरणाची सुरुवात या वेळी करण्यात आली .यानंतर सिंदखेड राजा तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेंद्र कुमार साळवे यांनी सुद्धा ची लस देऊन कोविड ची लस पूर्णतः सुरक्षित आहे लोकांनी कोविड ची लस घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले ।किरकोळ हाता पायाला कणकण वाटणे अशी लक्षणे दिसून आली असल्यास ‘आशा स्वयंसेविका आरोग्य सेविका ‘आरोग्य सेवक यांच्याशी संपर्क करावा असे आवाहनही करण्यासाठी .घाबरण्याचे कुठलेही कारण नाही ‘कोविड लस घेणाऱ्या मध्ये प्रामुख्याने ‘तालुका आरोग्य अधिकारी डॉ .महिंद्र कुमार साळवे ‘तालुका आरोग्य सहाय्यक श्री ए बी तिडके ‘श्री नितीन इंगळे ‘ग्रामीण रुग्णालय सिंदखेड राजा चे ‘डॉक्टर गाणार ,डॉक्टर बुधवत डॉक्टर दराडे डॉक्टर मेहेत्रे ,डॉक्टर मस्के ,डॉक्टर शामली, डॉक्टर मनीषा ,डॉक्टर पवार,श्री दिलीप म्हहेत्रे ,श्री राठोड ‘श्रीमती डोंगरदिवे श्रीमती संगीता ब्राह्मणे श्रीमती छाया सपकाळ श्रीमती गायकवाड श्री नागरे श्री मवाळ श्री मानवतकर श्रीमती वर्षा राठोड श्रीमती सीमा जाधव श्रीमती मायावती मस्के श्री श्री वसीम शेख सह इतर कर्मचाऱ्यांनी कोविड ची लस यावेळी घेतली ‘, कोविंड ची लस पूर्णतः सुरक्षित असून इतरांनी न घाबरता ची लस घ्यावी असे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र साळवे यांनी केले आहे ‘